देशातील 21 शहरांतील पाणी होणार 'गायब'

water
water

नवी दिल्ली : 'वायू' चक्रीवादळामुळे मॉन्सूनच्या वेळापत्रकावर परिणाम झाल्याने भारतातील अनेक शहरांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. येत्या 2020 पर्यंत राजधानी नवी दिल्ली, बंगळूर, चेन्नई, हैदराबादसह 21 शहरांतील भूगर्भातील पाणीपातळी संपुष्टात येईल आणि त्याचा फटका दहा कोटी नागरिकांना बसेल, असा इशारा निती आयोगाच्या अहवालातून देण्यात आला आहे.

2030 पर्यंत भारतातील लोकसंख्येच्या 40 टक्के नागरिकांना पिण्याचे पाणी नसेल, असे नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफार्मिंग इंडिया (निती आयोग) ने म्हटले आहे. पुढील वर्षी देशातील 21 शहरांना पिण्याच्या पाण्याच्या प्रश्‍नांचा सामना करावा लागणार आहे. बदलत्या वातावरणामुळे मॉन्सूनच्या वाटचालीवर विपरीत परिणाम झाल्याने दक्षिण आशियातील देशांना दुष्काळाला सामोरे जावे लागत आहे.

गेल्या पाच वर्षांत पाऊस हा सरासरीपेक्षा कमीच पडला असून, 2015 मध्ये 86 टक्के पाऊस पडल्याची नोंद आहे. मॉन्सूनला उशीर होत असल्याने चिंतेच भर पडत आहे. परिणामी, उष्णतेची लाट वाढत असून, आंध्र प्रदेश ते बिहार या राज्यातील तापमान तुलनेने उष्ण राहत आहे.

भारत सरकारने पाण्याच्या समस्येवर मार्ग काढण्यासाठी पाणी ऊर्जा मंत्रालयाची स्थापना केली आहे. देशातील 1 अब्ज 30 कोटी नागरिकांपैकी 60 टक्के नागरिक पावसाच्या पाण्यावर आणि शेतीवर अवलंबून आहेत. यादरम्यान राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी पाणी व्यवस्थापन आणि पुरवठा यात सुसूत्रता आणण्याचे आवाहन नवीन मंत्रालयाला केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com