Manmohan Singh
Manmohan Singh

Bharat Bandh : मोदी सरकार बदलण्याची वेळ आली: मनमोहनसिंग

नवी दिल्ली : इंधन दरवाढीवरून माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार बदलण्याची वेळ आली, असे म्हटले आहे.

केंद्र आणि राज्यातील भाजप सरकारच्या विरोधात इंधन दरवाढीच्या मुद्यावर सर्व विरोधी पक्षांना एकवटण्याचा निर्धार काँग्रेस पक्षाने केला असून, आज (ता.10) देशभरात 'भारत बंद'ची हाक दिली आहे. सतत वाढणाऱ्या पेट्रोलच्या किंमतींवरून मोदी सरकारला लक्ष्य करत काँग्रेससह 21 विरोधी पक्षांनी बंद पुकारला आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी राजघाट येथे जाऊन दर्शन आंदोलनाला सुरवात केली. मनमोहनसिंग यांच्यासह सोनिया गांधीही आंदोलनात सहभागी झाल्या आहेत. दिल्लीतील प्रसिद्ध रामलीला मैदानात सर्व विरोधी पक्ष एकवटले असून, मोदी सरकारवर टीका करण्यात येत आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत आज सोळाव्या दिवशी वाढ झाली आहे.

यावरून मोदी सरकारला लक्ष्य करत मनमोहनसिंग म्हणाले, की सतत वाढणाऱ्या इंधन किंमतींचा फटका या सरकारला पुढील निवडणूक पाहायला मिळेल. मोदी सरकारला किंमतीत वाढ करण्यात रस आहे, देशहिताशी त्यांना काही देणेघेणे नाही. आता हे सरकार बदलण्याची वेळ आली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com