निर्माल्य संकलनासाठी तरुणाई सरसावली

वाटदमध्ये गणेश विसर्जनादिवशी स्तुत्य उपक्रम; नदी स्वच्छतेसाठी प्रयत्न
निर्माल्य संकलनासाठी तरुणाई सरसावली

रत्नागिरी: गौरी-गणपती विसर्जनादिवशी नदी किनारी मोठ्या प्रमाणात निर्माल्य जमा होते. ते किनाऱ्यावर इतरत्र पसरू नये, यासाठी वाटद येथील तरुणांनी निर्माल्य गोळा केले आणि त्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावली. ग्रामीण भागामध्येही पर्यावरणपुरक उपक्रमांची अंमलबजावणी या निमित्ताने होऊ लागली आहे. त्याची सुरवात वाटदच्या तरुणांनी केली आहे.

तालुक्यातील वाटद येथेही देखील मोठ्या संख्येने गौरी गणपती विसर्जन झाले. वाटद येथील चौदा वाड्यांमधील सर्व २५० ते ३०० घरगुती गणपती विसर्जन वाटद येथील नदीमध्ये करण्याची प्रथा आहे. दरवर्षी सामूहिक पद्धतीने मिरवणूक काढून विसर्जन केले जाते. मात्र, या वर्षी कोरोनाचे नियम पाळत विसर्जन करण्यात आले. चौदा वाड्यांमधील गणेश विसर्जन वाटद येथील नदीमध्ये होत असल्याने विसर्जनानंतर नदी किनारी मोठ्या प्रमाणावर निर्माल्य जमा होते.

या निर्माल्याचे पावित्र्य राखण्यासाठी येथील स्थानिक तरुणांनी मागील काही वर्षांपासून हे निर्माल्य गोळा करून त्याची योग्य विल्हेवाट लावण्याची कामगिरी हाती घेतली आहे. विसर्जनानंतर ही कामगिरी या तरुणांनी केली. यात वाटदमधील सामाजिक कार्यकर्ते उमेश रहाटे यांच्यासह दीपक कोळवणकर, तुषार रहाटे, अमित सुर्वे, प्रसाद रहाटे, प्रथमेश रहाटे यांचा सहभाग होता. प्रत्येक गावात तरुणाने

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com