‘ॲप’वरबंदी हा सर्जिकल स्ट्राईक; केंद्रीय दूरसंचारमंत्री रविशंकर प्रसाद यांचा दावा 

Ravi Shankar Prasad
Ravi Shankar Prasad

नवी दिल्ली - चीनच्या ५९ मोबाईल ॲपवर घातलेली बंदी म्हणजे भारताने केलेला ‘डिजिटल स्ट्राईक’ आहे, असे मत केंद्रीय दूरसंचार मंत्री रविशंकर प्रसाद यांनी आज व्यक्त केले. भाजपच्या जनसंवाद सभा मोहिमेमध्ये प्रसाद यांनी पश्‍चिम बंगालमधील पक्ष कार्यकर्त्यांना दिल्लीतून ऑनलाइन संबोधित केले. 

पश्‍चिम बंगालमधील सत्तारूढ तृणमूल काँग्रेस, देशावर संकट येते तेव्हा केंद्रातील सरकारला साथ का देत नाही? असा सवाल विचारून ते म्हणाले की, ‘‘ सध्या कोरोना आणि चीन या दोन ‘सी’ चीच चर्चा जगभर आहे. भारताला शांतीच हवी आहे आणि शेजाऱ्यांशी तर हवीच आहे. मात्र आमच्याकडे कोणी वाकड्या नजरेने पाहिले तर तेवढेच जोरकस प्रत्युत्तर दिले जाईल. गलवानमध्ये भारतापेक्षा चीनचे किमान दुप्पट सैनिक मारले गेले. मात्र आपले किती सैनिक मेले हे त्यांनी आजपर्यंत जाहीर केलेले नाही. वीस शूर भारतीय जवानांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही, असे स्वत- पंतप्रधान सांगत असतील तर त्याचा व्यापक अर्थ होतो. कारण हे सरकार जे बोलले ते करून दाखवणारे आहे.’’ 

५९ चिनी अॅपवर भारताने घातलेल्या बंदीला तृणमूल काँग्रेसने सुरू केलेल्या विरोधावर आश्‍चर्य व्यक्त करून प्रसाद म्हणाले की,‘‘ चीनच्या विरोधात साऱ्या देशभरात संतप्त भावना आहे. पण पश्‍चिम बंगालमध्ये सत्तारूढ पातळीवर काही वेगळेच चित्र दिसते आहे. जेव्हा- जेव्हा देशावर संकट येते तेव्हा बंगालचे सत्ताधारी देशाच्या सरकार बरोबर का नसतात हा गहन प्रश्न आहे.’’ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com