मुंबई- सत्तेत असूनही राम मंदिर बांधायला किंवा त्याबाबतचा कायदा करायला कोणी रोखले होते, असा सवाल राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेला आज करण्यात आला. चार वर्षांपासून सत्तेत आहात, मग तुम्हाला कोणी थांबविले होते. शिवसेना आणि भाजपचे लोक विषय संपविण्याचा विचार करत नाहीत, तर तो विषय तसाच भिजत ठेवण्याचा प्रयत्न करतात, अशी टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय सचिव, आमदार हेमंत टकले यांनी माध्यमांशी बोलताना केली.
शिवसेनेच्या मेळाव्यात अयोध्येत राम मंदिर बांधण्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. त्यावर आज आमदार टकले यांनी टीकास्त्र सोडले. लोकसभा निवडणुका जवळ आल्यावर शिवसेनेचे पक्षप्रमुख रोज एक नवीन भाषण देत असतात, त्यात कुणाचेही हित नसते.
देशातील आणि राज्यातील सामान्य नागरिक महागाईने होरपळत आहेत. देशाची आणि राज्याची आर्थिक स्थिती काय आहे? लोकांच्या काय समस्या आहेत? लोकांना असुरक्षित वाटत आहे का? सातत्याने "मॉब लिचिंग'चे प्रकार होत आहेत, यावर शिवसेनेची आणि ठाकरे यांची भूमिका काय आहे? असा सवाल टकले यांनी या वेळी केला. राम मंदिराच्या मुद्यावरून टकले यांनी भाजपलाही धारेवर धरले.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.