भारतीय अधिकारी निराशावादी- चीनची टीका

भारतीय अधिकारी निराशावादी- चीनची टीका

बीजिंग : भारत आणि चीन यांच्यादरम्यान द्विपक्षीय चर्चा सकारात्मक वातावरणात पार पडली. मात्र, असे असतानाही भारतीय अधिकारी निराशावादी असल्यासारखे वागत आहेत, अशी टीका चीनमधील 'ग्लोबल टाइम्स' या सरकारी वृत्तपत्राने केली आहे. 

भारताचे परराष्ट्र सचिव एस. जयशंकर हे मागील आठवड्यात चीनच्या दौऱ्यावर गेले होते. चीन दौऱ्यावर असताना जयशंकर यांच्यासोबत विविध मुद्‌द्‌यांवर चीनी समपदस्थ पदाधिकाऱ्यांची यशस्वीपणे चर्चा झाली आणि संबंधित क्षेत्रांमध्ये दोन्ही देशांनी सहकार्य वाढवावे असेही ठरविण्यात आले.

दरम्यान, ही सकारात्मक बाजू सोडून सर्व भारतीय अधिकाऱ्यांनी 'अझर मसूद' आणि 'अणू पुरवठादार गटाचे सदस्यत्व' याबाबतचा वाद सुटला नसल्याचे वारंवार सांगत इतर चांगल्या गोष्टींकडे दुर्लक्ष केले आहे, असे या वृत्तपत्राने म्हटले आहे.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com