MPSC Exam : आणखी किती विद्यार्थ्यांचा बळी घेणार?

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (एमपीएससी) घेतल्या जाणाऱ्या परीक्षांचा निकाल वेळेवर लागत नाही. या कारणावरून स्वप्नील लोणकर या विद्यार्थ्याने आत्महत्या केली.
MPSC Exam
MPSC Examesakal
Summary

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (एमपीएससी) घेतल्या जाणाऱ्या परीक्षांचा निकाल वेळेवर लागत नाही. या कारणावरून स्वप्नील लोणकर या विद्यार्थ्याने आत्महत्या केली.

पुणे - ‘तब्बल दोन लाख ४० हजार पदे रिक्त असल्याची माहिती राज्याचे मंत्री देत आहेत. मात्र, प्रत्यक्षात १६१ जागांसाठी राज्यसेवा परीक्षेची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. ही एक प्रकारे राज्यातील लाखो विद्यार्थ्यांची थट्टा आहे. यामुळे अनेकांना नैराश्य आले असून, जळगाव जिल्ह्यातील एका विद्यार्थ्याने आत्महत्या केली आहे. त्यामुळे राज्य सरकार आणखी किती विद्यार्थ्यांचा बळी घेणार आहे?,’ असा गंभीर प्रश्न वैभवसह राज्यातील अनेक विद्यार्थ्यांनी उपस्थित केला आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (एमपीएससी) घेतल्या जाणाऱ्या परीक्षांचा निकाल वेळेवर लागत नाही. या कारणावरून स्वप्नील लोणकर या विद्यार्थ्याने आत्महत्या केली. त्यामुळे राज्यभरातून संतापाचा भडका उडाला होता. यामुळे सरकार खाड्कन जागे झाले होते.

परीक्षा वेळेत घेतल्या जातील, तसेच विविध विभागांच्या रिक्त पदांचे मागणीपत्र ‘एमपीएससी’ला पाठवले जाईल, असे जाहीर करण्यात आले. त्यानुसार काही पदांचे मागणी पत्र ‘एमपीएससी’कडे गेले. त्यामुळे भरती आता मोठ्या पदांसाठी होईल, असा अंदाज राज्यातील विद्यार्थ्यांना होता. मात्र, प्रत्यक्षात १६१ पदांची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. राज्यातील लाखो विद्यार्थी या परीक्षेची तयारी करतात, तरीसुद्धा सरकारला याचे गांभीर्य का नाही, अशी प्रतिक्रिया शुभांगी या विद्यार्थिनीने व्यक्त केली.

उपजिल्हाधिकारी, तहसीलदार पदांच्या १५४ जागा रिक्त

गेल्या तीन वर्षांपासून उपजिल्हाधिकारी आणि तहसीलदार पदांसाठीची भरती झालेली नाही. ३१ डिसेंबर २०२० पर्यंत महसूल खात्यातील उपजिल्हाधिकारी आणि तहसीलदार या पदांच्या १५४ जागा रिक्त आहेत, अशी माहिती अनिल गलगली यांना माहिती अधिकारातून मिळाली आहे.

राज्यसेवा परीक्षा २०२२च्या जाहिरातीत ११६ पदे ही फक्त महिला व बाल विकास विभागाची आहेत. समजा या पदांचा समावेश झाला नसता, तर केवळ ४५ पदांची जाहिरात सरकारला प्रसिद्ध करावी लागली असती.

- मयूर, विद्यार्थी

विद्यार्थ्यांमध्ये नैराश्याची भावना आहे. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारी शेकडो विद्यार्थी राज्य सरकारला ट्विटच्या माध्यमातून विचारणा करत आहे.

- प्रणिता, विद्यार्थिनी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com