संधी करिअरच्या... : बारावीनंतर इकॉनॉमिक्स...

Economics
Economics

कोरोनाच्या अभूतपूर्व संकटामुळे दहावी, बारावी परीक्षेला बसणारे विद्यार्थी आणि पालकांना पुढे करिअर नक्की कोणत्या क्षेत्रात करावे याची चिंता सतावत आहे. यापुढील काळात कोणत्या करिअरचे महत्त्व टिकून राहील आणि कोणत्या करिअरचे महत्त्व कमी होईल, ही रास्त शंका त्यांना वाटत आहे. आज जगभरात दोनच विषय प्रामुख्याने चर्चेत आहेत एक म्हणजे करोना आणि दुसरा म्हणजे अर्थव्यवस्था. ही गोष्ट लक्षात घेतली तर अर्थशास्त्र या विषयात पदवी/पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना करिअरच्या उज्ज्वल संधी मिळतील यात शंकाच नाही. आजमितीला पदवी स्तरावर काही महाविद्यालयात बीएस्सी किंवा बीए (इकॉनॉमिक्स) हे कोर्सेस उपलब्ध आहेत, तर पदव्युत्तर एमएस्सी आणि एमए (इकॉनॉमिक्स) हे कोर्सेस उपलब्ध आहेत.

अर्थशास्त्रात पदवी शिक्षण पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना वित्तीय संस्था, बँकिंग, इन्शुरन्स, स्वयंसेवी संस्था, सल्ला सेवा संस्था, पत्रकारिता अशा विविध क्षेत्रात करिअरच्या संधी उपलब्ध होऊ शकतात. याशिवाय अर्थशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना केंद्र सरकारच्या सेवेत जाता यावे म्हणून यूपीएससी वेगळी परीक्षा घेण्यात येते. संपूर्ण देशात अर्थशास्त्र विषयात पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण देणाऱ्या विविध शिक्षण देणाऱ्या संस्थांमधील एक अग्रगण्य संस्था म्हणजे पुण्यातील गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्स. या १९३०मध्ये स्थापन झालेल्या संस्थेत अनुभवी व ख्यातनाम प्राध्यापकांच्या जोडीला पावणेतीन लाख पुस्तके व नियतकालिके असलेले सुसज्ज ग्रंथालय आणि तीन रिसर्च सेंटर असून, संस्थेला अभिमत विद्यापीठाचा दर्जा आहे. या संस्थेमध्ये बारावीनंतरचे अर्थशास्त्राचे कोर्सेस आहेत. या कोर्सेसच्या प्रवेशासाठी संस्था राष्ट्रीय स्तरावर प्रवेश परीक्षा घेते, जी २७ जूनला  होणार आहे. या कोर्सची थोडक्यात माहिती :

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

बारावीनंतर बीएस्सी इकॉनॉमिक्स 
कला, वाणिज्य, विज्ञान या कोणत्याही शाखेतून बारावी उत्तीर्ण किंवा यंदा बारावीच्या परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांना अर्ज करता येईल, मात्र त्यांना बोर्डाच्या परीक्षेत किमान ६०% गुण मिळविणे आवश्यक आहे. यासाठी ऑनलाइन पद्धतीने www.gipe.ac.in या संकेतस्थळावरून १८ जून २०२१पर्यंत अर्ज करता येतील. राष्ट्रीय पातळीवरील प्रवेश परीक्षा पुणे, मुंबई, नाशिक, नागपूर, औरंगाबाद या केंद्रांवर घेण्यात येईल. परीक्षा दोन तासांची शंभर प्रश्नांची, शंभर मार्कांची असेल. त्यात गणित (बारावीपर्यंतचे) ४० मार्क, रिझनिंग ऍबिलिटी ४० मार्क, इंग्रजी २० मार्क या विषयांची परीक्षा होईल. परीक्षेचा निकाल २ जुलै रोजी लागेल व त्यानंतर गुणवत्तेनुसार प्रवेश देण्यात येतील.

अर्थशास्त्र विषयात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी फक्त पदवी शिक्षण घेऊन न थांबता किमान पदव्युत्तर शिक्षण घेतले, तर करिअरच्या चांगल्या संधी त्यांना उपलब्ध आहेत.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com