भाजप नेते म्हणतात, देशभक्तीच्या लाटेचे मतात रुपांतर करा

Bharat Pandya
Bharat Pandya

बडोदा : जम्मू काश्मीरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचे चित्र पूर्ण देशाने पाहिले आहे. त्यामुळे सध्या देशभक्तीच्या नावावर सगळे एकत्र आले आहेत. आपल्याला याचे रुपांतर मतांमध्ये करावे लागेल, असे वक्तव्य गुजरातमधील भाजप नेते भरत पंड्या यांनी केले आहे.

पुलवामामध्ये आत्मघाती हल्ल्यामध्ये हुतात्मा झालेल्या जवानांवरून गुजरातमधील भाजपच्या नेत्यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. या हल्ल्यात 40 जवान हुतात्मा झाले होते. भाजपकडून आयोजित कार्यकर्ता संवाद शिबिरामध्ये ते बोलत होते. 

पंड्या म्हणाले, की काश्मीरमध्ये जो हल्ला झाला...तुम्ही सर्वांनी त्याचे व्हिडिओ, फोटो पाहिले असतील. देशातील लोक सर्व मतभेद दूर करून राष्ट्रभक्तीमुळे एकत्र आले आहेत. या लोकांनी रॅली आणि आंदोलने करून देशाप्रती असलेले प्रेम दाखविले आहे. मनमोहन सरकारच्या वेळी मुंबईमध्ये हल्ला झाला होता तेव्हा कसे वातावरण होते? संसदेत कशाप्रकारे मुद्दा उठविण्यात येत होता. त्यावेळी अशी चर्चा होती की हल्लेखोर दहशतवाद्यांना स्थानिक पातळीवर मदत मिळत आहे. त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली जात होती. मात्र, आज स्थिती बदलली आहे. पुलवामामध्ये याआधीही अनेक हल्ले झाले आहेत. देशातील लोक दिवसरात्र हेच पाहत आहेत. पूर्ण देश राष्ट्रभक्तीच्या भावनेत आहे. या एकतेला मतांमध्ये परिवर्तीत करण्याची जबाबदारी आपली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com