नवी दिल्ली : संसदेत महिला खासदाराने आज मास्क लावून भाषण करत सभागृहाचे लक्ष वेधले. या भाषणातून त्यांनी प्रदूषणाच्या विषयाकडे सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे. बंगालमधील तृणमूलच्या खासदार काकोली घोष यांनी हे भाषण केले आहे.
आपल्या भाषणात काकोली घोष यांनी म्हटले आहे की, जगातील दहा प्रमूख प्रदूषित शहरांमध्ये नऊ शहरे भारतातील आहेत. सध्या भारताच्या दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधानांनी यावर प्रतिकूल टिप्पणी केलीय. हे अयोग्य आहे. जर आपण, आपल्या देशात स्वच्छ भारत अभियान राबवू शकतो. तर, स्वच्छ हवा अभियान का नाही? आपण देशवासियांना स्वच्छ हवेत श्वास घेण्याचा अधिकार देऊ शकत नाही का? दिल्लीत श्वास घेण्यासारखी परिस्थिती नाही.
कोण आहेत काकोली घोष?
काकोली घोष या पश्चिम बंगालमधील बरासत लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. हा मतदारसंघ तृणमूल काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो. 1998नंतर पाच वेळा या मतदारसंघातून तृणमूलने विजय मिळवलाय. त्यात काकोली घोष यांनी तीन वेळा विजय मिळवला आहे. किकिला घोष या 2009पासून या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.