<rss version="2.0" xmlns:atom="http://www.w3.org/2005/Atom" xmlns:content="http://purl.org/rss/1.0/modules/content/" xmlns:media="http://search.yahoo.com/mrss/" xmlns:sy="http://purl.org/rss/1.0/modules/syndication/"><channel><title>Esakal</title><link>https://www.esakal.com</link><description>विनामूल्य  प्रवेश करण्यासाठी साईन इन करा</description><atom:link href="https://www.esakal.com/stories.rss" rel="self" type="application/rss+xml"></atom:link><language>mr</language><lastBuildDate>Wed, 16 Sep 2026 16:52:46 +0530</lastBuildDate><sy:updatePeriod>hourly</sy:updatePeriod><sy:updateFrequency>1</sy:updateFrequency><item><title>उजव्या कालव्यातून पाणी सुटल्याने काटवान भागाची तहान भागली.....</title><link>https://www.esakal.com/uttar-maharashtra/nashik/todays-latest-marathi-news-msi26b04274-txt-dhltdy3-20260916110730</link><comments>https://www.esakal.com/uttar-maharashtra/nashik/todays-latest-marathi-news-msi26b04274-txt-dhltdy3-20260916110730#comments</comments><guid isPermaLink="false">c76b8b5a-0211-48ad-b92e-09c2d8df9ef2</guid><pubDate>Wed, 16 Sep 2026 16:37:30 +0530</pubDate><atom:updated>2026-09-16T16:37:30.000+05:30</atom:updated><atom:author><atom:name>CD</atom:name><atom:uri>/api/author/1629784</atom:uri></atom:author><description><![CDATA[ उजव्या कालव्यातून पाणी सुटल्याने काटवान भागाची तहान भागली.....]]></description><media:keywords></media:keywords><media:content url="https://cf-images.assettype.com/esakal/2026-09-16/2x4x6nyo/Sakal_Wesite_Banner_1200_x_675.jpg"><media:title type="html"></media:title><media:description type="html"></media:description></media:content><media:thumbnail url="https://cf-images.assettype.com/esakal/2026-09-16/2x4x6nyo/Sakal_Wesite_Banner_1200_x_675.jpg?w=280" width="280"></media:thumbnail><category>Nashik</category><content:encoded><![CDATA[ MSI26B09572
दिघावे (ता. साक्री) : शिवारात उजव्या कालव्याची दुरुस्ती करताना शेतकरी.
-----------------
लाटीपाडा प्रकल्पाचे पाणी काटवान परिसरात

उजव्या कालव्यातून पाणी सोडल्याने पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत
सकाळ वृत्तसेवा
म्हसदी, ता. १६ : यंदा अत्यल्प पावसामुळे साक्री तालुक्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असून नाले, बंधारे आणि विहिरी कोरड्या पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर लाटीपाडा प्रकल्पाचे पाणी पांझरा नदीतून ओव्हरफ्लो होत असतानाही काटवान परिसराला पाण्याची प्रतीक्षा होती. अखेर सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला यश येऊन लाटीपाडा प्रकल्पाच्या उजव्या कालव्यातून काटवान परिसरात पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे शेतकरी व ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळाला आहे.

प्रा. युवराज काकूस्ते यांच्यासह काटवान परिसरातील शेतकऱ्यांनी पाण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला. त्याचबरोबर निळगव्हाण व दारखेल येथील सोळा तरुण शेतकऱ्यांनी पुढाकार घेत उजव्या कालव्यातील घाण व गाळ साफ केला. त्यामुळे कालव्यातून पाणी पुढे नेण्याचा मार्ग मोकळा झाला असून हे पाणी विटाईपर्यंत पोहोचण्यास मदत होणार आहे. काटवान परिसरातील गंभीर पाणीटंचाई लक्षात घेऊन प्रा. युवराज काकूस्ते यांनी देशशिरवाडे रस्त्याचे काम बंद करण्यासाठीही सातत्याने पाठपुरावा केला. कालव्याचे पाणी परिसरातील शेतांपर्यंत योग्य पद्धतीने पोहोचावे यासाठी त्यांनी पदरमोड करून पाटचारी दुरुस्तीचे काम हाती घेतले. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत निळगव्हाण, दारखेलसह परिसरातील युवक व शेतकरी मदतीला धावून आले. त्यांच्या श्रमदानातून कालव्याचे पाणी काटवान भागात पोहोचण्याचा मार्ग सुकर झाला.

पाणीपातळीत वाढ होण्याची शक्यता
लाटीपाडा प्रकल्पाचे पाणी देशशिरवाडे ते विटाई परिसरासह गणेशपूर व कासारे गावांसाठीही फायदेशीर ठरणार आहे. कालव्यात पाणी आल्यामुळे परिसरातील नाले, बंधारे आणि विहिरींच्या पाणीपातळीत वाढ होण्यास मदत होणार आहे. तसेच आगामी रब्बी हंगामातील गहू, हरभरा, कांदा यांसारख्या पिकांसाठी हे पाणी उपयुक्त ठरणार आहे. वेळेत पाणी उपलब्ध झाले नसते, तर काटवान परिसरातील अनेक विहिरी कोरड्या पडण्याची शक्यता होती. परिणामी, शेतीच्या पाण्यासोबतच आगामी काळातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही अधिक गंभीर झाला असता. मात्र, कालव्यातून पाणी परिसरात पोहोचल्याने शेतकरी व ग्रामस्थांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. या कामासाठी हर्षल ठाकरे, पराग कुवर, शशी देसले तसेच अधिकारी दुसाने, कापडणीस, जाधव आदींनी सहकार्य केले.
---------------
सोळा शेतकऱ्यांचे श्रमदान
दरम्यान, शेतकरी एकत्र आले तर काही करू शकतात. निळगव्हाण, दारखेल व परिसरातील सोळा पेक्षा अधिक शेतकरी एकत्र आल्याने पाटचारी साफसफाई करण्यात आले. घाण, कचरा काढल्याने पाणी वाहून जाण्याचा मार्ग सुकर झाला. उजव्या कालव्याचे पाणी विटाईपर्यंत येईपर्यंत शिस्त पाळावी, असे आवाहन प्रा. काकूस्ते यांनी केले आहे.
----------
शेतीच्या विजेचा प्रश्न हाती
पाण्याचा प्रश्न मार्गी लागल्यानंतर आता काटवान परिसरातील शेतीच्या विजेचा प्रश्न हाती घेणार असल्याची माहिती प्रा. काकूस्ते यांनी दिली. शेतीसाठी सुरळीत वीजपुरवठा मिळावा, यासाठी संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून पुढील निर्णय घेण्यात येणार आहे. शेतकऱ्यांच्या वीज समस्येवर तातडीने तोडगा निघाला नाही, तर बेमुदत उपोषणाचा निर्णय घेण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले.]]></content:encoded></item><item><title>गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांना अग्निसुरक्षेचे धडे</title><link>https://www.esakal.com/uttar-maharashtra/nashik/todays-latest-marathi-news-nsk26h35149-txt-jaltdy3-20260916110457</link><comments>https://www.esakal.com/uttar-maharashtra/nashik/todays-latest-marathi-news-nsk26h35149-txt-jaltdy3-20260916110457#comments</comments><guid isPermaLink="false">04352943-ad78-4408-af28-1375a091516c</guid><pubDate>Wed, 16 Sep 2026 16:34:57 +0530</pubDate><atom:updated>2026-09-16T16:34:57.000+05:30</atom:updated><atom:author><atom:name>CD</atom:name><atom:uri>/api/author/1629784</atom:uri></atom:author><description><![CDATA[ गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांना अग्निसुरक्षेचे धडे]]></description><media:keywords></media:keywords><media:content url="https://cf-images.assettype.com/esakal/2026-09-16/8ctxdn8s/Sakal_Wesite_Banner_1200_x_675.jpg"><media:title type="html"></media:title><media:description type="html"></media:description></media:content><media:thumbnail url="https://cf-images.assettype.com/esakal/2026-09-16/8ctxdn8s/Sakal_Wesite_Banner_1200_x_675.jpg?w=280" width="280"></media:thumbnail><category>Nashik</category><content:encoded><![CDATA[ NSK26H29765
जळगाव : नवीपेठेतील गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांना प्रात्यक्षिकेतून अग्निसुरक्षेचे धडे देताना अग्निशमन विभागाचे कर्मचारी.
----
गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांना अग्निसुरक्षेचे धडे

‘मनपा अग्निशमन’चा उपक्रम; आगीवर उपाययोजना, यंत्र वापराचे प्रशिक्षण

सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. १६ : गणेशोत्सवात मंडप परिसरात भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता संभाव्य आग दुर्घटना टाळण्यासाठी महापालिकेच्या अग्निशमन व आपत्कालीन सेवा विभागाने गणेश मंडळांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना प्राथमिक अग्निशमन प्रशिक्षण दिले. आग लागल्यास घाबरून न जाता परिस्थिती हाताळण्यापासून अग्निशामक यंत्राचा योग्य वापर करण्यापर्यंत विविध बाबींचे प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन करण्यात आले.

आयुक्त आदित्य जीवने यांच्या आदेशानुसार आणि मुख्य अग्निशमन अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. विजसनी नगर येथील जय गोविंदा मित्र मंडळ तसेच नवीपेठेतील जय महाराष्ट्र मित्र मंडळ, श्री गर्जना मित्र मंडळ आणि पंचरत्न गणेश मंडळातील कार्यकर्त्यांनी प्रशिक्षण घेण्यास मंगळवारपासून सुरूवात करण्यात आली आहे. आगीची घटना घडल्यास सर्वप्रथम कोणती खबरदारी घ्यावी, परिसरातील नागरिकांना सुरक्षितपणे बाहेर कसे काढावे, आगीचा प्रकार लक्षात घेऊन कोणत्या पद्धतीने ती आटोक्यात आणावी, याबाबत अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी माहिती दिली. तसेच मंडप उभारणी करताना आवश्यक सुरक्षित अंतर, विद्युत जोडणीतील खबरदारी आणि अग्निशमन साधने सज्ज ठेवण्याचे महत्त्वाच्या गोष्टी यावेळी सांगितल्या जात आहे.  गणेशोत्सव काळात गर्दी वाढत असल्याने सुरक्षेच्या उपाययोजनांकडे दुर्लक्ष होऊ नये, यासाठी महापालिकेकडून मंडळांमध्ये जनजागृती सुरू आहे. ‘सुरक्षित गणेशोत्सव, सुरक्षित जळगाव’ या उद्देशाने प्रशिक्षण व मार्गदर्शनाचे उपक्रम राबविण्यात येत आहेत.

चौकट
दर्शनी भागात यंत्रणा, आपत्कालीन क्रमांक लावा 
आपत्कालीन प्रसंगी अग्निशमन दलाशी तातडीने संपर्क साधता यावा, यासाठी विभागाचे दूरध्वनी क्रमांक मंडपाच्या दर्शनी भागात लावण्याच्या सूचना मंडळांना देण्यात आल्या. गणेश मंडळांनी स्वयंसेवकांना प्राथमिक अग्निशमन प्रशिक्षण देऊन आवश्यक साधने उपलब्ध ठेवावीत, असे आवाहनही करण्यात आले.]]></content:encoded></item><item><title>समाजसेवेच्या दिशेने संतोष दळवी फाऊंडेशनचे पहिले पाऊल</title><link>https://www.esakal.com/mumbai/todays-latest-marathi-news-mum26i88470-txt-navimumbai-20260916110311</link><comments>https://www.esakal.com/mumbai/todays-latest-marathi-news-mum26i88470-txt-navimumbai-20260916110311#comments</comments><guid isPermaLink="false">64f9b824-d4ad-4fce-add4-a2a475f8c982</guid><pubDate>Wed, 16 Sep 2026 16:33:11 +0530</pubDate><atom:updated>2026-09-16T16:33:11.000+05:30</atom:updated><atom:author><atom:name>CD</atom:name><atom:uri>/api/author/1629784</atom:uri></atom:author><description><![CDATA[ समाजसेवेच्या दिशेने संतोष दळवी फाऊंडेशनचे पहिले पाऊल]]></description><media:keywords></media:keywords><media:content url="https://cf-images.assettype.com/esakal/2026-09-16/dqdi1cre/mumbai_fallback_image.jpg"><media:title type="html"></media:title><media:description type="html"></media:description></media:content><media:thumbnail url="https://cf-images.assettype.com/esakal/2026-09-16/dqdi1cre/mumbai_fallback_image.jpg?w=280" width="280"></media:thumbnail><category>Mumbai</category><content:encoded><![CDATA[ <p>संतोष दळवी फाऊंडेशनचे उद्‍घाटनव उत्साहात<br />बेलापूर, ता. १० (बातमीदार) ः संतोष दळवी फाऊंडेशनचा उद्‍घाटन सोहळा शुक्रवारी (ता. ६) नेरुळ येथील तेरणा डेंटल कॉलेज ऑडिटोरियममध्ये उत्साहात पार पडला. समाज सशक्तीकरण, जनसेवा आणि सामाजिक विकासाला नवी दिशा देण्याच्या उद्देश यामागे असल्याचे संस्थापक संतोष दळवी यांनी सांगितले आहे. <br />आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो ही भावना मनात ठेवत संतोष दळवी फाउंडेशन भविष्यात कार्यरत राहणार आहे. शिक्षण, जनसेवा, गरजूंची मदत, आरोग्य, सामाजिक जनजागृती तसेच शाश्वत विकासाशी संबंधित विविध उपक्रम फाउंडेशनच्या माध्यमातून राबवले जाणार आहेत. संतोष दळवी आणि स्वाती दळवी यांच्या पुढाकारातून सुरू झालेल्या या फाउंडेशनचा ‘मानवता हाच आमचा धर्म’ संदेश आहे. <br />फाउंडेशनच्या या पहिल्याच पावलाला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, आगामी काळात विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून जनसेवेचे कार्य अधिक व्यापक करण्याचा निर्धार करण्यात आला आहे.</p><p>मला समाजातील तळागाळातील अडलेल्या नागरिकाला मदत करायची आहे. युवकांचे शिक्षण, रोजगार यासोबत नागरिकांच्या विविध समस्यांसाठी सुख दुःखात सोबत रहायचे आहे. यासाठी सर्व नियमांचे पालन करून फाउंडेशनची स्थापना करण्यात आली आहे.<br />- संतोष दळवी, संस्थापक</p>]]></content:encoded></item><item><title>ज्येष्ठा गौरींच्या आगमनाची लगबग</title><link>https://www.esakal.com/mumbai/todays-latest-marathi-news-mum26i88872-txt-thane-today-20260916110230</link><comments>https://www.esakal.com/mumbai/todays-latest-marathi-news-mum26i88872-txt-thane-today-20260916110230#comments</comments><guid isPermaLink="false">f600ff9d-fdad-4065-9642-2697fc2c090c</guid><pubDate>Wed, 16 Sep 2026 16:32:30 +0530</pubDate><atom:updated>2026-09-16T16:32:30.000+05:30</atom:updated><atom:author><atom:name>CD</atom:name><atom:uri>/api/author/1629784</atom:uri></atom:author><description><![CDATA[ ज्येष्ठा गौरींच्या आगमनाची लगबग]]></description><media:keywords></media:keywords><media:content url="https://cf-images.assettype.com/esakal/2026-09-16/3v5ytust/mumbai_fallback_image.jpg"><media:title type="html"></media:title><media:description type="html"></media:description></media:content><media:thumbnail url="https://cf-images.assettype.com/esakal/2026-09-16/3v5ytust/mumbai_fallback_image.jpg?w=280" width="280"></media:thumbnail><category>Mumbai</category><content:encoded><![CDATA[ <p>ठाणे, ता. १६ (बातमीदार) : भाद्रपदमधील महत्त्वाचा सण असलेल्या ज्येष्ठा गौरींचे गुरुवारी (ता. १७) आगमन होणार आहे. रात्री ७ वाजून ५२ मिनिटांपर्यंत चंद्र अनुराधा नक्षत्रात असेपर्यंत गौरींची स्थापना करण्याचा मुहूर्त आहे. त्यानंतर शुक्रवारी (ता. १८) चंद्र ज्येष्ठा नक्षत्रात असताना ज्येष्ठा गौरींचे मनोभावे पूजन केले जाणार आहे. शनिवारी (ता. १९) चंद्र मूळ नक्षत्रात असताना गौरींचे विसर्जन करण्यात येईल.</p><p>ज्येष्ठा गौरी म्हणजे हिमालयाची कन्या पार्वती अर्थात आदिशक्तीचे स्वरूप मानले जाते. भाद्रपदमधील शेतात धान्य तयार होत असल्याने या काळात निसर्गातील निर्मितीशक्तीबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी गौरीपूजन केले जाते. त्यामुळे हा सण निसर्गशक्तीच्या उपासनेशी जोडला गेला आहे. महाराष्ट्रातील काही भागांत ज्येष्ठा गौरींना महालक्ष्मी असेही संबोधले जाते. परंपरेनुसार काही ठिकाणी खड्याच्या गौरी पूजल्या जातात, तर काही ठिकाणी तेरडा वनस्पतीला गौरीचे स्वरूप मानून पूजा केली जाते. काही प्रदेशांत धान्याच्या राशीवर गौरीचे मुखवटे ठेवून पूजन केले जाते. गौरीला १६ प्रकारचे नैवेद्य दाखविण्याचीही प्रथा आहे. सासरी गेलेली कन्या माहेरी लाडाने येते, या भावनेतून गौरीचे स्वागत करून तिचे लाड पुरविले जातात.</p><p>साड्यांमध्ये माहेश्वरी, चेक्स इरकलला पसंती<br />गौराईच्या वस्त्रांमध्ये यंदा माहेश्वरी आणि चेक्स इरकल साड्यांना मोठी मागणी आहे. याशिवाय सहावारी, नऊवारी, नथ नऊवारी, कोळी नऊवारी, ब्राह्मणी नऊवारी, त्रिवेणी नऊवारी, पैठणी, महाराणी, पेशवाई आणि गोल सहावारी साड्या उपलब्ध आहेत. तयार साड्यांच्या किमती साधारण १,२०० ते १,५०० रुपयांपासून सुरू आहेत.</p><p>गौराईच्या दागिन्यांमध्ये नव्या डिझाइन्सची भर<br />गौराईच्या दागिन्यांमध्ये ठुशी, बोरमाळ, लक्ष्मीहार, चपला हार, बाजूबंद, कानातील झुमके, मोहनमाळ, कोल्हापुरी साज, चोकर, नथ, कंबरपट्टा, बांगड्या, मंगळसूत्र, चिंचपेटी, पुतळीहार, मोत्यांच्या माळा आणि विविध प्रकारच्या नथी उपलब्ध आहेत. नव्या डिझाइनमध्ये अष्टपैलू माळ, एकविरा कंठी, थौजा मंगळसूत्र, जडाऊ नथ, चंद्रकोर नथ, मोती चंद्रकोर खोपा, डायमंड कोल्हापुरी साज, झिलमिल पैजण आदींची भर पडली आहे.</p>]]></content:encoded></item><item><title>नांदेडला ‘एडीबी’च्या निधीतून ५०० खाटांचे जिल्हा रुग्णालय</title><link>https://www.esakal.com/marathwada/aurangabad/nanded-500-bed-district-hospital-adb-funding</link><comments>https://www.esakal.com/marathwada/aurangabad/nanded-500-bed-district-hospital-adb-funding#comments</comments><guid isPermaLink="false">d1b77851-1d63-4b68-bfcb-19aa2b94d16c</guid><pubDate>Wed, 16 Sep 2026 16:31:36 +0530</pubDate><atom:updated>2026-09-16T16:31:36.000+05:30</atom:updated><atom:author><atom:name>CD</atom:name><atom:uri>/api/author/1629784</atom:uri></atom:author><description><![CDATA[ नांदेडला ‘एडीबी’च्या निधीतून ५०० खाटांचे जिल्हा रुग्णालय]]></description><media:keywords></media:keywords><media:content url="https://cf-images.assettype.com/esakal/2026-09-16/vqzwkn4z/Sakal20Wesite20Banner20_20Ch20Sambhaji20Nagar.jpg"><media:title type="html"></media:title><media:description type="html"></media:description></media:content><media:thumbnail url="https://cf-images.assettype.com/esakal/2026-09-16/vqzwkn4z/Sakal20Wesite20Banner20_20Ch20Sambhaji20Nagar.jpg?w=280" width="280"></media:thumbnail><category>Chhatrapati Sambhaji Nagar</category><content:encoded><![CDATA[ नांदेडला ‘एडीबी’च्या निधीतून ५०० खाटांचे जिल्हा रुग्णालय 
---
५९४ पदांना मंजुरी; ३१ कोटींचा वार्षिक वेतनखर्च, खासदार अशोक चव्हाण यांच्या पाठपुराव्याला यश
---
सकाळ वृत्तसेवा 
नांदेड, ता. १६  :नांदेडच्या जिल्हा आरोग्य व्यवस्थेला मोठी चालना देणारा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. आशियाई विकास बँकेच्या (एडीबी) अर्थसाहाय्यातून नांदेड येथे ५०० खाटांचे नवीन जिल्हा सामान्य रुग्णालय उभारण्यास अखेर मंजुरी मिळाली आहे. राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या ‘प्रगती’ प्रकल्पांतर्गत हे रुग्णालय उभारले जाणार असून, खासदार अशोक चव्हाण यांनी गेल्या दोन वर्षांपासून यासाठी केलेल्या पाठपुराव्याला यश आले.
 या रुग्णालयाच्या प्रभावी संचालनासाठी ५९४ नवीन पदांना मंजुरी देण्यात आली असून, या पदांच्या वेतनासाठी ३१ कोटी २५ लाख रुपयांचा अपेक्षित खर्च मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांना स्थानिक पातळीवर अधिक सक्षम, दर्जेदार आणि मोफत उपचार सुविधा उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्यात सार्वजनिक आरोग्य सेवेचे जाळे अधिक सक्षम करण्यासाठी एडीबीच्या सहकार्याने ४ हजार २५० कोटी रुपयांचा ‘प्रगती’ प्रकल्प राबविण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी ७० टक्के एडीबीचे कर्ज, तर ३० टक्के राज्य शासनाचा हिस्सा असणार आहे. त्यापैकी १ हजार ५०० कोटी रुपये आरोग्य संस्थांच्या पायाभूत सुविधा आणि सक्षमीकरणासाठी वापरण्यात येणार आहेत.
---
विधानसभेतील मागणीला मिळाली गती
नांदेड जिल्हा सामान्य रुग्णालयाचे श्रेणीवर्धन करून ते ५०० खाटांचे करण्याचा शासन निर्णय यापूर्वीच झाला होता. मात्र, प्रत्यक्ष बांधकामासाठी निधी उपलब्ध होणे आवश्यक होते. त्यासाठी खा.अशोक चव्हाण यांनी सातत्याने पाठपुरावा केला. दरम्यान, भोकरच्या आमदार श्रीजया चव्हाण यांनी १७ मार्च २०२६ रोजी विधानसभेत लक्षवेधी सूचना मांडून एडीबीच्या माध्यमातून या रुग्णालयासाठी निधी देण्याची मागणी केली होती. त्यावर सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी पुढील एडीबी प्रस्तावात या रुग्णालयाचा समावेश करण्याचे आश्वासन दिले होते. महानगरपालिका निवडणुकीपूर्वी भाजपच्या ‘विकसित नांदेडचा संकल्पनामा’मध्येही ५०० खाटांच्या जिल्हा रुग्णालयाच्या उभारणीचे आश्वासन देण्यात आले होते. आता शासन निर्णयामुळे या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला निधीची तरतूद आणि प्रशासकीय मंजुरीची ठोस दिशा मिळाली आहे.
---
आरोग्य सुविधांचा विस्तार
नांदेडसह जिल्ह्यातील ग्रामीण भागातील रुग्णांना उपचारासाठी मोठ्या शहरांकडे धाव घ्यावी लागू नये, या दृष्टीने हे रुग्णालय महत्त्वाचे ठरणार आहे. नव्या रुग्णालयामुळे खाटांची क्षमता वाढण्याबरोबरच वैद्यकीय मनुष्यबळ, उपचार सुविधा आणि पायाभूत सुविधांमध्येही वाढ होणार आहे. या निर्णयाबद्दल खासदार अशोक चव्हाण यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्राताई पवार आणि सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांचे आभार मानले. तसेच मान्यता मिळविण्यासाठी भाजप-महायुतीतील सहकाऱ्यांचेही योगदान लाभल्याचे त्यांनी म्हटले आहे.]]></content:encoded></item><item><title>ज्‍येष्‍ठा गौरीचे आज आगमन</title><link>https://www.esakal.com/uttar-maharashtra/nashik/todays-latest-marathi-news-nsk26h35162-txt-jaltdy3-20260916110133</link><comments>https://www.esakal.com/uttar-maharashtra/nashik/todays-latest-marathi-news-nsk26h35162-txt-jaltdy3-20260916110133#comments</comments><guid isPermaLink="false">d878798b-ff3f-4084-80e8-00cffa3439c6</guid><pubDate>Wed, 16 Sep 2026 16:31:33 +0530</pubDate><atom:updated>2026-09-16T16:31:33.000+05:30</atom:updated><atom:author><atom:name>CD</atom:name><atom:uri>/api/author/1629784</atom:uri></atom:author><description><![CDATA[ ज्‍येष्‍ठा गौरीचे आज आगमन]]></description><media:keywords></media:keywords><media:content url="https://cf-images.assettype.com/esakal/2026-09-16/55ic2rku/Sakal_Wesite_Banner_1200_x_675.jpg"><media:title type="html"></media:title><media:description type="html"></media:description></media:content><media:thumbnail url="https://cf-images.assettype.com/esakal/2026-09-16/55ic2rku/Sakal_Wesite_Banner_1200_x_675.jpg?w=280" width="280"></media:thumbnail><category>Nashik</category><content:encoded><![CDATA[ टुडे पान ३  : सेकंड मेन

NSK26H29767
जळगाव : विक्रीला आलेले महालक्ष्मीचे मुखवटे.
-----------
NSK26H29768
महालक्ष्मीची तयार मूर्ती.
––––––––
गौराईच्या आगमनासाठी घराघरांत लगबग

(उपशीर्षक)
ज्येष्ठा-कनिष्ठा महालक्ष्मींचे आज आवाहन; आरास, सजावटची तयारी पूर्णत्वाकडे

सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. १६ : विघ्नहर्त्या गणरायाच्या आगमनानंतर आता घराघरांत ज्येष्ठा-कनिष्ठा महालक्ष्मी अर्थात गौराईच्या स्वागताची लगबग सुरू आहे. तीन दिवस माहेरवाशीण म्हणून घरी येणाऱ्या गौराईचे आगमन उद्या (ता.१७) होत आहे. या अनुषंगाने अनेक घरांमध्ये आरास, सजावट आणि रोषणाईची तयारी पूर्णत्वाकडे आली आहे. 
गणेशोत्सवातील गौरी आगमनाला विशेष धार्मिक महत्त्व आहे. गणेश स्‍थापना झाल्‍यानंतर तीन दिवस गौराई माहेराला येत असते. अर्थात चौथ्‍या दिवशी गौराईचे आवाहन असते. त्‍यानुसार उद्या (ता.१७) गौराईला आवाहन करत प्रतिष्‍ठापना केली जाणार आहे. त्यापूर्वी पूजेची तयारी पूर्ण करण्यासाठी महिलांची धावपळ सुरू आहे. तसेच बाजारात देखील गौराईचे सुरेख असे मुखवट्यांसह लागणारे दागिने, सजावटीचे साहित्‍य विक्रीसाठी दाखल असून आज खरेदी करणार्यांची देखील लगबग पाहावयास मिळाली.

‘आरास’साठी लगबग
गौराईच्या आगमनासाठी घरातील जागेची स्वच्छता करून तेथे आकर्षक आरास करण्यात येत आहे. फुले, वस्त्रे, विविध सजावटीच्या वस्तू, पारंपरिक साहित्य यांचा वापर करून गौराईसाठी सजावट केली जात आहे. गणपती प्रतिष्‍ठापना केल्‍याच्‍या बाजूलाच रोषणाईचीही तयारी करण्यात आली आहे. त्यामुळे घराघरांत उत्सवी वातावरण निर्माण झाले आहे.

इन्‍फो
आज आवाहन, उद्या नैवेद्य
गौराईला गुरुवारी आवाहन करत प्रतिष्‍ठापना केली जाते. यासाठी बाजारात गौरीचे मुखवटे, पावले आणि सजावटीच्या साहित्याची खरेदी करण्यासाठी नागरिकांची गर्दी झाली होती. दरम्‍यान उद्या (ता.१७) गौरींचे आवाहन व प्रतिष्ठापना करून शुक्रवारी (ता.१८) महालक्ष्मी पूजन आणि षोडशोपचार पूजा केली जाईल. यानंतर महाप्रसादासाठी विविध भाज्या आणि पारंपरिक नैवेद्य दाखविला जाईल.
––]]></content:encoded></item><item><title>‘मांजर’ चित्रपट मुलाखत (प्रीमियर)</title><link>https://www.esakal.com/mumbai/todays-latest-marathi-news-mum26i88882-txt-mumbai-today-20260916110109</link><comments>https://www.esakal.com/mumbai/todays-latest-marathi-news-mum26i88882-txt-mumbai-today-20260916110109#comments</comments><guid isPermaLink="false">761ffc97-e07e-4780-81b1-ba8ca0fc65e8</guid><pubDate>Wed, 16 Sep 2026 16:31:09 +0530</pubDate><atom:updated>2026-09-16T16:31:09.000+05:30</atom:updated><atom:author><atom:name>CD</atom:name><atom:uri>/api/author/1629784</atom:uri></atom:author><description><![CDATA[ ‘मांजर’ चित्रपट मुलाखत (प्रीमियर)]]></description><media:keywords></media:keywords><media:content url="https://cf-images.assettype.com/esakal/2026-09-16/33yhhuww/mumbai_fallback_image.jpg"><media:title type="html"></media:title><media:description type="html"></media:description></media:content><media:thumbnail url="https://cf-images.assettype.com/esakal/2026-09-16/33yhhuww/mumbai_fallback_image.jpg?w=280" width="280"></media:thumbnail><category>Mumbai</category><content:encoded><![CDATA[ <p>चार मित्रांच्या गोंधळाची धमाल गोष्ट</p><p>‘मांजर’ हा चार जिवलग मित्रांच्या आयुष्यात घडणाऱ्या गमती-जमती आणि गोंधळाची विनोदी गोष्ट आहे. प्रेम, मैत्री आणि एकमेकांना मदत करण्याच्या प्रयत्नांतून निर्माण होणाऱ्या परिस्थितीमुळे चित्रपटात हास्याची मेजवानी पाहायला मिळणार आहे. सिद्धार्थ मेनन, ओंकार भोजने, तेजस राऊत, भाग्यश्री लिमये, सयाजी शिंदे, अंशुमन विचारे आणि वैष्णवी आंधळे यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन सुशील महादेव यांनी केले आहे. एच३ओ मोशन पिक्चर्स आणि जस्ट राइट फिल्म्स निर्मित ‘मांजर’ येत्या १८ सप्टेंबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. त्यानिमित्ताने चित्रपटातील कलाकारांनी ‘सकाळ’शी संवाद साधला. </p><p>सिद्धार्थ मेनन <br />‘मांजर’ या चित्रपटाची मूळ धाटणी विनोदी आहे. अतिशय वास्तववादी वातावरणात ही कथा मांडण्यात आली असून, चित्रपटाची निर्मितीमूल्येही उच्च दर्जाची आहेत. मात्र, ‘मांजर’ची दुनिया ही पूर्णपणे आपल्या मातीतली आणि अस्सल व्यक्तिरेखांनी भरलेली आहे. ही चार मित्रांची गोष्ट आहे. यात मी, तेजस राऊत, भाग्यश्री लिमये आणि ओंकार भोजने आहोत. चित्रपटाच्या कथानकानुसार, भाग्यश्री आणि मी एकमेकांच्या प्रेमात आहोत. आम्हाला लग्न करायचं आहे; पण काही कारणांमुळे ते शक्य होत नाही. ही अडचण सोडवण्यासाठी आमचे दोन मित्र मदतीला येतात. या दोघांचेही कथेत तितकेच महत्त्व आहे. हा केवळ एका जोडप्याचा आणि त्यांच्या मित्रांचा प्रवास नाही, तर एकमेकांशिवाय राहू न शकणाऱ्या चार जिवलग मित्रांची गोष्ट आहे. चित्रपट पाहिल्यानंतर प्रेक्षकांना एक प्रसन्न आणि मनमोकळे वाटेल. मैत्री, प्रेम आणि माणसांमधील नातेसंबंध हे या कथेत अतिशय सुंदरपणे गुंफलेले आहेत. त्यामुळे हसत-हसत प्रेक्षक चित्रपटगृहाबाहेर पडतील आणि सोबत एक छान, समाधान देणारी भावना घेऊन जातील. याशिवाय, चित्रपटात अनेक आश्चर्यकारक वळणे आहेत. ‘मांजर’ हे नाव का देण्यात आले आहे, याचं उत्तरही चित्रपट पाहिल्यानंतर प्रेक्षकांना मिळेल. त्या नावामागेही एक गंमत आणि खास कारण दडले आहे. </p><p>भाग्यश्री लिमये <br />‘मांजर’ या चित्रपटात जरी माझी आणि सिद्धार्थची जोडी दाखवण्यात आली असली, तरी तेजस आणि ओंकारची व्यक्तिरेखाही माझ्या तितकीच जवळची आहे. आम्ही चौघेही घट्ट मित्र आहोत. कोणत्याही परिस्थितीत एकमेकांना साथ देणे, हीच या सगळ्यांची मध्यवर्ती गोष्ट आहे. मैत्री म्हणजे काय आणि मित्र एकमेकांसाठी काय करू शकतात, हे या चित्रपटातून पाहायला मिळेल. माझी व्यक्तिरेखा स्वतंत्र विचारांची, ठाम आणि व्यावसायिक क्षेत्रात काम करणाऱ्या तरुणीची आहे. हे चौघेही एकमेकांना पूर्ण करतात; पण त्याच वेळी एकमेकांमुळे अडचणीतही सापडतात. त्यामुळे सगळेच छान आणि सुरळीत घडते असे नाही. मात्र, मित्रांमुळे संकटात सापडलो तरी त्या परिस्थितीतही हसू येते. ‘मांजर’मध्ये याच प्रकारचा विनोद आणि गोंधळ पाहायला मिळणार आहे.</p><p>तेजस राऊत <br />या चित्रपटात मी चार मित्रांमधला एक मित्र आहे. या चित्रपटाच्या कथेइतकीच त्याच्याशी जोडली गेलेली नावेही मला भावली. चित्रपटाचे कास्टिंग हळूहळू ठरत गेले. या प्रक्रियेदरम्यान ‘एच३ओ प्रॉडक्शन’च्या तिन्ही निर्मात्यांची माझी भेट झाली. त्यांचे दृष्टिकोन आणि मराठी सिनेमात काहीतरी वेगळे करण्याची त्यांची इच्छा ऐकून मला खूप चांगले वाटले. विशेष म्हणजे, हे त्यांचे पहिलेच मराठी चित्रपटाचे निर्मिती पाऊल आहे. ते हिंदी चित्रपटसृष्टीशी संबंधित असूनही त्यांनी आपला पहिला चित्रपट मराठीत करण्याचा निर्णय घेतला. त्यामागचे कारण म्हणजे त्यांना हा विषय आवडला आणि आमचे दिग्दर्शक सुशील महादेव यांच्यावर त्यांचा विश्वास होता. मराठी कलाकार आणि कलाकृतींबद्दल त्यांच्या मनात खूप आदर आहे. </p><p>वैष्णवी आंधळे <br />या चित्रपटात मी सिद्धार्थची बॉस आहे. तिची स्वतःची कंपनी आहे आणि सिद्धार्थ तिच्या कंपनीत काम करत असतो. त्यामुळे त्यांचे कार्यालयीन जग, त्यांच्यातील नाते आणि त्यातून निर्माण होणाऱ्या विनोदी परिस्थिती चित्रपटात पाहायला मिळतील. या ग्रुपमध्ये एक क्रॉसओवर आहे. या मित्रांमध्ये माझा काय रोल आहे ते चित्रपट पाहिल्यावर कळेल.</p>]]></content:encoded></item><item><title>जलजीवन मिशनच्या कामानंतर सिंदखेडच्या रस्त्यांची दुरवस्था</title><link>https://www.esakal.com/marathwada/aurangabad/sindkhed-road-repairs-issues</link><comments>https://www.esakal.com/marathwada/aurangabad/sindkhed-road-repairs-issues#comments</comments><guid isPermaLink="false">51cef730-8c8c-4aae-a3b2-2a49796c7c99</guid><pubDate>Wed, 16 Sep 2026 16:30:46 +0530</pubDate><atom:updated>2026-09-16T16:30:46.000+05:30</atom:updated><atom:author><atom:name>CD</atom:name><atom:uri>/api/author/1629784</atom:uri></atom:author><description><![CDATA[ जलजीवन मिशनच्या कामानंतर सिंदखेडच्या रस्त्यांची दुरवस्था]]></description><media:keywords></media:keywords><media:content url="https://cf-images.assettype.com/esakal/2026-09-16/d8c19ig8/Sakal20Wesite20Banner20_20Ch20Sambhaji20Nagar.jpg"><media:title type="html"></media:title><media:description type="html"></media:description></media:content><media:thumbnail url="https://cf-images.assettype.com/esakal/2026-09-16/d8c19ig8/Sakal20Wesite20Banner20_20Ch20Sambhaji20Nagar.jpg?w=280" width="280"></media:thumbnail><category>Chhatrapati Sambhaji Nagar</category><content:encoded><![CDATA[ ABD26J79514 सारखणी : रस्त्यावरील खड्ड्यात चिखल आणि पाणी साचल्याने नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे. (छायाचित्र ः पंकज जयस्वाल)
---
‘जलजीवन’च्या कामानंतर सिंदखेडच्या रस्त्यांची दुरवस्था
----
खड्डे, चिखल आणि साचलेल्या पाण्यामुळे ग्रामस्थ त्रस्त
----
सारखणी, ता. १६ (बातमीदार) : जलजीवन मिशनअंतर्गत सुरू असलेल्या पाणीपुरवठा योजनेच्या कामासाठी सिंदखेड गावातील रस्त्यांची खोदाई करण्यात आली. मात्र, काम पूर्ण झाल्यानंतर रस्त्यांची योग्य प्रकारे दुरुस्ती करण्यात आली नसल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त होत आहे. 
रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले असून, चिखल आणि पाणी साचल्याने दुकानदार तसेच वाहनचालकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. पावसाच्या पाण्यामुळे परिस्थिती आणखी बिकट झाली असून, नागरिकांना ये-जा करताना अडचणी निर्माण होत आहे.
रस्त्याच्या कडेला पाणी साचून राहत असल्याने डासांचा प्रादुर्भाव वाढला असून, त्यांच्या उपद्रवामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. जलजीवन मिशनचे काम महत्त्वाचे असले, तरी कामानंतर रस्त्याची पूर्ववत दुरुस्ती करणे ही संबंधित यंत्रणेची जबाबदारी आहे. त्यामुळे संबंधित विभागाने तातडीने रस्त्याची दुरुस्ती करून खड्डे बुजवावेत, साचलेले पाणी काढावे तसेच डास प्रतिबंधक फवारणी करावी, अशी मागणी सिंदखेड येथील ग्रामस्थ, दुकानदार व वाहनचालकांकडून करण्यात येत आहे.]]></content:encoded></item><item><title>कोपरगाव १६ गावात एक गाव एक गणपती</title><link>https://www.esakal.com/pune/kopargaon-one-village-one-ganapati</link><comments>https://www.esakal.com/pune/kopargaon-one-village-one-ganapati#comments</comments><guid isPermaLink="false">92a9dec7-1e0e-43dc-acfa-f2f70469ea77</guid><pubDate>Wed, 16 Sep 2026 16:27:54 +0530</pubDate><atom:updated>2026-09-16T16:27:54.000+05:30</atom:updated><atom:author><atom:name>CD</atom:name><atom:uri>/api/author/1629784</atom:uri></atom:author><description><![CDATA[ कोपरगाव १६ गावात एक गाव एक गणपती]]></description><media:keywords></media:keywords><media:content url="https://cf-images.assettype.com/esakal/2026-09-16/a2r7dxl9/Banner1.png"><media:title type="html"></media:title><media:description type="html"></media:description></media:content><media:thumbnail url="https://cf-images.assettype.com/esakal/2026-09-16/a2r7dxl9/Banner1.png?w=280" width="280"></media:thumbnail><category>Pune</category><content:encoded><![CDATA[ <p>गट-तट विसरले, गणरायासाठी एकत्र आले!<br />कोपरगाव तालुक्यात १६ गावांत ‘एक गाव, एक गणपती’; पोलिसांच्या आवाहनाला प्रतिसाद<br />कोपरगाव, ता. १६ ः राजकीयदृष्ट्या अतिसंवेदनशील असलेल्या कोपरगाव तालुक्यात यंदाचा गणेशोत्सव मात्र एकीचा संदेश देणारा ठरत आहे. राजकीय प्रभावाच्या तालुक्यात गावपातळीवरील गट-तट अनेक वर्षांपासून कायम असले, तरी गणरायाच्या उत्सवासाठी ग्रामस्थांनी हे मतभेद बाजूला सारले आहेत. तालुक्यातील संवत्सरसह तब्बल १६ गावांत ‘एक गाव, एक गणपती’ बसवून सामाजिक एकतेचा आदर्श निर्माण करण्यात आला आहे.<br />गोदावरी दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे यांच्या संवत्सर गावात सर्व राजकीय गट-तट बाजूला ठेवून ‘एक गाव, एक गणपती’ची संकल्पना राबविण्यात आली. कोपरगाव तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीतील ५८ गावांपैकी १५ गावांत ‘एक गाव, एक गणपती’ उपक्रम राबविण्यात आला आहे. या हद्दीत एकूण १७९ गणेश मंडळे आहेत. पोलिस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी ग्रामस्थांचे प्रबोधन केले. उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी तीन अधिकारी, ३० पोलिस व २५ होमगार्ड, असा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.<br />दरम्यान, कोपरगाव शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत शहरासह दहा गावांत ११० गणेश मंडळांनी गणरायाची प्रतिष्ठापना केली आहे. शहरातील ८२ मंडळांपैकी ७२ मंडळांनी अधिकृत परवानगी घेतली असून, उर्वरित मंडळांनी परवानगी घेतली नसल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलिस निरीक्षक उद्धव डमाळे यांच्या मार्गदर्शनाखाली तीन अधिकारी, ३० पोलिस, ३० होमगार्ड, तसेच राखीव प्रशिक्षणार्थी पथकातील १० महिला व १० पुरुष पोलिसांचा बंदोबस्त तैनात आहे. संपूर्ण तालुक्यात गणेशोत्सव उत्साहात सुरू असून, भक्तिमय वातावरणात गणरायाचे स्वागत करण्यात आले आहे. डीजेमुक्त गणेशोत्सवासाठी प्रशासन सज्ज झाले आहे.<br />---------<br />या गावांचा समावेश<br />मोर्वीस, सोनारी, हंडेवाडी, मढी खुर्द, देर्डे चांदवड, खिर्डी गणेश, बोलकी, कासली, शिरसगाव, सावळगाव, घोयगाव, धोत्रे, जवळके, ओगदी व हिंगणी या गावांनी ‘एक गाव, एक गणपती’ या उपक्रमाला प्रतिसाद दिला आहे.</p>]]></content:encoded></item><item><title>पूरग्रस्त बिहारमध्ये केंद्रीय कृषिमंत्र्याचा दौरा</title><link>https://www.esakal.com/pune/shivraj-chouhan-vaishali-flood-visit</link><comments>https://www.esakal.com/pune/shivraj-chouhan-vaishali-flood-visit#comments</comments><guid isPermaLink="false">6c1378e7-33a5-4ce2-b7ab-a47e0b1d2bf8</guid><pubDate>Wed, 16 Sep 2026 16:27:51 +0530</pubDate><atom:updated>2026-09-16T16:27:51.000+05:30</atom:updated><atom:author><atom:name>CD</atom:name><atom:uri>/api/author/1629784</atom:uri></atom:author><description><![CDATA[ पूरग्रस्त बिहारमध्ये केंद्रीय कृषिमंत्र्याचा दौरा]]></description><media:keywords></media:keywords><media:content url="https://cf-images.assettype.com/esakal/2026-09-16/6jqby9ow/Banner1.png"><media:title type="html"></media:title><media:description type="html"></media:description></media:content><media:thumbnail url="https://cf-images.assettype.com/esakal/2026-09-16/6jqby9ow/Banner1.png?w=280" width="280"></media:thumbnail><category>Pune</category><content:encoded><![CDATA[ <p>पाटणा, ता १६ (पीटीआय) ः केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी बुधवारी बिहारमधील पूरग्रस्त वैशाली जिल्ह्याला भेट दिली. राज्यातील पूरग्रस्त भागातील बचावकार्याचा आढावा घेण्यासाठी ते दिवसभराच्या बिहार दौऱ्यावर आले आहेत, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. बिहारचे मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्यासमवेत केंद्रीय कृषिमंत्र्यांनी वैशाली जिल्ह्यातील पुराचा फटका बसलेल्या तेरासिया आणि सराईपूर गावांची बोटीतून तसेच ट्रॅक्टरमधून पाहणी केली. त्यांनी तेथील पूरग्रस्त नागरिकांशीही संवाद साधला. पिकांचे झालेले नुकसान किती आहे, याचा ते आढावा घेणार असून स्थानिक शेतकऱ्यांची भेट घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.<br />तेरासिया आणि सराईपूर गावांची पाहणी केल्यानंतर चौहान यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले, ‘‘आतापर्यंतचा हा सर्वांत भीषण पूर आहे. यावेळी पाण्याची पातळी २०१६च्या पुराच्या तुलनेत जवळपास एक फूट अधिक असल्याचे मला सांगण्यात आले आहे. शेतकऱ्यांचे झालेले नुकसानही मी पाहिले.पूरग्रस्त नागरिकांना सरकारकडून शक्य ती सर्व मदत केली जात आहे. प्रत्यक्ष परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आणि नुकसानीची व्याप्ती जाणून घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्देशानुसार मी येथे आलो आहे. पाहणीनंतर संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेणार आहे.’’</p><p>विरोधकांची टीका<br />चौहान यांच्या बिहार दौऱ्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना राष्ट्रीय जनता दलाचे (आरजेडी) खासदार मनोज झा यांनी पुराच्या परिस्थितीबाबत केंद्र सरकारने उशिरा प्रतिसाद दिल्याचा आरोप करत टीका केली. ‘‘त्यांनी इथे यायला खूप उशीर केला ते चार्टर्ड विमानाने येत असल्याचे मी ऐकले आहे. त्याऐवजी हा पैसा पूरग्रस्तांसाठी खर्च केला असता तर अधिक चांगले झाले असते,’ असे ते म्हणाले.</p>]]></content:encoded></item><item><title>बँकेच्या निबँकेच्या निवडणुकीत बँकेच्या निवडणुकीत वडणुकीत</title><link>https://www.esakal.com/uttar-maharashtra/nashik/todays-latest-marathi-news-nsk26h35151-txt-jaltdy1-20260916105739</link><comments>https://www.esakal.com/uttar-maharashtra/nashik/todays-latest-marathi-news-nsk26h35151-txt-jaltdy1-20260916105739#comments</comments><guid isPermaLink="false">da9b4776-b713-4af6-a36d-439fb2340e86</guid><pubDate>Wed, 16 Sep 2026 16:27:39 +0530</pubDate><atom:updated>2026-09-16T16:27:39.000+05:30</atom:updated><atom:author><atom:name>CD</atom:name><atom:uri>/api/author/1629784</atom:uri></atom:author><description><![CDATA[ बँकेच्या निबँकेच्या निवडणुकीत बँकेच्या निवडणुकीत वडणुकीत]]></description><media:keywords></media:keywords><media:content url="https://cf-images.assettype.com/esakal/2026-09-16/s8ay465w/Sakal_Wesite_Banner_1200_x_675.jpg"><media:title type="html"></media:title><media:description type="html"></media:description></media:content><media:thumbnail url="https://cf-images.assettype.com/esakal/2026-09-16/s8ay465w/Sakal_Wesite_Banner_1200_x_675.jpg?w=280" width="280"></media:thumbnail><category>Nashik</category><content:encoded><![CDATA[ टुडे एक ॲंकर

NSK26H29777
-------
जिल्हा बँकेच्या मतदार याद्यांचे काम अंतिम टप्प्यात 

लवकरच होणार जाहीर; निवडणूक नोव्हेंबरमध्ये लागण्याची चिन्हे  

सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. १६ : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रारूप मतदार याद्या तयार करण्याचे काम नाशिक सहनिबंधकांकडे अंतिम टप्प्यात असल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने दिली. लवकरच मतदार यादी जाहीर होऊन त्यावर हरकती व अंतिम यादी जाहीर केली जाणार आहे. 

जिल्ह्यातील विविध कार्यकारी सोसायटी व इतर संस्थांकडून एकूण दोन हजार ४५० ठराव जिल्हा उपनिबंधक कार्यालयाला मिळाले आहेत. हे ठराव सहनिबंधकांकडे पाठविण्यात आले. जळगाव जिल्हा बँकेची अधिकृत निवडणूक नोव्हेंबरमध्ये होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने विविध सहकारी सोसायट्यांसह इतर सहकारी सोसायट्यांकडून ठराव मागविले होते. २ सप्टेंबरला ठराव पाठविण्याची अंतिम मुदत होती. त्यामुळे २ सप्टेंबरअखेर विकास व शेती सहकारी संस्थांचे ८७६ आणि इतर सर्व सहकारी संस्था (दुग्ध संस्थासह) एक हजार ५७४ असे एकूण दोन हजार ४५० ठराव प्राप्त झाले. प्राप्त झालेले ठराव नाशिक सहनिबंधकाकडे पाठविले आहेत. 
तेथे ठरावांची छाननी झाली. अंतिम मतदारयाद्या तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. मतदानाची तारीखही ठरविली जाईल. निवडणुकीचे निश्चित वेळापत्रक स्पष्ट होईल. बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावर सध्या बँकेच्या २३७ शाखा आणि १२ लाखांहून अधिक ग्राहक आहेत. मागील पंचवार्षिक निवडणूक २१ नोव्हेंबर २०२१ ला झाली होती. यंदाही नोव्हेंबर २०२६ मध्ये निवडणूक होण्याची शक्यता आहे. 

चौकट
नऊ दिग्गजांना पुन्हा मिळणार पुन्हा संधी
या संभाव्य निवडणुकीमुळे सहकार क्षेत्रातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. संभाव्य उमेदवार, गटबाजी आणि पॅनलच्या जुळवाजुळवीला सुरुवात झाली आहे. दरम्यान, विद्यमान अध्यक्ष संजय पवारांसह संचालक एकनाथ खडसे, माजी मंत्री गुलाबराव देवकर, माजी आमदार चिमणराव पाटील यांच्यासह नऊ संचालकांना पुन्हा रिंगणात उभे राहण्याची संधी मिळणार आहे.
--------]]></content:encoded></item><item><title>वारलीपाड्यात शहरी आरोग्यवर्धिनी केंद्र सुरू</title><link>https://www.esakal.com/mumbai/todays-latest-marathi-news-mum26i88944-txt-navimumbai-20260916105732</link><comments>https://www.esakal.com/mumbai/todays-latest-marathi-news-mum26i88944-txt-navimumbai-20260916105732#comments</comments><guid isPermaLink="false">e32147b8-d76d-4dd1-8534-de80dcbb38ab</guid><pubDate>Wed, 16 Sep 2026 16:27:32 +0530</pubDate><atom:updated>2026-09-16T16:27:32.000+05:30</atom:updated><atom:author><atom:name>CD</atom:name><atom:uri>/api/author/1629784</atom:uri></atom:author><description><![CDATA[ वारलीपाड्यात शहरी आरोग्यवर्धिनी केंद्र सुरू]]></description><media:keywords></media:keywords><media:content url="https://cf-images.assettype.com/esakal/2026-09-16/y179l64p/mumbai_fallback_image.jpg"><media:title type="html"></media:title><media:description type="html"></media:description></media:content><media:thumbnail url="https://cf-images.assettype.com/esakal/2026-09-16/y179l64p/mumbai_fallback_image.jpg?w=280" width="280"></media:thumbnail><category>Mumbai</category><content:encoded><![CDATA[ <p>वारलीपाड्यात शहरी आरोग्यवर्धिनी केंद्र सुरू<br />संध्याकाळच्या वेळेतही प्राथमिक आरोग्य सुविधा उपलब्ध<br />नेरूळ, ता. १६ (बातमीदार) : दिवसभर कामावर जाणाऱ्या नागरिकांसह महिला व ज्येष्ठ नागरिकांना सोयीच्या वेळेत आरोग्य सेवा मिळावी, यासाठी नवी मुंबई महापालिकेच्या घणसोली विभागातील अश्विननगर वारलीपाडा परिसरात शहरी आरोग्यवर्धिनी केंद्राचे मंगळवारी (ता. १५) लोकार्पण करण्यात आले. सकाळी ११ ते सायंकाळी ७ या वेळेत केंद्र सुरू राहणार असल्याने परिसरातील नागरिकांना प्राथमिक उपचारांची सुविधा जवळच उपलब्ध होणार आहे.<br />केंद्राच्या लोकार्पणप्रसंगी महापौर सुजाता पाटील, आरोग्य समिती सभापती डॉ. जयाजी नाथ, समाजकल्याण समिती सभापती रंजना सोनवणे, माजी महापौर तथा नगरसेवक सुधाकर सोनवणे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. राजेश म्हात्रे, वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन चिटणीस, विभाग अधिकारी तथा सहाय्यक आयुक्त संजय तडवी, कार्यकारी अभियंता यशवंत कापसे आदी उपस्थित होते. या उपक्रमामुळे नागरिकांना घराजवळ आणि सोयीच्या वेळेत आरोग्य सुविधा मिळणार असल्याचे सुधाकर सोनवणे यांनी सांगितले.<br />केंद्र सरकारच्या १५व्या वित्त आयोगांतर्गत नवी मुंबई महापालिका क्षेत्रात ५९ शहरी आरोग्यवर्धिनी केंद्रांना मंजुरी मिळाली आहे. या केंद्रांमध्ये डॉक्टर, नर्स आणि बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी उपलब्ध असतील. असंसर्गजन्य आजारांची तपासणी, प्रतिबंध व नियंत्रण, माता-बाल आरोग्यसेवा, किशोरवयीन आरोग्य, मूलभूत मौखिक आरोग्यसेवा इत्यादी सुविधा येथे मिळणार आहेत. तसेच संसर्गजन्य आजारांपासून बचाव, वैयक्तिक स्वच्छता आणि पोषणाबाबत जनजागृती केली जाणार आहे.</p><p>परिसरात वृक्षारोपण<br />लोकार्पणावेळी महापौर व मान्यवरांच्या हस्ते परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. सुधाकर सोनवणे यांनी नियोजनबद्ध पद्धतीने विकसित केलेल्या दाट वनराईच्या परिसरात हे केंद्र असल्याने येथे उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना हिरवेगार आणि प्रसन्न वातावरण मिळणार असल्याचे महापौर सुजाता पाटील यांनी सांगितले.</p>]]></content:encoded></item><item><title>भारतात लिंग समानतेची परिस्थिती ‘जैसे थे’</title><link>https://www.esakal.com/pune/india-gender-equality-rankings-2023</link><comments>https://www.esakal.com/pune/india-gender-equality-rankings-2023#comments</comments><guid isPermaLink="false">b3ef3b43-4620-42e9-8995-0851f0d6c6ef</guid><pubDate>Wed, 16 Sep 2026 16:26:46 +0530</pubDate><atom:updated>2026-09-16T16:26:46.000+05:30</atom:updated><atom:author><atom:name>CD</atom:name><atom:uri>/api/author/1629784</atom:uri></atom:author><description><![CDATA[ भारतात लिंग समानतेची परिस्थिती ‘जैसे थे’]]></description><media:keywords></media:keywords><media:content url="https://cf-images.assettype.com/esakal/2026-09-16/fhe9ibju/Banner1.png"><media:title type="html"></media:title><media:description type="html"></media:description></media:content><media:thumbnail url="https://cf-images.assettype.com/esakal/2026-09-16/fhe9ibju/Banner1.png?w=280" width="280"></media:thumbnail><category>Pune</category><content:encoded><![CDATA[ <p>नवी दिल्ली, ता. १६ (पीटीआय) ः जागतिक आर्थिक परिषदेने आज जाहीर केलेल्या लिंग समानता निर्देशांकात भारताची प्रगती झाली नसून देश यावर्षीही १३१ व्या क्रमांकावर आहे. या यादीत आईसलॅंडने आपला पहिला क्रमांक कायम राखला असून फिनलॅंड, नॉर्वेही अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकावर आहेत. या यादीत केवळ १४ देश भारताच्या खाली आहेत. चाड तळाशी तर इराण, पाकिस्तान खालून दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकावर आहेत.<br />जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश असलेल्या भारताची कामगिरी गेल्या वर्षीपेक्षाही किंचित सुधारली असली तरी देशाचे १३१ वे स्थान कायम आहे. एकूणच २००६ पासून लैंगिक समानतेत ४.३ टक्के वाढ झाली असून शैक्षणिक उपलब्धींमुळे ही प्रगती झाल्याचेही अहवालात म्हटले आहे.  <br />आर्थिक सहभाग आणि संधी या उपनिर्देशांकात भारताने ४१.२ टक्के लिंग समानता गुण नोंदवला. मागील वर्षीच्या तुलनेत त्यात ०.५ टक्के अंकांनी वाढ झाली असली, तरी २०१३ मधील सर्वोत्तम निकालाच्या तुलनेत तो ३.५ टक्क्यांनी कमी आहे.<br />व्यावसायिक व तांत्रिक क्षेत्रातील कामगारांची संख्या लक्षणीयरित्या वाढल्याने लिंग समानता २००६ च्या २६.६ टक्क्यांच्या तुलनेत २०२६ मध्ये ४९.९ टक्क्यांवर गेली. त्याचप्रमाणे, भारतात लोकप्रतिनिधी व वरिष्ठ अधिकारी पदांवरील महिलांची संख्याही दहा टक्क्यांनी वाढली आहे. कामगारांतील लिंग समानतेत मात्र फारशी वाढ झाली नसून ती ४४.१ टक्क्यांवर आहे. आरोग्याशी संबंधित लिंग समानता उपनिर्देशांकात देशाने ९६.६ टक्के गुण मिळविले असले तरी गेल्या वर्षीपेक्षा अर्ध्या टक्क्याने घसरण झाली आहे. राजकीय सक्षमीकरण हा २०२६ मध्ये भारताचा सर्वाधिक क्रमांकाचा उपनिर्देशांक ठरला. यातील लैंगिक असमानतेतील २४.५ टक्के अंतर भरून काढण्यात देशाला यश आले असून जागतिक क्रमवारीत या उपनिर्देशांकात ६७ वा क्रमांक आहे.   <br />राष्ट्रप्रमुख या निकषातील लिंग समानतेत २००६ मध्ये भारताचे ४२.९टक्क्यांसह सुरुवातीचे गुण सर्वाधिक होते. या निर्देशांकाच्या पहिल्या दशकात ते ७२.३ टक्क्यांवर गेले. मात्र, २०२१ मध्ये त्यात घसरण होत सध्याच्या ४०.७ टक्क्यांपर्यंत घटले. <br />संसदेतील लिंग समानतेतील १६.१ टक्क्यांची दरी २०२६ मध्ये भरून काढण्यात आली. मंत्री पातळीवर २.४ टक्के गुणांसह एकूण प्रगती झाली. महिलांनी वरिष्ठ पदे व मंत्रिमंडळात स्थान मिळविले असले तरी सर्वाधिक आर्थिक-राजकीय प्रभावाच्या पदांवर त्यांचे प्रतिनिधित्व कमीच असून मुख्य कार्यकारी अधिकारीपदी केवळ १९.१ टक्के महिला आहेत.</p><p>लिंग समानतेचे उद्दिष्ट गाठणे शक्य आहे, हे २० वर्षांच्या डेटातून दिसते. प्रत्येक देशाने प्रगती केली असल्याने संसाधनाचा अभाव अडथळा ठरू शकत नाही. समानता ही आर्थिक वाढ आणि स्पर्धात्मकतेचा पाया आहे; मात्र ती आपोआप साध्य होणारी गोष्ट नाही.<br />- सादिया जाहिदी, व्यवस्थापकीय संचालक, जागतिक आर्थिक परिषद</p><p>..लैंगिक समानतेला १२० वर्षे लागतील<br />सन २००६पासून हा निर्देशांक जाहीर करणाऱ्या जीनिव्हास्थित जागतिक आर्थिक परिषदेने प्रत्येक देशाने लिंग समानतेत काहीशी प्रगती केली तरी या गतीने संपूर्ण लिंग समानतेसाठी आणखी १२० वर्षे लागतील,असेही म्हटले आहे. जागतिक पातळीवर लिंग समानतेतील दरी ६९.२ टक्क्यांनी कमी झाली आहे. गेल्या वर्षी हे अंतर ०.४ टक्क्याने घटले. </p><p>लिंग असमानतेतील घट<br />जग : ६९.२ टक्के<br />भारत : ६४.५ टक्के </p><p><br />यादीत भारताच्या खाली असणारे देश<br />पापुआ न्यू गिनिआ, कुवैत, ओमान, कतार, ताजिकिस्तान, सौदी अरेबिया, इजिप्त,मोरोक्को,माली,अल्गेरिया, कांगो</p>]]></content:encoded></item><item><title>कर धोरणाचा विचार क्षेत्रीय हितसंबंधांपलीकडे हवा : सीताराम</title><link>https://www.esakal.com/pune/india-tax-policy-insights-nirmala-sitharaman</link><comments>https://www.esakal.com/pune/india-tax-policy-insights-nirmala-sitharaman#comments</comments><guid isPermaLink="false">6e8cf454-5b7d-4226-b7e4-2f2a4221f259</guid><pubDate>Wed, 16 Sep 2026 16:24:04 +0530</pubDate><atom:updated>2026-09-16T16:24:04.000+05:30</atom:updated><atom:author><atom:name>CD</atom:name><atom:uri>/api/author/1629784</atom:uri></atom:author><description><![CDATA[ कर धोरणाचा विचार क्षेत्रीय हितसंबंधांपलीकडे हवा : सीताराम]]></description><media:keywords></media:keywords><media:content url="https://cf-images.assettype.com/esakal/2026-09-16/7exvnffa/Banner1.png"><media:title type="html"></media:title><media:description type="html"></media:description></media:content><media:thumbnail url="https://cf-images.assettype.com/esakal/2026-09-16/7exvnffa/Banner1.png?w=280" width="280"></media:thumbnail><category>Pune</category><content:encoded><![CDATA[ <p>क्षेत्रीय हितसंबंधांपलीकडे <br />कर धोरणाचा विचार हवा</p><p>अर्थमंत्री निर्मला सीतारामन : देशाची व्यापक गरज लक्षात घ्यावी</p><p>बंगळूर, ता. १६ (पीटीआय) : ‘‘कर धोरणाबाबत विचार करताना केवळ क्षेत्रीय हितसंबंधांपुरती मर्यादित न राहता देशाच्या अर्थव्यवस्थेच्या व्यापक गरजाही लक्षात घ्यायला हव्यात,’’ अशी अपेक्षा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बुधवारी व्यक्त केली. करप्रणाली न्याय्य, अंदाज लावता येण्याजोगी आणि गुंतवणूक व नवोन्मेषाला चालना देणारी असणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.</p><p>‘नव्या युगातील करप्रणाली’ या विषयावरील आठव्या आंतरराष्ट्रीय कर परिषदेत त्या बोलत होत्या. या परिषदेत करसुधारणांचा उद्देश अनुपालन सुलभ करणे, करदात्यांना अधिक निश्चितता देणे आणि करसंबंधी खटल्यांची संख्या घटवणे हा असल्याचे त्यांनी सांगितले. सरकारने उद्‍गम करकपात (टीडीएस) आणि उद्‍गम करसंकलनासंबंधी (टीसीएस) तरतुदी सुलभ केल्या असून, मर्यादा वाढविल्या आहेत. अनावश्यक फौजदारी तरतुदीही कमी करण्यात आल्या आहेत. “स्वेच्छेने करपालन सुलभ करणे आणि जिथे खरोखर गरज आहे तिथे अंमलबजावणीची क्षमता कायम ठेवणे, हे यामागचे तत्त्व आहे,” असे त्या म्हणाल्या.</p><p>‘विवाद से विश्वास’ योजनेसह विविध उपाययोजनांद्वारे करसंबंधी खटले कमी करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. आयकर अपील न्यायाधिकरण, उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयातील विभागीय अपिलांसाठी आर्थिक मर्यादा अनुक्रमे ६० लाख, दोन कोटी आणि पाच कोटी रुपयांपर्यंत वाढविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. प्रत्यक्ष करप्रणालीत २०१९ मध्ये कॉर्पोरेट कर २२ टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आला, तर २०२५ मध्ये वैयक्तिक आयकर रचनेत सुसूत्रता आणण्यात आली. १९६१च्या कायद्याची जागा घेणारा नवीन आयकर कायदा अधिक संक्षिप्त आणि सुलभ असून, त्यातून करदात्यांना अधिक स्पष्टता मिळेल, असे सीतारामन म्हणाल्या.</p><p>‘जीएसटी’च्या पुढील सुधारणांवरही सीतारामन यांनी भाष्य केले. ‘‘ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात होणाऱ्या जीएसटी परिषदेच्या बैठकीत प्रक्रियात्मक सुधारणांवर भर दिला जाईल. अजून ‘जीएसटी ३.०’ पर्यंत पोहोचलो नाही. आम्ही दोन टप्प्यांतच ते करत आहोत,” असे त्यांनी सांगितले. डिजिटल अर्थव्यवस्थेतील करप्रणालीबाबत सावध भूमिका घेताना डिजिटल कंपन्या, आभासी डिजिटल मालमत्ता, क्लाउड सेवा आणि सीमापार व्यवहार यांचा करप्रणालीवर होणारा परिणाम तपासण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. कर उपाययोजनांचा भारतातील भविष्यातील गुंतवणुकीवर होणारा परिणामही निष्पक्षपणे तपासला पाहिजे, असेही त्यांनी नमूद केले.</p><p>देशाच्या अर्थव्यवस्थेने पहिल्या तिमाहीत नोंदविलेल्या ७.८ टक्के वाढीचे श्रेय सीतारामन यांनी सरकारऐवजी नागरिक, उद्योग आणि लघु व मध्यम उद्योगांना दिले. मात्र, शुल्कवाढीचा धोका, सुरू असलेली युद्धे, ‘होर्मुझ’मधील कोंडी, तसेच कच्चे तेल आणि खतांच्या किमती यामुळे जागतिक आर्थिक वातावरण आव्हानात्मक असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.</p>]]></content:encoded></item><item><title>किनारपट्टीवरील हवामान धोक्यांचे मूल्यमापन</title><link>https://www.esakal.com/pune/coastal-weather-risks-iit-madras</link><comments>https://www.esakal.com/pune/coastal-weather-risks-iit-madras#comments</comments><guid isPermaLink="false">485953cd-a68c-4434-a6a7-992f64364885</guid><pubDate>Wed, 16 Sep 2026 16:23:23 +0530</pubDate><atom:updated>2026-09-16T16:23:23.000+05:30</atom:updated><atom:author><atom:name>CD</atom:name><atom:uri>/api/author/1629784</atom:uri></atom:author><description><![CDATA[ किनारपट्टीवरील हवामान धोक्यांचे मूल्यमापन]]></description><media:keywords></media:keywords><media:content url="https://cf-images.assettype.com/esakal/2026-09-16/2tsk34wy/Banner1.png"><media:title type="html"></media:title><media:description type="html"></media:description></media:content><media:thumbnail url="https://cf-images.assettype.com/esakal/2026-09-16/2tsk34wy/Banner1.png?w=280" width="280"></media:thumbnail><category>Pune</category><content:encoded><![CDATA[ <p>किनारपट्टीवरील हवामान धोक्यांचे मूल्यमापन </p><p>‘आयआयटी मद्रास’चा एकात्मिक आराखडा</p><p>चेन्नई, ता. १६ (पीटीआय) : हवामानबदलामुळे भारताच्या किनारपट्टीवर होणारे परिणाम आणि त्यातून निर्माण होणारे धोके जाणून घेण्यासाठीच; तसेच पायाभूत सुविधा, परिसंस्था आणि असुरक्षित समुदायांच्या संरक्षणासाठी व्यवहार्य उपाययोजना निश्चित करण्याच्या उद्देशाने ‘आयआयटी मद्रास’च्या संशोधकांनी एकात्मिक आराखडा विकसित केला आहे.<br />‘आयआयटी मद्रास’ने बुधवारी प्रसिद्ध केलेल्या निवेदनानुसार, विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या सहकार्याने ‘आयआयटी मद्रास’मधील किनारी पायाभूत सुविधांवरील हवामानबदलाचे परिणाम आणि अनुकूलन धोरणांसाठी उत्कृष्टता केंद्रामध्ये हे संशोधन करण्यात आले. या आंतरशाखीय केंद्रात हवामानशास्त्र, किनारी अभियांत्रिकी, जलस्रोत आणि पर्यावरण अभियांत्रिकी या क्षेत्रांतील तज्ज्ञ एकत्र काम करतात. या संशोधनातील निष्कर्ष सिंगापूरमधील परिषदेत सादर करण्यात आले.<br />भारताच्या विस्तीर्ण किनारपट्टीवर महत्त्वाची बंदरे, मासेमारी बंदरे, वीज प्रकल्प, उद्योग, शहरी वसाहती आणि संवेदनशील परिसंस्था आहेत. हवामानातील वाढती अनिश्चितता आणि टोकाच्या हवामान घटनांची वाढती वारंवारता यामुळे पायाभूत सुविधा आणि उपजीविकेला धोका निर्माण होत आहे. त्यामुळे वैज्ञानिक पुराव्यांवर आधारित प्रभावी उपाययोजना करणे आवश्यक बनले आहे. चक्रीवादळे, वादळी समुद्रलाटा, किनारी पूर, समुद्रकिनाऱ्याची धूप, समुद्रपातळीत वाढ आणि अतिवृष्टी यांमुळे निर्माण होणाऱ्या धोक्यांचे मूल्यमापन करण्यासाठी संशोधकांनी प्रगत प्रारूपे आणि साधने विकसित केली आहेत. भारतीय किनारपट्टीचा विचार करून हवामान, चक्रीवादळ, वादळी समुद्रलाटा, लाटा, जलगतिकीय आणि किनारपट्टीच्या भूरूपीय बदलांची प्रारूपे विकसित करण्यात आली आहेत. संशोधकांनी विकसित केलेल्या नव्या वाऱ्यांच्या माहितीच्या एकत्रीकरणाच्या तंत्रामुळे वादळी समुद्रलाटांचा अंदाज अधिक अचूक होण्यास मदत झाली आहे.<br />चेन्नईतील पूरग्रस्त भागांचे प्रारूप तयार करून त्यांचे नकाशेही तयार करण्यात आले आहेत. आपत्ती व्यवस्थापनाची तयारी आणि शहरी नियोजनासाठी त्याचा उपयोग होणार आहे. समुद्रपातळीतील वाढ आणि वादळी समुद्रलाटांचा परिणाम लक्षात घेऊन चेन्नई, एन्नोर आणि कराईकलसाठी किनारी असुरक्षितता निर्देशांकाचे नकाशे तयार करण्यात आले आहेत.<br />या केंद्राचे प्रमुख संशोधक आणि ‘आयआयटी मद्रास’च्या महासागर अभियांत्रिकी विभागाचे प्राध्यापक एस. ए. सन्नासीराज म्हणाले, ‘‘भारताच्या किनारपट्टीवर देशातील अनेक महत्त्वाच्या पायाभूत सुविधा असून लाखो लोकांच्या उपजीविकेचा आधार या भागावर आहे. हवामानबदलामुळे किनारी धोक्यांची तीव्रता आणि वारंवारता वाढत असल्याने किनारपट्टीची लवचिकता वाढविण्याला तातडीचे महत्त्व प्राप्त झाले आहे. आमच्या केंद्राने हवामान प्रारूपे, अभियांत्रिकी उपाय आणि समुदायाच्या सहभागावर आधारित अनुकूलन यांची सांगड घालणारा सर्वंकष दृष्टिकोन स्वीकारला आहे. त्यामुळे किनारी भागांमधील धोके कमी करण्यासाठी आणि आपत्तीच्या वेळी तयारी अधिक सक्षम करण्यासाठी प्रत्यक्षात वापरता येतील अशा उपाययोजना उपलब्ध होतील.’’</p>]]></content:encoded></item><item><title>लातूर जिल्ह्यात १९०० गणेश मंडळाची स्थापना</title><link>https://www.esakal.com/marathwada/aurangabad/ganesh-festival-community-awareness-helmet-distribution</link><comments>https://www.esakal.com/marathwada/aurangabad/ganesh-festival-community-awareness-helmet-distribution#comments</comments><guid isPermaLink="false">99d2322e-10ce-4292-af67-761a263da752</guid><pubDate>Wed, 16 Sep 2026 16:23:22 +0530</pubDate><atom:updated>2026-09-16T16:23:22.000+05:30</atom:updated><atom:author><atom:name>CD</atom:name><atom:uri>/api/author/1629784</atom:uri></atom:author><description><![CDATA[ लातूर जिल्ह्यात १९०० गणेश मंडळाची स्थापना]]></description><media:keywords></media:keywords><media:content url="https://cf-images.assettype.com/esakal/2026-09-16/4yiehz7r/Sakal20Wesite20Banner20_20Ch20Sambhaji20Nagar.jpg"><media:title type="html"></media:title><media:description type="html"></media:description></media:content><media:thumbnail url="https://cf-images.assettype.com/esakal/2026-09-16/4yiehz7r/Sakal20Wesite20Banner20_20Ch20Sambhaji20Nagar.jpg?w=280" width="280"></media:thumbnail><category>Chhatrapati Sambhaji Nagar</category><content:encoded><![CDATA[ सामाजिक उपक्रमातून करावी जनजागृती
पोलिस अधीक्षक अमोल तांबे : हेल्मेट वाटप, रक्तदानासह जनजागृतीचे आवाहन
-----
लातूर, ता. १६ : जिल्ह्यातील १,९०० गणेश मंडळांनी पोलिस विभागाकडून रीतसर परवानगी घेतली आहे. अनंत चतुर्दशीपर्यंत विविध कार्यक्रमांची रेलचेल राहणार असून, गणेश मंडळांनी उत्सवाच्या माध्यमातून सामाजिक उपक्रमांना प्राधान्य द्यावे, असे आवाहन पोलिस अधीक्षक अमोल तांबे यांनी केले आहे.
गणेशोत्सवाच्या माध्यमातून सामाजिक प्रश्नांवर जनजागृती करणे, नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी उपक्रम राबविणे आणि गरजू व्यक्तींना मदत करणे, ही गणेश मंडळांची सामाजिक जबाबदारी असल्याचे तांबे यांनी सांगितले.
जिल्ह्यात वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून हेल्मेट वापराबाबत विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. दुचाकीस्वारांनी हेल्मेट वापरणे ही केवळ वाहतूक नियमांचे पालन करण्याची बाब नसून स्वतःचे जीवन व कुटुंबाची सुरक्षितता जपण्याची गरज आहे. त्यामुळे गणेश मंडळांनी हेल्मेट वाटपाचे उपक्रम आयोजित करून नागरिकांना सुरक्षित व वाहतूक नियमांबाबत मार्गदर्शन करावे, असे आवाहन तांबे यांनी केले.
गणेशोत्सवाच्या काळात मोठ्या संख्येने नागरिक मंडळांना भेट देतात. त्यामुळे हेल्मेट वापराबाबत जनजागृती करण्याची मंडळांना मोठी संधी आहे. मंडळांनी परिसरातील दुचाकीस्वारांना हेल्मेट वापरण्यास प्रोत्साहित करावे. हेल्मेट वाटप करताना त्याची गुणवत्ता, योग्य आकार आणि सुरक्षिततेच्या निकषांचीही काळजी घ्यावी, असा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचवावा, असे पोलिसांनी सांगितले.
गणेश मंडळांनी रक्तदान शिबिरांचे आयोजन करून समाजोपयोगी कार्यात योगदान द्यावे, असेही आवाहन करण्यात आले आहे. उदगीर व निलंगा तालुक्यात काही मंडळांनी हेल्मेट वाटप तसेच रक्तदान शिबिरांचे आयोजन केले आहे. या उपक्रमांमुळे गणेशोत्सवाच्या माध्यमातून सामाजिक संदेश देण्यास मदत होत असून, नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत आणि आरोग्यविषयक गरजांबाबत जनजागृती होत आहे. इतर मंडळांनीही समाजाभिमुख उपक्रम राबवावेत, अशी अपेक्षा लातूर पोलिसांनी व्यक्त केली आहे.
-----
सीसीटीव्ही उपक्रमालाही प्रतिसाद
गेल्या वर्षी गणेश मंडळांनी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याच्या उपक्रमाला सकारात्मक प्रतिसाद दिला होता. यंदाही मंडळांनी सीसीटीव्ही कॅमेरे बसवून परिसरातील सुरक्षितता वाढविण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन पोलिस अधीक्षक अमोल तांबे यांनी केले आहे.]]></content:encoded></item><item><title>कोंकण रेल्वे भरतीतीची यादी जाहीर करा</title><link>https://www.esakal.com/kokan/todays-latest-marathi-news-kop26e33226-txt-ratnagiri-today-20260916105316</link><comments>https://www.esakal.com/kokan/todays-latest-marathi-news-kop26e33226-txt-ratnagiri-today-20260916105316#comments</comments><guid isPermaLink="false">d913cd33-77f2-412e-bb7b-862e85041246</guid><pubDate>Wed, 16 Sep 2026 16:23:16 +0530</pubDate><atom:updated>2026-09-16T16:23:16.000+05:30</atom:updated><atom:author><atom:name>CD</atom:name><atom:uri>/api/author/1629784</atom:uri></atom:author><description><![CDATA[ कोंकण रेल्वे भरतीतीची यादी जाहीर करा]]></description><media:keywords></media:keywords><media:content url="https://cf-images.assettype.com/esakal/2026-09-16/72em6xp8/ratnagiri_default_banner_1.jpg"><media:title type="html"></media:title><media:description type="html"></media:description></media:content><media:thumbnail url="https://cf-images.assettype.com/esakal/2026-09-16/72em6xp8/ratnagiri_default_banner_1.jpg?w=280" width="280"></media:thumbnail><category>Kokan</category><content:encoded><![CDATA[ <p>रेल्वेभरतीची यादी जाहीर करा<br />शौकत मुकादम ः स्थानिक भूमिपुत्रांचा हक्क<br />सकाळ वृत्तसेवा<br />चिपळूण, ता. १६ ः कोकण रेल्वेमध्ये ऑफिस बॉय, खलाशी आणि हेल्पर पदांसाठी १४ सप्टेंबर रोजी घेण्यात आलेल्या मुलाखतींमधून ३२ बेरोजगार उमेदवारांची निवड करण्यात आली; मात्र, प्रशासनाने निवड झालेल्या उमेदवारांची केवळ नावे जाहीर केली. त्यांच्या नावासमोर गाव, तालुका आणि जिल्ह्याचा पत्ता जाहीर केलेला नाही. त्यामुळे हे उमेदवार कोकणातील स्थानिक आहेत की बाहेरील, याबाबत संभ्रम निर्माण झाला असून सर्व उमेदवारांची संपूर्ण माहिती सार्वजनिक करावी, अशी मागणी ‘कोकण रेल्वे अन्याय निवारण समिती’चे अध्यक्ष शौकत मुकादम यांनी केली आहे.<br />यापूर्वीही अशाच प्रकारे २५ उमेदवारांची भरती करण्यात आली होती. नुकत्याच निवड झालेल्या ३२ आणि पूर्वीच्या २५ अशा सर्व उमेदवारांच्या नावासह त्यांचा पूर्ण पत्ता जाहीर केल्यासच या प्रक्रियेत पारदर्शकता येईल, असे मुकादम यांनी स्पष्ट केले आहे. कोकण रेल्वे प्रकल्पासाठी कोकणातील जनतेने मोठा त्याग केला आहे. त्यामुळे येथील रोजगारावर स्थानिक भूमिपुत्रांचाच पहिला हक्क आहे. स्थानिक तरुणांना डावलून बाहेरील उमेदवारांची भरती झाल्यास समिती गप्प बसणार नाही, असा इशारा देत प्रशासनाविरोधात तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा निर्वाणीचा इशारा मुकादम यांनी दिला आहे.</p>]]></content:encoded></item><item><title>चाकूरात १२५ ठिकाणी श्रींची प्रतिष्ठापना</title><link>https://www.esakal.com/marathwada/aurangabad/one-village-one-ganapati-chakur</link><comments>https://www.esakal.com/marathwada/aurangabad/one-village-one-ganapati-chakur#comments</comments><guid isPermaLink="false">29d3ec52-7bbc-48cd-b855-adcdf35366cd</guid><pubDate>Wed, 16 Sep 2026 16:21:40 +0530</pubDate><atom:updated>2026-09-16T16:21:40.000+05:30</atom:updated><atom:author><atom:name>CD</atom:name><atom:uri>/api/author/1629784</atom:uri></atom:author><description><![CDATA[ चाकूरात १२५ ठिकाणी श्रींची प्रतिष्ठापना]]></description><media:keywords></media:keywords><media:content url="https://cf-images.assettype.com/esakal/2026-09-16/l4pzd7nd/Sakal20Wesite20Banner20_20Ch20Sambhaji20Nagar.jpg"><media:title type="html"></media:title><media:description type="html"></media:description></media:content><media:thumbnail url="https://cf-images.assettype.com/esakal/2026-09-16/l4pzd7nd/Sakal20Wesite20Banner20_20Ch20Sambhaji20Nagar.jpg?w=280" width="280"></media:thumbnail><category>Chhatrapati Sambhaji Nagar</category><content:encoded><![CDATA[ ५२ गावांत ‘एक गाव, एक गणपती’; 
१२५ ठिकाणी गणरायाची प्रतिष्ठापना
-----
चाकूर, ता. १६ (बातमीदार) : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर चाकूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील १०६ गावांत सोमवारी (ता. १४) १२५ ठिकाणी गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली. विशेष म्हणजे, ५२ गावांनी ‘एक गाव, एक गणपती’ ही संकल्पना राबवत एकत्रितपणे गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे.
चाकूर तालुक्यासह रेणापूर व अहमदपूर तालुक्यातील काही गावांचा समावेश आहे. या गावांतील १२५ गणेश मंडळांनी पोलिस प्रशासनाकडून आवश्यक परवाने घेतले आहेत. गणेशोत्सवाच्या काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी पोलिस प्रशासनाने गणेश मंडळांना विविध सूचना दिल्या आहेत. परवानगी न घेता गणेशाची प्रतिष्ठापना केलेल्या मंडळांनी परवाना काढून घ्यावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
गणेशोत्सवाच्या काळात मिरवणुका, आरती, सांस्कृतिक कार्यक्रम तसेच विसर्जनावेळी गर्दी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे संवेदनशील ठिकाणे, प्रमुख चौक, बाजारपेठा तसेच विसर्जन मार्गावर पोलिसांचे विशेष लक्ष राहणार आहे. वाहतुकीला अडथळा निर्माण होणार नाही आणि नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचना मंडळांना देण्यात आल्या आहेत.
गणेशोत्सवासाठी नऊ अधिकारी, ४५ पोलिस कर्मचारी आणि ५० होमगार्ड असा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पारंपरिक वाद्ये, ढोल-ताशे आणि धार्मिक कार्यक्रमांना प्राधान्य देत अनेक मंडळांनी गणेशोत्सव साजरा करण्यास सुरवात केली आहे. ध्वनिप्रदूषण टाळण्यासाठी शासनाच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहनही पोलिसांनी केले आहे.
-----
सामाजिक उपक्रमांमुळे एकोपा
सामाजिक उपक्रमांमुळे सामाजिक एकोपा वाढण्यासही मदत होत आहे. पोलिस निरीक्षक बालाजी भंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व गावांतील पोलिस अंमलदारांना गणेश मंडळांच्या माध्यमातून सामाजिक उपक्रम राबविण्यावर भर देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.]]></content:encoded></item><item><title>रास्ता रोको कराल तर कारवाई होणार</title><link>https://www.esakal.com/marathwada/aurangabad/road-block-legal-action</link><comments>https://www.esakal.com/marathwada/aurangabad/road-block-legal-action#comments</comments><guid isPermaLink="false">ca4eb2c9-26b2-4881-bc7b-4d13a01bc5be</guid><pubDate>Wed, 16 Sep 2026 16:21:08 +0530</pubDate><atom:updated>2026-09-16T16:21:08.000+05:30</atom:updated><atom:author><atom:name>CD</atom:name><atom:uri>/api/author/1629784</atom:uri></atom:author><description><![CDATA[ रास्ता रोको कराल तर कारवाई होणार]]></description><media:keywords></media:keywords><media:content url="https://cf-images.assettype.com/esakal/2026-09-16/4h6qgqai/Sakal20Wesite20Banner20_20Ch20Sambhaji20Nagar.jpg"><media:title type="html"></media:title><media:description type="html"></media:description></media:content><media:thumbnail url="https://cf-images.assettype.com/esakal/2026-09-16/4h6qgqai/Sakal20Wesite20Banner20_20Ch20Sambhaji20Nagar.jpg?w=280" width="280"></media:thumbnail><category>Chhatrapati Sambhaji Nagar</category><content:encoded><![CDATA[ ‘रास्ता रोको’ करणाऱ्यांवर 
होणार कायदेशीर कारवाई
-----
लातूर, ता. १६ : विविध मागण्या शासन व प्रशासनाकडून मान्य करून घेण्यासाठी नागरिकांनी लोकशाही व कायदेशीर मार्गाचा अवलंब करावा. मागण्यांसाठी रास्ता रोको आंदोलन करून सर्वसामान्य नागरिकांना त्रासाचे कारण बनू नये, असे आवाहन पोलिस अधीक्षक अमोल तांबे यांनी केले आहे. लातूर जिल्ह्यात रास्ता रोको आंदोलन केल्यास संबंधितांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.
विविध मागण्या मांडण्यासाठी काही व्यक्ती, संघटना किंवा आंदोलक रास्ता रोकोचा मार्ग स्वीकारतात. मात्र, सार्वजनिक रस्त्यांवरील वाहतूक अडवून नागरिकांची गैरसोय करणे हा मागण्या मांडण्याचा योग्य मार्ग नाही. लोकशाही व्यवस्थेत शासन व प्रशासनापर्यंत मागण्या पोहोचविण्यासाठी अनेक कायदेशीर व शांततामय मार्ग उपलब्ध आहेत. त्यांचा अवलंब करून मागण्यांसाठी पाठपुरावा करावा, असे तांबे यांनी सांगितले. रास्ता रोको आंदोलनामुळे वाहतूक कोंडी होऊन वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात. त्यामुळे नागरिकांचा वेळ वाया जातो. कार्यालयीन कामकाज, शाळा, महाविद्यालये, बाजारपेठा आणि दैनंदिन व्यवहारांवरही त्याचा परिणाम होतो. अनेक नागरिकांना नियोजित ठिकाणी वेळेवर पोहोचता येत नाही.
रास्ता रोकोमुळे रुग्णवाहिका, अग्निशमन दलाची वाहने तसेच इतर आपत्कालीन सेवांच्या वाहनांना मार्ग मिळण्यात अडथळा निर्माण होऊ शकतो. गंभीर रुग्णांना रुग्णालयात पोहोचण्यास विलंब झाल्यास त्यांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता असते. त्यामुळे आपत्कालीन सेवांना अडथळा निर्माण होणार नाही, याची प्रत्येकाने काळजी घेणे आवश्यक आहे.
नागरिकांनी रास्ता रोको आंदोलनाचा मार्ग न स्वीकारता आपल्या मागण्या लोकशाही व कायदेशीर मार्गाने मांडाव्यात. सार्वजनिक रस्त्यांवरील वाहतूक अडवून नागरिकांना त्रास देण्याचा प्रयत्न केल्यास संबंधितांविरुद्ध कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलिस अधीक्षक तांबे यांनी दिला.]]></content:encoded></item><item><title>प्रयोगशाळेत सुरक्षा पद्धती आवश्यक</title><link>https://www.esakal.com/kokan/todays-latest-marathi-news-kop26e33197-txt-ratnagiri-today-20260916105047</link><comments>https://www.esakal.com/kokan/todays-latest-marathi-news-kop26e33197-txt-ratnagiri-today-20260916105047#comments</comments><guid isPermaLink="false">292e1e49-f07d-482a-bb31-251d5c92aac6</guid><pubDate>Wed, 16 Sep 2026 16:20:47 +0530</pubDate><atom:updated>2026-09-16T16:20:47.000+05:30</atom:updated><atom:author><atom:name>CD</atom:name><atom:uri>/api/author/1629784</atom:uri></atom:author><description><![CDATA[ प्रयोगशाळेत सुरक्षा पद्धती आवश्यक]]></description><media:keywords></media:keywords><media:content url="https://cf-images.assettype.com/esakal/2026-09-16/gikl5e9q/ratnagiri_default_banner_1.jpg"><media:title type="html"></media:title><media:description type="html"></media:description></media:content><media:thumbnail url="https://cf-images.assettype.com/esakal/2026-09-16/gikl5e9q/ratnagiri_default_banner_1.jpg?w=280" width="280"></media:thumbnail><category>Kokan</category><content:encoded><![CDATA[ <p>प्रयोगशाळेत सुरक्षापद्धती आवश्यक<br />संजय महामुने : मंडणगडमध्ये ऑनलाइन कार्यशाळा<br />सकाळ वृत्तसेवा <br />मंडणगड, ता. १६ : रासायनिक जळजळ, विषारी वायू, आग, शारीरिक दुखापती तसेच रासायनिक गळती व स्फोटांचे धोके टाळण्यासाठी प्रयोगशाळेत सुरक्षानियमांचे काटेकोर पालन आवश्यक आहे, असे महाड येथील ईएचएस प्लास्टिक कंपनीचे व्यवस्थापक संजय महामुने यांनी सांगितले.<br />सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळाच्या लोकनेते गोपीनाथजी मुंडे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय आणि दोशी-वकील महाविद्यालय, गोरेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘प्रयोगशाळा व्यवस्थापन व सुरक्षा’ या विषयावरील ऑनलाइन कार्यशाळेत ते बोलत होते. या वेळी दोशी-वकील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जनार्धन होटकर उपस्थित होते. महामुने यांनी प्रयोगशाळेत सुरक्षित कामकाजाचे वातावरण राखण्यासाठी विविध सुरक्षापद्धतींची आवश्यकता असल्याचे सांगितले. योग्य सुरक्षा कार्यपद्धतीमुळे जबाबदार प्रयोगशाळा संस्कृतीला प्रोत्साहन मिळते. सुरक्षा मार्गदर्शक तत्त्वांचे पालन केल्यास विद्यार्थी व संशोधक आत्मविश्वासाने आणि कार्यक्षमतेने प्रयोग करू शकतात, असे त्यांनी स्पष्ट केले. <br />या वेळी प्रभारी प्राचार्य डॉ. वाल्मिक परहर, रसायनशास्त्र विभागप्रमुख डॉ. मुकेश कदम, प्रा. संदीप निर्वाण, प्रा. शरिफ काझी, डॉ. विभुते, डॉ. नागोरे, डॉ. ठाकूर, प्रयोगशाळा सहाय्यक रंजीत म्हाप्रळकर आदी उपस्थित होते. प्राचार्य डॉ. होटकर यांनी प्रास्ताविक केले. प्रा. अमोल घोटी यांनी सूत्रसंचालन तर प्रा. संदीप निर्वाण यांनी आभार मानले.</p>]]></content:encoded></item><item><title>‘डीपीएस’ तलावाच्या अभ्यासाला विलंब; सिडकोला १० हजारांचा दंड</title><link>https://www.esakal.com/mumbai/todays-latest-marathi-news-mum26i88886-txt-navimumbai-20260916105011</link><comments>https://www.esakal.com/mumbai/todays-latest-marathi-news-mum26i88886-txt-navimumbai-20260916105011#comments</comments><guid isPermaLink="false">c1e973bb-aa5d-45eb-b845-cb6f0cde71e5</guid><pubDate>Wed, 16 Sep 2026 16:20:11 +0530</pubDate><atom:updated>2026-09-16T16:20:11.000+05:30</atom:updated><atom:author><atom:name>CD</atom:name><atom:uri>/api/author/1629784</atom:uri></atom:author><description><![CDATA[ ‘डीपीएस’ तलावाच्या अभ्यासाला विलंब; सिडकोला १० हजारांचा दंड]]></description><media:keywords></media:keywords><media:content url="https://cf-images.assettype.com/esakal/2026-09-16/xm0a2c0v/mumbai_fallback_image.jpg"><media:title type="html"></media:title><media:description type="html"></media:description></media:content><media:thumbnail url="https://cf-images.assettype.com/esakal/2026-09-16/xm0a2c0v/mumbai_fallback_image.jpg?w=280" width="280"></media:thumbnail><category>Mumbai</category><content:encoded><![CDATA[ <p>हरित लवादाचा सिडकोला १० हजारांचा दंड<br />‘डीपीएस’ तलावाच्या अभ्यासाला विलंब<br />रोहित पक्ष्यांच्या उड्डाणमार्गाचा विमान वाहतुकीवरील संभाव्य परिणाम तपासण्याचे प्रकरण; अहवालासाठी आणखी दोन आठवड्यांची मुदत<br />तुर्भे, ता. १६ (बातमीदार) ः नेरूळ येथील जैवविविधतेने समृद्ध असलेल्या डीपीएस तलावातील रोहित (फ्लेमिंगो) पक्ष्यांच्या उड्डाणमार्गाचा नवी मुंबई विमानतळावरील विमान वाहतुकीवर होणाऱ्या संभाव्य परिणामाचा अभ्यास अहवाल वेळेत सादर न केल्याबद्दल राष्ट्रीय हरित लवादाने सिडकोला १० हजारांचा दंड ठोठावला आहे. न्यायमूर्ती दिनेश कुमार सिंह आणि तज्ज्ञ सदस्य डॉ. सुजीत कुमार बाजपेयी यांच्या पीठाने सिडकोला अहवाल सादर करण्यासाठी आणखी दोन आठवड्यांची अंतिम मुदत दिली आहे.<br />एप्रिल २०२४ मध्ये डीपीएस तलाव परिसरात सात रोहित पक्ष्यांचा मृत्यू झाल्याचे समोर आले होते. या घटनेची दखल घेत एनडीटीच्या मुख्य पीठाने स्वतःहून दखल घेतली होती. नॅटकनेक्ट फाउंडेशनने केलेल्या तक्रारीच्या पार्श्वभूमीवरही तलाव आणि परिसरातील पर्यावरणीय स्थितीचा प्रश्न लवादासमोर आला होता. त्यानंतर हे प्रकरण लवादाच्या पश्चिम विभागीय पीठाकडे वर्ग करण्यात आले. दरम्यान, सिडकोच्या विनंतीनंतर एप्रिलमध्ये पश्चिम विभागीय पीठाने रोहित पक्ष्यांच्या उड्डाणमार्गाचा आणि त्याचा नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील विमान वाहतुकीवर होणाऱ्या संभाव्य परिणामाचा सविस्तर अभ्यास करण्याचे आदेश दिले होते. या अभ्यासाच्या आधारे अहवाल सादर करणे अपेक्षित होते. मात्र, निर्धारित मुदतीत अहवाल सादर न झाल्याने सिडकोने आणखी वेळ मागितला. यापूर्वी १४ ऑगस्टला अहवाल सादर करण्यासाठी सिडकोला मुदत देण्यात आली होती. मात्र, मागील सुनावणीत सिडकोने पुन्हा दोन आठवड्यांची मुदत मागितली. न्यायमूर्ती दिनेश कुमार सिंह आणि तज्ज्ञ सदस्य डॉ. सुजीत कुमार बाजपेयी यांच्या पीठाने सिडकोची मागणी मान्य केली. </p><p>संवर्धन राखीव दर्जाची शिफारस<br />डीपीएस तलावाच्या संवर्धनासाठी राज्य सरकारने नियुक्त केलेल्या उच्चस्तरीय समितीने सुमारे १२ हेक्टर पाणथळ जागेला संवर्धन राखीव क्षेत्राचा दर्जा देण्याची शिफारस केली आहे. राज्य वन्यजीव मंडळानेही या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. मात्र, अंतिम शासन निर्णयाची प्रतीक्षा कायम आहे.</p>]]></content:encoded></item><item><title>मनाई असतानाही झाडांवर रोषणाई</title><link>https://www.esakal.com/mumbai/todays-latest-marathi-news-mum26i88942-txt-raigad-20260916104820</link><comments>https://www.esakal.com/mumbai/todays-latest-marathi-news-mum26i88942-txt-raigad-20260916104820#comments</comments><guid isPermaLink="false">ef724361-2137-4182-99ac-a548ab4bd1d3</guid><pubDate>Wed, 16 Sep 2026 16:18:20 +0530</pubDate><atom:updated>2026-09-16T16:18:20.000+05:30</atom:updated><atom:author><atom:name>CD</atom:name><atom:uri>/api/author/1629784</atom:uri></atom:author><description><![CDATA[ मनाई असतानाही झाडांवर रोषणाई]]></description><media:keywords></media:keywords><media:content url="https://cf-images.assettype.com/esakal/2026-09-16/2viivmsg/mumbai_fallback_image.jpg"><media:title type="html"></media:title><media:description type="html"></media:description></media:content><media:thumbnail url="https://cf-images.assettype.com/esakal/2026-09-16/2viivmsg/mumbai_fallback_image.jpg?w=280" width="280"></media:thumbnail><category>Mumbai</category><content:encoded><![CDATA[ <p>मनाई असतानाही झाडांवर रोषणाई<br />गणेशोत्सव मंडळांकडून दिव्यांची सजावट<br />तुर्भे, ता. १६ (बातमीदार) : नवी मुंबई महापालिकेने झाडांवर विद्युत रोषणाई करण्यास मनाई केलेली असतानाही गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील अनेक गणेशोत्सव मंडळांनी झाडांवर मोठ्या प्रमाणात विद्युत दिव्यांची सजावट केली आहे. सीबीडी, नेरूळ, सानपाडा, वाशी, कोपरखैरणे, ऐरोली, घणसोली आणि दिघा या विभागांत ही रोषणाई करण्यात आली असून, गणेशोत्सव सुरू होऊनही संबंधितांवर अद्याप कारवाई झालेली नाही.<br />झाडांवर केलेली विद्युत रोषणाई प्रकाश प्रदूषणास कारणीभूत ठरत असून, पक्षी तसेच झाडांवरील कीटकांसाठी ती धोकादायक असल्याचा पर्यावरणतज्ज्ञांचा दावा आहे. यासंदर्भात उच्च न्यायालयात जनहित याचिकाही दाखल करण्यात आली होती. न्यायालयाने त्याची दखल घेत राज्य सरकारला नोटीस बजावली होती. यापूर्वी नवी मुंबईतील उपाहारगृहे आणि व्यावसायिकांकडून झाडांवर करण्यात आलेल्या विद्युत रोषणाई व जाहिरातींची दखल घेत महापालिका प्रशासनाने संबंधितांना नोटिसा बजावून गुन्हे नोंदविण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.<br />गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सव काळात झाडांवर विद्युत रोषणाई केली जात असल्याने महापालिका प्रशासनाने यंदा उत्सवापूर्वीच सर्व संबंधित वृक्ष प्राधिकरण अधिकाऱ्यांना कारवाईच्या सूचना दिल्या होत्या, मात्र त्यानंतरही अनेक गणेशोत्सव मंडळांनी या सूचनांकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे.</p><p>कारवाईचे आदेश<br />झाडांवर विद्युत रोषणाई करण्यास मनाई असून, त्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कार्यवाही करण्याचे आदेश विभाग अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत, अशी माहिती उद्यान विभागाच्या उपायुक्त स्मिता काळे यांनी दिली. त्यामुळे आता संबंधित गणेशोत्सव मंडळांवर महापालिका प्रशासन कोणती कारवाई करते, याकडे लक्ष लागले आहे.</p>]]></content:encoded></item><item><title>‘बाप्पा, यंदा सांभाळून घ्या!’</title><link>https://www.esakal.com/mumbai/todays-latest-marathi-news-mum26i88892-txt-navimumbai-20260916104659</link><comments>https://www.esakal.com/mumbai/todays-latest-marathi-news-mum26i88892-txt-navimumbai-20260916104659#comments</comments><guid isPermaLink="false">5e0fd560-43c8-47af-b78a-141a11ec2f7b</guid><pubDate>Wed, 16 Sep 2026 16:16:59 +0530</pubDate><atom:updated>2026-09-16T16:16:59.000+05:30</atom:updated><atom:author><atom:name>CD</atom:name><atom:uri>/api/author/1629784</atom:uri></atom:author><description><![CDATA[ ‘बाप्पा, यंदा सांभाळून घ्या!’]]></description><media:keywords></media:keywords><media:content url="https://cf-images.assettype.com/esakal/2026-09-16/x6lgppnk/mumbai_fallback_image.jpg"><media:title type="html"></media:title><media:description type="html"></media:description></media:content><media:thumbnail url="https://cf-images.assettype.com/esakal/2026-09-16/x6lgppnk/mumbai_fallback_image.jpg?w=280" width="280"></media:thumbnail><category>Mumbai</category><content:encoded><![CDATA[ <p>‘गणराया, यंदा सांभाळून घ्या!’<br />खड्ड्यांविरोधात पनवेलकराचा अनोखा एल्गार<br />पनवेल, ता. १६ (बातमीदार) ः गणेशोत्सवाच्या काळातही शहरातील रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य कायम असल्याने यंदा नागरिकांच्या तोंडी ‘गणराया, यंदा जरा सांभाळून घ्या’ असे म्हणण्याची वेळ आली आहे. वारंवार तक्रारी करूनही दुरुस्ती होत नसल्याने प्रणीत अमृते या तरुणाने खड्ड्यात अनोखे आंदोलन करीत प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे. हा व्हिडिओ सध्या समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे.<br />पनवेल शहर आणि आजूबाजूच्या परिसरातील रस्त्यांवर अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. पावसाळ्यात या खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने अपघाताचा धोका निर्माण होतो. प्रणीत अमृते यानेही याचा फटका बसला असून, दुचाकीवरून प्रवास करताना पुढे खड्डा आल्याने त्याला ब्रेक दाबला. त्याचवेळी मागून येणाऱ्या वाहनाची त्याच्या दुचाकीला धडक बसली आणि तो जखमी झाला. या वैयक्तिक अनुभवातून खड्ड्यांचा प्रश्न केवळ दुरवस्थेपुरता मर्यादित नसून, तो नागरिकांच्या सुरक्षिततेशी जोडलेला असल्याची भावना प्रणीत याने मांडली. प्रणीत याच्या आंदोलनानंतर नगरसेवक राजू सोनी आणि नगरसेविका शिवानी घरत यांनी त्यांच्याशी संपर्क साधला. </p><p>खड्ड्यातच खुर्ची आणि चहा<br />प्रणीत याने एका खड्ड्यात खुर्ची टाकली आणि तेथेच बसून चहा-बिस्कीट खाण्यास सुरुवात केली. प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी केलेला हा प्रकार पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी झाली. खड्डा इतका मोठा आहे की इथे बसता येते, चहा पिता येतो आणि वर्तमानपत्रही वाचता येते, असा उपरोधिक संदेशच त्याच्या या आंदोलनातून देण्यात आला. त्यानंतर तो स्पायडरमॅनची वेशभूषा परिधान करून खड्ड्यात बसला.</p><p>तात्पुरते खड्डे बुजवून उपयोग काय?<br />प्रणीत अमृते याने स्वतःच्या परीनेही खड्डे बुजवण्याचा प्रयत्न केल्याचे सांगितले. त्याने माती आणि खडी टाकून खड्डे बुजवण्याचा प्रयत्न केला; मात्र पावसाच्या पाण्यामुळे ही सामग्री वाहून गेली. कायमस्वरूपी दुरुस्ती करण्यासाठी काँक्रीट किंवा अन्य बांधकाम करणे आपल्या आवाक्याबाहेर असल्याने प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागल्याचे त्याने स्पष्ट केले.</p>]]></content:encoded></item><item><title>नशामुक्त वाहतुकीसाठी राज्यव्यापी मोहीम</title><link>https://www.esakal.com/mumbai/todays-latest-marathi-news-mbi26b37498-txt-mumbai-today-20260916104543</link><comments>https://www.esakal.com/mumbai/todays-latest-marathi-news-mbi26b37498-txt-mumbai-today-20260916104543#comments</comments><guid isPermaLink="false">3b2cf0af-8a19-4bf6-8774-533cd8376ba4</guid><pubDate>Wed, 16 Sep 2026 16:15:43 +0530</pubDate><atom:updated>2026-09-16T16:15:43.000+05:30</atom:updated><atom:author><atom:name>CD</atom:name><atom:uri>/api/author/1629784</atom:uri></atom:author><description><![CDATA[ नशामुक्त वाहतुकीसाठी राज्यव्यापी मोहीम]]></description><media:keywords></media:keywords><media:content url="https://cf-images.assettype.com/esakal/2026-09-16/tg37xpa1/mumbai_fallback_image.jpg"><media:title type="html"></media:title><media:description type="html"></media:description></media:content><media:thumbnail url="https://cf-images.assettype.com/esakal/2026-09-16/tg37xpa1/mumbai_fallback_image.jpg?w=280" width="280"></media:thumbnail><category>Mumbai</category><content:encoded><![CDATA[ <p>मुंबई, ता. १६ : रस्ते वाहतूक अधिक सुरक्षित, शिस्तबद्ध आणि विश्वासार्ह करण्यासाठी ‘नशामुक्त चालक, सुरक्षित प्रवास, सक्षम महाराष्ट्र’ या संकल्पनेवर आधारित राज्यव्यापी मद्य व अमली पदार्थ तपासणी अभियान राबविण्यात येणार असल्याची माहिती परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी (ता. ११) मंत्रालयीन दालनात बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीस एसटी महामंडळ तसेच परिवहन विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. </p><p>अभियानाच्या माध्यमातून नशेच्या प्रभावाखाली वाहन चालविण्यास प्रतिबंध करण्यासोबतच जनजागृती, नियमित तपासणी, प्रतिबंधात्मक उपाय, उपचार व पुनर्वसन यांचा समन्वय साधण्यात येणार आहे. सुरक्षित वाहतूक व्यवस्था ही शासनाच्या प्राधान्यक्रमांपैकी एक असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील ‘विकसित महाराष्ट्र २०४७’च्या उद्दिष्टपूर्तीसाठी सुरक्षित आणि सक्षम वाहतूक व्यवस्था निर्माण करण्यावर भर देण्यात येत आहे. २०२६ ते २०२९ या कालावधीत विविध प्रकारच्या प्रवासी व मालवाहतूक सेवांमध्ये एकात्मिक तपासणी व्यवस्था लागू करण्यासाठी आवश्यक कार्यपद्धती व मार्गदर्शक तत्त्वे विकसित करण्यात येणार आहेत.</p><p>विविध वाहतूक सेवांचा समावेश<br />प्रस्तावित ‘नशामुक्त एसटी महामंडळ’ अभियानांतर्गत महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, महापालिका बससेवा, शासकीय वाहने, सार्वजनिक उपक्रम तसेच शासनासाठी कार्यरत कंत्राटी वाहनांचा समावेश करण्यात येणार आहे. त्याचबरोबर खासगी बस, पर्यटन वाहने, टॅक्सी, ॲपआधारित कॅब, ऑटोरिक्षा आणि कंत्राटी प्रवासी वाहतूक सेवांमध्येही तपासणी व्यवस्था लागू करण्याचे नियोजन असल्याचे मंत्री सरनाईक यांनी सांगितले.</p><p>तपासणीसाठी विशेष किट<br />अमली पदार्थांची प्राथमिक स्तरावर तत्काळ तपासणी करता यावी, यासाठी विकसित करण्यात आलेल्या विशेष तपासणी किटच्या चाचण्यांचे प्रमाणीकरण झाले आहे. या किटचा राज्यात प्रायोगिक तत्त्वावर वापर करण्याच्या दृष्टीने कार्यवाही करण्यात येणार असल्याचे परिवहनमंत्री सरनाईक यांनी सांगितले.</p><p>मुंबई : परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक पार पडली.</p>]]></content:encoded></item><item><title>कार्यवाहीतील वेगाअभावी  एचएसआरपीची गाडी मंदावली</title><link>https://www.esakal.com/marathwada/aurangabad/hsrp-registration-delays-district</link><comments>https://www.esakal.com/marathwada/aurangabad/hsrp-registration-delays-district#comments</comments><guid isPermaLink="false">c2768bf2-cf13-4a9d-8c42-4d54729c542f</guid><pubDate>Wed, 16 Sep 2026 16:15:09 +0530</pubDate><atom:updated>2026-09-16T16:15:09.000+05:30</atom:updated><atom:author><atom:name>CD</atom:name><atom:uri>/api/author/1629784</atom:uri></atom:author><description><![CDATA[ कार्यवाहीतील वेगाअभावी  एचएसआरपीची गाडी मंदावली]]></description><media:keywords></media:keywords><media:content url="https://cf-images.assettype.com/esakal/2026-09-16/1o36z8hp/Sakal20Wesite20Banner20_20Ch20Sambhaji20Nagar.jpg"><media:title type="html"></media:title><media:description type="html"></media:description></media:content><media:thumbnail url="https://cf-images.assettype.com/esakal/2026-09-16/1o36z8hp/Sakal20Wesite20Banner20_20Ch20Sambhaji20Nagar.jpg?w=280" width="280"></media:thumbnail><category>Chhatrapati Sambhaji Nagar</category><content:encoded><![CDATA[ कार्यवाहीतील वेगाअभावी 
एचएसआरपीची मंदावली ‘गाडी’

- जिल्ह्यात पावणेदोन लाख वाहने अजूनही नंबरप्लेटविना
- दीड महिन्यात केवळ १,७१० वाहनांनाच बसली प्लेट
- उद्दिष्टपूर्तीसाठी आणखी दोन वर्षे लागण्याची शक्यता
.........
सकाळ वृत्तसेवा
धाराशिव, ता. १६ : वाहनांच्या सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक प्लेट (एचएसआरपी) बसविण्याबाबत जिल्ह्यात मोठी अनास्था दिसून येत आहे. जिल्ह्यातील एकूण २ लाख ६७ हजार वाहनांपैकी तब्बल १ लाख ७८ हजार १५६ वाहने अद्याप एचएसआरपी नंबरप्लेटविनाच रस्त्यावर धावत आहेत. मागील दीड महिन्यात केवळ १ हजार ७१० वाहनांनाच एचएसआरपी बसविण्यात यश आले आहे. अपॉइंटमेंटसाठी मिळणारा ८ ते १० दिवसांचा कालावधी आणि संथ गतीमुळे हे उद्दिष्ट पूर्ण होण्यासाठी आणखी २ ते अडीच वर्षे लागण्याची शक्यता आहे.
एचएसआरपी न बसविणाऱ्यांवर उपप्रादेशिक परिवहन कार्यालय आणि वाहतूक पोलिसांकडून १ जुलैपासून कडक कारवाई सुरू आहे. मागील अडीच महिन्यात ८०२ वाहनांवर दंडात्मक कारवाई करत प्रतिवाहन १ हजार रुपयांप्रमाणे सुमारे ८ लाख रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. यातील सुमारे सव्वा लाखाची वसुली झाली आहे. ज्या वाहनधारकांनी अधिकृत पोर्टलवर ऑनलाइन अपॉइंटमेंट घेतली आहे, अशा वाहनांना तूर्तास दंडात्मक कारवाईतून वगळण्यात येत आहे.

एक लाख ६७ हजार वाहनचालकांनी अर्जच केला नाही
जिल्ह्यातील २ लाख ६७ हजार वाहनांपैकी आतापर्यंत ९९ हजार ७७७ वाहनधारकांनीच ऑनलाइन अर्ज केला आहे. त्यातील ८८ हजार ८४४ वाहनांना प्रत्यक्षात एचएसआरपी बसवण्यात आली आहे. परंतु, अजूनही तब्बल १ लाख ६७ हजार २२३ वाहनधारकांनी ऑनलाइन अर्ज किंवा नोंदणीच केलेली नाही. त्यामुळे ही वाहने पोलिसांच्या रडारवर आली असली तरी प्रत्यक्षात कारवाईचा वेग मंद असल्याने अशी वाहने सर्रास रस्त्यावर फिरत आहेत.
............
((पॉईंटर))

आकडेवारीची सद्यःस्थिती (१५ सप्टेंबर)
एकूण आवश्यक वाहने : २,६७,०००
एकूण प्राप्त ऑनलाइन अर्ज : ९९,७७७
प्रत्यक्षात प्लेट बसवलेली वाहने : ८८,८४४
अर्ज करून प्लेट मिळणे बाकी (प्रलंबित) : १०,९३३
अद्याप अर्ज न केलेले वाहनधारक : १,६७,२२३
एकूण नंबर प्लेट नसलेली वाहने : १,७८,१५६

२९ जुलैपर्यंतची स्थिती
- प्राप्त अर्ज : ९८ हजार ४२६ वाहनधारकांचे अर्ज  
- नंबर प्लेट बसवलेली : ८७ हजार १३४ वाहने 
- प्रलंबित : अर्ज केलेल्यांपैकी ११ हजार २९२ वाहने
.........
((कोट))
एचएसआरपी नंबर प्लेट न बसविलेल्या वाहनमालकांवर दंडात्मक कारवाई सुरू करण्यात आली आहे. आतापर्यंत एकूण ८०२ वाहनांवर दंडात्मक कारवाई करून प्रत्येकी १ हजार रुपये दंड आकारण्यात येत आहे. कारवाई आणि दंडाचा फटका टाळण्यासाठी वाहनधारकांनी तत्काळ ऑनलाइन अर्ज करून अपॉइंटमेंट घ्यावी व नंबर प्लेट बसवून घ्यावी.
- हर्षल डाके, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, धाराशिव]]></content:encoded></item><item><title>भातपिकांवर दवबिंदूंची नक्षी</title><link>https://www.esakal.com/mumbai/todays-latest-marathi-news-thn26b09770-txt-thane-today-20260916104426</link><comments>https://www.esakal.com/mumbai/todays-latest-marathi-news-thn26b09770-txt-thane-today-20260916104426#comments</comments><guid isPermaLink="false">f8bc96b5-fedb-4c96-90a5-ba87521992f7</guid><pubDate>Wed, 16 Sep 2026 16:14:26 +0530</pubDate><atom:updated>2026-09-16T16:14:26.000+05:30</atom:updated><atom:author><atom:name>CD</atom:name><atom:uri>/api/author/1629784</atom:uri></atom:author><description><![CDATA[ भातपिकांवर दवबिंदूंची नक्षी]]></description><media:keywords></media:keywords><media:content url="https://cf-images.assettype.com/esakal/2026-09-16/xzyr5nig/mumbai_fallback_image.jpg"><media:title type="html"></media:title><media:description type="html"></media:description></media:content><media:thumbnail url="https://cf-images.assettype.com/esakal/2026-09-16/xzyr5nig/mumbai_fallback_image.jpg?w=280" width="280"></media:thumbnail><category>Mumbai</category><content:encoded><![CDATA[ <p>सकाळ वृत्तसेवा <br />डोंबिवली, ता. १६ : गेल्या काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली असतानाच कल्याण-डोंबिवली शहरासह ग्रामीण भागावर दाट धुक्याची चादर पसरल्याचे पाहायला मिळाले. कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर, दिवा, १४ गावे, श्री मलंगगड परिसर तसेच लगतच्या गावांमध्ये पहाटेच्या वेळी धुक्यामुळे परिसराचे स्वरूपच बदलून गेले आहे. शहरातील रस्ते, मोकळी मैदाने आणि ग्रामीण भागातील भातशेती धुक्याने व्यापून गेली होती.</p><p>विशेष म्हणजे भातपिकांच्या पानांवर मोठ्या प्रमाणात दवबिंदू जमा झाल्याचे दिसून आले. धुक्यात हरवलेली हिरवीगार भातशेती आणि त्यावर चमकणारे दवबिंदू यामुळे ग्रामीण भागात निसर्गाचे मनमोहक रूप पाहायला मिळाले. शहरातून ग्रामीण भागाकडे सायकलिंगसाठी येणाऱ्या नागरिकांनी या दृश्याचे छायाचित्रण आपल्या कॅमेऱ्यात कैद केल्याचे दिसून आले.</p><p>दरम्यान, पावसाने काही दिवस विश्रांती घेतल्याने भातपिकांच्या वाढीबाबत शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. यंदाच्या खरीप हंगामाच्या सुरुवातीला झालेल्या समाधानकारक पावसामुळे भातपिकांना चांगली वाढ मिळाली होती, मात्र सध्या पावसाचा खंड पडल्याने पिकांना आवश्यक असलेल्या पाण्याची कमतरता भासण्याची शक्यता आहे. भातपीक अद्याप निसवण्याच्या अवस्थेत आलेले नसल्याने पुढील काळातील पावसाकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.</p><p>दाट धुके आणि पिकांवरील दवबिंदू यामागील कारणांबाबत हवामानतज्ज्ञ अभिजित मोडक यांनी सांगितले की, सप्टेंबर ते ऑक्टोबरदरम्यान अशी स्थिती सामान्य असते. या काळात हंगामी पश्चिमेकडील वारे हळूहळू कमजोर होतात आणि रात्रीचे वातावरण अधिक शांत व निरभ्र बनते. मॉन्सूनमुळे जमिनीत पुरेसा ओलावा असल्याने रात्री जमिनीचे विकिरणजन्य थंडकरण होते. त्यामुळे जमिनीलगतची हवा दवबिंदू तापमानापर्यंत थंड होते आणि परिणामी जमिनीवर धुक्याची निर्मिती होते.</p>]]></content:encoded></item><item><title>पंचवटी, कारंजा परिसरात वाहनांना बंदी</title><link>https://www.esakal.com/uttar-maharashtra/nashik/todays-latest-marathi-news-nsk26h35163-txt-nsktdy3-20260916104343</link><comments>https://www.esakal.com/uttar-maharashtra/nashik/todays-latest-marathi-news-nsk26h35163-txt-nsktdy3-20260916104343#comments</comments><guid isPermaLink="false">bd0f22d7-baf0-49a6-9e46-56362ec77ba4</guid><pubDate>Wed, 16 Sep 2026 16:13:43 +0530</pubDate><atom:updated>2026-09-16T16:13:43.000+05:30</atom:updated><atom:author><atom:name>CD</atom:name><atom:uri>/api/author/1629784</atom:uri></atom:author><description><![CDATA[ पंचवटी, कारंजा परिसरात वाहनांना बंदी]]></description><media:keywords></media:keywords><media:content url="https://cf-images.assettype.com/esakal/2026-09-16/7vtt5h9m/Sakal_Wesite_Banner_1200_x_675.jpg"><media:title type="html"></media:title><media:description type="html"></media:description></media:content><media:thumbnail url="https://cf-images.assettype.com/esakal/2026-09-16/7vtt5h9m/Sakal_Wesite_Banner_1200_x_675.jpg?w=280" width="280"></media:thumbnail><category>Nashik</category><content:encoded><![CDATA[ पंचवटी कारंजा परिसरात वाहनांना बंदी

नाशिक, ता. १६ : पंचवटी, मालवीय चौक, गजानन चौक आणि कारंजा परिसरात देखावे पाहण्यासाठी होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेता शहर वाहतूक पोलिसांतर्फे वाहतुकीत २१ ते २४ तारखे दरम्यान सायंकाळी ५ ते मध्यरात्री १२ पर्यंत या भागातील मुख्य मार्गांवर सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेशबंद करण्यात आला आहे. 
​
या मार्गांवर प्रवेश बंद:
​- दिंडोरी नाका ते पंचवटी कारंजा - मालेगाव स्टॅन्ड : या मार्गावरील सर्व प्रकारची वाहतूक पूर्णपणे बंद राहील.
-​मखमलाबाद नाका ते मालेगाव स्टँड : या रस्त्यावरून ये-जा करण्यास बंदी असेल.
-​आंतरिक चौक व रस्ते : मालवीय चौक ते गजानन चौक, गजानन चौक ते नागचौक, नागचौक ते शिवाजी चौक आणि शिवाजी चौक ते मालवीय चौक या सर्व मार्गांवर दोन्ही बाजूंनी वाहनांना मनाई असेल.
-​काळाराम मंदिर परिसर : सरदार चौक ते श्री काळाराम मंदिर दरम्यानच्या रस्त्यावर सर्व वाहनांना प्रवेशबंदी असेल.
--
पर्यायी मार्ग :
-​दिंडोरी नाक्याकडून मालेगाव स्टॅन्डकडे जाणारी वाहतूक : पेठ फाटा - मखमलाबाद नाका - बायजाबाई छावणी - रामवाडी - चोपडा लॉन्स मार्गे पुढे जाईल.
​- दिंडोरी नाका - निमाणी काट्या मारुती चौक - संतोष टी पॉइंट मार्गे वाहतूक वळवण्यात आली आहे.
-​मखमलाबाद नाक्याकडून जाणारी वाहतूक : पेठ नाका मार्गे पुढे.]]></content:encoded></item><item><title>महामार्गावरील नालेकामाची चौकशी करा</title><link>https://www.esakal.com/uttar-maharashtra/nashik/todays-latest-marathi-news-nsk26h35164-txt-jaltdy4-20260916104251</link><comments>https://www.esakal.com/uttar-maharashtra/nashik/todays-latest-marathi-news-nsk26h35164-txt-jaltdy4-20260916104251#comments</comments><guid isPermaLink="false">8fefd16e-4ae9-4b52-852a-c2888fde283a</guid><pubDate>Wed, 16 Sep 2026 16:12:51 +0530</pubDate><atom:updated>2026-09-16T16:12:51.000+05:30</atom:updated><atom:author><atom:name>CD</atom:name><atom:uri>/api/author/1629784</atom:uri></atom:author><description><![CDATA[ महामार्गावरील नालेकामाची चौकशी करा]]></description><media:keywords></media:keywords><media:content url="https://cf-images.assettype.com/esakal/2026-09-16/2ojysgqj/Sakal_Wesite_Banner_1200_x_675.jpg"><media:title type="html"></media:title><media:description type="html"></media:description></media:content><media:thumbnail url="https://cf-images.assettype.com/esakal/2026-09-16/2ojysgqj/Sakal_Wesite_Banner_1200_x_675.jpg?w=280" width="280"></media:thumbnail><category>Nashik</category><content:encoded><![CDATA[ NSK26H29772
जळगाव : महामार्ग क्रमांक ५३ च्या नालेकामाची चौकशी करण्याबाबत जिल्हाधिकारी रोहन घुगे यांना निवेदन देताना माजी नगरसेवक रियाज बागवान.
.........
महामार्गावरील नालेकामाची चौकशी करा

सेवा रस्त्याचे काम निकृष्ट; माजी नगरसेवक बागवान यांचे निवेदन 

सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. १६ : शहरातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वरील अजिंठा चौक ते ममता हॉस्पिटल परिसर तसेच मलिकनगर नाल्यापर्यंत सुरू असलेल्या सेवा रस्त्याच्या कामात तांत्रिक निकषांकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप करीत माजी नगरसेवक रियाज बागवान यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे. या संपूर्ण कामाची तांत्रिक व निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी निवेदनाद्वारे केली.
महामार्गालगतच्या सेवा रस्त्यावरील पावसाच्या पाण्याचा योग्य निचरा होण्यासाठी निचरा व्यवस्था नियोजनबद्ध पद्धतीने करणे आवश्यक असताना संबंधित कामात त्याकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. त्यामुळे पावसाळ्यात सेवा रस्त्यासह मुख्य महामार्गावर मोठ्या प्रमाणात पाणी साचत असून, पाण्याखाली खड्डे झाकले जात असल्याने वाहनचालकांसाठी धोका निर्माण होत असल्याचे बागवान यांनी म्हटले आहे.

नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न 
या महामार्गावरील अजिंठा चौफुली, ममता हॉस्पिटलजवळील नाला आणि मेहरूण परिसरात पाणी साचत असल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे, असा दावा निवेदनात करण्यात आला आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या रस्ता सुरक्षितता मार्गदर्शक तत्त्वांनुसार काम झाले आहे का, तसेच निचरा व्यवस्था कोणाच्या मंजुरीने करण्यात आली, याची तपासणी करण्याची मागणी करण्यात आली आहे. 

चौकट
यापूर्वी देखील तक्रार
यापूर्वीही संबंधित विभागाकडे तक्रार करून काम थांबविण्याची कार्यवाही करण्यात आली होती; मात्र समस्येचे कायमस्वरूपी निराकरण झाले नसल्याचे निवेदनात नमूद आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी तक्रारीची दखल घेऊन चौकशी करून निष्कर्षानुसार योग्य कार्यवाही करण्याचे आश्वासन दिल्याचे बागवान यांनी माहिती दिली आहे.]]></content:encoded></item><item><title>शहरातील ‘हा’ परिसर आठवडाभर ‘नो व्हेईकल झोन’</title><link>https://www.esakal.com/uttar-maharashtra/nashik/todays-latest-marathi-news-nsk26h35161-txt-nsktdy3-20260916104129</link><comments>https://www.esakal.com/uttar-maharashtra/nashik/todays-latest-marathi-news-nsk26h35161-txt-nsktdy3-20260916104129#comments</comments><guid isPermaLink="false">fadc642d-8d99-41fa-9f81-08835f7926fc</guid><pubDate>Wed, 16 Sep 2026 16:11:29 +0530</pubDate><atom:updated>2026-09-16T16:11:29.000+05:30</atom:updated><atom:author><atom:name>CD</atom:name><atom:uri>/api/author/1629784</atom:uri></atom:author><description><![CDATA[ शहरातील ‘हा’ परिसर आठवडाभर ‘नो व्हेईकल झोन’]]></description><media:keywords></media:keywords><media:content url="https://cf-images.assettype.com/esakal/2026-09-16/t7o90s7z/Sakal_Wesite_Banner_1200_x_675.jpg"><media:title type="html"></media:title><media:description type="html"></media:description></media:content><media:thumbnail url="https://cf-images.assettype.com/esakal/2026-09-16/t7o90s7z/Sakal_Wesite_Banner_1200_x_675.jpg?w=280" width="280"></media:thumbnail><category>Nashik</category><content:encoded><![CDATA[ शहरातील १० प्रमुख मार्गावर ‘नो व्हेईकल झोन’

गर्दीवर पोलिसांकडून उपाय; सायंकाळी सहा ते मध्यरात्री बारापर्यंत लागू

सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. १६ : गणेशोत्सवाच्या कालावधीत देखावे व आरास पाहण्यासाठी होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेता शहर वाहतूक शाखेने शुक्रवार (ता. १८) ते गुरुवार (ता.२४) यादरम्यान दररोज सायंकाळी सहा ते मध्यरात्री बारा या वेळेत बी. डी. भालेकर मैदान, शालीमार, मेन रोड, रविवार कारंजा व अशोकस्तंभ परिसरातील १० प्रमुख मार्ग सर्व प्रकारच्या वाहनांसाठी पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहेत. हा परिसर ‘नो व्हेईकल झोन’ घोषित केला असून, वाहनधारकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन पोलिस उपायुक्त चंद्रकांत गवळी यांनी केले आहे.  

​हे १० मार्ग राहतील बंद  
-​अण्णा भाऊ साठे पुतळा (किटकॅट) चौक ते शालीमार चौक : कालिदास कलामंदिर व सुमंगल कपड्याच्या दुकानमार्गे जाणारा रस्ता.  
-​सीबीएस ते बीडी भालेकर मैदान : गायकवाड क्लास व कान्हेरेवाडी मार्गे दोन्ही बाजूंची वाहतूक.  
-​खडकाळी सिग्नल ते शालीमार व सीबीएसकडे : दोन्ही बाजूंची वाहतूक बंद.  
- ​दीपसन्स कॉर्नर ते गाडगे महाराज पुतळा : नेहरू गार्डन मार्गे ये-जा करणारा मार्ग.  
-​खडकाळी सिग्नल ते गाडगे महाराज पुतळा : त्र्यंबक पोलीस चौकी व पिंपळ चौक मार्गे.  
-​बादशाही कॉर्नर ते मंगेश मिठाई कॉर्नर : गाडगे महाराज पुतळा व धुमाळ पॉइंट मार्गे.  
- ​मेहेर सिग्नल ते दहीपूल : सांगली बँक सिग्नल व धुमाळ पॉइंट मार्गे.  
- प्रतीक लॉज ते नेपाळी कॉर्नरकडे : जाणाऱ्या सर्व वाहनांना बंदी.  
-​अशोकस्तंभ ते मालेगाव स्टँड : रविवार कारंजा मार्गे ये-जा करणारा रस्ता.  
-रविवार कारंजा ते शालीमार : सांगली बँक सिग्नल मार्गे येणारी वाहतूक.  
--
पर्यायी मार्ग :
- खडकाळी सिग्नल - किटकॅट कॉर्नर - मोडक सिग्नल - सीबीएस - मेहेर सिग्नल - अशोकस्तंभ - दिंडोरी नाका/रामवाडी मार्गे मखमलाबाद नाका व पेठ नाक्याकडे.  
-मुंबई नाका - गडकरी सिग्नल - मोडक सिग्नल - सीबीएस - मेहेर सिग्नल - अशोकस्तंभ मार्गे इतरत्र.  
- सीबीएस - मोडक सिग्नल - गडकरी सिग्नल - मुंबई नाका मार्गे पुढे.  
-​मालेगाव स्टँड - मखमलाबाद नाका - रामवाडी - जुना गंगापूर नाका सिग्नल मार्गे पुढे.]]></content:encoded></item><item><title>वेळेत दोषारोपपत्र दाखल करण्यात</title><link>https://www.esakal.com/marathwada/aurangabad/latur-police-100-percent-charge-sheet</link><comments>https://www.esakal.com/marathwada/aurangabad/latur-police-100-percent-charge-sheet#comments</comments><guid isPermaLink="false">fc02e3b9-32fd-403f-bc14-c50f12297f08</guid><pubDate>Wed, 16 Sep 2026 16:10:45 +0530</pubDate><atom:updated>2026-09-16T16:10:45.000+05:30</atom:updated><atom:author><atom:name>CD</atom:name><atom:uri>/api/author/1629784</atom:uri></atom:author><description><![CDATA[ वेळेत दोषारोपपत्र दाखल करण्यात]]></description><media:keywords></media:keywords><media:content url="https://cf-images.assettype.com/esakal/2026-09-16/srbvx5dy/Sakal20Wesite20Banner20_20Ch20Sambhaji20Nagar.jpg"><media:title type="html"></media:title><media:description type="html"></media:description></media:content><media:thumbnail url="https://cf-images.assettype.com/esakal/2026-09-16/srbvx5dy/Sakal20Wesite20Banner20_20Ch20Sambhaji20Nagar.jpg?w=280" width="280"></media:thumbnail><category>Chhatrapati Sambhaji Nagar</category><content:encoded><![CDATA[ वेळेत दोषारोपपत्र दाखल, लातूर राज्यात प्रथम
पोलिसांनी ९० दिवसांत १०० टक्के दोषारोपपत्र दाखल केल्याने तपास प्रक्रियेत सुधारणा
-----
लातूर, ता. १६ : नवीन फौजदारी कायद्यानुसार गुन्ह्यांचा तपास विहित मुदतीत पूर्ण करून न्यायालयात वेळेत दोषारोपपत्र दाखल करणे बंधनकारक आहे. या प्रक्रियेत लातूर जिल्हा पोलिसांनी उल्लेखनीय कामगिरी करत राज्यात प्रथम क्रमांक मिळविला आहे. पोलिस अधीक्षक अमोल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली वेळेत तपास पूर्ण करून दोषारोपपत्र दाखल करण्याच्या प्रक्रियेत जिल्हा पोलिसांनी मोठी सुधारणा केली आहे.
लातूर जिल्ह्यात १ जुलै २०२४ ते ३१ डिसेंबर २०२४ या कालावधीत ६० दिवसांत दोषारोपपत्र दाखल करण्याचे प्रमाण ५.८१ टक्के, तर ९० दिवसांत दोषारोपपत्र दाखल करण्याचे प्रमाण ७.९५ टक्के होते. त्यानंतर १ जानेवारी २०२५ ते ३० जून २०२५ या कालावधीत हे प्रमाण अनुक्रमे १०.५५ आणि १३.४१ टक्क्यांवर पोचले.
३० जून २०२५ रोजी अमोल तांबे यांनी लातूर जिल्ह्याचा पदभार स्वीकारल्यानंतर वेळेत दोषारोपपत्र दाखल करण्याच्या प्रक्रियेकडे विशेष लक्ष दिले. अपर पोलिस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या माध्यमातून तपासाच्या प्रगतीचा नियमित आढावा घेण्यात आला. तसेच तपास अधिकाऱ्यांना विहित मुदतीत तपास पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
१ जानेवारी २०२६ पासून आतापर्यंत ६० दिवसांत दोषारोपपत्र दाखल करण्याचे प्रमाण तब्बल ९९.८६ टक्के, तर ९० दिवसांत दोषारोपपत्र दाखल करण्याचे प्रमाण १०० टक्के झाले आहे. या कामगिरीमुळे लातूर जिल्हा महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर आला आहे.
-----
प्रक्रिया गतिमान करण्यावर भर 
वेळेत दोषारोपपत्र दाखल करण्याच्या प्रक्रियेमुळे नागरिकांना तपासातील विलंबाचा सामना कमी प्रमाणात करावा लागत आहे. यापूर्वी तपास वेळेत पूर्ण न होणे, आरोपींची अटक प्रलंबित राहणे, तक्रारींची दखल न घेणे तसेच तपासात विलंब होत असल्याच्या तक्रारी पोलिसांकडे प्राप्त होत होत्या. या पार्श्वभूमीवर तपास प्रक्रिया अधिक गतिमान करण्यावर भर देण्यात आला आहे.
-----
कारवाईचा नियमित आढावा
जिल्ह्यातील गुन्ह्यांचा तपास, दोषारोपपत्र दाखल करण्याची प्रक्रिया आणि प्रतिबंधात्मक कारवाईचा नियमित आढावा घेतला जात आहे. गुन्हा वेळेत दाखल करणे, तपास मुदतीत पूर्ण करणे, दोषारोपपत्र न्यायालयात वेळेत दाखल करणे तसेच आरोपींवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यावर भर दिल्याने ही सुधारणा साध्य झाल्याचे पोलिस विभागाकडून सांगण्यात आले.]]></content:encoded></item><item><title>जिल्हा परिषद अधिकारी व कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी</title><link>https://www.esakal.com/marathwada/aurangabad/employee-health-check-initiative</link><comments>https://www.esakal.com/marathwada/aurangabad/employee-health-check-initiative#comments</comments><guid isPermaLink="false">90911165-0184-463a-b0b7-6454877b07af</guid><pubDate>Wed, 16 Sep 2026 16:05:45 +0530</pubDate><atom:updated>2026-09-16T16:05:45.000+05:30</atom:updated><atom:author><atom:name>CD</atom:name><atom:uri>/api/author/1629784</atom:uri></atom:author><description><![CDATA[ जिल्हा परिषद अधिकारी व कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी]]></description><media:keywords></media:keywords><media:content url="https://cf-images.assettype.com/esakal/2026-09-16/ay2whkzn/Sakal20Wesite20Banner20_20Ch20Sambhaji20Nagar.jpg"><media:title type="html"></media:title><media:description type="html"></media:description></media:content><media:thumbnail url="https://cf-images.assettype.com/esakal/2026-09-16/ay2whkzn/Sakal20Wesite20Banner20_20Ch20Sambhaji20Nagar.jpg?w=280" width="280"></media:thumbnail><category>Chhatrapati Sambhaji Nagar</category><content:encoded><![CDATA[ जि. प. कार्यालयात अधिकारी, 
कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी
-सीईओ नतीशा माथूर यांच्या संकल्पनेतून शिबिर
सकाळ वृत्तसेवा
परभणी, ता. १६ :  जिल्हा परिषदेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांची दैनंदिन धावपळ, कामाचा वाढता ताण, बदलती जीवनशैली यामुळे आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असते. अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेत त्यांना वेळोवेळी आरोग्य तपासणीची सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने मुख्य कार्यकारी अधिकारी नतीशा माथूर यांच्या संकल्पनेतून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यालयात आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. 
यावेळी एकूण ३२७ अधिकारी व कर्मचाऱ्यांपैकी १८४ अधिकारी व कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. शिबिरादरम्यान अधिकारी व कर्मचाऱ्यांची वजन, उंची, रक्तदाब (बीपी), रक्तातील साखर (शुगर), रक्त तपासणी तसेच सर्वसाधारण आरोग्य तपासणी करण्यात आली. वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून तपासणी करून आवश्यकतेनुसार संबंधितांना आरोग्यविषयक मार्गदर्शन व सल्ला देण्यात आला. हे शिबिर जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संदीप घोन्सीकर, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. आर. एम. सोनवणे यांच्या निरीक्षणाखाली पार पडले. शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी वैद्यकीय अधिकारी, समुदाय आरोग्य अधिकारी, आरोग्य सेवक व सेविका, जिल्हा महालॅब समन्वयक तसेच आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले. प्रत्येकाने नियमित आरोग्य तपासणी, योग्य आहार, व्यायाम आणि निरोगी जीवनशैलीचा अंगीकार करून आरोग्य संपन्न बनावे असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी माथूर यांनी केले आहे.
----------]]></content:encoded></item><item><title>वाशी नाका परिसरात अवैध पार्किंगचा विळखा</title><link>https://www.esakal.com/mumbai/todays-latest-marathi-news-mum26i88905-txt-mumbai-today-20260916103512</link><comments>https://www.esakal.com/mumbai/todays-latest-marathi-news-mum26i88905-txt-mumbai-today-20260916103512#comments</comments><guid isPermaLink="false">e933e289-6ab4-4de2-9045-44bc2de1e386</guid><pubDate>Wed, 16 Sep 2026 16:05:12 +0530</pubDate><atom:updated>2026-09-16T16:05:12.000+05:30</atom:updated><atom:author><atom:name>CD</atom:name><atom:uri>/api/author/1629784</atom:uri></atom:author><description><![CDATA[ वाशी नाका परिसरात अवैध पार्किंगचा विळखा]]></description><media:keywords></media:keywords><media:content url="https://cf-images.assettype.com/esakal/2026-09-16/cajrtci2/mumbai_fallback_image.jpg"><media:title type="html"></media:title><media:description type="html"></media:description></media:content><media:thumbnail url="https://cf-images.assettype.com/esakal/2026-09-16/cajrtci2/mumbai_fallback_image.jpg?w=280" width="280"></media:thumbnail><category>Mumbai</category><content:encoded><![CDATA[ <p>वाशी नाका परिसरात अवैध पार्किंगचा विळखा<br />नागरिक, वाहनचालक त्रस्त; वाहतूक कोंडीमुळे अपघाताचा धोका<br />जीवन तांबे ः सकाळ वृत्तसेवा<br />चेंबूर, ता. १६ ः चेंबूर येथील आर. सी. मार्गावरील वाशी नाका परिसरातील मार्गाच्या दुतर्फा अवैधरीत्या अवजड वाहने उभी केली जात असल्याने नागरिक आणि वाहनचालक त्रस्त झाले आहेत. या अनधिकृत पार्किंगमुळे रस्ते अरुंद होऊन वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत असून, वाहतूक विभागाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे.<br />चेंबूरच्या माहुल गाव, गडकरी खाण आणि वाशी नाका परिसरात बीपीसीएल, एचपीसीएल, टाटा पॉवर, एजिस आणि आरसीएफ यांसह अनेक औद्योगिक प्रकल्प आहेत. या प्रकल्पांमध्ये ये-जा करणारे मालवाहू ट्रक, एलपीजी सिलिंडर वाहून नेणारे ट्रक, टँकर आणि अन्य अवजड वाहने रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात उभी केली जातात. त्यामुळे वाशी नाका, माहुल गाव, आणिक गाव आणि शंकर देऊळ परिसरातील मार्गावर वाहतुकीचा खोळंबा होत आहे.<br />या वाहतूक कोंडीचा फटका चेंबूर रेल्वे स्थानक तसेच सायन-पनवेल मार्गाकडे जाणाऱ्या वाहनचालकांना बसत आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना वाहने उभी असल्याने उपलब्ध रस्ता अरुंद होतो. त्यामुळे वाहनांना मार्ग काढताना अडचणी येतात. पादचाऱ्यांनाही दोन वाहनांच्या मधून जीव मुठीत धरून चालावे लागत असल्याने अपघाताचा धोका निर्माण झाला आहे.<br />दरम्यान, या परिसरात औद्योगिक प्रकल्पांमुळे रासायनिक वायू आणि प्रदूषणाचा त्रास होत असल्याच्या तक्रारी स्थानिकांकडून केल्या जात आहेत. त्यातच रस्त्यांवरील अवैध पार्किंगमुळे नागरिकांच्या समस्येत आणखी भर पडली आहे. काही वर्षांपूर्वी गव्हाणपाडा परिसरातील एका व्यक्तीला हृदयविकाराचा झटका आल्यानंतर उपचारासाठी नेत असताना वाहतूक कोंडीमुळे वेळेत उपचार न मिळाल्याने त्याचा मृत्यू झाल्याचा दावा स्थानिकांकडून करण्यात येत आहे.<br />प्रशासनाने तातडीने रस्त्यावरील अवैध पार्किंग हटवून कारवाई करावी. तसेच औद्योगिक प्रकल्पांमध्ये येणाऱ्या अवजड व रासायनिक पदार्थांची वाहतूक करणाऱ्या वाहनांसाठी स्वतंत्र पार्किंग अथवा प्रतीक्षा व्यवस्था उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.</p><p>संबंधित विभागांनी या गंभीर समस्येकडे तातडीने लक्ष देऊन अनधिकृत पार्किंगवर कारवाई करावी अन्यथा नागरिकांच्या हितासाठी न्यायालयात दाद मागावी लागेल.<br />- ॲड. संतोष धोत्रे, आरटीआय कार्यकर्ते</p><p>वाहनचालक आणि पादचाऱ्यांना जीव धोक्यात घालून मार्ग काढावा लागतो. प्रशासनाने तातडीने ही वाहने हटवून कायमस्वरूपी पार्किंगची व्यवस्था करावी.<br />- गौतम मोरे, स्थानिक नागरिक</p><p>गव्हाणपाडा परिसरातील अनधिकृत पार्किंगचा विषय प्रशासन आणि प्रभाग समितीकडे मांडण्यात आला आहे. हा प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील.<br />- अंजली नाईक, नगरसेविका, शिवसेना (शिंदे गट)</p><p>वाशी नाका परिसरातील अनधिकृत पार्किंगबाबत वाहतूक विभागाकडून कारवाई सुरू आहे. नियमांचे उल्लंघन करून वाहने उभी करणाऱ्यांवर आवश्यक ती कारवाई करण्यात येत आहे.<br />- लक्ष्मण उकिर्डे, पोलिस निरीक्षक, ट्रॉम्बे वाहतूक विभाग</p>]]></content:encoded></item><item><title>गुंडांकडून चॉपरचा धाक दाखवून हप्ता वसुली</title><link>https://www.esakal.com/uttar-maharashtra/nashik/todays-latest-marathi-news-nsk26h35150-txt-nsktdy3-20260916103140</link><comments>https://www.esakal.com/uttar-maharashtra/nashik/todays-latest-marathi-news-nsk26h35150-txt-nsktdy3-20260916103140#comments</comments><guid isPermaLink="false">65a40386-fafb-41fd-a0d5-f1ce42578332</guid><pubDate>Wed, 16 Sep 2026 16:01:40 +0530</pubDate><atom:updated>2026-09-16T16:01:40.000+05:30</atom:updated><atom:author><atom:name>CD</atom:name><atom:uri>/api/author/1629784</atom:uri></atom:author><description><![CDATA[ गुंडांकडून चॉपरचा धाक दाखवून हप्ता वसुली]]></description><media:keywords></media:keywords><media:content url="https://cf-images.assettype.com/esakal/2026-09-16/yf8imwr0/Sakal_Wesite_Banner_1200_x_675.jpg"><media:title type="html"></media:title><media:description type="html"></media:description></media:content><media:thumbnail url="https://cf-images.assettype.com/esakal/2026-09-16/yf8imwr0/Sakal_Wesite_Banner_1200_x_675.jpg?w=280" width="280"></media:thumbnail><category>Nashik</category><content:encoded><![CDATA[ चॉपरचा धाक दाखवून हप्ता वसुली

तिघा सराईतांविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल 

सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. १६ : रविवार पेठ परिसरातील गंगावाडी येथे गणेशोत्सवाचा देखावा पाहण्यासाठी आलेल्या नागरिक व मंडळाच्या कार्यकर्त्यांना धाक दाखवून जबरदस्तीने खंडणी वसुली करण्याचा प्रकार घडला आहे. चॉपर व चाकूचा धाक दाखवून रोख रक्कम लुटण्यासह रस्त्यावरील गाड्यांची तोडफोड करत दगडफेक केल्याची घटना घडली असून, यात दोघे जण जखमी झाले आहेत. याप्रकरणी सरकारवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  
अवधूत जाधव, जयेश जाधव, राहुल दिघे व रोशन गांगुर्डे  अशी संशयितांची नावे आहेत. विशाल चंद्रकांत आहेर  (४१, रा. आहेर भवन, गंगावाडी, रविवार पेठ) यांच्या फिर्यादीनुसार, गंगावाडी भक्त मित्रमंडळाच्या देखाव्याजवळ गर्दी असताना संशयितांनी  शिवीगाळ करत उभ्या असलेल्या गाड्यांची तोडफोड करण्यास सुरुवात केली. नागरिकांनी त्यांना विचारणा केली असता, गाड्या पार्क करण्यासाठी दरमहा २ हजार रुपये द्यावे लागतील, अशी धमकी दिली.  तसेच, मंडळाने यंदा गणपतीचा हप्ता दिला नाही'' असे म्हणत संशयितांनी चॉपर व चाकूचा धाक दाखवून फिर्यादी विशाल आहेर यांच्या खिशातील बाराशे रुपये बळजबरीने काढून घेतले. त्याच वेळी शुभम मेटकर या कार्यकर्त्याला चाकूचा धाक दाखवून ५०० रुपये हिसकावले व प्रतिकार केला असता त्याला दगडाने मारहाण करून जखमी केले.   यानंतर राहुल दिघे याने जिवे मारण्याची धमकी दिली आणि रस्त्यावरील दगड मारण्यास सुरुवात केली. या दगडफेकीत फिर्यादी व इतर तरुण जखमी झाले आहेत. निघून जाताना संशयितांनी दोन दुचाकी (एमएच १५ डीपी ०१७१, एमएच १५ डीडी ६६६४) व इतर ४ ते ५ सायकलींची तोडफोड करून सुमारे २५ हजार रुपयांचे नुकसान केले.  या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक डगळे करीत आहेत.]]></content:encoded></item><item><title>प्रकल्पग्रस्तांसाठी घेतलेल्या घरांचे एमएमआरडीए भाडे देईना!</title><link>https://www.esakal.com/mumbai/todays-latest-marathi-news-mbi26b37584-txt-mumbai-today-20260916103026</link><comments>https://www.esakal.com/mumbai/todays-latest-marathi-news-mbi26b37584-txt-mumbai-today-20260916103026#comments</comments><guid isPermaLink="false">e24513c8-ddcc-42fb-9d5c-4f825e93b79a</guid><pubDate>Wed, 16 Sep 2026 16:00:26 +0530</pubDate><atom:updated>2026-09-16T16:00:26.000+05:30</atom:updated><atom:author><atom:name>CD</atom:name><atom:uri>/api/author/1629784</atom:uri></atom:author><description><![CDATA[ प्रकल्पग्रस्तांसाठी घेतलेल्या घरांचे एमएमआरडीए भाडे देईना!]]></description><media:keywords></media:keywords><media:content url="https://cf-images.assettype.com/esakal/2026-09-16/t1mwcsrq/mumbai_fallback_image.jpg"><media:title type="html"></media:title><media:description type="html"></media:description></media:content><media:thumbnail url="https://cf-images.assettype.com/esakal/2026-09-16/t1mwcsrq/mumbai_fallback_image.jpg?w=280" width="280"></media:thumbnail><category>Mumbai</category><content:encoded><![CDATA[ <p>प्रकल्पग्रस्तांसाठी घेतलेल्या घरांचे एमएमआरडीए भाडे देईना!<br />शिवशाहीकडून तीव्र नाराजी; १४० घरांचे दोन वर्षांचे तीन कोटी भाडे थकवले<br />सकाळ वृत्तसेवा<br />मुंबई, ता. १६ : मुंबईसह एमएमआरडीए क्षेत्रात हजारो कोटी रुपयांचे मेट्रो, रस्ते, सी लिंक असे वेगवेगळे प्रकल्प करणारे एमएमआरडीएने आपल्या प्रकल्पग्रस्तांकरिता १४० घरे शिवशाही पुनर्वसन प्रकल्पाकडून घेतली आहेत. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून या घरांचे सुमारे दोन कोटी ८३ लाख रुपयांचे भाडे थकवले आहे. वारंवार पाठपुरावा करूनही भाडे मिळत नसल्याने शिवशाहीने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. <br />      झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पातून अतिरिक्त तयार होणाऱ्या सदनिका एसआरएकडून संक्रमण सदनिका म्हणून शिवशाहीकडे दिल्या जातात. त्यानुसार एसआरए प्रकल्प राबविणाऱ्या विकसकांना तात्पुरत्या स्वरूपात या सदनिका भाडेतत्त्वावर झोपडपट्टीधारकांसाठी उपलब्ध करून दिल्या जातात. दरम्यान, एमएमआरडीएकडून शिवडी-वरळी उन्नत मार्गाचे काम हाती घेताना येथील प्रकल्पबाधितांसाठी त्यांनी शिवशाहीची जसमीन मिल धारावी येथील १४० घरे २०२२ मध्ये भाडेतत्त्वावर घेतली आहेत. मासिक ८,००० हजार रुपये भाडे निश्चित केले होते. त्यानुसार एमएमआरडीएने पहिल्या दोन वर्षांचे भाडे शिवशाहीला इमानेइतबारे दिले आहे. मात्र गेल्या दोन वर्षांत भाडे थकीत ठेवले आहे. तसेच हे भाडे माफ करावे, अशी मागणी एमएमआरडीए गृहनिर्माण विभागाकडे केली आहे. त्यामुळे आता ते भाडे वसूल कसे करायचे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. </p><p>भाड्यावरून जुंपणार<br />शिवशाहीने एमएमआरडीएला भाडेतत्त्वावर घरे दिली आहेत. त्याचे भाडे त्यांनी देणे बंधनकारक आहे. त्यानुसार मागील दोन वर्षांचे भाडे आम्ही वसूल करणार असून, त्याबाबत गृहनिर्माण विभागाकडे प्रस्ताव दिला असल्याचे शिवशाहीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. त्यामुळे भाड्यावरून शिवशाही आणि एमएमआरडीएमध्ये जुंपणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.</p>]]></content:encoded></item><item><title>पाचव्या, सातव्या दिवशीच्या गणेश विसर्जनासाठी वाहतुकीत बदल</title><link>https://www.esakal.com/uttar-maharashtra/nashik/todays-latest-marathi-news-nsk26h35154-txt-nsktdy3-20260916102823</link><comments>https://www.esakal.com/uttar-maharashtra/nashik/todays-latest-marathi-news-nsk26h35154-txt-nsktdy3-20260916102823#comments</comments><guid isPermaLink="false">4b733e95-64d1-417a-9645-05c7674dcc7c</guid><pubDate>Wed, 16 Sep 2026 15:58:23 +0530</pubDate><atom:updated>2026-09-16T15:58:23.000+05:30</atom:updated><atom:author><atom:name>CD</atom:name><atom:uri>/api/author/1629784</atom:uri></atom:author><description><![CDATA[ पाचव्या, सातव्या दिवशीच्या गणेश विसर्जनासाठी वाहतुकीत बदल]]></description><media:keywords></media:keywords><media:content url="https://cf-images.assettype.com/esakal/2026-09-16/npfhwshv/Sakal_Wesite_Banner_1200_x_675.jpg"><media:title type="html"></media:title><media:description type="html"></media:description></media:content><media:thumbnail url="https://cf-images.assettype.com/esakal/2026-09-16/npfhwshv/Sakal_Wesite_Banner_1200_x_675.jpg?w=280" width="280"></media:thumbnail><category>Nashik</category><content:encoded><![CDATA[ पाचव्या, सातव्या दिवशीच्या विसर्जनासाठी वाहतुकीत बदल

पर्यायी मार्गांचा करावा अवलंब करण्याचे वाहतूक शाखेकडून आवाहन  

सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. १६ : पाचव्या (ता. १८) आणि सातव्या दिवशी (ता. २०) होणाऱ्या श्री गणेश विसर्जन मिरवणुका आणि दर्शनासाठी होणारी गर्दी लक्षात घेता शहर वाहतूक पोलिसांनी मार्गात महत्त्वाचे बदल केले आहेत. पंचवटी कारंजा, मालेगाव स्टॅन्ड, रविवार कारंजा आणि अशोकस्तंभ या भागांत संभाव्य वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहतूक शाखेचे उपायुक्त चंद्रकांत गवळी यांनी अधिसूचना जारी करीत पर्यायी मार्गांचा अवलंब करण्याचे आवाहन केले आहे. 
वाहतूक नियम व निर्बंध हे पोलिस, रुग्णवाहिका आणि अग्निशमन दलाच्या वाहनांना लागू राहणार नाहीत. तसेच परिस्थितीनुसार वाहतुकीत ऐनवेळी बदल करण्याचे अधिकार पोलिसांनी राखून ठेवले आहेत. या अधिसूचनेचे उल्लंघन करणाऱ्या वाहनधारकांवर मोटर वाहन कायदा व मुंबई पोलीस कायद्यांतर्गत कडक कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलिस प्रशासनाने दिला आहे.  १८, २० सप्टेंबरला दुपारी दोनपासून ते मध्यरात्री बारापर्यंत शहरातील काही प्रमुख मार्गांवर अवजड वाहने, एसटी बस आणि सिटीलिंक बससाठी प्रवेश बंद राहणार आहे.  
--
हे मार्ग राहतील बंद; दुपारी २ ते रात्री बारापर्यंत
​- निमाणी ते रविवार कारंजा मार्ग : निमाणी बसस्थानकावरून पंचवटी कारंजा, मालेगाव स्टॅन्ड व रविवार कारंजा मार्गाने जाणाऱ्या राज्य परिवहन मंडळ व सिटीलिंक बसस आणि सर्व प्रकारच्या जड/अवजड वाहनांना पूर्णपणे प्रवेश बंद राहील.
- अशोकस्तंभ ते पंचवटी कारंजा मार्ग : सीबीएसकडून पंचवटीकडे जाणाऱ्या बस व इतर जड वाहनांना अशोकस्तंभ ते रविवार कारंजा मार्गे पंचवटी कारंजाकडे जाण्यास मनाई करण्यात आली आहे.  
--
पर्यायी मार्ग :
-​निमाणीकडून जाणाऱ्या वाहनांसाठी : निमाणी मार्गावरील प्रवेशबंद असलेली वाहने काट्या मारुती चौक, संतोष टी पॉइंट, कन्नमवार पूल आणि द्वारका सर्कल मार्गाने नाशिक रोड, अंबड, सातपूर व इतर भागांत वळवण्यात आली आहेत.  
-​सीबीएसकडून पंचवटीकडे जाणाऱ्या वाहनांसाठी : ही वाहने अशोकस्तंभ, रामवाडी पुल, मखमलाबाद नाका, पेठ नाका सिग्नल आणि दिंडोरी नाका मार्गे निमाणी स्टॅन्ड, पंचवटीकडे जातील.  
-नाशिक रोड, अंबड, सातपूरकडे जाणारी वाहने : काठ्या मारुती चौक - विश्वकर्मा चौक - कन्नमवार पूल - द्वारका मार्गे इच्छितस्थळी जाऊ शकतील.]]></content:encoded></item><item><title>शासकीय योजनांसाठी ‘सेवा संकल्प’!</title><link>https://www.esakal.com/mumbai/todays-latest-marathi-news-mum26i88913-txt-thane-today-20260916102713</link><comments>https://www.esakal.com/mumbai/todays-latest-marathi-news-mum26i88913-txt-thane-today-20260916102713#comments</comments><guid isPermaLink="false">1524ce12-1dff-4ea3-a6a4-13d9e881b320</guid><pubDate>Wed, 16 Sep 2026 09:27:13 +0530</pubDate><atom:updated>2026-09-16T15:57:13.000+05:30</atom:updated><atom:author><atom:name>CD</atom:name><atom:uri>/api/author/1629784</atom:uri></atom:author><description><![CDATA[ शासकीय योजनांसाठी ‘सेवा संकल्प’!]]></description><media:keywords></media:keywords><media:content url="https://cf-images.assettype.com/esakal/2026-09-16/oett7fdy/mumbai_fallback_image.jpg"><media:title type="html"></media:title><media:description type="html"></media:description></media:content><media:thumbnail url="https://cf-images.assettype.com/esakal/2026-09-16/oett7fdy/mumbai_fallback_image.jpg?w=280" width="280"></media:thumbnail><category>Mumbai</category><content:encoded><![CDATA[ <p>सकाळ वृत्तसेवा<br />ठाणे, ता. १६ : नागरिकांना सरकारी योजनांची माहिती असूनही त्याचा लाभ घेण्यासाठी कार्यालयांच्या फेऱ्या माराव्या लागू नयेत, यासाठी ठाणे जिल्हा परिषद आता गावपातळीवर पोहोचणार आहे. सरकारच्या निर्देशानुसार उद्या (ता. १७) पासून १७ ऑक्टोबरपर्यंत जिल्ह्यात ‘सेवा संकल्प अभियान’ राबविण्यात येणार आहे. या अभियानाच्या माध्यमातून शासकीय योजनांचा लाभ पात्र नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासोबतच गावागावात सामाजिक, आरोग्य, स्वच्छता आणि जनजागृतीचे उपक्रम राबविले जाणार आहेत.</p><p>जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव यांनी अभियानाच्या तयारीसाठी मंगळवारी (ता. १५) संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेतली. प्रत्येक विभागाने स्वतंत्र नियोजन न करता समन्वयाने काम करावे आणि नागरिकांना केंद्रस्थानी ठेवून सेवा अधिक गतिमान करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. अभियानाचा महत्त्वाचा भाग म्हणून प्रत्येक तालुक्यात ‘सेवा सेतू’ शिबिरे घेण्यात येणार आहेत. या शिबिरांमध्ये पात्र लाभार्थ्यांना विविध शासकीय योजनांची माहिती देऊन त्यांना थेट लाभ मिळवून देण्याची कार्यवाही केली जाणार आहे. त्यामुळे योजना आणि लाभार्थी यांच्यातील अंतर कमी करण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून केला जाणार आहे. </p><p>‘सेवा माझे योगदान’ या उपक्रमातून गाव आणि वाडी पातळीवर स्थानिक गरजेनुसार विविध कार्यक्रम घेण्यात येणार आहेत. रक्तदान, वृक्षारोपण, स्वच्छता, आरोग्य तपासणी, योग-ध्यान, प्लॅस्टिकमुक्ती, जलसंधारण, कचरा वर्गीकरण व कंपोस्टिंग याबरोबरच महिला आरोग्य, पोषण आणि ॲनिमियाबाबत जनजागृती केली जाणार आहे. याशिवाय सायबर सुरक्षा, रस्ते सुरक्षा, दिव्यांगजनांना सहकार्य, मतदार जागृती आणि शासकीय योजनांची माहिती देण्याचे उपक्रमही राबविले जाणार आहेत. या उपक्रमांसाठी गट विकास अधिकारी नोडल अधिकारी म्हणून काम पाहतील.</p><p>अंगणवाडी उत्सवात माता-बालकांचा सहभाग<br />अभियानात सेवा ज्योत यात्रा, चित्रकला व वक्तृत्व स्पर्धा, अंगणवाडी उत्सव, आशीर्वादाचा दिवा आणि बदलाची गोष्ट यांसारख्या उपक्रमांचाही समावेश आहे. अंगणवाडी उत्सवाच्या माध्यमातून माता आणि बालकांना सहभागी करून आरोग्य व पोषण योजनांची माहिती दिली जाणार आहे. अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि आशा कार्यकर्त्यांचा सन्मानही करण्यात येणार आहे.</p><p>योजनांच्या यशोगाथा गावागावात<br />शासकीय योजनांमुळे नागरिकांच्या जीवनात झालेला बदल ‘बदलाची गोष्ट’ या उपक्रमातून मांडण्यात येणार आहे. तर ‘नमो सेवागाथा’अंतर्गत शाळा, महाविद्यालये आणि ग्रामपंचायतींच्या स्तरावर कला व नाट्य पथकांच्या माध्यमातून शासकीय योजनांची माहिती दिली जाणार आहे. दरम्यान, अभियानातील प्रत्येक उपक्रमाची माहिती, लाभार्थ्यांचा तपशील तसेच फोटो, व्हिडिओ आणि रील्सचे संकलन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.</p>]]></content:encoded></item><item><title>रीलमधून गावाची सफर</title><link>https://www.esakal.com/kokan/todays-latest-marathi-news-kop26e33225-txt-ratnagiri-today-20260916102702</link><comments>https://www.esakal.com/kokan/todays-latest-marathi-news-kop26e33225-txt-ratnagiri-today-20260916102702#comments</comments><guid isPermaLink="false">3c5a739c-c7ee-4bbd-8a4b-32259fe7429a</guid><pubDate>Wed, 16 Sep 2026 15:57:02 +0530</pubDate><atom:updated>2026-09-16T15:57:02.000+05:30</atom:updated><atom:author><atom:name>CD</atom:name><atom:uri>/api/author/1629784</atom:uri></atom:author><description><![CDATA[ रीलमधून गावाची सफर]]></description><media:keywords></media:keywords><media:content url="https://cf-images.assettype.com/esakal/2026-09-16/uak36tot/ratnagiri_default_banner_1.jpg"><media:title type="html"></media:title><media:description type="html"></media:description></media:content><media:thumbnail url="https://cf-images.assettype.com/esakal/2026-09-16/uak36tot/ratnagiri_default_banner_1.jpg?w=280" width="280"></media:thumbnail><category>Kokan</category><content:encoded><![CDATA[ <p>rat१६p५.jpg- <br />26O64275<br />रत्नागिरी ः रील स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभाला उपस्थित मान्यवर. <br />---<br />रील स्पर्धेत आदित्य कोत्रे प्रथम<br />हातखंबा लायन्स क्लब; ग्रामीण पर्यटनाला चालना<br />सकाळ वृत्तसेवा<br />रत्नागिरी, ता. १६ : गावची माती, संस्कृती, परंपरा आणि निसर्गसौंदर्य रीलच्या माध्यमातून जगासमोर आणण्यासाठी लायन्स क्लब ऑफ हातखंबा रॉयल, डीके फोटो स्टुडिओ आणि दर्जा चॅनल यांच्यातर्फे तालुकास्तरीय रील स्पर्धा घेण्यात आली. यामध्ये कापडगाव येथील आदित्य कोत्रे यांनी स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला तर गोळपचे सुतेज भाटकर द्वितीय आणि केळ्ये-भीमउद्यानचे राजदीप कदम तृतीय ठरले.<br />जागतिक छायाचित्रण दिनानिमित्त आयोजित या स्पर्धेत रत्नागिरी तालुक्यातील २७ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. ग्रामीण जीवनशैली, राहणीमान, परंपरा, धार्मिक स्थळे, प्राचीन शिल्पे, खाद्यसंस्कृती, नद्या-नाले, धबधबे, पारंपरिक शेती व व्यवसाय यांसह गावातील वैशिष्ट्ये अवघ्या एक मिनिट ३० सेकंदांच्या रीलमधून प्रभावीपणे मांडण्याचे आव्हान स्पर्धकांसमोर होते. झरेवाडीचे ऋत्विक गोताड आणि हातखंब्याचे यश सनगरे यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले. बक्षीस वितरण सोहळ्यात रत्नागिरीचे प्रसिद्ध अभिनेते सचिन काळे यांनी ग्रामीण जीवनाशी नाळ जोडलेल्या या उपक्रमाचे कौतुक केले. लायन्स क्लबचे झोन चेअरमन एमजेएफ शिल्पा पानवलकर यांनी या नावीन्यपूर्ण सेवा उपक्रमाचे कौतुक केले. क्लबचे अध्यक्ष गिरीश शितप यांनी ग्रामीण पर्यटनाला चालना देणे आणि गावातील वैशिष्ट्ये डिजिटल माध्यमातून जगासमोर आणणे, हा स्पर्धेमागील उद्देश असल्याचे सांगितले.<br />पारितोषिक वितरणावेळी पंचायत समिती सदस्य संयोग उर्फ दादा दळी, पराग पानवलकर, ज्ञानेश कांबळे, भूषण बागुल, औदुंबर कळंबटे, राजेश गोसावी, वसंत कळंबटे यांच्यासह क्लबचे पदाधिकारी उपस्थित होते. सचिन सावेकर यांनी सूत्रसंचालन केले तर अवधूत कळंबटे यांनी आभार मानले.</p>]]></content:encoded></item><item><title>सोशल मीडियातील व्यसनाधीन करणाऱ्या फीचर्सवर केंद्राचे धोरण आहे का?</title><link>https://www.esakal.com/pune/government-control-social-media-addiction</link><comments>https://www.esakal.com/pune/government-control-social-media-addiction#comments</comments><guid isPermaLink="false">ef22cbd3-0f3f-4f5c-b7ac-1f0b158ceb7f</guid><pubDate>Wed, 16 Sep 2026 15:52:06 +0530</pubDate><atom:updated>2026-09-16T15:52:06.000+05:30</atom:updated><atom:author><atom:name>CD</atom:name><atom:uri>/api/author/1629784</atom:uri></atom:author><description><![CDATA[ सोशल मीडियातील व्यसनाधीन करणाऱ्या फीचर्सवर केंद्राचे धोरण आहे का?]]></description><media:keywords></media:keywords><media:content url="https://cf-images.assettype.com/esakal/2026-09-16/qq988fhd/Banner1.png"><media:title type="html"></media:title><media:description type="html"></media:description></media:content><media:thumbnail url="https://cf-images.assettype.com/esakal/2026-09-16/qq988fhd/Banner1.png?w=280" width="280"></media:thumbnail><category>Pune</category><content:encoded><![CDATA[ <p>‘सोशल मीडिया फीचर’वर <br />नियंत्रणाचा विचार आहे का? </p><p>हाय कोर्टाचा केंद्राला सवाल : व्यसनाधीनता रोखण्यासाठी उपाय </p><p>नवी दिल्ली, ता. १६ (पीटीआय) : ‘इन्फिनिट स्क्रोल’ आणि ‘ऑटो प्ले’सारख्या वापरकर्त्यांना व्यसनाधीन करणाऱ्या ‘सोशल मीडिया’तील ‘फिचर’वर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र सरकार धोरण आखण्याचा विचार करत आहे का?’ अशी विचारणा दिल्ली उच्च न्यायालयाने बुधवारी केली.</p><p>न्यायाधीश नितीन वासुदेव सांब्रे आणि न्या. अमित शर्मा यांच्या खंडपीठाने याबाबत केंद्राकडून माहिती मागवली. सोशल मीडियाच्या माध्यमांवरील वापरकर्त्यांचा सहभाग वाढविणाऱ्या आणि व्यसनाधीन करणाऱ्या रचनेची तपासणी करण्यासाठी तज्ज्ञ समिती स्थापन करण्याची मागणी करणाऱ्या जनहित याचिकेवर तीन आठवड्यांनंतर सुनावणी घेण्यात येणार आहे. केंद्र सरकार अशा धोरणाचा विचार करत आहे का, अशी विचारणा न्यायालयाने केली असता अतिरिक्त महाधिवक्ता चेतन शर्मा यांनी याबाबत आपल्याकडे निश्चित माहिती नसल्याचे सांगितले. त्यावर, “धोरणाचा विचार सुरू आहे का, याबाबत माहिती घेऊन या. आम्ही तीन आठवड्यांनी सुनावणी घेऊ,” असे न्यायालयाने सांगितले. याचिकाकर्ते आणि कायद्याचे प्राध्यापक विकास कथुरिया यांनी सांगितले की, याचिकेचा मुद्दा ‘सोशल मीडिया’वरील सामग्री नसून, वापरकर्त्यांचे लक्ष सतत गुंतवून ठेवण्यासाठी करण्यात आलेल्या व्यासपीठांच्या रचनेशी संबंधित आहे. त्यात ‘इन्फिनिट स्क्रोल’, ‘ऑटो प्ले’, वैयक्तिक पसंतीनुसार दाखविले जाणारे फीड, सततच्या सूचना आणि ‘लाईक’सारख्या वैशिष्ट्यांचा समावेश असल्याचे त्यांनी सांगितले.</p><p>याचिकेत केंद्र सरकार आणि राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाला अशा वैशिष्ट्यांवर निर्बंध किंवा नियमन करण्याचे निर्देश देण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच, वापरकर्त्यांच्या सुरक्षिततेसाठी उपाययोजना सुचविणाऱ्या तज्ज्ञ समितीची स्थापना करण्याची मागणीही करण्यात आली आहे.</p>]]></content:encoded></item><item><title>सफाई कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांचा मनपात आढावा</title><link>https://www.esakal.com/uttar-maharashtra/nashik/todays-latest-marathi-news-nsk26h35141-txt-jaltdy4-20260916101403</link><comments>https://www.esakal.com/uttar-maharashtra/nashik/todays-latest-marathi-news-nsk26h35141-txt-jaltdy4-20260916101403#comments</comments><guid isPermaLink="false">43ce79dd-058b-4550-9fdc-82e8078018a2</guid><pubDate>Wed, 16 Sep 2026 15:44:03 +0530</pubDate><atom:updated>2026-09-16T15:44:03.000+05:30</atom:updated><atom:author><atom:name>CD</atom:name><atom:uri>/api/author/1629784</atom:uri></atom:author><description><![CDATA[ सफाई कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांचा मनपात आढावा]]></description><media:keywords></media:keywords><media:content url="https://cf-images.assettype.com/esakal/2026-09-16/qtcoq6oj/Sakal_Wesite_Banner_1200_x_675.jpg"><media:title type="html"></media:title><media:description type="html"></media:description></media:content><media:thumbnail url="https://cf-images.assettype.com/esakal/2026-09-16/qtcoq6oj/Sakal_Wesite_Banner_1200_x_675.jpg?w=280" width="280"></media:thumbnail><category>Nashik</category><content:encoded><![CDATA[ टुडे पान ४ : मेन फिचर
 
NSK26H29763
जळगाव : महापालिकेच्या आढावा बैठकीत उपस्थित राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे उपाध्यक्ष मुकेश सारवान. शेजारी महापौर दीपमाला काळे, उपमहापौर मनोज चौधरी, स्थायी समिती सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील, आयुक्त आदित्य जिवने, अतिरिक्त आयुक्त शोभा बाविस्कर, उपायुक्त निर्मला गायकवाड-पेखळे, उपायुक्त धनश्री शिंदे आदी.
----

सफाई कामगारांच्या वेतन, सुविधांचा प्रश्‍न आयोगासमोर सादर 

सदनिका, वारसा हक्कासह विविध विषयांवर चर्चा; प्रलंबित प्रकरणांचाही आढावा

सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. १६ : सफाई कामगारांच्या सेवाविषयक तसेच कल्याणकारी योजनांशी संबंधित प्रलंबित प्रश्नांचा आढावा घेण्यासाठी महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे उपाध्यक्ष मुकेश सारवान यांच्या उपस्थितीत महापालिकेत मंगळवारी बैठक झाली. श्रमसाफल्य योजनेअंतर्गत सदनिका, वारसा हक्काच्या प्रलंबित प्रकरणांसह सफाई कामगारांची रिक्त पदे, लाडपागे समितीअंतर्गत नियुक्त्या आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या वेतन व सुविधांबाबत यावेळी माहिती घेण्यात आली.

महापालिकेच्या प्रशासकीय इमारतीतील सभागृहात झालेल्या बैठकीस आयोगाचे विशेष कार्य अधिकारी राजेश सोनवणे, महापौर दीपमाला काळे, उपमहापौर मनोज चौधरी, स्थायी समिती सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील, आयुक्त आदित्य जिवने, अतिरिक्त आयुक्त शोभा बाविस्कर, उपायुक्त निर्मला गायकवाड-पेखळे, उपायुक्त धनश्री शिंदे यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

श्रमसाफल्य योजनेचा आढावा 
डॉ. बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य योजनेत २५ वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक सेवा पूर्ण केलेल्या सफाई कामगारांना मालकी हक्काने मोफत सदनिका देण्याची तरतूद आहे. या योजनेतील महापालिकेच्या प्रकरणांची सद्यस्थिती, झालेली कार्यवाही आणि प्रलंबित बाबींची माहिती आयोगासमोर सादर करण्यात आली.

वारसा हक्क, रिक्त पदांवर चर्चा 
सफाई कामगारांच्या वारसा हक्काच्या प्रलंबित प्रकरणांचा तसेच मंजूर, कार्यरत आणि रिक्त पदांचा आढावा घेण्यात आला. लाडपागे समितीच्या शिफारशीनुसार झालेल्या नियुक्त्या, कर्मचाऱ्यांना गणवेशाचे वाटप आणि विविध कल्याणकारी योजनांची माहितीही बैठकीत देण्यात आली. दरम्यान, दूषित गटारात काम करताना मृत्यू किंवा कायमस्वरूपी अपंगत्वाच्या घटना घडल्या आहेत का, याबाबतही माहिती घेण्यात आली. महापालिका क्षेत्रात अशी घटना घडलेली नसल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी सुरक्षिततेला प्राधान्य देण्यावर भर देण्यात आला.

चौकट
कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सुविधांची तपासणी
बीव्हीजी या संस्थेमार्फत कार्यरत कंत्राटी सफाई कामगारांची संख्या, त्यांना दिले जाणारे वेतन, सुरक्षा साधने आणि अन्य सुविधांची माहिती घेण्यात आली. किमान वेतनाच्या निकषांनुसार वेतन मिळते का, याचाही आढावा घेण्यात आला. तसेच सफाई कामगारांचे प्रलंबित प्रश्न नियमांनुसार प्राधान्याने मार्गी लावण्यासाठी संबंधित विभागांनी आवश्यक कार्यवाही करावी, अशा सूचना बैठकीत देण्यात आल्या.]]></content:encoded></item><item><title>-भरती परीक्षा पारदर्शकतेसाठी सूचना द्या</title><link>https://www.esakal.com/kokan/todays-latest-marathi-news-kop26e33244-txt-ratnagiri-today-20260916100301</link><comments>https://www.esakal.com/kokan/todays-latest-marathi-news-kop26e33244-txt-ratnagiri-today-20260916100301#comments</comments><guid isPermaLink="false">f3467af5-225a-4a70-b891-6fc83c276a18</guid><pubDate>Wed, 16 Sep 2026 15:33:01 +0530</pubDate><atom:updated>2026-09-16T15:33:01.000+05:30</atom:updated><atom:author><atom:name>CD</atom:name><atom:uri>/api/author/1629784</atom:uri></atom:author><description><![CDATA[ -भरती परीक्षा पारदर्शकतेसाठी सूचना द्या]]></description><media:keywords></media:keywords><media:content url="https://cf-images.assettype.com/esakal/2026-09-16/f80322lt/ratnagiri_default_banner_1.jpg"><media:title type="html"></media:title><media:description type="html"></media:description></media:content><media:thumbnail url="https://cf-images.assettype.com/esakal/2026-09-16/f80322lt/ratnagiri_default_banner_1.jpg?w=280" width="280"></media:thumbnail><category>Kokan</category><content:encoded><![CDATA[ <p>भरती परीक्षांसाठी सूचना मागविल्या</p><p>उच्चस्तरीय समितीचा २९ला कोकण दौरा</p><p>सकाळ वृत्तसेवा<br />रत्नागिरी, ता. १६ ः भरती प्रक्रियेत सुधारणा घडवून आणण्याच्यादृष्टीने ही प्रक्रिया अत्यंत महत्त्वपूर्ण असून, कोकण विभागातील सर्व स्पर्धा परीक्षा परीक्षार्थी, विद्यार्थी, पालक, शिक्षक, शिक्षणतज्ज्ञ आणि सुजाण नागरिकांनी या प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदवून आपल्या महत्त्वपूर्ण सूचना सादर कराव्यात, असे प्रशासनातर्फे केले आहे.<br />राज्यातील विविध भरती परीक्षा अधिक सुरक्षित, पारदर्शक, विश्वासार्ह आणि उमेदवाराभिमुख करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने गठित केलेली उच्चस्तरीय समिती कोकण विभागाच्या दौऱ्यावर येत आहे. समितीचे अध्यक्ष व सदस्य २९ रोजी वांद्रे (पूर्व) चेतना कॉलेज येथे भेट देणार आहेत. या पार्श्वभूमीवर कोकण विभागातील विद्यार्थी, स्पर्धा परीक्षा परीक्षार्थी, पालक, शैक्षणिक संस्था व तज्ज्ञांकडून सुधारणांबाबत लेखी सूचना, अभिप्राय व निवेदने मागवण्यात आली आहेत. शासनामार्फत घेण्यात येणाऱ्या भरती परीक्षांची पद्धत अधिक गतिमान व त्रुटीमुक्त व्हावी यासाठी या उच्चस्तरीय समितीची स्थापना करण्यात आली आहे. कोकण विभागातील संबंधित घटकांना समितीसमोर आपले म्हणणे, सूचना मांडता याव्यात यासाठी २९ सप्टेंबर रोजी चेतना कॉलेज जिल्हाधिकारी, मुंबई उपनगर यांच्या कार्यालयाजवळील चेतना महाविद्यालय मार्ग येथे बैठक आयोजित केली आहे. समितीच्या भेटीदरम्यान प्रत्यक्ष भेटून चर्चा करण्यासाठी वेळ मागणे अथवा आपले लेखी निवेदन सादर करण्यासाठी १५ ते २३ सप्टेंबर हा कालावधी निश्चित केला आहे. अप्पर जिल्हा उपजिल्हाधिकारी यांच्या कार्यालयात सकाळी ११ ते सायंकाळी ५:३० या वेळेत निवेदन देता येईल. अभिप्राय konkan_examreformstaskforce@maharashtra.gov.in या ई-मेलवर अर्ज पाठवू शकतात.</p>]]></content:encoded></item><item><title>एनसीएमसी कार्ड सक्तीला ३० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ</title><link>https://www.esakal.com/uttar-maharashtra/nashik/todays-latest-marathi-news-nsk26h35139-txt-jaltdy1-20260916095033</link><comments>https://www.esakal.com/uttar-maharashtra/nashik/todays-latest-marathi-news-nsk26h35139-txt-jaltdy1-20260916095033#comments</comments><guid isPermaLink="false">cab3c4c1-275e-4e5e-aec2-256cdbb78ed6</guid><pubDate>Wed, 16 Sep 2026 15:20:33 +0530</pubDate><atom:updated>2026-09-16T15:20:33.000+05:30</atom:updated><atom:author><atom:name>CD</atom:name><atom:uri>/api/author/1629784</atom:uri></atom:author><description><![CDATA[ एनसीएमसी कार्ड सक्तीला ३० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ]]></description><media:keywords></media:keywords><media:content url="https://cf-images.assettype.com/esakal/2026-09-16/4jhs2h4b/Sakal_Wesite_Banner_1200_x_675.jpg"><media:title type="html"></media:title><media:description type="html"></media:description></media:content><media:thumbnail url="https://cf-images.assettype.com/esakal/2026-09-16/4jhs2h4b/Sakal_Wesite_Banner_1200_x_675.jpg?w=280" width="280"></media:thumbnail><category>Nashik</category><content:encoded><![CDATA[ ‘एनसीएमसी’ कार्ड सक्तीला 
३० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

ज्येष्ठ नागरिक, महिला प्रवाशांना जुन्या पद्धतीने तिकीट

सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. १६ : एसटी महामंडळाच्या बसमधून सवलतीत प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रवाशांसाठी १ सप्टेंबरपासून लागू करण्यात आलेली ‘नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड’ (एनसीएमसी) सक्ती आता ३० सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. एनसीएमसी प्रणालीवर मोठ्या प्रमाणात प्रवासी व्यवहार होत असल्याने सर्व्हरवरील वाढलेला ताण, नेटवर्क व तांत्रिक अडचणींमुळे सवलतीचे तिकीट काढताना अडथळे येत असल्याने महामंडळाने हा निर्णय घेतला आहे.

एनसीएमसी कार्ड अनिवार्य केल्यानंतर अनेक ठिकाणी कार्ड सक्रिय नसणे, कार्ड वाचले न जाणे, ई-तिकीट यंत्रात अडथळे येणे तसेच सर्व्हरशी संपर्क न झाल्याने व्यवहार रखडणे, अशा समस्या प्रवाशांना जाणवत आहेत. काही ठिकाणी कार्ड वितरण व नोंदणीची प्रक्रियाही अपेक्षित वेगाने न झाल्याने प्रवाशांची गैरसोय झाली. परिणामी, सवलतीचा लाभ घेण्यासाठी पात्र असतानाही काही प्रवाशांना पूर्ण तिकीट काढण्याची वेळ आल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर ३० सप्टेंबरपर्यंत ज्येष्ठ नागरिक आणि महिला सवलतधारकांना पूर्वीप्रमाणे प्रचलित पद्धतीने सवलतीचे तिकीट देऊन एसटीने प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे. त्यामुळे ज्यांच्याकडे अद्याप एनसीएमसी कार्ड नाही, त्यांनी या कालावधीत सवलतीचा लाभ घेता येणार आहे.

चौकट
कार्ड काढण्याचे आवाहन
दरम्यान, ज्या प्रवाशांचे एनसीएमसी कार्ड तयार होऊन सक्रिय झाले आहे, त्यांनी शक्यतो कार्डद्वारेच सवलतीचे तिकीट काढावे, असे आवाहन करण्यात आले आहे. ज्या ज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रवाशांनी अद्याप एनसीएमसी कार्ड काढलेले नाही, त्यांनी ३० सप्टेंबरपूर्वी अधिकृत एजंटकडून कार्ड काढून ते सक्रिय करून घ्यावे, असे आवाहन एसटी महामंडळाने केले आहे.]]></content:encoded></item><item><title>दुचाकी चोरट्यांचा उच्छाद; 
सात महिन्यांत ६०७ वाहने लंपास</title><link>https://www.esakal.com/pune/prevent-motorcycle-theft-pimpri</link><comments>https://www.esakal.com/pune/prevent-motorcycle-theft-pimpri#comments</comments><guid isPermaLink="false">88800609-5400-4069-9d40-1ed9b6b55238</guid><pubDate>Wed, 16 Sep 2026 15:16:28 +0530</pubDate><atom:updated>2026-09-16T15:16:28.000+05:30</atom:updated><atom:author><atom:name>CD</atom:name><atom:uri>/api/author/1629784</atom:uri></atom:author><description><![CDATA[ दुचाकी चोरट्यांचा उच्छाद; 
सात महिन्यांत ६०७ वाहने लंपास]]></description><media:keywords></media:keywords><media:content url="https://cf-images.assettype.com/esakal/2026-09-16/e45tq4pj/Banner1.png"><media:title type="html"></media:title><media:description type="html"></media:description></media:content><media:thumbnail url="https://cf-images.assettype.com/esakal/2026-09-16/e45tq4pj/Banner1.png?w=280" width="280"></media:thumbnail><category>Pune</category><content:encoded><![CDATA[ <p>पिंपरी, ता. १६ : घराबाहेर, सोसायटी परिसरात, दुकानासमोर अथवा रस्त्यालगत दुचाकी उभी करून नागरिक आपापल्या कामासाठी निघून जातात. मात्र, काहीवेळाने परतल्यानंतर दुचाकी जागेवर नसल्याचे निदर्शनास येते. दुचाकी चोरीच्या वाढत्या घटनांमुळे वाहनधारकांची चिंता वाढली आहे. विशेषतः गर्दीच्या ठिकाणी तसेच रस्त्यालगत उभी केलेली वाहने चोरट्यांच्या निशाण्यावर येत आहेत. पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत जानेवारी ते जुलै या सात महिन्यांच्या कालावधीत तब्बल ६०७ दुचाकी चोरीला गेल्या आहेत.</p><p>शहरातील विविध भागांत दुचाकी चोरीच्या घटना सातत्याने घडत असल्याचे पोलिस ठाण्यांमध्ये दाखल होणाऱ्या तक्रारींवरून स्पष्ट होते. वाहनधारकाने काही मिनिटांसाठी दुचाकी उभी केली असली तरी चोरट्यांना संधी मिळाल्यास ते काही क्षणांत वाहन घेऊन पसार होतात. त्यामुळे रस्त्यालगत अथवा इतर ठिकाणी उभी केलेली ‘आपली दुचाकी सुरक्षित आहे’ असा समज वाहनधारकांनी ठेवणे धोकादायक ठरत आहे.</p><p>रस्त्यालगतची वाहने चोरट्यांच्या रडारवर<br />काही वाहनधारक हँडल लॉक करण्याकडे दुर्लक्ष करतात. अशा वाहनांवर चोरट्यांची नजर असते. वाहनधारक काही मिनिटांसाठी दूर गेल्यानंतर चोरटे संधी साधून वाहन लंपास करतात. तसेच काही दुचाकींचे लॉक तोडूनही दुचाकी लंपास केली जाते.</p><p>चोरट्यांचे ‘उद्योग’<br />शहराच्या विविध भागांत सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. मात्र, चोरटे चेहरा झाकणे, नंबर प्लेटमध्ये फेरफार करणे किंवा चोरीचे वाहन तातडीने दुसऱ्या ठिकाणी नेणे अशा पद्धतींचा वापर करतात. त्यामुळे चोरीनंतर वाहनाचा माग काढणे पोलिसांसाठी आव्हानात्मक ठरते. काही प्रकरणांमध्ये सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिस चोरट्यांचा शोध घेतात.</p><p>पार्किंगची निश्चित जागा नसल्यानेही धोका<br />शहरातील अनेक भागांत पुरेशी अधिकृत पार्किंग व्यवस्था नसल्याने नागरिकांना रस्त्याच्याकडेला किंवा उपलब्ध जागेत दुचाकी उभी करावी लागते. अशा ठिकाणी वाहनांच्या सुरक्षेची कोणतीही व्यवस्था नसते. परिणामी, वाहन चोरीबरोबरच वाहनातील वस्तू चोरी जाण्याचाही धोका वाढतो.</p><p>ही घ्या काळजी<br />- दुचाकी शक्यतो अधिकृत व सुरक्षित पार्किंगमध्येच उभी करावी<br />- वाहन सोडताना हँडल लॉक करणे आवश्यक<br />- शक्य असल्यास अतिरिक्त डिस्क लॉक किंवा सुरक्षितता उपकरणाचा वापर करावा<br />- दुचाकी बराचवेळ एकाच ठिकाणी उभी ठेवणे टाळावे<br />- वाहनाची आरसी, विमा, नोंदणी क्रमांकाची प्रत सुरक्षित ठेवावी<br />- तत्काळ पोलिसात तक्रार द्यावी  </p><p>चोरीच्या घटना<br />महिना ः दुचाकी ः तीन चाकी ः चारचाकी  <br />जानेवारी ः १०७ ः ०४ ः ०७<br />फेब्रुवारी ः ८९ ः ०५ ः ०३<br />मार्च ः ७९ ः १४ ः ०५      <br />एप्रिल ः ६२ ः ०९ ः ०४<br />मे ः ८४ ः ०२ ः ०७<br />जून ः ८८ ः ०७ ः ०७<br />जुलै ः ९८ ः १० ः ०५</p><p>‘‘वाहन चोरीच्या घटना थांबविण्यासाठी गस्त वाढवली आहे. या गुन्ह्याच्या तपासासाठी गुन्हे शाखेच्या पथकांना विशेष सूचना दिलेल्या आहेत. घटनास्थळाची पाहणी करून सखोल तपास करीत वाहनचोरांच्या मुसक्या आवळल्या जात आहेत. अनेक गुन्हेगार बाहेरील जिल्ह्यांतील असल्याचे समोर येते. या घटना रोखण्यासाठी घटनेच्या मुळापर्यंत जाऊन तपास केला जात आहे. मागील काही दिवसांत गुन्हे उघडकीस आणण्याचे प्रमाण अधिक आहे.<br />- रोहिदास पवार, पोलिस उपायुक्त, गुन्हे शाखा<br />---</p>]]></content:encoded></item><item><title>AIच्या युगात तांत्रिक कौशल्याला सर्वाधिक महत्त्व; SDTI सातारा येथे रोजगाराभिमुख कोर्सेससाठी प्रवेश सुरू</title><link>https://www.esakal.com/pune/shinde-deshmukh-technical-courses</link><comments>https://www.esakal.com/pune/shinde-deshmukh-technical-courses#comments</comments><guid isPermaLink="false">31edbefe-ebbd-41ca-912a-2e4ea6072b76</guid><pubDate>Wed, 16 Sep 2026 15:14:58 +0530</pubDate><atom:updated>2026-09-16T15:14:58.000+05:30</atom:updated><atom:author><atom:name>CD</atom:name><atom:uri>/api/author/1629784</atom:uri></atom:author><description><![CDATA[ AIच्या युगात तांत्रिक कौशल्याला सर्वाधिक महत्त्व; SDTI सातारा येथे रोजगाराभिमुख कोर्सेससाठी प्रवेश सुरू]]></description><media:keywords></media:keywords><media:content url="https://cf-images.assettype.com/esakal/2026-09-16/5j8u50tf/Banner1.png"><media:title type="html"></media:title><media:description type="html"></media:description></media:content><media:thumbnail url="https://cf-images.assettype.com/esakal/2026-09-16/5j8u50tf/Banner1.png?w=280" width="280"></media:thumbnail><category>Pune</category><content:encoded><![CDATA[ <p>शिंदे-देशमुख टेक्निकल इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश सुरू</p><p>सातारा, ता. १६ : आजच्या स्पर्धात्मक आणि तंत्रज्ञानाधारित युगात केवळ शैक्षणिक पदवीपेक्षा प्रत्यक्ष काम करण्याचे तांत्रिक कौशल्य रोजगार मिळवून देण्यासाठी अधिक महत्त्वाचे ठरत आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) आणि ऑटोमेशनचा वापर वाढत असताना उद्योगांना आधुनिक तंत्रज्ञानासोबत प्रत्यक्ष मशिन, इलेक्ट्रिकल सिस्टीम, वाहन, बांधकाम व उत्पादन क्षेत्रातील काम हाताळणारे कुशल तंत्रज्ञ मोठ्या प्रमाणावर आवश्यक आहेत. तांत्रिक कौशल्यच रोजगाराच्या संधींचा मजबूत आधार आहे, तसेच योग्य कौशल्य आत्मसात केल्यास नोकरीसोबत स्वयंरोजगाराचीही दारे खुली होऊ शकतात. हीच गरज लक्षात घेऊन येथील शिंदे-देशमुख टेक्निकल इन्स्टिट्यूटद्वारे रोजगार व स्वयंरोजगाराभिमुख शासनमान्य कोर्सेसचे प्रशिक्षण दिले जात आहे.</p><p>संस्थेत इलेक्ट्रिशियन, ऑटो इंजिनिअरिंग टेक्निशियन, डिझेल मेकॅनिक, वायरमन, कन्स्ट्रक्शन सुपरवायझर आणि सीएनसी ऑपरेटिंग ॲण्ड प्रोग्रामिंग या अभ्यासक्रमांचे प्रशिक्षण सुरू आहे. प्रशिक्षणात विद्यार्थ्यांच्या प्रत्यक्ष प्रॅक्टिकल कौशल्यावर विशेष भर दिला जातो, जेणेकरून प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर विद्यार्थी उद्योगक्षेत्रात आवश्यक काम आत्मविश्वासाने करू शकेल. एआयच्या काळात तंत्रज्ञान बदलत राहणार असले तरी तंत्रज्ञानाचा वापर करणारे आणि प्रत्यक्ष तांत्रिक काम करणारे कुशल मनुष्यबळ कायम आवश्यक राहणार आहे. त्यामुळे युवकांनी भविष्यातील रोजगाराच्या संधी लक्षात घेऊन तांत्रिक कौशल्य प्रशिक्षण घेणे ही काळाची गरज असल्याचे संस्थेच्या वतीने सांगण्यात आले. या अभ्यासक्रमांसाठी प्रवेश सुरू असून, इच्छुक विद्यार्थी व पालकांनी प्रवेशासाठी मोळाचा ओढा (वर्ये रस्ता) येथील शिंदे देशमुख टेक्निकल इन्स्टिट्यूट येथे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.</p>]]></content:encoded></item><item><title>शेतकरी नियोजन ः रेशीमशेती</title><link>https://www.esakal.com/pune/successful-sericulture-maharashtra</link><comments>https://www.esakal.com/pune/successful-sericulture-maharashtra#comments</comments><guid isPermaLink="false">cf79a165-15b2-4625-a3c6-d80a71418de2</guid><pubDate>Wed, 16 Sep 2026 15:12:33 +0530</pubDate><atom:updated>2026-09-16T15:12:33.000+05:30</atom:updated><atom:author><atom:name>CD</atom:name><atom:uri>/api/author/1629784</atom:uri></atom:author><description><![CDATA[ शेतकरी नियोजन ः रेशीमशेती]]></description><media:keywords></media:keywords><media:content url="https://cf-images.assettype.com/esakal/2026-09-16/g6t7zeel/Banner1.png"><media:title type="html"></media:title><media:description type="html"></media:description></media:content><media:thumbnail url="https://cf-images.assettype.com/esakal/2026-09-16/g6t7zeel/Banner1.png?w=280" width="280"></media:thumbnail><category>Pune</category><content:encoded><![CDATA[ <p>पाणी उपलब्धतेनुसार रेशीम <br />कोष उत्पादनावर भर</p><p>शेतकरी नियोजन ः रेशीमशेती<br />-----------------<br />शेतकरी ः सदाशिव दामोदर वाघमारे<br />गाव ः केकतजळगाव, ता. पैठण, जि. छत्रपती संभाजीनगर<br />एकूण शेती ः १५ एकर<br />तुती क्षेत्र ः चार एकर<br />----------------------------<br />केकतजळगाव (ता. पैठण, जि. छत्रपती संभाजीनगर) येथील सदाशिव दामोदर वाघमारे हे मागील १० वर्षांपासून रेशीमशेती करत आहेत. सुरुवातीला एक एकरावर केलेली तुती लागवड त्यांनी विस्तारत ४ एकरापर्यंत वाढविली आहे. रेशीम उत्पादनासाठी त्यांनी २२ बाय १०० फूट आकारमानाच्या शेडची उभारणी केली आहे. त्यामुळे एक वेळेस चारशे अंडीपुंजांपर्यंतची बॅच घेणेे शक्य होते. शिवाय तुती लागवड जास्त क्षेत्रावर असल्यामुळे मुबलक तुती पाला उपलब्ध रेशीम अळ्यांना उपलब्ध होतो. दरवर्षी पर्जन्यमानाचा अंदाज घेऊन तुती बागेस पाण्याची उपलब्धता कशी राहील यानुसार रेशीम कोष उत्पादनाचे नियोजन केले जाते. यावर्षी पाऊस कमी असल्यामुळे कमी अंडीपुंजाची बॅच घेतल्याचे श्री. वाघमारे सांगतात. <br />पारंपरिक पीक पद्धतीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे शक्य होत नव्हते. अशा स्थितीत चुलत भाऊ संतोष वाघमारे यांच्याकडून प्रेरणा घेऊन रेशीम शेती करण्याचा निर्णय घेतला. कमी कालावधी, कमी पाणी आणि कमी खर्चात जास्त उत्पन्न देणारा रेशीम व्यवसायाचे अर्थकारण समजून घेतल्यानंतर या उद्योगाची सुरुवात केल्याचे श्री. वाघमारे सांगतात.<br />------------------<br />बॅच नियोजन ः <br />चार एकरांतील तुती लागवडीनुसार दोन टप्प्यात बागेचे व्यवस्थापन करून बॅच घेण्याचे नियोजन करण्यात आले. . प्रति बॅच साधारण ४०० अंडीपुंज उत्पादन घेतले जाते. यावर्षी २५० अंडीपुंजाची एक बॅच आतापर्यंत पूर्ण झाली आहे. गतवर्षी याच कालावधीत ४०० अंडीपुंजाची बॅच घेतली होती. यावर्षी पर्जन्यमान कमी असल्याने कमी अंडीपुंजाची बॅच घेण्यात आली आहे. <br />श्री. वाघमारे यांच्या माहितीनुसार, पाऊस चांगला असेल तर वर्षातून सात ते आठ बॅच, तर मध्यम पाऊस असेल तीन ते पाच पर्यंत बॅच  घेतल्या जातात. अगदीच अत्यल्प पाऊस असेल तर दोन किंवा तीन बॅच घेण्यावर भर दिला जातो. त्यामुळे उपलब्ध पाण्याचे काटेकोर नियोजन करणे शक्य होते. <br />....................................<br />एक एकरापासून सुरुवात ः <br />श्री. वाघमारे म्हणाले, की रेशीम उद्योगाची सुरुवात करण्यासाठी सुरुवातीला सुरुवातीला एक एकरावर तुती लागवड केली होती. हळूहळू व्यवसायातील बारकावे आणि अर्थकारण समजल्यानंतर टप्प्याटप्प्याने तुती लागवड क्षेत्रात वाढ करत ती पाच एकरांपर्यंत नेली. मात्र पुढे एक एकर क्षेत्र कमी करत आता चार एकरावर तुती बागेच्या व्यवस्थापनातून कोष उत्पादन घेतले जात आहे. व्यवसायामध्ये सदाशिव वाघमारे यांना पत्नी कालिंदा वाघमारे, मुलगा गजानन व दत्तात्रय तसेच दोन्ही सुनांची मदत होते. <br />----------<br />दर्जेदार कोष उत्पादनावर भर ः <br />रेशीम उद्योगामध्ये दर्जेदार कोष उत्पादन अत्यंत महत्त्वाचे असते. कोषाचा दर्जा जितका चांगला तितका दर अधिक मिळण्यास मदत मिळते. त्यासाठी योग्य बॅच नियोजन करून दर्जेदार कोष उत्पादन घेण्याचा प्रयत्न केला जातो. रेशीम उद्योगातील सर्वात मोठी समस्या ही रेशीम अळ्यांवर होणारा रोगांचा प्रादुर्भाव ही असते. रेशीम अळ्यांवर प्रामुख्याने ग्रासेरी, फ्लॅचेरी, मस्करडायन यासारख्या रोगांचा प्रादुर्भाव होतो. यामुळे अळ्यांची कोष निर्मिती क्षमता खालावते. परिणामी संपूर्ण बॅच बाद होण्याचा धोका असतो. त्यासाठी शेड निर्जंतुकीकरण, स्वच्छता यावर भर देऊन रोगांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी प्रयत्न केले जातात. याशिवाय रेशीम अळीवर उझी माशीचा प्रादुर्भाव होतो. त्यासाठी मच्छरदाणीचा वापर करून उझी माशीला अटकाव केला जातो.<br />........................<br />पाण्याच्या उपलब्धतेवर बॅचचे गणित <br />श्री वाघमारे यांच्या माहितीनुसार, पाऊस चांगला असेल तर वर्षातून सात ते आठ बॅच निघतात. मध्यम पाऊस असेल तीन ते पाच पर्यंत बॅच निघतात. आणि अगदीच अत्यल्प पाऊस असेल तर दोन किंवा तीन बॅच निघतात. अर्थात पावसाळा, पाण्याची उपलब्धता यानुसार ते रेशीम कीटक संगोपनाच्या किती बॅच घ्यायच्या याचे नियोजन केले जाते. रेशीम उत्पादनासाठी २२ बाय १०० फूट आकारमानाचे चारशे अंडीपुंजाची एक वेळेस बॅच घेण्याची क्षमता असलेले शेड आहे. <br />....<br />पाल्याच्या दर्जावर भर <br />तुती पाल्याचा दर्जा चांगला राखण्यासाठी सुरुवातीला एकरी आठ ते दहा ट्रॉली शेणखत वापरले जाते. आवश्यकतेनुसार शेणखत बाहेरून विकत घेतले जाते. शेणखताच्या वापरामुळे तुती पाल्याची प्रत चांगली येऊन भरघोस उत्पादन मिळण्यास मदत होते. त्याचबरोबर १०:२६:२६, अमोनिअम सल्फेट, सूक्ष्म अन्नद्रव्यांचा तुती बागेत वापर केला जातो.<br />.....<br />विक्री नियोजन ः <br />रेशीम उत्पादनाला सुरुवात केल्यानंतर सुरुवातीच्या काळात रामनगरम मार्केटमध्ये कोषाची विक्री केली जात असे. पुढे जालनास, बीड मार्केटला विक्री करण्यास सुरुवात केली. सध्या बीड बाजारपेठेत चांगले दर मिळत असल्याने तेथेच विक्री करण्यावर भर दिला जात आहे.<br />रेशीम कोष उत्पादनात उत्पादनाच्या २० टक्के खर्च व त्यामधून ७० ते ८० टक्के निव्वळ नफा मिळत असल्याचा अनुभव सदाशिव सांगतात. त्यामुळे इतर पारंपरिक पिकांच्या तुलनेत रेशीम उद्योग अधिक शाश्वत उत्पन्न देणारा ठरतो आहे. <br />..........................<br />- सदाशिव वाघमारे, ९९२२२४९९६९</p><p>फोट ः <br />शेतकरी शेड सह व तुती असे दोन फोटो पाठवीत आहे.<br />-------------------</p>]]></content:encoded></item><item><title>पत्नीच्या प्रियकराचा खून</title><link>https://www.esakal.com/pune/husband-bail-wife-lover-murder</link><comments>https://www.esakal.com/pune/husband-bail-wife-lover-murder#comments</comments><guid isPermaLink="false">e2b40d79-1bc9-4951-aec3-02fb73b42bf5</guid><pubDate>Wed, 16 Sep 2026 15:12:13 +0530</pubDate><atom:updated>2026-09-16T15:12:13.000+05:30</atom:updated><atom:author><atom:name>CD</atom:name><atom:uri>/api/author/1629784</atom:uri></atom:author><description><![CDATA[ पत्नीच्या प्रियकराचा खून]]></description><media:keywords></media:keywords><media:content url="https://cf-images.assettype.com/esakal/2026-09-16/2tikm7fk/Banner1.png"><media:title type="html"></media:title><media:description type="html"></media:description></media:content><media:thumbnail url="https://cf-images.assettype.com/esakal/2026-09-16/2tikm7fk/Banner1.png?w=280" width="280"></media:thumbnail><category>Pune</category><content:encoded><![CDATA[ <p>पत्नीच्या प्रियकराचा खून; <br />पतीस उच्च न्यायालयातून जामीन<br />सोलापूर, ता. १५ : मंगळवेढा तालुक्यातील सलगर बुद्रुक येथील सागर मनोहर इंगोले यांच्या खूनप्रकरणी आरोपी सुभाष श्रीमंत होनमुके (रा. मुरळी, ता. मंगळवेढा) यास उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचकडून जामीन मंजूर झाला आहे.<br />सागर मोबाईल शॉपी चालवत होता. सुभाषची पत्नी मोबाईल रिचार्जसाठी त्याच्याकडे येत होती. त्यातून दोघांचे प्रेमसंबंध जुळल्याचा आरोप आहे. २५ एप्रिल २०२५ रोजी सागर घरी आला नाही. दुसऱ्या दिवशी तो सुभाषच्या वस्तीवर जखमी अवस्थेत पडल्याची माहिती त्याचे वडील मनोहर इंगोले यांना मिळाली. ते अन्य लोकांसह तेथे गेले असता सागरचा मृत्यू झाल्याचे आढळले. त्याच्या सर्वांगावर जखमा होत्या. याबाबत मनोहर इंगोले यांनी मंगळवेढा पोलिसांत फिर्याद दिली. त्यानुसार सुभाषला अटक केली.<br />सुभाषने जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र, पंढरपूर सत्र न्यायालयाने तो फेटाळला. त्यानंतर ॲड. रितेश थोबडे यांच्यामार्फत त्याने जामिनासाठी अर्ज केला. सुनावणीवेळी पोलिसांनी दाखल केलेल्या कागदपत्रांवरून प्रथमदर्शनी ही घटना पूर्वनियोजित नसल्याचा युक्तिवाद बचाव पक्षातर्फे करण्यात आला. हा युक्तिवाद ग्राह्य धरत न्यायालयाने ५० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर सुभाषचा जामीन मंजूर केला. आरोपीतर्फे ॲड. रितेश थोबडे व ॲड. महादेव गायकवाड यांनी काम पाहिले.</p>]]></content:encoded></item><item><title>विद्यापिठांना संशोधनासाठी 72 कोटीचा निधी</title><link>https://www.esakal.com/kokan/todays-latest-marathi-news-kop26e33201-txt-ratnagiri-today-20260916094100</link><comments>https://www.esakal.com/kokan/todays-latest-marathi-news-kop26e33201-txt-ratnagiri-today-20260916094100#comments</comments><guid isPermaLink="false">6d29b1fb-5eaa-430a-a648-8a6ef7f85a2a</guid><pubDate>Wed, 16 Sep 2026 15:11:00 +0530</pubDate><atom:updated>2026-09-16T15:11:00.000+05:30</atom:updated><atom:author><atom:name>CD</atom:name><atom:uri>/api/author/1629784</atom:uri></atom:author><description><![CDATA[ विद्यापिठांना संशोधनासाठी 72 कोटीचा निधी]]></description><media:keywords></media:keywords><media:content url="https://cf-images.assettype.com/esakal/2026-09-16/7t6h2g0e/ratnagiri_default_banner_1.jpg"><media:title type="html"></media:title><media:description type="html"></media:description></media:content><media:thumbnail url="https://cf-images.assettype.com/esakal/2026-09-16/7t6h2g0e/ratnagiri_default_banner_1.jpg?w=280" width="280"></media:thumbnail><category>Kokan</category><content:encoded><![CDATA[ <p>26O64328<br />एआय चित्र</p><p>विद्यापीठांना संशोधनासाठी ७२ कोटी<br />सूरज मांढरे ः कृषी संशोधन अन् विकास समितीची बैठक <br />सकाळ वृत्तसेवा<br />दापोली, ता. १६ ः ‘राज्यातील चारही कृषी विद्यापीठांची कार्यपद्धती वेगवेगळी असली तरी ती शेती प्रगतीचे केंद्र आहेत. प्रत्येक विद्यापीठाला संशोधनासाठी ७२ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या बैठकीत मंजूर झालेल्या सर्व शिफारसी हा माझ्यासाठी कृती आराखडा असून, प्रशासकीय स्तरावर त्या वेगाने पूर्ण करण्यावर माझा भर राहील,’ असे प्रतिपादन राज्याचे कृषी आयुक्त सूरज मांढरे यांनी केले.<br />येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ आणि महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद (पुणे) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ५४ व्या तीनदिवसीय ‘संयुक्त कृषी संशोधन आणि विकास समिती’ बैठकीचा समारोपावेळी ते बोलत होते. हा कार्यक्रम विद्यापीठाच्या सर विश्वेश्वरैया सभागृहात झाला. समारोप कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. इंद्रमणी होते. अध्यक्षीय भाषणात त्यांनी सांगितले की, कृषी विस्ताराची दिशा बदलण्यासाठी ‘शेतकरी ते शेतकरी’ असा तंत्रज्ञानाचा प्रसार होणे गरजेचे आहे. कृषी विज्ञान केंद्रातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना आयसीएआरच्या धर्तीवर पदोन्नती देण्याचा प्रयत्न असून, राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात एक ‘इन्क्युबेशन सेंटर’ सुरू करण्यात येणार आहे.<br />या वेळी अकोला विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख म्हणाले, ‘भौगोलिक परिस्थिती वेगळी असली तरी शेतकरी समृद्ध करणे हेच आमचे अंतिम उद्दिष्ट आहे. गुजरातप्रमाणे महाराष्ट्रातही राष्ट्रीय कृषी विकास योजनेचा निधी आणि शासनाकडून अटींमध्ये शिथिलता मिळणे गरजेचे आहे.’<br />राहुरी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास खर्चे यांनी ‘शासनाने संशोधनासाठी सातत्यपूर्ण आणि भरीव आर्थिक मदत दिली पाहिजे. सर्व संलग्न विभागांनी एकत्र येऊन ‘खेत बचाओ अभियान’ जोरकसपणे राबवावे,’ अशी सूचना केली. <br />या कार्यक्रमास विविध कृषी विद्यापीठांचे संशोधन संचालक अनुक्रमे डॉ. लोढे (पुणे), डॉ. प्रशांत बोडके (राहुरी), डॉ. माने (अकोला), डॉ. आसेवार (परभणी) आणि डॉ. प्रशांत शहारे (दापोली) उपस्थित होते. डॉ. मकरंद करमरकर यांनी सूत्रसंचालन केले, तर संशोधन संचालक डॉ. प्रशांत शहारे यांनी आभार मानले.<br />---<br />ध्येयपूर्तीवर भर द्या <br />‘टीकेकडे दुर्लक्ष करून आपण ध्येयपूर्तीवर भर दिला पाहिजे. शेतीमध्ये पशुपालनाचा समावेश असेपर्यंत परिसंस्था संतुलित राहते. विद्यापीठाच्या शिफारशींचा वापर करणाऱ्या शेतकऱ्यांना अडचणी येत नाहीत,’ असे दापोली विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय भावे यांनी सांगितले.</p>]]></content:encoded></item><item><title>मॅग्नेटमधून शेतकऱ्यांना ६० टक्के अनुदान</title><link>https://www.esakal.com/marathwada/aurangabad/magnet-project-maharashtra-farmer-grants</link><comments>https://www.esakal.com/marathwada/aurangabad/magnet-project-maharashtra-farmer-grants#comments</comments><guid isPermaLink="false">47ecb3c6-b353-4ed0-881a-50f5e8dd28f1</guid><pubDate>Wed, 16 Sep 2026 15:10:26 +0530</pubDate><atom:updated>2026-09-16T15:10:26.000+05:30</atom:updated><atom:author><atom:name>CD</atom:name><atom:uri>/api/author/1629784</atom:uri></atom:author><description><![CDATA[ मॅग्नेटमधून शेतकऱ्यांना ६० टक्के अनुदान]]></description><media:keywords></media:keywords><media:content url="https://cf-images.assettype.com/esakal/2026-09-16/jwalbm24/Sakal20Wesite20Banner20_20Ch20Sambhaji20Nagar.jpg"><media:title type="html"></media:title><media:description type="html"></media:description></media:content><media:thumbnail url="https://cf-images.assettype.com/esakal/2026-09-16/jwalbm24/Sakal20Wesite20Banner20_20Ch20Sambhaji20Nagar.jpg?w=280" width="280"></media:thumbnail><category>Chhatrapati Sambhaji Nagar</category><content:encoded><![CDATA[ मॅग्नेटमधून शेतकऱ्यांना ६० टक्के अनुदान
---
बीड, ता. १६ : महाराष्ट्र शासन व आशियाई विकास बँकेच्या संयुक्त अर्थसाह्याने राज्यात राबविण्यात येत असलेल्या महाराष्ट्र ॲग्री बिझनेस नेटवर्क (मॅग्नेट) प्रकल्पातील विविध योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविणे, शेतमालाचे मूल्यवर्धन करणे, काढणीपश्चात नुकसान कमी करणे आणि ग्रामीण महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, ही प्रकल्पाची प्रमुख उद्दिष्टे आहेत.
     मॅग्नेट प्रकल्पात सीताफळ, पेरू, केळी, स्ट्रॉबेरी, संत्रा, डाळिंब, चिकू, मोसंबी, हिरवी व लाल मिरची, भेंडी, आंबा, काजू, लिंबू, पडवळ तसेच विविध फुलपिकांचा समावेश आहे. या पिकांच्या मूल्यसाखळ्या टप्प्याटप्प्याने विकसित करण्यात येत आहेत. प्रकल्पातील बाजाराभिमुख उत्पादनवाढ व उत्पादकता सुधारणा उपघटकाअंतर्गत ग्लोबलगॅप प्रमाणपत्र, कीटकनाशक अंश तपासणी, ‘फ्रूट केअर प्रॅक्टिसेस’ (विशेषतः केळीसाठी) आणि सेंद्रिय प्रमाणीकरणासाठी येणाऱ्या खर्चाच्या ६० टक्क्यांपर्यंत थेट अनुदान दिले जात आहे. लातूर, बीड, धाराशिव व नांदेड जिल्ह्यांतील शेतकरी उत्पादक कंपन्या, शेतकरी सहकारी संस्था, कृषी विज्ञान केंद्रे व कृषी विद्यापीठांनी योजनेचा लाभ घ्यावा. पात्र संस्थांनी प्रस्ताव तातडीने सादर करावेत, असे आवाहन मॅग्नेट प्रकल्पाच्या लातूर प्रकल्प उपसंचालकांनी केले आहे. अधिक माहितीसाठी लातूर येथील मॅग्नेट प्रकल्पाच्या विभागीय कार्यालयाशी संपर्क साधावा.]]></content:encoded></item><item><title>बागलाणमध्ये सरसकट पीक पंचनाम्यांची मागणी  राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा तहसीलदारांना घेराव</title><link>https://www.esakal.com/uttar-maharashtra/nashik/todays-latest-marathi-news-sn126b02944-txt-disttdy1-20260916093959</link><comments>https://www.esakal.com/uttar-maharashtra/nashik/todays-latest-marathi-news-sn126b02944-txt-disttdy1-20260916093959#comments</comments><guid isPermaLink="false">7b5b2d2a-9a66-450a-a665-13a2598a2ee4</guid><pubDate>Wed, 16 Sep 2026 15:09:59 +0530</pubDate><atom:updated>2026-09-16T15:09:59.000+05:30</atom:updated><atom:author><atom:name>CD</atom:name><atom:uri>/api/author/1629784</atom:uri></atom:author><description><![CDATA[ बागलाणमध्ये सरसकट पीक पंचनाम्यांची मागणी  राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा तहसीलदारांना घेराव]]></description><media:keywords></media:keywords><media:content url="https://cf-images.assettype.com/esakal/2026-09-16/x6jkzswq/Sakal_Wesite_Banner_1200_x_675.jpg"><media:title type="html"></media:title><media:description type="html"></media:description></media:content><media:thumbnail url="https://cf-images.assettype.com/esakal/2026-09-16/x6jkzswq/Sakal_Wesite_Banner_1200_x_675.jpg?w=280" width="280"></media:thumbnail><category>Nashik</category><content:encoded><![CDATA[ छायाचित्र- 07266
सटाणा : बागलाण तालुका राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षातर्फे तहसीलदार कैलास चावडे यांना निवेदन देताना माजी आमदार संजय चव्हाण, केशव मांडवडे, भारत काटके, मनोज सोनवणे आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकरी.

बागलाणमध्ये सरसकट पीक पंचनाम्यांची मागणी  

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचा तहसीलदारांना घेराव
सकाळ वृत्तसेवा
सटाणा, ता. १६ : अत्यल्प पावसामुळे बागलाण तालुक्यात खरिपासह फळबागांचे मोठे नुकसान झाले असताना शासनाने पंचनाम्यांचे आदेश देऊनही महसूल प्रशासनाने कार्यवाही सुरू केली नसल्याचा आरोप करीत माजी आमदार संजय चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाने बुधवारी (ता. १६) तहसीलदार कैलास चावडे यांना घेराव घातला. सरसकट पंचनामे करून शासनाला तातडीने अहवाल पाठवावा, या मागणीसाठी तहसील कार्यालयाच्या आवारात आंदोलन करण्यात आले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पीक नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश देऊनह बागलाणमध्ये पंचनाम्यांना सुरुवात झालेली नाही. त्यामुळे संतप्त पदाधिकारी व शेतकऱ्यांनी महसूल प्रशासनाच्या निषेधार्थ घोषणाबाजी केली.
माजी आमदार चव्हाण म्हणाले, की संपूर्ण पावसाळ्यात तालुक्यात चार ते पाच दिवसच पाऊस झाला. पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने पिकांची वाढ खुंटली असून, कांदा, मका, डाळिंब, द्राक्षे, सीताफळ, पेरू व ऊस उत्पादक शेतकरी अडचणीत आहेत. उत्पादन घटण्याच्या शक्यतेने त्यांचे नियोजन कोलमडले असून, शेतमजूर व व्यावसायिकांवरही परिणाम झाला आहे. १२ सप्टेंबरनंतर चांगल्या पावसाची अपेक्षा होती; मात्र पाऊस न झाल्याने चिंता वाढली आहे.
महावितरणचा वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा व जळालेले ट्रान्स्फॉर्मर यामुळे सिंचन व्यवस्थेलाही फटका बसत असल्याचे चव्हाण यांनी स्पष्ट केले.
पीकविमा रक्कम तातडीने वितरित करावी, सरसकट पंचनामे करून अहवाल पाठवावा आणि दुष्काळसदृश परिस्थितीतील सर्व लाभ शेतकऱ्यांना द्यावेत, अशी मागणी करण्यात आली.
आंदोलनकर्त्यांनी प्रशासनाने गावनिहाय पाहणी करून प्रत्यक्ष शेतशिवारात पंचनामे करावेत, नुकसानग्रस्त क्षेत्राची अचूक नोंद घ्यावी. पात्र शेतकऱ्यांना कोणत्याही मदतीपासून वंचित ठेवू नये, अशी मागणी केली. पंचनाम्यात विलंब झाल्यास शेतकऱ्यांचे नुकसान अधिक गंभीर होईल, असा इशाराही देण्यात आला. 
तालुकाध्यक्ष केशव मांडवडे, कार्याध्यक्ष संजय पवार, शहराध्यक्ष भारत काटके, शहर कार्याध्यक्ष मनोज छोटू सोनवणे, साहेबराव सोनवणे, माजी सरपंच राजेंद्र जाधव, चेतन वणीस, विनोद पाटील, मयूर अहिरे, विलास सोनवणे, किरण पाटील, टोनी मोरे, सागर मोरे, स्वप्नील सोनवणे, पोपटराव सोनवणे, विकी महाजन, पोपटराव अहिरे, सुभाष पाटील, काळु जाधव, दीपक रौंदळ, केदा सोनवणे, वसंत सोनवणे, राजेंद्र सोनवणे, आनंदा सोनवणे आदी उपस्थित होते.
........]]></content:encoded></item><item><title>सावरिया सेठ, रामेश्वरमच्या प्रतिकृती ठरणार भाविकांचे आकर्षण</title><link>https://www.esakal.com/uttar-maharashtra/nashik/todays-latest-marathi-news-nsk26h35058-txt-jaltdy1-20260916093923</link><comments>https://www.esakal.com/uttar-maharashtra/nashik/todays-latest-marathi-news-nsk26h35058-txt-jaltdy1-20260916093923#comments</comments><guid isPermaLink="false">746a2ea9-9834-4c75-8f1e-0aed442deddb</guid><pubDate>Wed, 16 Sep 2026 15:09:23 +0530</pubDate><atom:updated>2026-09-16T15:09:23.000+05:30</atom:updated><atom:author><atom:name>CD</atom:name><atom:uri>/api/author/1629784</atom:uri></atom:author><description><![CDATA[ सावरिया सेठ, रामेश्वरमच्या प्रतिकृती ठरणार भाविकांचे आकर्षण]]></description><media:keywords></media:keywords><media:content url="https://cf-images.assettype.com/esakal/2026-09-16/23zuerbo/Sakal_Wesite_Banner_1200_x_675.jpg"><media:title type="html"></media:title><media:description type="html"></media:description></media:content><media:thumbnail url="https://cf-images.assettype.com/esakal/2026-09-16/23zuerbo/Sakal_Wesite_Banner_1200_x_675.jpg?w=280" width="280"></media:thumbnail><category>Nashik</category><content:encoded><![CDATA[ मेनफिचर
------
(फोटो ठळक वापरावेत)
NSK26H29721   : नेहरु चौक बहुउद्देशीय मित्रमंडळाची आकर्षक मूर्ती.
NSK26H29722 : नेहरु चौक बहुउद्देशीय मित्रमंडळाचा देखावा. (हा फोटो मोठा वापरावा)

NSK26H29723  : रेल्वेस्थानक रोड जय गणेश मित्रमंडळाची पर्यावरणपूरक मूर्ती.
NSK26H29724  : रेल्वेस्थानक रोड जय गणेश मित्रमंडळाचा देखावे. (हा फोटो मोठा वापरावा)
----
‘रामेश्वरम’, सावरिया सेठ भाविकांचे आकर्षण

गणेश मंडळांच्या देखाव्यांना अंतिम स्वरूप; कार्यकर्त्यांची रात्रंदिवस धावपळ

सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता १६ : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील विविध गणेश मंडळांच्या देखाव्यांना अंतिम स्वरूप देण्यासाठी कार्यकर्त्यांची रात्रंदिवस लगबग सुरू आहे. आकर्षक रोषणाई, सजावट, धार्मिक स्थळांच्या प्रतिकृती तसेच सामाजिक संदेश देणाऱ्या आरासांमुळे यंदाचा गणेशोत्सव अधिक लक्षवेधी ठरणार आहे. शहरातील श्री नेहरू चौक बहुउद्देशीय मित्रमंडळ ‘जळगावचा राजा’ आणि जय गणेश मित्र मंडळ, रेल्वेस्थानक रोड यांच्या देखाव्यांकडे भाविकांचे विशेष लक्ष लागले आहे.

‘जळगावचा राजा’
श्री नेहरू चौक बहुउद्देशीय मित्र मंडळाचे यंदाचे ४३ वे वर्ष आहे. यंदा मंडळातर्फे राजस्थानातील प्रसिद्ध सावरिया सेठ यांच्या मंदिराची प्रतिकृती साकारण्यात आली आहे. त्यामुळे राजस्थानात प्रसिद्ध असलेल्या सावरिया सेठचे दर्शन जळगावातच घेता येणार असल्याने भाविकांसाठी हा देखावा आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरणार आहे.
मंडळाचे अध्यक्ष अजयकुमार गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकर्ते देखावा पूर्ण करण्यासाठी परिश्रम घेत आहेत. धार्मिक वातावरणाची अनुभूती देणारी सजावट, आकर्षक आरास आणि विद्युत रोषणाईचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. 

रामेश्वरमची प्रतिकृती
रेल्वेस्थानक रस्त्यावरील जय गणेश मित्रमंडळाचे यंदाचे ३६ वे वर्ष आहे. यंदा मंडळाने रामेश्वरम येथील धार्मिक स्थळाची प्रतिकृती साकारली आहे. मागील वर्षी मंडळातर्फे चारधामचे देखावे साकारण्यात आले होते. यंदा आरास सादरीकरणाचे चौथे वर्ष असून धार्मिकतेसोबत सामाजिक संदेश देण्यावरही भर देण्यात आला आहे.
मंडळाचे अध्यक्ष राहुल तोडा यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकारिणी व कार्यकर्ते आरास पूर्ण करण्यासाठी मेहनत घेत आहेत. या मंडळाचे विशेष आकर्षण म्हणजे केळीच्या खोडापासून साकारण्यात आलेली पर्यावरणपूरक गणेशमूर्ती. मंडळाचे कार्यकर्ते विनायक ठाकूर यांनी स्वतः ही मूर्ती साकारली आहे. त्यांना साहिल ठाकूर, तेजस गवळी, ईशा ठाकूर, अल्केश जाखेडे आणि खगेश जाखेडे यांची साथ लाभली आहे.
ही गणेशमूर्ती ११ फूट उंचीची असून पर्यावरणपूरक साहित्याचा वापर करून मूर्ती साकारण्याचा मंडळाचा उपक्रम लक्षवेधी ठरत आहे. 

झुल्यावर विराजमान गणराय
यश लॉन परिसरातील गणाधीश फाउंडेशनतर्फे गणेशोत्सवानिमित्त यंदा भव्य व आकर्षक गणेशमूर्ती तसेच विशेष सजावट करण्यात आली आहे. यंदाच्या उत्सवाचे प्रमुख आकर्षण म्हणजे झुल्यावर विराजमान गणरायाची मनमोहक मूर्ती आणि सजावटीमध्ये साकारण्यात आलेली नाशिक महाकुंभाची आकर्षक थीम.

चौकट
महाकुंभाचे ठरतेय आकर्षण
गणरायाची सुंदर मूर्ती, आकर्षक सजावट व रोषणाईसोबतच नाशिक महाकुंभाच्या संकल्पनेवर आधारित देखावा साकारण्यात आला आहे. धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरेचा सुंदर संगम साधत तयार करण्यात आलेला हा देखावा भाविकांचे लक्ष वेधून घेत आहे. गणरायाच्या दर्शनासोबतच महाकुंभाच्या थीमचा देखावा पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. झुल्यावर विराजमान गणराय आणि नाशिक महाकुंभाची भव्य थीम हे यंदाच्या गणाधीश फाउंडेशनच्या गणेशोत्सवाचे विशेष आकर्षण ठरले आहे.]]></content:encoded></item><item><title>राज्यभर सेवा संकल्प अभियान</title><link>https://www.esakal.com/uttar-maharashtra/nashik/todays-latest-marathi-news-nvl26b00625-txt-dhltdy4-20260916092732</link><comments>https://www.esakal.com/uttar-maharashtra/nashik/todays-latest-marathi-news-nvl26b00625-txt-dhltdy4-20260916092732#comments</comments><guid isPermaLink="false">aea16165-2b3c-4c97-b797-c71c4c827d4a</guid><pubDate>Wed, 16 Sep 2026 14:57:32 +0530</pubDate><atom:updated>2026-09-16T14:57:32.000+05:30</atom:updated><atom:author><atom:name>CD</atom:name><atom:uri>/api/author/1629784</atom:uri></atom:author><description><![CDATA[ राज्यभर सेवा संकल्प अभियान]]></description><media:keywords></media:keywords><media:content url="https://cf-images.assettype.com/esakal/2026-09-16/brh4p7wr/Sakal_Wesite_Banner_1200_x_675.jpg"><media:title type="html"></media:title><media:description type="html"></media:description></media:content><media:thumbnail url="https://cf-images.assettype.com/esakal/2026-09-16/brh4p7wr/Sakal_Wesite_Banner_1200_x_675.jpg?w=280" width="280"></media:thumbnail><category>Nashik</category><content:encoded><![CDATA[ (पान ४ ला मेन)
लोगो :  ‘सेवा संकल्प अभियान’
---------
आजपासून राज्यभर ‘सेवा संकल्प अभियान’

नागरिकांना थेट शासकीय सेवांचा लाभ; १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबरदरम्यान आयोजन
पी. एन. पाटील : सकाळ वृत्तसेवा
नवलनगर, ता. १६ : राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत राज्यभर ‘सेवा संकल्प अभियान’ राबविण्याचा निर्णय घेतला आहे. नागरिकांपर्यंत विविध शासकीय योजना व सेवा अधिक प्रभावीपणे पोहोचविण्यासोबतच सामाजिक सहभागातून विविध उपक्रम राबविण्याचे निर्देश शासन निर्णयातून देण्यात आले आहेत.
-------
अभियानाच्या प्रारंभी प्रत्येक तालुक्यात ‘सेवा सेतू’ शिबिरांचे आयोजन करण्यात येणार असून, पात्र नागरिकांना केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ एकाच ठिकाणी मिळवून देण्यावर भर आहे. महसूल विभागाशी संबंधित फेरफार नोंदी, स्वामित्व सनद, रेशनकार्ड, विविध प्रमाणपत्रे, आधारकार्ड, जन्म-मृत्यू नोंदणी, विवाह नोंदणी, महिला बचत गट नोंदणी, ७/१२ व ८-अ नोंदी अद्ययावत करणे आदी सेवांचा समावेश आहे.

गावागावात ‘सेवा माझे योगदान’
अभियानांतर्गत प्रत्येक गाव व वॉर्डात ‘सेवा माझे योगदान’ उपक्रम राबविण्यात येणार आहे. सर्वांच्या  सहभागातून स्वच्छता मोहीम, रक्तदान, वृक्षारोपण, आरोग्य तपासणी, योग-ध्यान, प्लास्टिकमुक्ती, महिला आरोग्य, करिअर मार्गदर्शन, अवयवदान संकल्प, व्यसनमुक्ती जनजागृती,  सायबर सुरक्षा, मतदार नोंदणी आणि शासकीय योजनांची माहिती अशा स्थानिक गरजांवर आधारित उपक्रम घेता येणार आहेत.

विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व्यासपीठ
‘विकसित भारत’ संकल्पनेवर आधारित चित्रकला व वक्तृत्व स्पर्धा शाळांमध्ये घेण्यात येणार आहेत. ‘मुलांच्या स्वप्नातील भारत’ आणि ‘विकसित भारत-२०४७’ या विषयांवर वक्तृत्व स्पर्धा घेऊन विजेत्यांना पुरस्कार दिले जाणार आहेत.

अंगणवाडीत योजनांची माहिती
अंगणवाडी केंद्रांवर मातांसह मुलांचा सहभाग असलेले कार्यक्रम घेऊन महिला आरोग्य व पोषण योजनांची माहिती देण्यात येणार आहे. योजनांचा प्रत्यक्ष लाभ घेतलेल्या नागरिकांच्या घरी जाऊन ‘आशीर्वादाचा दिवा’ प्रज्वलित करण्याचा उपक्रम, तसेच योजनांमुळे जीवनमानात झालेल्या सकारात्मक बदल याची दखल घेतली जाणार आहे.

जिल्ह्यातून संकल्प यात्रा
या अभियानातील ‘जल, जन आणि सेवा संकल्प यात्रा’ धुळे जिल्ह्यातून जाणार आहे. यात्रेचे स्वागत करून स्थानिक योजना व विकासकामांबाबत संवाद कार्यक्रम घेण्यात येणार आहेत. शाळा, महाविद्यालये आणि ग्रामपंचायत स्तरावर कला व नाट्य पथकांच्या माध्यमातून केंद्र व राज्य शासनाच्या जनकल्याणकारी योजनांची माहिती देणारे कार्यक्रम घेण्यात येणार आहेत. २ ऑक्टोबर २०२६ रोजी तालुकास्तरावर कार्यक्रमाचे आयोजन करण्याचे निर्देश आहेत. उत्कृष्ट कलाकार, विद्यार्थी व शिक्षकांचा सन्मान करण्याचीही तरतूद आहे.

१७ ऑक्टोबरला अभियानाची सांगता
अभियानाच्या अखेरीस १७ ऑक्टोबर २०२६ रोजी ‘जनसेवक महाकुंभ’ आयोजित करण्यात येणार आहे. ग्रामपंचायत ते संसद स्तरापर्यंतचे लोकप्रतिनिधी सहभागी होऊन विकसित भारताबाबतचे अनुभव मांडतील आणि सेवा संकल्प घेण्यात येईल. त्यानंतर अभियानाची सांगता होईल. 
अभियानाच्या अंमलबजावणीसाठी जिल्हा, विभाग आणि राज्यस्तरावर समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. जिल्हास्तरावरील समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी, तर जिल्हा माहिती व जनसंपर्क अधिकारी सदस्य सचिव असतील. विभागीय स्तरावर विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती कार्यरत राहणार आहे.]]></content:encoded></item><item><title>विज्ञानाची जिज्ञासा हीच विद्यार्थ्यांच्या प्रगतीची नवी दिशा : दिलीप दळवी जिजामाता हायस्कूलच्या तालुकास्तरीय विज्ञान नाट्य महोत्सवात १८ शाळांचा सहभाग</title><link>https://www.esakal.com/uttar-maharashtra/nashik/todays-latest-marathi-news-sn126b02943-txt-mlgtdy2-20260916092249</link><comments>https://www.esakal.com/uttar-maharashtra/nashik/todays-latest-marathi-news-sn126b02943-txt-mlgtdy2-20260916092249#comments</comments><guid isPermaLink="false">72d43530-7243-4328-86b6-6be82c6d43ac</guid><pubDate>Wed, 16 Sep 2026 14:52:49 +0530</pubDate><atom:updated>2026-09-16T14:52:49.000+05:30</atom:updated><atom:author><atom:name>CD</atom:name><atom:uri>/api/author/1629784</atom:uri></atom:author><description><![CDATA[ विज्ञानाची जिज्ञासा हीच विद्यार्थ्यांच्या प्रगतीची नवी दिशा : दिलीप दळवी जिजामाता हायस्कूलच्या तालुकास्तरीय विज्ञान नाट्य महोत्सवात १८ शाळांचा सहभाग]]></description><media:keywords></media:keywords><media:content url="https://cf-images.assettype.com/esakal/2026-09-16/5mj7mgo7/Sakal_Wesite_Banner_1200_x_675.jpg"><media:title type="html"></media:title><media:description type="html"></media:description></media:content><media:thumbnail url="https://cf-images.assettype.com/esakal/2026-09-16/5mj7mgo7/Sakal_Wesite_Banner_1200_x_675.jpg?w=280" width="280"></media:thumbnail><category>Nashik</category><content:encoded><![CDATA[ ( वर्धापन दिनासाठी शाळेची अर्धे पान जाहिरात घेतलेली आहे कृपया सविस्तर बातमी सर्व नावांसह फोटोसह प्रसिद्ध नम्र विनंती)
----
छायाचित्र- 07264
सटाणा : जिजामाता गर्ल्स हायस्कूलमध्ये झालेल्या बागलाण तालुका विज्ञान नाट्य महोत्सवातील विजेत्या विद्यार्थ्यांसमवेत मान्यवर.

जिजामाता हायस्कूलमध्ये विज्ञान नाट्य महोत्सव

तालुक्यातील १८ शाळांचा तालुकास्तरीय स्पर्धेत सहभाग
सकाळ वृत्तसेवा
सटाणा, ता. १६ : विज्ञानाला केवळ पाठ्यपुस्तकातील विषय न मानता प्रश्न विचारण्याची, प्रयोग करण्याची आणि नव्या कल्पनांना आकार देण्याची वृत्ती विद्यार्थ्यांमध्ये रुजली पाहिजे. विज्ञान प्रदर्शनाप्रमाणेच विज्ञान नाट्याच्या माध्यमातूनही विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पकतेला वाव देत वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करावा आणि या व्यासपीठातून तालुका, जिल्हा व राज्यस्तरावर यश मिळवावे, अशी अपेक्षा ‘मविप्र’चे चिटणीस दिलीप दळवी यांनी व्यक्त केली.
येथील मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेच्या जिजामाता गर्ल्स हायस्कूलमध्ये बागलाण पंचायत समिती शिक्षण विभाग व तालुका विज्ञान अध्यापक संघातर्फे झालेल्या तालुकास्तरीय विज्ञान नाट्य महोत्सवात तालुक्यातील १८ शाळांनी सहभाग घेतला. संस्थेचे चिटणीस दिलीप दळवी अध्यक्षस्थानी होते. संचालक डॉ. प्रसाद सोनवणे, संचालिका शालनताई सोनवणे, स्कूल कमिटी अध्यक्ष बी. एस. सूर्यवंशी, गटशिक्षणाधिकारी अक्षदा अढागळे, विस्ताराधिकारी चित्रा देवरे, तुषार महाले, नवनाथ पवार, तुळशीराम ठाकरे, मुख्याध्यापिका एस. आर. माळेकर, जे. बी. देवरे, व्ही. ए. सोनवणे, विज्ञान अध्यापक संघाचे तालुकाध्यक्ष दत्तराज ह्याळीज, पर्यवेक्षक डी. डी. पवार व के. पी. मोरे प्रमुख पाहुणे होते.
श्री. सूर्यवंशी यांनी विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाविषयी आवड व कुतूहल निर्माण करणे हा विज्ञान नाट्य महोत्सवामागील उद्देश असून, त्यासाठी संस्था कटिबद्ध असल्याचे सांगितले. डॉ. प्रसाद सोनवणे यांनी विज्ञान नाट्याचा विषय व्यापक असावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. स्पर्धेचे परीक्षण किशोर सोनवणे, महेश पाटोळे व दीपक जाधव यांनी केले. स्पर्धेत केबीएच हायस्कूल, वीरगाव यांनी प्रथम, जिजामाता गर्ल्स हायस्कूलने द्वितीय, तर मराठा हायस्कूलने तृतीय क्रमांक मिळविला. जनता विद्यालय, अंबासन यांनी उत्तेजनार्थ प्रथम, तर तळवाडे दिगर हायस्कूल यांनी उत्तेजनार्थ द्वितीय क्रमांक पटकाविला. तुषार महाले यांनी प्रास्ताविक केले. शिक्षिका एम. बी. सोनवणे यांनी सूत्रसंचालन केले. दत्तराज ह्याळीज यांनी आभार मानले. महोत्सव यशस्वितेसाठी शिक्षक-शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केले. 
.............]]></content:encoded></item><item><title>आव्हानात्मक लडाख मॅरेथॉन पार</title><link>https://www.esakal.com/uttar-maharashtra/nashik/todays-latest-marathi-news-nsk26h35133-txt-jaltdy3-20260916091207</link><comments>https://www.esakal.com/uttar-maharashtra/nashik/todays-latest-marathi-news-nsk26h35133-txt-jaltdy3-20260916091207#comments</comments><guid isPermaLink="false">65e17924-7515-407d-baf8-aee999ee96b3</guid><pubDate>Wed, 16 Sep 2026 14:42:07 +0530</pubDate><atom:updated>2026-09-16T14:42:07.000+05:30</atom:updated><atom:author><atom:name>CD</atom:name><atom:uri>/api/author/1629784</atom:uri></atom:author><description><![CDATA[ आव्हानात्मक लडाख मॅरेथॉन पार]]></description><media:keywords></media:keywords><media:content url="https://cf-images.assettype.com/esakal/2026-09-16/t54qqiaj/Sakal_Wesite_Banner_1200_x_675.jpg"><media:title type="html"></media:title><media:description type="html"></media:description></media:content><media:thumbnail url="https://cf-images.assettype.com/esakal/2026-09-16/t54qqiaj/Sakal_Wesite_Banner_1200_x_675.jpg?w=280" width="280"></media:thumbnail><category>Nashik</category><content:encoded><![CDATA[ टुडे चार ॲंकर

NSK26H29761
जळगाव : ‘लडाख मॅरेथॉन’चे २१ किलोमीटर अंतर २ तास १७ मिनिटांत पार केल्यानंतर पदकासह समर्थ खटोड.
-----
जळगावच्या तरुणाने पार केली आव्हानात्मक ‘लडाख मॅरेथॉन’

उपशीर्षक
समर्थ खटोडचे स्पर्धेत यश; २१ किमी अंतर २ तास १७ मिनिटांत पार

सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. १६ : इतर कोणत्याही स्पर्धेपेक्षा कठीण मानली जाणारी डोंगर- दऱ्यांमधील अत्यंत आव्हानात्मक 
''लडाख मॅरेथॉन'' सर करून येथील तरुणाने जळगावच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. समर्थ खटोडने २१ किलोमीटरचे अंतर अवघ्या २ तास १७ मिनिटांत पार करत उल्लेखनीय यश मिळवले आहे.
समुद्रसपाटीपासून तब्बल १२ हजार ५०० फूट उंचीवर वसलेल्या लडाखच्या खडतर डोंगराळ प्रदेशात दरवर्षी ही मॅरेथॉन आयोजित केली जाते. हवेतील ऑक्सिजनचे कमी प्रमाण, हाडे गोठवणारी बोचरी थंडी आणि चेहऱ्यावर टोचणारे तीव्र ऊन अशा प्रतिकूल नैसर्गिक परिस्थितीचा सामना करत समर्थने ही स्पर्धा पूर्ण केली.
शारीरिक क्षमतेसोबतच मानसिक कणखरतेची खरी परीक्षा पाहणाऱ्या या स्पर्धेत समर्थने दाखवलेले हे सातत्य आणि दमदार प्रदर्शन कौतुकास्पद ठरले आहे. 
------
प्रतिकूल हवामान
इतर कोणत्याही स्वरुपाच्या मॅरेथॉनपेक्षा ही स्पर्धा अत्यंत कठीण व आव्हानात्मक असते. रात्रीचे तापमान २ ते ३ अंश, दिवसाचे १८ अंशांपर्यंत असते. समुद्रसपाटीपासून १२ हजार फूट उंचावरील हा प्रदेश. स्पर्धेचे क्षेत्र डोंगर-दऱ्यांचे असल्याने चढ उतार खूप असतात. उचावरील प्रदेशामुळे प्राणवायुचे प्रमाण अन्य क्षेत्रांपेक्षा ४० टक्क्यांहूनही कमी. त्यामुळे श्‍वास घ्यायला प्रचंड त्रास होता. अशा स्थितीत धावायचे असते.
-----
कोट
या स्पर्धेत उतरून ती यशस्वी करायची हे वर्षभरापासून ठरवले होते. वर्षभरापासून स्पर्धेची तयारी सुरू केली. मे महिन्यात नोंदणी केली. अशाप्रकारच्या स्पर्धेसाठी हातापायांचे स्नायू मजबूत असावे लागतात. त्यासाठी नियमित व्यायामावर भर दिला. जळगाव रनर्स ग्रुपचे गुरुप्रसाद तोतला, किरण बच्छाव यांनी मार्गदर्शन केले. त्यामुळे स्पर्धा पार करु शकलो. 
- समर्थ खटोड]]></content:encoded></item><item><title>नगर- डाळिंब परिषदत शास्त्रज्ञांचा गौरव</title><link>https://www.esakal.com/pune/pomegranate-research-mahatma-phule-agricultural-university</link><comments>https://www.esakal.com/pune/pomegranate-research-mahatma-phule-agricultural-university#comments</comments><guid isPermaLink="false">ecb75c16-b7d7-4a39-ab17-60299f118e15</guid><pubDate>Wed, 16 Sep 2026 14:42:00 +0530</pubDate><atom:updated>2026-09-16T14:42:00.000+05:30</atom:updated><atom:author><atom:name>CD</atom:name><atom:uri>/api/author/1629784</atom:uri></atom:author><description><![CDATA[ नगर- डाळिंब परिषदत शास्त्रज्ञांचा गौरव]]></description><media:keywords></media:keywords><media:content url="https://cf-images.assettype.com/esakal/2026-09-16/6dhzu7u5/Banner1.png"><media:title type="html"></media:title><media:description type="html"></media:description></media:content><media:thumbnail url="https://cf-images.assettype.com/esakal/2026-09-16/6dhzu7u5/Banner1.png?w=280" width="280"></media:thumbnail><category>Pune</category><content:encoded><![CDATA[ <p>महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या <br />शास्त्रज्ञ व विद्यार्थ्यांचा गौरव</p><p>ॲग्रोवन वृत्तसेवा<br />अहिल्यानगर : महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या अखिल भारतीय समन्वित कोरडवाहू फळपिके संशोधन प्रकल्पाच्या शास्त्रज्ञांसह पदव्युत्तर विद्यार्थ्याने उत्कृष्ट संशोधनपर सादरीकरण केले. पुणे येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय डाळिंब परिषदेत वनस्पती रोगशास्त्रज्ञ डॉ. प्रकाश मोरे, उद्यानविद्यावेत्ता डॉ. एस. पी. गायकवाड आणि कीटकशास्त्र विषयातील पीएचडीचे विद्यार्थी दुर्गेश नरवाडे यांच्या सादरीकरणाचा विशेष पुरस्काराने गौरव करण्यात आला.</p><p>आंतरराष्ट्रीय परिषद डाळिंब संशोधनाच्या प्रगतीसाठी कार्यरत संस्था, सोलापूर आणि भारतीय कृषि अनुसंधान परिषद-राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र, सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी यांच्या सहकार्याने पुणे येथे ६ ते ८ सप्टेंबर अशी तीन दिवस आंतरराष्ट्रीय डाळिंब परिषद झाली.</p><p>या परिषदेत महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे वनस्पती रोगशास्त्रज्ञ डॉ. प्रकाश मोरे यांनी ‘हवामानावर आधारित डाळिंबातील अँथ्रॅक्नोज रोगाचा शास्त्रीय अभ्यास व पूर्वानुमानाद्वारे हवामान-सक्षम डाळिंब उत्पादन’ या विषयावर मौखिक सादरीकरण केले. हवामानातील विविध घटकांचा डाळिंबातील अँथ्रॅक्नोज रोगाच्या प्रादुर्भावाशी असलेला संबंध आणि रोगाच्या पूर्वानुमानाच्या दृष्टीने या संशोधनाला विशेष महत्त्व आहे.</p><p>उद्यानविद्यावेत्ता डॉ. एस. पी. गायकवाड यांनी ‘अर्धशुष्क परिसंस्थेत अधिक उत्पादनक्षमता व उत्कृष्ट फळगुणवत्तेसाठी गोड डाळिंबाच्या वाणांचे कार्यक्षमता मूल्यमापन’ या विषयावर पोस्टर सादरीकरण केले. अर्धशुष्क हवामानामध्ये योग्य गोड डाळिंब वाणांची निवड, उत्पादनक्षमता आणि फळांची गुणवत्ता या दृष्टीने हे संशोधन महत्त्वपूर्ण आहे.</p><p>कीटकशास्त्र विषयातील पीएचडीचे विद्यार्थी दुर्गेश नरवाडे यांनी ‘तापासून फळापर्यंत : डाळिंबातील कीटकनाशक अवशेषांचे एकात्मिक मूल्यांकन’ या विषयावर पोस्टर सादरीकरण केले. डाळिंबातील कीटकनाशक अवशेषांचे मूल्यांकन आणि सुरक्षित डाळिंब उत्पादनाच्या दृष्टीने त्यांच्या संशोधनाला विशेष महत्त्व आहे.</p><p>या तिन्ही संशोधकांचे संशोधन डाळिंब उत्पादनातील रोग व्यवस्थापन, वाण निवड, उत्पादन व फळगुणवत्ता तसेच सुरक्षित अन्न उत्पादन या विविध महत्त्वपूर्ण बाबींशी संबंधित आहे. त्यामुळे एकाच आंतरराष्ट्रीय परिषदेत तीन वेगवेगळ्या विषयांवर उत्कृष्ट सादरीकरण पुरस्काराने त्यांचा सन्मान झाला. त्याबद्दल महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास खर्चे, संशोधन संचालक डॉ. प्रशांत बोडके, विस्तार शिक्षण संचालक डॉ. गोरक्ष ससाणे व अधिष्ठाता डॉ. साताप्पा खरबडे यांनी अभिनंदन केले आहे.</p>]]></content:encoded></item><item><title>नगर ः गणेश मूर्ती विसर्जनासाठी प्रवरा नदीपात्रात तातडीने पाणी सोडा ः सत्यजित तांबे</title><link>https://www.esakal.com/pune/ganesh-visarjan-pravara-river-water-release</link><comments>https://www.esakal.com/pune/ganesh-visarjan-pravara-river-water-release#comments</comments><guid isPermaLink="false">8bc0f7d8-941d-40dc-a64b-351141fa61a8</guid><pubDate>Wed, 16 Sep 2026 14:40:23 +0530</pubDate><atom:updated>2026-09-16T14:40:23.000+05:30</atom:updated><atom:author><atom:name>CD</atom:name><atom:uri>/api/author/1629784</atom:uri></atom:author><description><![CDATA[ नगर ः गणेश मूर्ती विसर्जनासाठी प्रवरा नदीपात्रात तातडीने पाणी सोडा ः सत्यजित तांबे]]></description><media:keywords></media:keywords><media:content url="https://cf-images.assettype.com/esakal/2026-09-16/a89nx15a/Banner1.png"><media:title type="html"></media:title><media:description type="html"></media:description></media:content><media:thumbnail url="https://cf-images.assettype.com/esakal/2026-09-16/a89nx15a/Banner1.png?w=280" width="280"></media:thumbnail><category>Pune</category><content:encoded><![CDATA[ <p>विसर्जनासाठी प्रवरा <br />नदीपात्रात पाणी सोडा</p><p>सत्यजित तांबे यांची मागणी</p><p>अॅग्रोवन वृत्तसेवा</p><p>अहिल्यानगर : सध्या गणेशोत्सवाचे वातावरण असून, राज्यासह देशात श्री गणेशाचे स्वागत भक्तिमय व आनंदमय वातावरणात होत आहे. संगमनेर शहरातही गणेशोत्सव मोठ्या आनंदात साजरा होत असून, गणेशमूर्तींच्या विधिवत विसर्जनासाठी प्रवरा नदीपात्रात आवश्यक पाण्याचे आवर्तन तातडीने सोडावे, अशी मागणी आमदार सत्यजित तांबे यांनी जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्याकडे केली आहे.<br />आमदार सत्यजित तांबे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, संगमनेर शहर व तालुक्यात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतो. गणेशमूर्तींचे विधिवत विसर्जन करण्यासाठी प्रवरा नदीपात्रात पुरेसे पाणी उपलब्ध असणे आवश्यक आहे. अन्यथा गणेशमूर्तींची हेळसांड होते. गणेशोत्सव हा नागरिकांच्या धार्मिक व भावनिक श्रद्धेशी जोडलेला मोठा उत्सव असून, गणेशमूर्तींचे विधिवत विसर्जन हा या उत्सवातील अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे गणेशमूर्तींचे विसर्जन करताना नदीपात्रात पुरेसे पाणी असणे आवश्यक आहे.<br />यापूर्वी प्रवरा नदीपात्रात पाणी उपलब्ध नसल्याने संगमनेर शहरातील गणेशमूर्तींचे विसर्जन लांबणीवर पडल्याच्या घटना घडलेल्या आहेत. सन २०१२ मध्ये तर पाणी नसल्यामुळे गणेश विसर्जन तब्बल १५ दिवस पुढे ढकलण्यात आले होते. यावर्षीही अशी परिस्थिती पुन्हा निर्माण होऊ नये आणि गणेश विसर्जनाच्या दिवशीच संगमनेर शहर व तालुक्यातील गणेशमूर्तींचे विधिवत विसर्जन करता यावे, यासाठी प्रवरा नदीपात्रात पाणी असणे गरजेचे आहे.</p>]]></content:encoded></item><item><title>नगर- शेतरस्त्यांसाठी महिनाभर राज्यात विशेष अभियान शेत-पाणंद रस्त्यांची माहिती संकलित केली जाणार</title><link>https://www.esakal.com/pune/farmers-rural-road-initiative-maharashtra</link><comments>https://www.esakal.com/pune/farmers-rural-road-initiative-maharashtra#comments</comments><guid isPermaLink="false">696f81b9-a9e6-4abf-95a4-db0c9c38db53</guid><pubDate>Wed, 16 Sep 2026 14:38:59 +0530</pubDate><atom:updated>2026-09-16T14:38:59.000+05:30</atom:updated><atom:author><atom:name>CD</atom:name><atom:uri>/api/author/1629784</atom:uri></atom:author><description><![CDATA[ नगर- शेतरस्त्यांसाठी महिनाभर राज्यात विशेष अभियान शेत-पाणंद रस्त्यांची माहिती संकलित केली जाणार]]></description><media:keywords></media:keywords><media:content url="https://cf-images.assettype.com/esakal/2026-09-16/vamy494a/Banner1.png"><media:title type="html"></media:title><media:description type="html"></media:description></media:content><media:thumbnail url="https://cf-images.assettype.com/esakal/2026-09-16/vamy494a/Banner1.png?w=280" width="280"></media:thumbnail><category>Pune</category><content:encoded><![CDATA[ <p>शेतरस्त्यांसाठी महिनाभर <br />राज्यात विशेष अभियान</p><p>शेत-पाणंद रस्त्यांची माहिती संकलित केली जाणार</p><p>अॅग्रोवन वृत्तसेवा<br />अहिल्यानगर  ः शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत बारमाही आणि हक्काचा रस्ता उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने मुख्यमंत्री बळीराजा शेत-पाणंद रस्ते योजनेअंतर्गत राज्यात एक सप्टेंबर ते दोन ऑक्टोबरदरम्यान विशेष अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाच्या माध्यमातून गावागावांतील शेत-पाणंद रस्त्यांची माहिती संकलित केली जाणार आहे. शेतकऱ्यांनी आपल्या शेतापर्यंत जाणाऱ्या रस्त्यांची माहिती संबंधित तलाठी अथवा ग्रामसेवकांकडे नोंदवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.<br />ग्रामीण भागात शेत-पाणंद रस्त्याचा प्रश्न कायम सतावत असतो. अनेक कारणाने शेतकऱ्यांना रस्ताचा प्रश्न भेडसावतो. रस्त्याच्या कारणावरून वाद, व सातत्याने संघर्षही केला जात असल्याचे पहायला मिळत आहे. शेतकऱ्यांना रस्ते उपलब्ध व्हावेत आणि एकमेकांतील रस्त्यावरून होणारा संघर्षही टाळता यावा यासाठी शासनाने मुख्यमंत्री बळीराजा शेत-पाणंद रस्ते योजनेअंतर्गत विशेष अभियान आयोजित केले आहे. <br />या अभियानात गावाच्या नकाशावर अस्तित्वात असलेले तसेच नकाशावर नोंद नसलेले, मात्र प्रत्यक्ष वापरात असलेले डी/ई प्रकारातील शेत-पाणंद रस्ते यांची माहिती संकलित केली जाणार आहे. त्यानंतर आवश्यक ती प्रशासकीय कार्यवाही करण्याचे नियोजन आहे. त्यामुळे अनेक वर्षांपासून दुर्लक्षित राहिलेल्या किंवा नोंदीअभावी विकासापासून वंचित असलेल्या शेतरस्त्यांना प्रशासकीय प्रक्रियेत आणण्याची संधी उपलब्ध झाली आहे. अभियानाला  राज्यात सुरवात झाली आहे.</p>]]></content:encoded></item><item><title>पवित्र पोर्टल पदभरती</title><link>https://www.esakal.com/uttar-maharashtra/nashik/todays-latest-marathi-news-nsk26h35134-txt-jaltdy1-20260916090820</link><comments>https://www.esakal.com/uttar-maharashtra/nashik/todays-latest-marathi-news-nsk26h35134-txt-jaltdy1-20260916090820#comments</comments><guid isPermaLink="false">0bf9f048-acbf-4db1-b316-106fdab68002</guid><pubDate>Wed, 16 Sep 2026 14:38:20 +0530</pubDate><atom:updated>2026-09-16T14:38:20.000+05:30</atom:updated><atom:author><atom:name>CD</atom:name><atom:uri>/api/author/1629784</atom:uri></atom:author><description><![CDATA[ पवित्र पोर्टल पदभरती]]></description><media:keywords></media:keywords><media:content url="https://cf-images.assettype.com/esakal/2026-09-16/nyx7f9zp/Sakal_Wesite_Banner_1200_x_675.jpg"><media:title type="html"></media:title><media:description type="html"></media:description></media:content><media:thumbnail url="https://cf-images.assettype.com/esakal/2026-09-16/nyx7f9zp/Sakal_Wesite_Banner_1200_x_675.jpg?w=280" width="280"></media:thumbnail><category>Nashik</category><content:encoded><![CDATA[ टुडे एक
---
(शिक्षकांचे संग्रहित चित्र वापरावे)
---
समुपदेशनाद्वारे २१४ शिक्षकांना पदस्थापना

(उपशीर्षक)
‘पवित्र पोर्टल’अंतर्गत प्रक्रिया; ‘उर्दू’तील ५१ शिक्षकांचा समावेश

सकाळ वृत्‍तसेवा
जळगाव, ता. १६ : जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागामार्फत पवित्र पोर्टल पदभरती २०२५ अंतर्गत पात्र ठरलेल्या शिक्षक उमेदवारांना पदस्‍थापना देण्यात आली. समुपदेशन प्रक्रियेद्वारे पारदर्शक व नियमानुकूल पद्धतीने ही पदस्थापना देण्यात आली असून, मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांच्या मार्गदर्शन व आदेशान्वये ही समुपदेशन प्रक्रिया राबविण्यात आली.
जिल्‍हा परिषद शाळांमध्‍ये असलेल्‍या उपलब्ध रिक्त पदे, उमेदवारांची पात्रता तसेच शासनाच्या नियमानुसार संपूर्ण समुपदेशन प्रक्रिया पारदर्शक व नियमानुकूल पद्धतीने पार पाडण्यात आली. उपलब्ध पदांची उमेदवारांना आवश्यक माहिती देऊन, त्यांच्या पसंतीक्रमानुसार पदस्थापना देण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. या प्रक्रियेत शिक्षणाधिकारी नीलेश पाटील, उपशिक्षणाधिकारी स्वाती हवेले, उपशिक्षणाधिकारी नरेंद्र चौधरी, विजय सरोदे तसेच संपूर्ण आस्थापना लिपिक वर्गाने या प्रक्रियेसाठी कार्य केले.

२१४ शिक्षकांना पदस्‍थापना
पवित्र पोर्टल पदभरतीच्‍या प्रक्रियेत मराठी माध्यमातील १६३ शिक्षक तसेच उर्दू माध्यमातील ५१ शिक्षक, अशा एकूण २१४ शिक्षकांना समुपदेशनाद्वारे पदस्थापना देण्यात आली. पात्र शिक्षकांना योग्य पदस्थापना, शाळांना सक्षम मनुष्यबळ आणि विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण या उद्देशाने राबविण्यात आलेली ही प्रक्रिया जिल्ह्यातील शैक्षणिक विकासाला गती देणारे सकारात्मक व भविष्यवेधी पाऊल ठरले आहे.

चौकट
शाळांना मिळणार आवश्यक मनुष्यबळ 
शिक्षक पदभरती व पदस्थापना प्रक्रियेमुळे जिल्ह्यातील शाळांना आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध होण्यास मदत होणार असून विद्यार्थ्यांना नियमित, गुणवत्तापूर्ण व अधिक परिणामकारक शिक्षण मिळण्यास हातभार लागणार आहे. ग्रामीण भागातील शाळांची शैक्षणिक गुणवत्ता अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने ही प्रक्रिया महत्त्वपूर्ण ठरणार आहे.]]></content:encoded></item><item><title>माजी विद्यार्थी मेळावा संपन्न</title><link>https://www.esakal.com/uttar-maharashtra/nashik/todays-latest-marathi-news-smd26b00514-txt-dhltdy4-20260916085653</link><comments>https://www.esakal.com/uttar-maharashtra/nashik/todays-latest-marathi-news-smd26b00514-txt-dhltdy4-20260916085653#comments</comments><guid isPermaLink="false">969650eb-8f4a-4981-b65d-d547f4522826</guid><pubDate>Wed, 16 Sep 2026 14:26:53 +0530</pubDate><atom:updated>2026-09-16T14:26:53.000+05:30</atom:updated><atom:author><atom:name>CD</atom:name><atom:uri>/api/author/1629784</atom:uri></atom:author><description><![CDATA[ माजी विद्यार्थी मेळावा संपन्न]]></description><media:keywords></media:keywords><media:content url="https://cf-images.assettype.com/esakal/2026-09-16/dpdk4ufb/Sakal_Wesite_Banner_1200_x_675.jpg"><media:title type="html"></media:title><media:description type="html"></media:description></media:content><media:thumbnail url="https://cf-images.assettype.com/esakal/2026-09-16/dpdk4ufb/Sakal_Wesite_Banner_1200_x_675.jpg?w=280" width="280"></media:thumbnail><category>Nashik</category><content:encoded><![CDATA[ (पान ४ ला ॲंकर)
SMD26B01140
पिंपळनेर : येथील न्यू इंग्लिश स्कूलच्या माजी विद्यार्थी- विद्यार्थिनींच्या स्नेहमेळाव्यात सहभागी झालेले शिक्षक व विद्यार्थी.
-----------------
पंचावन्न वर्षांनंतर फुलला मित्र- मैत्रिणींच्या स्नेहमळा

न्यू इंग्लिश स्कूलच्या माजी विद्यार्थ्यांचा जुन्या आठवणींना उजाळा
सकाळ वृत्तसेवा
सामोडे, ता. १६ : पिंपळनेर येथील न्यू इंग्लिश स्कूलच्या १९७१- ७२च्या माजी विद्यार्थी- विद्यार्थिनींचा तब्बल ५५ वर्षांनंतर स्नेहमेळावा उत्साहात झाला. वयाची ७१- ७२ वर्षे गाठलेल्या या मित्र-मैत्रिणींनी जुन्या आठवणींना उजाळा देत गाणे, विनोद, विविध प्रसंगांचे सादरीकरण अशा विविध उपक्रमांतून मनमुराद आनंद लुटला. काही काळासाठी सर्वजण पुन्हा सोळा-सतरा वर्षांचे झाल्याचा अनुभव घेत असल्याचे वातावरण कार्यक्रमस्थळी दिसून आले.
अध्यक्षस्थानी माजी प्राचार्य ए. बी. मराठे होते. प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे निवृत्त शिक्षक एस. एस. वंजारी, एम. पी. सोनवणे, जी. बी. जगताप, प्राचार्य पी. एच. पाटील, जयेश मराठे, एच. आर. गांगुर्डे, गांगुर्डे सर, शिवानंद दादाजी, भालचंद्र ततार, देविदास चौधरी, भालचंद्र कोठावदे आदी उपस्थित होते. प्रारंभी संस्थेचे आधारस्तंभ कैलासवासी कर्मवीर बंडू बापूजी, अण्णासाहेब एन. के. पाटील, व्ही. के. वाणी व कैलासवासी सुरेंद्रराव मराठे यांच्या प्रतिमांचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले. विद्यालयाच्या प्रांगणातील अवघडनाथ महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतले.
या वेळी माजी विद्यार्थ्यांनी पूर्वीची कौलारू शाळा आणि सध्याची तीन मजली भव्य इमारत पाहून जुन्या आठवणींना उजाळा दिला. आपल्या आयुष्याला आकार देणाऱ्या गुरुजनांप्रती कृतज्ञता व्यक्त करत गुरुपूजन करून शिक्षकांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य ए. बी. मराठे यांनी, ५५ वर्षांनंतरही माजी विद्यार्थ्यांनी संस्थेविषयी जपलेली आपुलकी व स्नेह पाहून आम्हाला अतिशय आनंद झाला. आपण आता विद्यार्थी नसून आजी- आजोबा झाला आहात. आपल्या भावी आयुष्यात कोणालाही दुःखाचे दिवस येऊ नयेत. सर्वांना निरोगी व आनंदी आयुष्य लाभावे, अशा शुभेच्छा दिल्या. हर्षदा शेलार व प्रा. बी. एस. कोठावदे यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.

गाण्यांची मैफल अन् हास्यविनोदाची रंगत
एकत्र आलेल्या मित्र- मैत्रिणींनी जीवनातील विविध प्रसंग सांगत जुन्या आठवणी जागवल्या. चित्रपटातील जुन्या गाण्यांची मैफिल रंगली, तर विनोदी सादरीकरणामुळे हास्याचे फवारे उडाले. एकमेकांच्या नव्याने ओळखी करून देत मैत्रिणींना माहेरची साडी भेट देण्यात आली. त्यानंतर सर्वांनी मिष्टान्न भोजनाचा आस्वाद घेतला.

जुन्या नात्यांना नवी ऊब
या सोहळ्याचे आयोजन पिंपळनेर येथील देविदास कृष्णा चौधरी, प.पू. भालचंद्र आनंदा ततार, प.पू. शिवानंद दादाजी धुनिवाले, सुभाषचंद्र शिवराम शेठ बधान व भालचंद्र कोठावदे यांनी केले. दुरावलेल्या मित्र- मैत्रिणींना एकत्र आणत त्यांनी हा स्नेहमिलन सोहळा घडवून आणला.]]></content:encoded></item><item><title>डायलिसीस गुणवत्ता वाढविण्यासाठी समिती करणार शिफारस</title><link>https://www.esakal.com/uttar-maharashtra/nashik/todays-latest-marathi-news-nsk26h35110-txt-nsktdy2-20260916085216</link><comments>https://www.esakal.com/uttar-maharashtra/nashik/todays-latest-marathi-news-nsk26h35110-txt-nsktdy2-20260916085216#comments</comments><guid isPermaLink="false">fe1a2d41-18c9-4943-8196-000ba9a6971b</guid><pubDate>Wed, 16 Sep 2026 14:22:16 +0530</pubDate><atom:updated>2026-09-16T14:22:16.000+05:30</atom:updated><atom:author><atom:name>CD</atom:name><atom:uri>/api/author/1629784</atom:uri></atom:author><description><![CDATA[ डायलिसीस गुणवत्ता वाढविण्यासाठी समिती करणार शिफारस]]></description><media:keywords></media:keywords><media:content url="https://cf-images.assettype.com/esakal/2026-09-16/xl93afqa/Sakal_Wesite_Banner_1200_x_675.jpg"><media:title type="html"></media:title><media:description type="html"></media:description></media:content><media:thumbnail url="https://cf-images.assettype.com/esakal/2026-09-16/xl93afqa/Sakal_Wesite_Banner_1200_x_675.jpg?w=280" width="280"></media:thumbnail><category>Nashik</category><content:encoded><![CDATA[ फोटो : H29754
नाशिक : इंडियन सोसायटी ऑफ नेफ्रॉलॉजी (पश्‍चिम विभाग) च्या ४२ व्या मूत्रपिंड विकार तज्ज्ञ परिषदेप्रसंगी उपस्‍थित पदाधिकारी, तज्‍ज्ञ वक्‍ते.
------------
‘डायलिसीस’ गुणवत्ता वाढविण्यासाठी समिती करणार शिफारस

मूत्रपिंड तज्‍ज्ञांच्‍या ‘आयएसएनडब्‍ल्‍यूझेड २०२६’ परिषदेचा समारोप

सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. १६ : गुणवत्तापूर्ण डायलिसीसमुळे रुग्‍णाला दिलासा मिळू शकतो. या पार्श्वभूमीवर उपलब्‍ध डायलिसिस केंद्रांना अद्ययावत करण्यासह इतर विविध सुविधा सुचविण्यासाठी तज्‍ज्ञांची समिती गठीत केली आहे. ही समिती शासन, प्रशासनाला शिफारशी करणार असल्‍याची माहिती मूत्रपिंड विकार तज्‍ज्ञांच्‍या परिषदेत दिली. 
इंडियन सोसायटी ऑफ नेफ्रॉलॉजी (पश्‍चिम विभाग) च्या ४२ व्या मूत्रपिंड विकार तज्ज्ञ परिषदेचा (आयएसएनडब्‍ल्‍यूझेड २०२६) समारोप रविवारी (ता. १३) झाला. परिषदेच्या या तिसऱ्या व अखेरच्या दिवशी तीन विविध सभागृहांमध्ये विविध वैद्यकीय सत्रांचे आयोजन केले होते. ‘३६० डिग्री किडनी केअर’ या संकल्पनेवर आधारित या परिषदेच्या शेवटच्या दिवशी देशभरातून आलेल्या तज्ज्ञ डॉक्टरांचा, संशोधकांचा व वैद्यकीय कर्मचाऱ्यांचा प्रतिसाद पाहायला मिळाला. पहिले मुख्य सत्र हॉटेल ट्रिट येथील डॉ. विद्या आचार्य सभागृहात पार पडले. कन्सल्टंट ओरल प्रेझेंटेशनचे परीक्षण डॉ. देवदत्त चाफेकर व डॉ. एन. के. हसे यांनी केले. मानाच्या डॉ. व्ही. एन. आचार्य ओरेशन सत्रात डॉ. विवेक कुटे यांनी भारतातील स्वॅप ट्रान्सप्लांटेशन प्रोग्राम यावर महत्त्वपूर्ण मांडणी केली. समारोपप्रसंगी या तीन दिवसीय परिषदेच्या यशस्वी प्रवासाचा आढावा घेतला. परिषदेत रेनल पॅथॉलॉजी व नेफ्रोक्रिटिकल केअर या विशेष कार्यशाळा, शोधनिबंध सादरीकरणासाठी सायलेंट हॉलची संकल्पना, तसेच ज्येष्ठ तज्ज्ञांचे विचार मांडणारा होलोग्राम हे विशेष आकर्षण ठरले.  त्र्यंबकेश्वर दर्शन आणि प्रियंका बर्वे यांच्या संगीत संध्या कार्यक्रमाला डॉक्टरांचा प्रतिसाद लाभला. आयोजन समिती अध्यक्ष डॉ. देवदत्त चाफेकर, सचिव डॉ. नागेश अघोर,  सायंटिफिक कमिटीचे डॉ. कैलास शेवाळे, आयएसएन पश्‍चिम विभागाचे अध्यक्ष डॉ. प्रदीप सल्गिया, सचिव डॉ. उमापती हेगडे, डॉ. एम. एम. राजापूरकर आणि डॉ. शिशिर गंग यांच्या सहकार्यामुळे परिषद यशस्वी झाली.
---]]></content:encoded></item><item><title>धरणग्रस्तांच्या प्रश्नावर युवा संघर्ष समितीची मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा</title><link>https://www.esakal.com/marathwada/aurangabad/youth-struggle-reservoir-height-issues</link><comments>https://www.esakal.com/marathwada/aurangabad/youth-struggle-reservoir-height-issues#comments</comments><guid isPermaLink="false">f46ea16a-1014-468a-aff3-59687ed26e5e</guid><pubDate>Wed, 16 Sep 2026 14:21:58 +0530</pubDate><atom:updated>2026-09-16T14:21:58.000+05:30</atom:updated><atom:author><atom:name>CD</atom:name><atom:uri>/api/author/1629784</atom:uri></atom:author><description><![CDATA[ धरणग्रस्तांच्या प्रश्नावर युवा संघर्ष समितीची मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा]]></description><media:keywords></media:keywords><media:content url="https://cf-images.assettype.com/esakal/2026-09-16/a8zxx5gt/Sakal20Wesite20Banner20_20Ch20Sambhaji20Nagar.jpg"><media:title type="html"></media:title><media:description type="html"></media:description></media:content><media:thumbnail url="https://cf-images.assettype.com/esakal/2026-09-16/a8zxx5gt/Sakal20Wesite20Banner20_20Ch20Sambhaji20Nagar.jpg?w=280" width="280"></media:thumbnail><category>Chhatrapati Sambhaji Nagar</category><content:encoded><![CDATA[ धरणग्रस्तांच्या प्रश्नावर युवा संघर्ष समितीची मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा
-----
माजलगाव, ता. १६ (बातमीदार) : माजलगाव धरणाची उंची वाढविण्याच्या निर्णयाला विरोध करणाऱ्या युवा संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन प्रकल्पग्रस्तांच्या समस्या मांडल्या. आयुष्मान भारत मिशन महाराष्ट्र समितीचे अध्यक्ष डॉ. ओमप्रकाश शेटे यांच्या पुढाकारातून झालेल्या या भेटीत धरणग्रस्तांवर अन्याय होणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिल्याचे शेटे यांनी सांगितले.
    धरणाच्या उंचीवाढीला २२ गावांचा विरोध असून, यापूर्वी १९८०-८५ दरम्यान ३० ते ३२ गावांचे पुनर्वसन झाले आहे. यातील अनेक शेतकरी भूमिहीन झाले असून, पुन्हा धरणाची उंची वाढल्यास माजलगाव, वडवणी व गेवराई तालुक्यातील सुपीक शेती पाण्याखाली जाण्याची भीती शिष्टमंडळाने व्यक्त केली. उंची वाढविण्याऐवजी धरणातील गाळ काढावा अथवा बॅरेजेस उभारण्याचा पर्याय स्वीकारावा, अशी मागणी शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांकडे केली. यावर फडणवीस यांनी एकाही शेतकरी किंवा प्रकल्पग्रस्तावर अन्याय होऊ देणार नसल्याचे सांगत राज्याचे अतिरिक्त मुख्य सचिव एकनाथ डवले यांना प्रकरणाचा वस्तुनिष्ठ अहवाल सादर करण्याचे निर्देश दिल्याचे शेटे यांनी सांगितले. त्यानंतर शिष्टमंडळाने डवले यांची भेट घेऊन प्रशासकीय कार्यवाहीबाबत चर्चा केली.
-----]]></content:encoded></item><item><title>कुसुंबा महाविद्यालयात पर्यावरण संरक्षण व संवर्धन जनजागृती अभियानांतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन</title><link>https://www.esakal.com/uttar-maharashtra/nashik/todays-latest-marathi-news-hus26b00275-txt-dhltdy4-20260916084325</link><comments>https://www.esakal.com/uttar-maharashtra/nashik/todays-latest-marathi-news-hus26b00275-txt-dhltdy4-20260916084325#comments</comments><guid isPermaLink="false">170f22ad-5bdc-4ab2-89ca-eb49572e0c81</guid><pubDate>Wed, 16 Sep 2026 14:13:25 +0530</pubDate><atom:updated>2026-09-16T14:13:25.000+05:30</atom:updated><atom:author><atom:name>CD</atom:name><atom:uri>/api/author/1629784</atom:uri></atom:author><description><![CDATA[ कुसुंबा महाविद्यालयात पर्यावरण संरक्षण व संवर्धन जनजागृती अभियानांतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन]]></description><media:keywords></media:keywords><media:content url="https://cf-images.assettype.com/esakal/2026-09-16/g6raw2az/Sakal_Wesite_Banner_1200_x_675.jpg"><media:title type="html"></media:title><media:description type="html"></media:description></media:content><media:thumbnail url="https://cf-images.assettype.com/esakal/2026-09-16/g6raw2az/Sakal_Wesite_Banner_1200_x_675.jpg?w=280" width="280"></media:thumbnail><category>Nashik</category><content:encoded><![CDATA[ HUS26B00563
कुसुंबा : महाविद्यालयात पर्यावरण संरक्षण व संवर्धन जनजागृती कार्यक्रमात उपस्थित शिक्षक.
-----
झाडे वाचली तरच वसुंधरा वाचेल

डॉ. पाटील : कुसुंबा महाविद्यालयात पर्यावरण संरक्षण अभियान
सकाळ वृत्तसेवा
कुसुंबा, ता. १४ : पर्यावरणाचे संरक्षण आणि संवर्धन ही प्रत्येकाची नैतिक जबाबदारी आहे. झाडांचे मुलांप्रमाणे संगोपन करून त्यांची काळजी घेतली पाहिजे. झाडे वाचली तर वसुंधरा वाचेल आणि वसुंधरा वाचली तर संपूर्ण जीवसृष्टी टिकून राहील, असे मत व्यवस्थापन परिषदेचे सदस्य प्रा. डॉ. शिवाजीराव पाटील यांनी व्यक्त केले.
येथील श्रीमती नर्मदाबाई नागो चौधरी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात विद्यार्थी विकास विभागाच्या वतीने वर्षभर विविध पर्यावरणपूरक उपक्रम राबविण्यात येणार आहेत. या पर्यावरण संरक्षण व संवर्धन अभियानाचे उद्‌घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष तथा कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगावच्या ग्रंथालय व माहितीशास्त्र अभ्यास मंडळाचे अध्यक्ष प्रा. डॉ. अनिल चौधरी होते. विद्यापीठाचे संचालक प्रा. डॉ. प्रवीण महाले यांच्या हस्ते अभियानाचे उद्‌घाटन झाले. व्यवस्थापन परिषद सदस्य प्रा. डॉ. शिवाजीराव पाटील यांनी प्रमुख मार्गदर्शन केले. संस्थेच्या सचिव तथा अधिसभा व विद्या परिषद सदस्य प्रा. डॉ. दीपिका चौधरी, उपप्राचार्य प्रा. डॉ. एम. जी. कासार, प्राचार्य प्रा. डॉ. एस. जी. बाविस्कर आदी उपस्थित होते.
प्रा. डॉ. अनिल चौधरी यांनी प्लास्टिकचा वाढता वापर पर्यावरणासाठी घातक असल्याचे सांगून प्लास्टिकचा वापर टाळण्याचे आवाहन केले. महाविद्यालयाच्या आवारात मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. डॉ. सुनील बावने यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. डॉ. बी. बी. गायकवाड यांनी आभार मानले.]]></content:encoded></item><item><title>मविप्रच्या रुग्णालयात ‘साइनोफेस्ट’ कार्यशाळा</title><link>https://www.esakal.com/uttar-maharashtra/nashik/todays-latest-marathi-news-nsk26h35064-txt-nsktdy2-20260916084145</link><comments>https://www.esakal.com/uttar-maharashtra/nashik/todays-latest-marathi-news-nsk26h35064-txt-nsktdy2-20260916084145#comments</comments><guid isPermaLink="false">ad0749ae-8cca-4556-a371-8ef4872aa212</guid><pubDate>Wed, 16 Sep 2026 14:11:45 +0530</pubDate><atom:updated>2026-09-16T14:11:45.000+05:30</atom:updated><atom:author><atom:name>CD</atom:name><atom:uri>/api/author/1629784</atom:uri></atom:author><description><![CDATA[ मविप्रच्या रुग्णालयात ‘साइनोफेस्ट’ कार्यशाळा]]></description><media:keywords></media:keywords><media:content url="https://cf-images.assettype.com/esakal/2026-09-16/x8a8aw9i/Sakal_Wesite_Banner_1200_x_675.jpg"><media:title type="html"></media:title><media:description type="html"></media:description></media:content><media:thumbnail url="https://cf-images.assettype.com/esakal/2026-09-16/x8a8aw9i/Sakal_Wesite_Banner_1200_x_675.jpg?w=280" width="280"></media:thumbnail><category>Nashik</category><content:encoded><![CDATA[ फोटो : H29726
आडगाव : ‘साइनोफेस्ट-२०२६’ राष्ट्रीय कार्यशाळेच्या उद्‌घाटनाप्रसंगी अधिष्ठाता डॉ. सुधीर भामरे, डॉ. रेणुका ब्राडू, डॉ. नारायण जयशंकर, डॉ. मंगेश जाधव आदी.

मविप्रच्या रुग्णालयात 
‘साइनोफेस्ट’ कार्यशाळा

सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. १६ : मविप्र संस्‍थेच्‍या आडगाव येथील डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय आणि संशोधन केंद्रात ‘साइनोफेस्ट २०२६’ राष्ट्रीय कार्यशाळा झाली. या तीन दिवसीय कार्यशाळेत देशभरातील दीडशेहून अधिक कान-नाक-घसा तज्ज्ञांनी सहभाग घेतला. यावेळी आठ रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रियादेखील केल्‍या.
कार्यशाळेच्या पहिल्या दिवशी लाइव्ह कॅडॅव्हेरिक सायनस डिसेक्शनचे प्रात्यक्षिक घेतले. दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी लाइव्ह सायनस शस्त्रक्रिया केल्‍या. सर्व शस्त्रक्रिया यशस्वी झाल्या असून, रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांनी समाधान व्यक्त केले. या कार्यशाळेचे मुख्य ऑपरेटिंग सर्जन मुंबईच्या डॉ. रेणुका ब्राडू व डॉ. नारायण जयशंकर होते. तसेच नाशिकचे डॉ. पुष्कर लेले व डॉ. महेश निकम यांनीदेखील शस्त्रक्रिया केल्या. कार्यक्रमाचे आयोजन ईएनटी विभागप्रमुख डॉ. श्रीया कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली झाले. आयोजक सचिव डॉ. रुषिका पटेल, डॉ. महेश निकम यांनी समन्वय साधून कार्यक्रम सुरळीत पार पाडला. मविप्रचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे,  शिक्षणाधिकारी डॉ. ज्ञानेश्वर लोखंडे, अधिष्ठाता डॉ. सुधीर भामरे यांचे सहकार्य लाभले.]]></content:encoded></item><item><title>वारसा गणेश मंडळांचा</title><link>https://www.esakal.com/pune/bal-ganesh-festival-gadkar-ali</link><comments>https://www.esakal.com/pune/bal-ganesh-festival-gadkar-ali#comments</comments><guid isPermaLink="false">f8f5f927-181a-45de-ae8a-08b7cbb484cf</guid><pubDate>Wed, 16 Sep 2026 13:28:09 +0530</pubDate><atom:updated>2026-09-16T13:28:09.000+05:30</atom:updated><atom:author><atom:name>CD</atom:name><atom:uri>/api/author/1629784</atom:uri></atom:author><description><![CDATA[ वारसा गणेश मंडळांचा]]></description><media:keywords></media:keywords><media:content url="https://cf-images.assettype.com/esakal/2026-09-16/bwyr4t1b/Banner1.png"><media:title type="html"></media:title><media:description type="html"></media:description></media:content><media:thumbnail url="https://cf-images.assettype.com/esakal/2026-09-16/bwyr4t1b/Banner1.png?w=280" width="280"></media:thumbnail><category>Pune</category><content:encoded><![CDATA[ <p>वारसा गणेश मंडळांचा<br />.......<br />सामाजिक उपक्रम<br />राबविण्यावर भर</p><p>-------------<br />श्री बालगणेशोत्‍सव मंडळ<br />गडकर आळी गावठाण, सातारा<br />...............</p><p>..........<br />स्‍थापना : १९२३<br />अध्‍यक्ष : अतिश कदम<br />उपाध्‍यक्ष : सचिन शेडगे<br />.............<br />शहर परिसरात असणाऱ्या मूळ गावठाणांमध्‍ये गडकर आळीचा देखील समावेश आहे. गावपण जपत होणाऱ्या बदलांना सामोरे जात गडकर आळीने स्‍वत:चे वेगळेपण यात्रा, जत्रा, सण, समारंभ, उत्‍सवांच्‍या माध्‍यमातून जपले आहे. यापैकी एक महत्त्‍वाचा असणारा गणेशोत्‍सव श्री. बालगणेशोत्‍सव मंडळ १९२३ पासून वेगळेपणाने साजरा करत आहे. <br />गणेशोत्‍सवापुरते एकत्र येण्‍यापेक्षा कायमस्वरूपी एकत्र राहात समाजोपयोगी उपक्रम राबवण्‍यावर या मंडळांच्‍या पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा भर असतो. ग्रामदैवत पेढ्याचा भैरोबा आणि महालक्ष्‍मी गडकर आळीची मुख्‍य ओळख आहे. यात्रेसाठी एकवटणाऱ्या तरुणाईकडे गणेशोत्‍सव मंडळाची धुरा सोपवत ज्‍येष्‍ठांनी त्‍यांना मार्गदर्शन सुरू केले. गणेशोत्‍सवासह यात्रा कालावधीत रक्‍तदान शिबिर, अन्नदान, वार्षिक भंडारा, परिसर स्‍वच्‍छता, सुरक्षितता यावर येथील तरुणाईचा भर असतो. भव्‍य मूर्ती आणि आकर्षक सजावटीच्‍या माध्‍यमातून गणेशोत्‍सव साजरा करत विविध समाजोपयोगी उपक्रमांवर मंडळाकडून जास्‍तीचा भर देण्‍यात येतो. मंडळ, युवक, तसेच ग्रामस्‍थांनी श्रमदानातून डोंगरावरील पेढ्याचा भैरोबा मंदिराकडे जाणाऱ्या पायरी मार्गाचे काम केले आहे. याच परिसरात झाडे लावणे, त्‍यांचे संवर्धन करणे, पुरातन तळ्याची डागडुजी, सफाई, लावलेल्‍या झाडांच्‍या देखभालीसाठी स्‍वतंत्र पाणी व्‍यवस्‍था उभारली आहे. मंदिर परिसराचे पावित्र्य राखण्‍यासह येथे विविध उपाययोजना देखील युवक, ग्रामस्‍थांकडून राबवल्‍या जातात. युवक, ग्रामस्‍थांनी केलेल्‍या ठोस आणि विकासात्‍मक कामांमुळे गडकर आळीसह परिसराचा कायापालट होण्‍यास मदतच झाली आहे. विविध समाजोपयोगी, धार्मिक कार्यक्रमांच्‍या माध्‍यमातून गडकर आळीचा नावलौकिक अबाधित ठेवण्‍यासाठी युवकांसह ज्‍येष्‍ठ नागरिक अखंडपणे सक्रिय आहेत.<br />...........<br />५०११८ : गडकर आळी मंडळ फोटो</p>]]></content:encoded></item><item><title>मायणीत व्यावसायिकांची एकजूटीसाठी बैठक</title><link>https://www.esakal.com/pune/business-unity-mayani-meeting</link><comments>https://www.esakal.com/pune/business-unity-mayani-meeting#comments</comments><guid isPermaLink="false">68942db4-e2c2-4453-9edf-aa28c35c4a1c</guid><pubDate>Wed, 16 Sep 2026 12:56:10 +0530</pubDate><atom:updated>2026-09-16T12:56:10.000+05:30</atom:updated><atom:author><atom:name>CD</atom:name><atom:uri>/api/author/1629784</atom:uri></atom:author><description><![CDATA[ मायणीत व्यावसायिकांची एकजूटीसाठी बैठक]]></description><media:keywords></media:keywords><media:content url="https://cf-images.assettype.com/esakal/2026-09-16/tukepz2s/Banner1.png"><media:title type="html"></media:title><media:description type="html"></media:description></media:content><media:thumbnail url="https://cf-images.assettype.com/esakal/2026-09-16/tukepz2s/Banner1.png?w=280" width="280"></media:thumbnail><category>Pune</category><content:encoded><![CDATA[ <p>मायणीत व्यावसायिकांची एकजुटीसाठी बैठक</p><p>पार्किंग, कॅमेरे, वाहतूक कोंडीसाठी पुढाकार; नोंदणीस उत्स्फूर्त प्रतिसाद</p><p>मायणी, ता. १६ : येथील व्यापारी व व्यावसायिकांच्या समस्या सोडवण्यासाठी आयोजित बैठकीत विविध क्षेत्रातील सुमारे अडीचशे व्यापारी, व्यावसायिकांनी हजेरी लावली. यावेळी विविध विषयांवर चर्चाही झाली.<br />येथील श्री धनगर विठोबा मंगल कार्यालयात ही बैठक झाली. खटाव तालुक्यातील येथे  बाजारपेठ असल्याने व्यापाऱ्यांना व व्यावसायिकांच्या समस्या दिवसेंदिवस वाढत आहेत. या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी तरुण व्यापारी, लहान-मोठे व्यावसायिक, युवा उद्योजक, गलाई बांधव, कापड उद्योजक आदी व्यावसायिकांची बैठक झाली. त्यात गावातील मुख्य रस्त्यावरील होणारी वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी सम-विषम पार्किंग नियोजन, परिवहन मंडळाची बस स्थानक येण्यासाठी प्रयत्न करण्यासाठी संबंधित विभागाला निवेदन देणे, ग्रामपंचायत व पोलिस विभागाशी चर्चा करून आठवडा बाजारादिवशी बसस्थानकातील वाहनांची कोंडी कमी करणे, गटारावरील झालेली अतिक्रमणे स्वत:हून काढून घेणे, चांदणी चौकातील व्यापाऱ्यांशी चर्चा करून वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करणे.<br />वारंवार खंडित होत असलेल्या विजेमुळे व्यावसायिकांचे आर्थिक नुकसान होत असून, त्याबाबत वीज वितरण कंपनीला निवेदन देणे, गावातील एकमेव राष्ट्रीयीकृत असल्याने व्यवहार करताना व्यावसायिकांना अडचणी येत आहेत, त्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करणे आदी विषयांवर चर्चा झाली. गावात होत असलेल्या चोरीबाबत सर्व व्यापाऱ्यांनी एकजुटीने सर्वासोबत राहण्याचा निर्णय यावेळी घेतला.<br />...........<br />कोट :<br />...........</p><p>दरम्यान बैठकीनंतर गावातून मायणी व्यापारी-व्यावसायिक संघटनेने सभासद नोंदणीस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. चांदणी चौकातील व गावातील मार्केटला पूर्व वैभव प्राप्त करून देण्यासाठी प्रयत्न होत आहेत.</p><p><br />B03439<br />मायणी : बैठकीसाठी जमलेले व्यावसायिक. (अंकुश चव्हाण : सकाळ छायाचित्रसेवा)<br />.............................................</p>]]></content:encoded></item><item><title>सांगली : त्रिभाजनाबाबत उपनिबंधकांचा पुढील आठवड्यात निर्णय</title><link>https://www.esakal.com/pune/sangli-market-committee-division</link><comments>https://www.esakal.com/pune/sangli-market-committee-division#comments</comments><guid isPermaLink="false">8d78d7f5-45a7-44ae-9949-6cb62a3e3c06</guid><pubDate>Wed, 16 Sep 2026 12:54:02 +0530</pubDate><atom:updated>2026-09-16T12:54:02.000+05:30</atom:updated><atom:author><atom:name>CD</atom:name><atom:uri>/api/author/1629784</atom:uri></atom:author><description><![CDATA[ सांगली : त्रिभाजनाबाबत उपनिबंधकांचा पुढील आठवड्यात निर्णय]]></description><media:keywords></media:keywords><media:content url="https://cf-images.assettype.com/esakal/2026-09-16/tjoxtrgw/Banner1.png"><media:title type="html"></media:title><media:description type="html"></media:description></media:content><media:thumbnail url="https://cf-images.assettype.com/esakal/2026-09-16/tjoxtrgw/Banner1.png?w=280" width="280"></media:thumbnail><category>Pune</category><content:encoded><![CDATA[ <p>त्रिभाजनाबाबत उपनिबंधकांचा <br />पुढील आठवड्यात निर्णय</p><p>ॲग्रोवन वृत्तसेवा<br />सांगली  ः सांगली बाजार समिती त्रिभाजनाबाबत बाजार समिती प्रशासन, संचालकांचे अभिप्राय मागितल्यानंतर जिल्हा सहकार उपनिबंधक सुनील चव्हाण कोल्हापूर सर्कीट बॅंचकडे शुक्रवारी (ता. ११) आणखी एक आठवड्याची मुदत मागितली आहे. विभाजनाबाबत पुढील आठवड्यातच निर्णय अपेक्षित आहे.<br />सांगली बाजार समितीचे त्रिभाजन करावे, असा अहवाल पणन विभागाने जिल्हा उपनिबंधकांकडे दिला होता. त्यानंतर संचालक मंडळ व बाजार समिती प्रशासनाकडून पुन्हा अभिप्राय मागविण्यात आले. सर्व संचालक, बाजार समिती प्रशासनाने अभिप्राय जिल्हा उपनिबंधकांकडे सादर केले आहेत. अभिप्राय दाखल करण्याची अंतिम मुदत गुरुवारी (ता. १०) होती. जिल्हा सहकार उपनिबंधक चव्हाण यांच्या निर्णयाकडे लक्ष होते. मात्र त्यांनी मुदतवाढ मागितली आहे.<br />राज्य सरकारने सांगली बाजार समितीचे त्रिभाजन करून जत व कवठेमहांकाळ येथे स्वतंत्र बाजार समित्या स्थापन करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाला संचालकांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले. न्यायालयाच्या आदेशानंतर भागधारक व मतदारांचे म्हणणे जाणून घेण्यात आहे. त्यानंतर झालेल्या वार्षिक सभेत त्रिभाजन करू नये, असा ठराव करण्यात आला. हा ठराव जिल्हा उपनिबंधकांकडे पाठविण्यात आला होता.</p>]]></content:encoded></item><item><title>खल्वायन सभा आज रत्नागिरीत</title><link>https://www.esakal.com/mumbai/todays-latest-marathi-news-kop26e31874-txt-ratnagiri-today-20260911115912</link><comments>https://www.esakal.com/mumbai/todays-latest-marathi-news-kop26e31874-txt-ratnagiri-today-20260911115912#comments</comments><guid isPermaLink="false">54cefc88-7e8f-4fb9-9a15-10f2b714bdda</guid><pubDate>Fri, 11 Sep 2026 17:29:12 +0530</pubDate><atom:updated>2026-09-11T17:29:12.000+05:30</atom:updated><atom:author><atom:name>CD</atom:name><atom:uri>/api/author/1629784</atom:uri></atom:author><description><![CDATA[ खल्वायन सभा आज रत्नागिरीत]]></description><media:keywords>washing machine,Ganesh Celebration</media:keywords><media:content url="https://cf-images.assettype.com/esakal/2026-09-11/t60tzlxs/ratnagiri_default_banner_1.jpg"><media:title type="html"></media:title><media:description type="html"></media:description></media:content><media:thumbnail url="https://cf-images.assettype.com/esakal/2026-09-11/t60tzlxs/ratnagiri_default_banner_1.jpg?w=280" width="280"></media:thumbnail><category>Mumbai</category><content:encoded><![CDATA[ <p>rat११p१३.jpg  <br />६३२४७<br />विशारद गुरव</p><p>खल्वायन सभा <br />आज रत्नागिरीत<br />रत्नागिरी ः खल्वायन, रत्नागिरी या संस्थेची ३२९वी मासिक संगीत सभा शनिवारी (ता. १२) सायंकाळी  ६ ते ८ या वेळात नेहमीप्रमाणेच सौ. गोदूताई जांभेकर विद्यालय, बसस्थानकासमोर होणार आहे. कै. अन्नपूर्णा उर्फ गोदुताई अनंत जोगळेकर स्मृती संगीत मैफल म्हणून साजरी होणार आहे. यासाठी जोगळेकर, केळकर, करंदीकर या कुटुंबीयांनी पुढाकार घेतला आहे. या मैफलीत चिपळूण येथील प्रसिद्ध युवा गायक विशारद गुरव यांच्या शास्त्रीय, उपशास्त्रीय व अभंग-नाट्यसंगीते सादर करणार आहेत. विशारद गुरव यांना वयाच्या चौथ्या वर्षापासून वडिलांचे मार्गदर्शन व गाण्यासाठी प्रोत्साहन मिळाले. त्यानंतर महेशकुमार देशपांडे यांच्याकडे विशारदपर्यंत शिक्षण त्यांनी घेतले. सध्या पं. प्रसाद गुळवणी यांच्याकडे त्यांचे जयपूर घराणे गायकीचे शिक्षण चालू आहे. या मैफलीला हेरंब जोगळेकर (तबला) व श्रीरंग जोगळेकर (संवादिनी), मंगेश चव्हाण (पखवाज), उदय गोखले (व्हायोलिन) हे साथ संगत करणार आहेत.  या मैफलीचा आस्वाद सर्वानी घ्यावा, असे आवाहन खल्वायन संस्थाध्यक्ष मनोहर जोशी यांनी केले आहे.</p><p>---------</p><p>स्वयंशासन दिन <br />शिर्के प्रशालेत साजरा<br />रत्नागिरी ः रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या रा. भा. शिर्के प्रशालेत १० सप्टेंबर रोजी १०वीच्या विद्यार्थ्यांकडून ''स्वयंशासन दिन'' अतिशय उत्साहात आणि शिस्तबद्ध वातावरणात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाची सुरवात १०वीच्या छात्र शिक्षकांनी सादर केलेल्या परिपाठाने झाली. या कार्यक्रमाला उपस्थित भारतीय सैन्यात ''लेफ्टनंट'' पदावर रूजू झालेले अनिकेत वाडकर यांनी विद्यार्थ्यांना संरक्षणक्षेत्रात करिअर करण्याबाबत मार्गदर्शन केले. या प्रसंगी शिक्षक ए. पी. चव्हाण यांनी सागरमित्र उपक्रमांतर्गत प्लास्टिकच्या पुनर्वापराबाबत विद्यार्थ्यांना मोलाची माहिती दिली. परिपाठानंतर प्रत्यक्ष तासिकांना सुरवात झाली. नियोजनानुसार छात्र शिक्षकांनी विविध वर्गांवर जाऊन वेळेत तास घेतले. या सर्व तासिकांचे परीक्षण शाळा व्यवस्थापन व नियमित शिक्षकांनी केले. मुख्याध्यापक के. डी. कांबळे, उपमुख्याध्यापिका पवार, पर्यवेक्षिका कांबळे उपस्थित होते. सूत्रसंचालन श्रेया वाडकर हिने तर पार्थी मेहेंदळे हिने आभार मानले.</p><p>--------</p><p>नवनिर्माणमध्ये रंगला <br />मोदक मेनिया<br /> रत्नागिरी ः येथील नवनिर्माण शिक्षणसंस्थेच्या एस. पी. हेगशेट्ये महाविद्यालयातील हॉटेल मॅनेजमेंट विभागाकडून आयोजित केलेल्या मोदक स्पर्धा आणि प्रदर्शनाला महाविद्यालयातून चांगला प्रतिसाद मिळाला. हॉटेल मॅनेजमेंट विभागतर्फे मोदक मेनियाचे आयोजन केले होते. या स्पर्धेत गणपती बाप्पांना आवडणारे विविध चवी, रंग आणि प्रकारच्या सजावटी असणारे मोदक बनवण्यात आले. विशेषकरून हेल्दी मिलेट मोदक, शुगर फ्री दुधी भोपळा मोदक, उकडीचे पान फ्लेवर मोदक, कोकणी स्पेशल मोदक, नाचणी ड्रायफ्रूट मोदक अशा विविध फ्लेवर्सचे मोदक विद्यार्थ्यांनी बनवले. या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक साक्षी पाटील आणि संगीता नारकर यांना विभागून देण्यात आला. द्वितीय श्रावणी मयेकर आणि तृतीय सोहन घावळी यांनी प्राप्त केला. त्याचबरोबर सार्थक शिंदे आणि दिशी कदम यांनी उत्तेजनार्थ पारितोषिक पटकावले. स्पर्धेचे परीक्षण मुग्धा चव्हाण आणि संचालिका सीमा हेगशेट्ये यांनी केले.</p>]]></content:encoded></item></channel></rss>