"टीईटी' नसलेल्या शिक्षकांना संरक्षण द्या! 

"टीईटी' नसलेल्या शिक्षकांना संरक्षण द्या! 

मुंबई : राज्यातील शिक्षण पात्रता परीक्षा (टीईटी) उत्तीर्ण नसलेल्या शिक्षकांची नोकरी नव्या वर्षात धोक्‍यात येणार आहे. यामुळे विविध शिक्षण संघटनांनी या निर्णयाला विरोध दर्शवला आहे. टीईटी उत्तीर्ण नसलेल्या आठ हजार शिक्षकांना दिलासा द्यावा, अशी मागणी शिक्षक आमदार कपिल पाटील यांनीही केली आहे.

टीईटी उत्तीर्ण नसलेल्या आठ हजार शिक्षकांची नोकरी नवीन वर्षात धोक्‍यात आली आहे. नव्या शिक्षणमंत्र्यांनी पदभार स्वीकारल्यानंतर पदवीधर शिक्षकांचे समायोजन कसे करता येईल, याबाबत मी त्यांच्याशी चर्चा करणार असल्याचे पाटील यांनी सांगितले. शिक्षण विभागाच्या या निर्णयावरून शिक्षकांनी घाबरू नये, आम्ही त्यांच्या मागे आहोत, असेही पाटील यांनी सांगितले.

शिक्षकांची नियुक्ती शाळांनी आणि मान्यता देतांना शिक्षणाधिकारी कार्यालयांनी महाराष्ट्र खाजगी शाळातील कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियमावली 1981 मधील तरतुदीचा अवलंब केल्याने अचानक त्यांना टीईटी परीक्षा उत्तीर्ण करण्याचे बंधन करणे हे त्यांच्यावर अन्याय करण्यासारखे आहे. त्यामुळे 13 फेब्रुवारी 2013 नंतर नियुक्त झालेल्या शिक्षकांना टीईटी परीक्षेच्या अटीतून वगळून त्यांचे वेतन थांबविण्याचे शिक्षण संचालनालयाचे आदेश तातडीने मागे घ्यावेत, अशी मागणी भाजपा शिक्षक सेलने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिक्षणमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे केली आहे. 
 

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com