नवी दिल्ली : खोटारडेपणा, बढाया आणि दहशत हीच विद्यमान मोदी सरकारची तत्त्वे आहेत, असा हल्लाबोल काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांनी आज केला. कॉंग्रेसच्या संसदीय पक्षाच्या बैठकीत बोलताना त्यांनी ही टीका केली.
सोनिया म्हणाल्या, की केंद्र सरकारने देशात भीती आणि दहशतीचे वातावरण निर्माण केले आहे. कॉंग्रेसचे विद्यमान अध्यक्ष राहुल गांधी यांनी पक्षाच्या लाखो कार्यकर्त्यांना एकजूट करत त्यांना केंद्र सरकारच्या विरोधात लढण्याची प्रेरणा दिली आहे. राहुल हे सध्या सातत्याने केंद्रावर हल्लाबोल करत आहेत. राजस्थान, छत्तीसगड आणि मध्य प्रदेशातील विजयांमुळे पक्षात नवा विश्वास आणि आशावाद निर्माण झाला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत सत्ताधाऱ्यांना त्यांच्या बालेकिल्ल्यांमध्येच आपण पराभूत करू असा मला विश्वास आहे.
लोकशाही आणि धर्मनिरपेक्षता या देशाच्या मूलभूत तत्त्वांवरच सरकार घाला घालत आहे, अशी टीकाही सोनिया यांनी केली. या बैठकीला राहुल गांधी यांच्यासह माजी पंतप्रधान डॉ.मनमोहनसिंग, मल्लिकार्जुन खर्गे, गुलाम नबी आझाद आणि इतर वरिष्ठ नेते उपस्थित होते.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.