जयपूर : राजस्थानचे शिक्षण मंत्री गोविंद सिंह डोटासरा यांनी महिला शिक्षकांबद्दल वादग्रस्त विधान केल्यानं ते चर्चेत आले आहेत. "ज्या शाळेत महिला शिक्षकांचं प्रमाण जास्त असतं तिथं भांडणंही जास्त होतात" असं विधान त्यांनी आंतरराष्ट्रीय कन्या दिनानिमित्त आयोजित एका कार्यक्रमात केलं. त्यांच्या अजब विधानाची सर्वत्र चर्चा सुरु आहे.
शिक्षण मंत्री डोटासरा शिक्षकांना संबोधित करताना म्हणाले, "सरकारने प्रत्येक ठिकाणी महिलांना प्राधान्य दिलं आहे. महिलांनी थोडा अधिक प्रयत्न केला तर त्या आणखी पुढे जाऊ शकतात. आमच्याकडे अनेक शिक्षक येतात आणि म्हणतात शहराजवळच्या शाळेत आम्हाला नियुक्ती द्या, त्यावर आम्ही सांगतो तिथं जागा शिल्लक नाही. यावर ते म्हणतात, जागा कशी असेल सर्व महिला शिक्षकांना शहराजवळच्या शाळांमध्ये नियुक्ती देण्यात येते."
महिलांसाठी सरकारने अनेक चांगली धोरणं आखली आहेत. निवड आणि बढतीमध्ये महिलांना प्राधान्य देण्यात आलं आहे. पण अनेक लोकांना हे रुचत नाही. ते विचारतात, "आम्ही चांगलं शिकवत नाही का? पण मी आपल्याला सांगू इच्छितो की, तुमच्यामध्ये (महिला शिक्षक) आपसात भांडणंही जास्त होतात. ज्या शाळेमध्ये महिला शिक्षकांचं प्रमाण जास्त झालं की तिथं सगळा गोंधळच असतो"
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.