भारत आणि चीन वादामध्ये कुणाला साथ देणार? रशियाकडून आलं मोठं वक्तव्य

India and China dispute A big statement from Russia
India and China dispute A big statement from Russia

नवी दिल्ली- भारत आणि चीन वादामध्ये पडण्यास रशियाने नकार दिला आहे. आज रशिया, भारत आणि चिनी परराष्ट्रमंत्र्यांची परिषद(रिक) पार पडली. यावेळी बोलताना रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्गेई लावारोव्ह यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यावर या दोन्ही देशांना मदतीची काहीही आवश्‍यकता नसल्याचे ते म्हणाले आहेत. तसेच संयुक्त राष्ट्र संघामध्ये भारताच्या स्थायी सदस्यत्वाला रशियाचा पूर्ण पाठिंबा असल्याचंही त्यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केलं आहे. 

गलवान खोऱ्यात अखेर सैन्य मारले गेल्याची चीनची कबुली
रिक परिषदेमध्ये भारत, चीन आणि रशियाच्या परराष्ट्रमंत्र्यांमध्ये चर्चा झाली. भारत आणि चीन यांच्यातील तणावाच्या पार्श्वभूमीवर या परिषदेला महत्व प्राप्त झाले होते. तसेच या बैठकीत रशिया कोणती भूमिका घेईल, याकडे भारताचं लक्ष लागलं होतं. रशियाने भारत आणि चीनमधील वादात हस्तक्षेप करण्यास अप्रत्यक्षरीत्या नकार दिला आहे. दोन्ही देश त्यांच्यातील तणाव सोडवण्यात समर्थ आहेत, असं सर्गेई लावारोव्ह म्हणाले आहे. 

H-1B व्हिसाबाबत घेतलेल्या निर्णयाचा सर्वाधिक फटका भारतीयांना? कसा? वाचा सविस्तर...
भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी परिषदेमध्ये भारताची भूमिका स्पष्ट केली आहे. बड्या देशांनी आंतरराष्ट्रीय कायद्यांचे पालन करून जगासमोर उदाहरण प्रस्थापित करावे. सर्वांच्या हिताचे निर्णय करूनच आपण पुढे गेले पाहिजे. वैश्विक नेतृत्वाचा आवाज सर्वांच्या हितासाठी असणे आवश्यक आहे. ‘रिक’ परिषदेने जगासमोर उदाहरण सादर करावे. सर्वांना सोबत घेऊनच पुढे जाण्यानेच प्रगतशील विश्व साकारता येईल, असं ते म्हणाले आहेत. 

कोरोनावर प्रभावी ठरतंय आणखी एक औषध; जागतिक आरोग्य संघटनेकडून सूचना जारी
आंतरराष्ट्रीय कायद्यांच्या पालनातून, सहकाऱ्यांच्या हिताची जपणूक, बहुपक्षीयतेला पाठिंबा आणि सर्वांच्या हितासाठी घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी करूनच आपल्याला चांगली आणि चिरंतन टिकणारी वैश्विक व्यवस्था निर्माण करता येईल. आंतरराष्ट्रीय संबंधांवर असलेल्या आपल्या विश्वासाचे प्रतिबिंब या ‘रिक’ परिषदेतून दिसते. मात्र, परिषदेच्या सिद्धांत आणि नियमांचे पालन योग्य प्रकारे करण्याचे आव्हान आपल्यासमोर आहे, अशी पुष्टी जयशंकर यांनी जोडली आहे. 

दरम्यान, पूर्व लडाखमधील गलवान भागात भारत-चीनच्या सैन्यामध्ये हिंसा झाली होती. यात भारताचे 20 जवान शहीद झाले आहेत. तर चीनचे 40 सैनिक मारले गेल्याचं भारताकडून सांगण्यात आलं आहे. तणावाच्या पार्श्वभूमीवर भारत सर्व बाजूंनी चीनची कोंडी करण्याचा प्रयत्न करत आहे. याचाच एक भाग म्हणून  संरक्षणमंत्री राजनाथ सिंह तीन दिवसीय रशिया दौऱ्यावर गेले आहेत. S-400 मिसाई रशियाकडून लवकर मिळावे यासाठी ते प्रयत्न करणार आहेत.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com