वंदे मातरम चा मुद्दा दिल्ली हायकोर्टात

‘वंदे मातरम' ला राष्ट्रगीताचा दर्जा मिळावा
Delhi High Court
Delhi High Courtsakal

नवी दिल्ली ; ‘वंदे मातरम' ला राष्ट्रगीताचा दर्जा मिळावा, या मागणीसाठी दाखल झालेल्या एका याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालयाने केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारला नोटीस बजावली आहे.दरम्यान याचिकाकर्ता न्यायालया आधी प्रसार माध्यमांकडे जातो याचा अर्थ हा एक ‘ पब्लिसीटी स्टंट' आहे, असे ताशेरेही न्यायालयाने ओढले.यावर ९ नोव्हेंबरला पुढील सुनावणी होणार आहे.भाजपचे ॲड. अश्विनी उपाध्याय यांनी ही याचिका दाखल केली आहे.

माजी राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांनी घटना समितीच्या एका बैठकीत, वंदे मातरम हेही स्वतंत्र भारताचे राष्ट्रगीत असल्याचा निर्वाळा दिला होता तसेच मद्रास उच्च न्यायालयानेही एक आदेश दिला होता त्यांचाही आधार उपाध्याय यांच्या याचिकेत घेण्यात आला आहे. त्यावर प्रभारी मुख्य न्यायमूर्ती विपीन सांघी न्यायालयाने आज केंद्र सरकारला नोटीस बजावून ६ आठवड्यांत सरकारचे यावरील लेखी मत मागविले आहे.याचिका दाखल करण्याआधीच माध्यमांना बाईट देण्याच्या उपाध्याय यांच्या सवयीबद्दल न्या. सांघी यांनीच ताशेरे ओढले व हा पब्लिसिटी स्टंट असल्याचे ताशेरे ओढले. अर्थात याचिका दाखल करून घेतल्याने त्यावर पुढील सुनावणी नोव्हेंबरात होणार हे निश्चित आहे.

दरम्यान उपाध्याय यांनी सांगितले की या एका गीतावर आमची स्वातंत्र्य चळवळ आधारित होती. आमच्या राष्ट्रध्वजातही प्रथम वंदे मातरमचाच उल्लेख होता. वंदे मातरम हे राष्ट्रीय गानाच्या दर्जाचेच राहील असे आमच्या पूर्वजांनी स्पष्ट केले आहे. मात्र याबाबत स्पष्ट दिशानिर्देश नसल्याने चित्रपट, धारावाहिक व रॉक बँड सारख्या प्रकारांतही वंदे मातरमचा दुरुपयोग होतो तोही रोखणे अत्यावश्यक आहे. रॉक बॅंडमध्ये वंदे मातरम असभ्य पध्दतीने गायिले जाते, त्याबद्दल कडक शिक्षेची तरतूद हवी.

देशातील विविध मुघल कालीन मशिदी व वास्तूंबरोबरच हिंदुत्ववादी, दक्षिणपंथी संघटनांनी ‘वंदे मातरम' चा मुद्दाही तापविण्यास सुरवात केली आहे. नव्या रणनीतीनुसार काशी, मथुरा व अन्य वादग्रस्त मशिदी हटविण्याबाबत यापुढे जन आंदोलनांएवजी न्यायालयांच्या मार्गाने जाण्याची व्यापक योजना संघपरिवाराने आखल्याची चर्चा आहे. याच मालिकेत ॲड. उपाध्याय यांनी वंदे मातरमला जन गण मन सारखाच राष्ट्रगीताचा दर्जा मिळावा अशा मागणीची याचिका न्यायालयात दाखल केली. मोदी सरकारने २०१७ मध्ये वंदे मातरम च्या गायनाबाबत नियमावली बनविण्यासाठी एका तज्ज्ञ समितीची स्थापना केली होती. त्या समितीचे काय झाले हे अद्याप समोर आलेले नाही.

जन गण मन हे देशाचे राष्ट्रगीत आहे. वंदे मातरमने भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात एतिहासिक भूमिका बजावलेली आहे. त्यामुळे ‘वंदे मातरम'लाही जन गम मन तकाच समान दर्जा व सन्मान मिळायला हवा.

- डॉ. राजेन्द्र प्रसाद (माजी राष्ट्रपती)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com