Cashew Cultivation: तुम्हालाही बिझनेस करायचा आहे, पण कोणता बिझनेस करावा कळत नाही, तर मग ही बातमी तुमच्यासाठी आहे. कारण आज आम्ही तुम्हाला एका व्यवसायाची माहिती देणार आहोत ज्याला बाजारात खूप मागणी आहे. हिवाळा, उन्हाळा, पाऊस अशा प्रत्येक ऋतूत खाल्ला जाणारा हा पदार्थ आहे. याशिवाय लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सगळेच अगदी आवडीने हा पदार्थ खातात. एवढेच नाही तर याची मागणी गाव असो की शहरं कायमच असते.
आम्ही काजू शेतीबद्दल बोलत आहोत. गेल्या काही काळापासून देशात कृषी क्षेत्रात अनेक बदल झाले आहेत. आता देशातील शेतकरी पारंपरिक शेती सोडून नगदी पिकांवर अधिक भर देत आहेत.
ड्रायफ्रूट म्हणून काजू खूप लोकप्रिय आहेत. काजूच्या झाडाची लांबी 14 मीटर ते 15 मीटर किंवा त्याहून अधिक असू शकते. त्याची झाडे 3 वर्षात फळ देण्यास तयार होतात. काजूशिवाय त्याची सालेही वापरली जातात. सालीपासून पेंट आणि लुब्रिकेंट्स तयार केले जातात. त्यामुळे त्याची लागवड अत्यंत फायदेशीर मानली जाते. काजूचे रोप उबदार तापमानात चांगले वाढते. त्याच्या लावडीसाठी योग्य तापमान 20 ते 35 अंशांच्या दरम्यान आहे. याव्यतिरिक्त, ते कोणत्याही प्रकारच्या मातीवर घेतले जाऊ शकते. तरीही, यासाठी लाल वालुकामय चिकणमाती चांगली मानली जाते.
काजूच्या एकूण उत्पादनात भारताचा वाटा 25 टक्के आहे. केरळ, महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, ओडिशा आणि पश्चिम बंगालमध्ये याची लागवड केली जाते. आता तर झारखंड आणि उत्तर प्रदेशातील अनेक जिल्ह्यांमध्ये त्याची लागवड केली जात आहे.
किती कमाई होईल?
काजूची झाडे एकदा लावली की अनेक वर्ष फळ देतात. झाडे लावायला वेळ लागतो. एक हेक्टरमध्ये 500 काजूची झाडे लावता येतात. एका झाडापासून 20 किलो काजू मिळू शकतात. एका हेक्टरमध्ये 10 टन काजूचे उत्पादन होते. त्यानंतर प्रक्रियेचा खर्च येतो. बाजारात काजू 1200 रुपये किलोने विकला जातो. अशा परिस्थितीत जर तुम्ही जास्त प्रमाणात रोपे लावलीत तर तुम्ही चांगला फायदा कमावू शकता.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.