सार्वभौमत्वासाठी ताकद पणाला लावू: राष्ट्रपती

Ramnath Kovind
Ramnath Kovind

कोईम्बतूर: देशाचे सार्वभौमत्व टिकविण्यासाठी भारत आपली सर्व ताकद पणाला लावेल, असे प्रतिपादन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज (शुक्रवार) केले. पुलवामातील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या हवाई दलाने पाकिस्तानात जाऊन केलेल्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रपतींनी हे वक्तव्य केले आहे.

भारताने शांततेच्या तत्त्वाचा कायमच पुरस्कार केला आहे. मात्र, ज्या वेळी आवश्‍यकता भासते, त्याप्रसंगी देशाच्या सर्व ताकदीचा उपयोग केला जातो. भारताची सैन्य दले भविष्यातही असामान्य कामगिरीचे दर्शन घडवतील, अशी मला आशा आहे, असे कोविंद म्हणाले.

सैन्य दलांनी या आधीही आपला पराक्रम आणि व्यावसायिकता दाखवून दिली असून, दहशतवाद्यांच्या ठिकाणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करत भारतीय हवाई दलाने नुकतीच त्याची प्रचिती दिली आहे, असे राष्ट्रपती म्हणाले.

हकीमपेठ येथील हवाई दलाच्या तळाला राष्ट्रपतींचा मानाचा ध्वज प्रदान करण्याचा कार्यक्रम कोविंद यांच्या हस्ते पार पडला. या वेळी बोलताना राष्ट्रपतींनी वरील विचार मांडले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com