नवी दिल्ली : शिरुरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी संसदेतील आपल्या पहिल्याच भाषणात सरकारला शालजोडीतले फटके लगावले. सत्ता संचलनासाठी विरोधी पक्ष आणि स्वायत्त संस्था आवश्यक आहेत. सीबीआय, रिझर्व्ह बॅंक, न्यायपालिकेची स्वायत्तता टिकून राहावी, असे आवाहन त्यांनी केले. पंतप्रधानांच्या शेतकरी सन्मान योजनेचा उल्लेख करताना डॉ. कोल्हे यांनी महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्यांकडे लक्ष वेधले. शेतकऱ्यांचा सन्मान व्हावा, शेतकऱ्यांचे स्मशान होऊ नये, असे आवाहन त्यांनी केले.
तसेच त्यांनी बैलगाडा शर्यत पुन्हा सुरु करावी, या महाराष्ट्रातील मागणीचा पुनरुच्चार करताना, ही शर्यत ग्रामीण अर्थव्यवस्था बळकट करणारी असल्याचा दावा केला. या शर्यतीसाठी उपयोगात येणाऱ्या खिलार बैलांचा शेतीच्या कामासाठी उपयोग होत नाही. शर्यत बंद असल्यामुळे नाइलाजास्तव शेतकऱ्यांना कत्तलखान्याची वाट धरावी लागते. हे गांभीर्य लक्षात घेऊन बैलगाडा शर्यतीसाठी अध्यादेश आणावा.
तसेच, छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक उभारून त्यांना आदरांजली देण्यासाठी शिवरायांची राजधानी किल्ले रायगड 17 व्या शतकात जसा होता तसा साकारावा. पूर्ण बहुमताचे सरकार असल्याने हे शक्य असल्याचेही त्यांनी म्हटले. सरकारने असे केले तर हे जगातील आठवे आश्चर्य असेल, असेही त्यांनी म्हटले आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.