...तर २०५० पर्यंत देशातली सगळी गरिबी आपण हटवू शकतो- गौतम अदानी

जागतिक बँकेच्या भारतातल्या गरिबीवरील अहवालानुसार, देशात २०११ ते २०१९ या कालावधीत देशातल्या गरिबीमध्ये १२.३ टक्क्यांची घसरण झाली आहे.
Gautam Adani richest person, Gautam Adani Latest News Updates, Gautam Adani on Indian economy
Gautam Adani richest person, Gautam Adani Latest News Updates, Gautam Adani on Indian economy Gautam Adani richest person

उद्योगपती गौतम अदानी यांनी देशाच्या अर्थव्यवस्थेबद्दल एक महत्त्वाचं विधान केलं आहे. जर भारत २०५० च्या अंदाजानुसार, ३० ट्रिलियन अमेरिकी डॉलर्सची अर्थव्यवस्था असलेला देश झाला तर देशातली एकही व्यक्ती उपाशीपोटी झोपणार नाही, असं अदानी म्हणाले आहेत. (Gautam Adani Latest News Updates)

टाईम्स नेटवर्कतर्फे आयोजित केलेल्या इंडिया इकॉनॉमिक कॉनक्लेव्हमध्ये बोलताना अदानी म्हणाले की, आपण २०५० पासून साधारणपणे १०,००० दिवस दूर आहोत. या काळात माझा अंदाज आहे की, आपण आपल्या अर्थव्यवस्थेत २५ ट्रिलियन अमेरिकी डॉलर्सची भर घालू शकतो. म्हणजेच प्रत्येक दिवशी आपण देशाच्या जीडीपीमध्ये २.५ बिलियन अमेरिकी डॉलर्सची भर घालू शकतो. माझा अंदाज आहे की या काळात आपण देशातून प्रत्येक स्वरुपातली गरिबी हटवू शकतो.

जागतिक बँकेच्या भारतातल्या गरिबीवरील अहवालानुसार, देशात २०११ ते २०१९ या कालावधीत देशातल्या गरिबीमध्ये १२.३ टक्क्यांची घसरण झाली आहे. २०११ मध्ये हे प्रमाण २२.५ टक्के होतं तर २०१९ मध्ये ते १०.२ टक्क्यांवर आलं आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com