Ganesh Visarjan 2022 : मूर्तीचे विसर्जन पाण्यात का करतात? जाणून घ्या धार्मिक कारण

हिंदू धर्मात अनेक विधी हे निसर्गाशी निगडीत आहे. निसर्गाशी एकरूपता राखण्याचा संदेश वेगवेगळ्या पद्धतीने कायमच दिला जातो.
Ganesh Visarjan 2022
Ganesh Visarjan 2022esakal

Ganesh Visarjan 2022 : कोविडच्या दोन वर्षांच्या निर्बंधांमुळे यंदा गणेशोत्सवाचा उत्साह काही वेगळाच होता. घरगुती गणपतीसह मंडळाच्या गणपतीमध्येही तो जाणवला. दहा दिवस मनोभावे सेवा केल्यानंतर आज लाडक्या बाप्पाचा निरोप घेण्याची वेळ आली आहे. गणपतीला पाण्यात विसर्जित करण्यात येते. गणपती विसर्जन पाण्यातच का केले जाते या मागे काही धार्मिक करणे आहेत.

Ganesh Visarjan 2022
Pune Ganesh Visarjan 2022 : मुख्य मिरवणुकीसाठी पोलिसांचा बंदोबस्त

तसेच हिंदू धर्मात अनेक विधी हे निसर्गाशी निगडीत आहे. निसर्गाशी एकरूपता राखण्याचा संदेश वेगवेगळ्या पद्धतीने कायमच दिला जातो. गणेश विसर्जनाच्या वेळेस विसर्जन हे फक्त मूर्तीचेच करायचे नसते तर आपल्यातील दुर्गुणांचेसुद्धा करायचे असते.

Ganesh Visarjan 2022
Ganesh Visarjan 2022 : विसर्जन मिरवणुकीवेळी १३ पुलांवर पोलिस बंदोबस्त

धार्मिक मान्यता

धार्मिक मान्यतेनुसार असे मानले जाते की महाभारत भगवान गणेशाने लिहिले आहे. महर्षी वेद व्यास यांनी सलग १० दिवस गणपतीला महाभारताची कथा सांगितली आणि त्यांनी ही कथा १० दिवस तंतोतंत लिहिली. १० दिवसानंतर जेव्हा महर्षी वेदव्यासांनी गणपतीला स्पर्श केला तेव्हा, त्यांना गणपतीच्या शरीराचा अक्षरशः चटका लागला.

Ganesh Visarjan 2022
Ganesh Visarjan 2022 : आवाजाची मर्यादा पाळा...

त्यांच्या शरीराचे तापमान खूप वाढले होते. वेदव्यासांनी त्यांना ताबडतोब जलाशयात डुबकी मारण्यास सांगितली. यामुळे त्यांच्या शरीराचे तापमान सामान्य झाले. तेव्हापासून असे मानले जाते की, गणपतीचे विसर्जन हे त्यांना शीतल करण्यासाठी केले जाते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com