अध्यक्ष कोणीही होवो; पण गांधी कुटुंब हवेच

अध्यक्ष कोणीही होवो; पण गांधी कुटुंब हवेच

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर राहुल गांधी हे कॉंग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्यावर ठाम असून, आता पक्षांतर्गत नव्या अध्यक्षच्या शोधासाठी चाचपणी सुरू आहे. याच पार्श्‍वभूमीवर ज्येष्ठ नेते मणिशंकर अय्यर यांनी गांधी नसणारी व्यक्तीदेखील पक्षाची प्रमुख होऊ शकते, असे नमूद करत गांधी कुटुंबाने मात्र संघटनेमध्ये सक्रिय राहायला हवे, असे मत मांडले. 

पक्षाच्या अध्यक्षपदी राहुल हेच असणे कधीही चांगले; पण त्याच वेळेस त्यांच्या इच्छेचादेखील सर्वांनी आदर ठेवायला हवा. नेहरू-गांधी कुटुंबांव्यतिरिक्त अन्य कोणतीही व्यक्ती जरी पक्षाची प्रमुख झाली, तरीसुद्धा आमचा पक्ष तरू शकेल, याची मला खात्री आहे. पण पक्षामध्ये गांधी कुटुंब सक्रिय असणे गरजेचे आहे, कारण जेव्हा पक्षात गंभीर मतभेद निर्माण होतील, तेव्हा त्यांचे निराकरण करण्याचे काम ते करतील.

राहुल यांनीही नवा अध्यक्ष शोधण्यासाठी पक्षाला एक महिन्याचा वेळ दिला असून, माध्यमांनीही आणखी महिनाभर वाट पाहावी, असा सल्लाही अय्यर यांनी या वेळी दिला. 

बिगर गांधी मॉडेल

भाजपलाच गांधीमुक्त कॉंग्रेस हवी असल्याने त्यांनी कॉंग्रेसमुक्त भारताची घोषणा दिली आहे. या जाळ्यामध्ये आपण अडकावे असे मला वाटत नाही. एखादी गोष्ट त्यांना सापडली आहे आणि आम्ही शोधण्यात ती अपयशी ठरलो आहोत, असे वाटून घेण्यात काही अर्थ नाही.

कॉंग्रेस पक्षाचा आत्माच काढून घेतला, तर त्या शरीराला काही अर्थ राहत नाही, असेही ते या वेळी म्हणाले. याआधीही गांधी कुटुंबाबाहेरची व्यक्ती पक्षाची अध्यक्ष झालेली आहे. यू. एन. देहबर ते ब्रह्मानंद रेड्डी यांच्यापर्यंतची परंपरा लक्षात घेतली, तर ही गोष्ट ठळकपणे आपल्या लक्षात येईल. याच मॉडेलचा आताही स्वीकार करता येईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com