पैसे वाटणारे भाजप नेते तेव्हा नाही दिसले

mamta-banerjee
mamta-banerjee

गारबेटा - निवडणूका असल्या की भाजप नेते रोख रक्कम घेऊन येतात आणि ती वाटतात, पण अम्फन चक्रीवादळ आले तेव्हा ते कधीही दिसले नाहीत, असा दावा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केला. त्यांनी सांगितले की, सरकारने मदत कार्य केले तेव्हा एखाद-दोन लाभार्थी वंचित राहिले असतील, पण आम्ही लोकांच्या मदतीसाठी धावलो. मानव संकटात सापडतो तेव्हा भाजप नेहमीच गैरहजर असतो. निवडणूकीच्यावेळी मात्र ते बाहेरून हेलिकॉप्टर, विमानातून येतात अन्् पैसे वाटून मते लुटतात, 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

राष्ट्रीय लोकसंख्या पुस्तिका (एनपीआर) योजनेवरून त्यांनी टीकेची झोड उठविली. त्या म्हणाल्या की, या योजनेची अंमलबजावणी करण्याच्या  नावाखाली केंद्रातील भाजप मतदारांची नावे वगळेल. गणना करणारे प्रतिनिधी घरी आल्यावर जे नागरिक नसतील त्यांची नावे वगळली जातील, पण बंगालमध्ये आम्ही एकाही कुटुंबाला किंवा नागरिकाला बाहेर घालवू देणार नाही. भाजप हा दंगलखोरांचा पक्ष असल्याचा आरोप करून त्या म्हणाल्या की, आम्हाला हिंसाचार, रक्तपात नको आहे. आम्ही बंगालमध्ये सुडाच्या राजकारण होऊ देणार नाही.

मन की बात लक्ष्य
निवडणूक आयोगात केंद्रीय गृह मंत्री अमित शहा ढवळाढवळ करीत असल्याच्या आरोप ममता यांनी केला होता. त्यावरून आयोगाने त्यांना ठणकावले होते. त्यानंतर ममता यांनी प्रतिहल्ला केला. मन की बात हा पंतप्रधानांचा कार्यक्रम निवडणूक आचारसंहितेचा भंग ठरत नाही का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. लसीवरून प्रसिद्धी लाटू नका असे आयोग मोदी यांना का सांगत नाही ? मन की बातमधून प्रत्येक गोष्ट सुरु आहे. आयोग त्यांच्यावर कारवाई का करीत नाही ?

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com