Loksabha 2019 ः वेळ आल्यास मंत्रीपदही सोडू- रामदास आठवले

Loksabha 2019 ः वेळ आल्यास मंत्रीपदही सोडू- रामदास आठवले

उल्हासनगर- शिवसेना भाजप युती झाली असली तरी आम्हाला एकही जागा सोडण्यात न आल्याने आम्ही दुःखी असल्याचे केंद्रिय मंत्री रामदास आठवले यांनी सांगितले. त्याचबरोबर, प्रकाश आंबेडकर जर ऐक्याच नेतृत्व स्वीकारण्यास तयार असतील तर त्यांना अध्यक्ष पद देण्यास माझी तयारी आहे, वेळ प्रसंगी मला मंत्रीपद सोडण्याची वेळ आल्यास मंत्री पद सोडू, असेही ते म्हणाले.

आरपीआयच्या एका पदाधिकाऱ्याच्या आईचे दुःखद निधन झाल्याने आठवले आज उल्हासनगरात आले होते, यावेळी आठवले यांनी पत्रकारांशी संवाद साधला. सेना भाजप युती झाली असली तरी आम्हाला एक ही जागा सोडण्यात न आल्याने आम्ही दुःखी असून सेना आणि भाजपने आम्हाला एक-एक जागा सोडावी अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली. तसेच, सर्जिकल स्ट्राईक वर कोणी राजकारण करू नये, राज ठाकरे यांनी पुलवामा हल्ल्याबाबत केलेले वक्तव्य बालिश आरोप असल्याचं रामदास आठवले यांनी यावेळी म्हटले आहे.

पाकिस्तानने दाऊदला आणि अजहर मसूदला भारताच्या ताब्यात दिले पाहिजे, आतंकवाद्याचा खात्मा करण्यासाठी पाकिस्तानने भारताची साथ दिली पाहिजे, पाकिस्तान ने नरेंद्र मोदींच्या सब का साथ सबका विकास वाक्याप्रमाणे इम्रान खान यांनी सुद्धा बोलले पाहिजे, भारत आणि पाकिस्तानचा विकास सर्वांचा विकास या प्रकारची पाकिस्तानने भूमिका घेतली पाहिजे, असे मत आठवले यांनी यावेळी व्यक्त केले.

सोशल मीडियावर एकमेकांवर पोस्ट टाकून टीका केल्या जात आहेत, रिपब्लिकन पक्षाचे ऐक्य होणं आवश्यक आहे. तसेच येत्या लोकसभा निवडणुकीत भाजप तीनशे जागांवर निवडून येणार तसेच एनडीए केंद्रात 400 जागा मिळवून सत्ता स्थापन करणार असा आठवले यांनी विश्वासही यावेळी व्यक्त केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com