कोलकता - ‘भष्यिकालीन फायदा आणि समस्यांच्या निराकरणासाठी वैज्ञानिक संशोधन होणे आवश्यक आहे. विज्ञान हे अपयशी नाही तर प्रयोगशील असते. निरंतर प्रयोगाने जागतिक मानकांवर खरे उतरणारे आणि दर्जा राखणारे संशोधन व्हावे,’ असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी व्यक्त केले.
कोलकता येथे आयोजित भारत आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सवाचे उद्घाटन आज झाले. मोदी यांनी नवी दिल्ली येथून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थितांशी संवाद साधला. या वेळी सभागृहात पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनकर आणि केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉ. हर्षवर्धन उपस्थित होते. मोदी म्हणाले, ‘‘पूर्वी गरज ही शोधाची जननी आहे असे म्हटले जायचे, पण आता शोधांमुळे गरजांचे स्वरूप आणि मर्यादा वाढत आहेत.
आपल्या गरजेतून निर्माण झालेले प्लॅस्टिक आणि प्रदूषण यांवरील उपाय योजनांसाठी वैज्ञानिकांनी विचार करायला हवा. तसेच ऊर्जा संचयन, सौर ऊर्जा आणि बॅटरीची क्षमता वाढविण्यासाठी आवश्यक संशोधन आपण करायला हवे. ‘चांद्रयान-२’ मुळे देशातील नागरिकांच्या वैज्ञानिक दृष्टिकोनात वाढ झाली.’’ शुक्रवारपर्यंत (ता. ८) चालणाऱ्या या महोत्सवात वैज्ञानिक चर्चासत्रे व प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सवात देशातील सर्वांत मोठे विज्ञान प्रदर्शन भरविण्यात आले आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.