संसदेत कायदा करून राम मंदिर उभारा: विहिंप

vhp
vhp

नवी दिल्ली : राम मंदिराबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची आम्ही प्रतिक्षा करू शकत नाही. राम मंदिरासाठी संसदेत कायदा करून तातडीने राम मंदिर उभारावे, अशी मागणी विश्व हिंदू परिषदेने केली आहे.

न्यायालयीन प्रक्रिया संपुष्टात आल्यानंतरच राम मंदिर उभारणीबाबत अध्यादेश आणण्याचा विचार केला जाऊ शकतो, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी एएनआयला दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते. यावर प्रतिक्रिया देताना विहिंपने आज पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली. देशभरातून हिंदू संघटनांकडून राम मंदिर उभारण्याची मागणी होत आहे. शिवसेनेनेही नुकतीच ही मागणी केलेली आहे. 

विहिंपचे कार्यकारी अध्यक्ष अलोक कुमार यांनी म्हटले, की विहिंपची 31 जानेवारी आणि 1 फेब्रुवारीला धर्मसंसद आयोजित करण्यात आली असून, त्यामध्ये पुढील दिशा ठरणार आहे. राम मंदिराबाबत प्रतिक्षा करू शकत नाही. राम मंदिरावरील सुनावणी अजून लांब आहे. न्यायालयाने तातडीने सुनावणी करण्यास नकार दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची प्रतिक्षा करू शकत नाही. राम मंदिराबाबत हिंदू समाज न्यायालयाच्या निर्णयाची जास्त वेळ वाट बघू शकत नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com