राजपक्ष विरोधात मोर्चेबांधणी; तीन दिवस मोर्चा काढणार; राजीनाम्यावर विरोधक ठाम

श्रीलंकेतील विरोधी पक्ष जनता विमुक्ती पेरामुनाने (जेव्हीपी) राजपक्ष सरकारच्या विरोधात पुढील आठवड्यात तीन दिवस मोर्चा काढणार असल्याचे जाहीर केले
राजपक्ष
राजपक्ष sakal

कोलंबो : श्रीलंकेतील विरोधी पक्ष जनता विमुक्ती पेरामुनाने (जेव्हीपी) राजपक्ष सरकारच्या विरोधात पुढील आठवड्यात तीन दिवस मोर्चा काढणार असल्याचे जाहीर केले आहे. जनतेच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले जात असून श्रीलंकेवर जबरदस्तीने राज्य करत असल्याचा आरोप जेव्हीपीने केला आहे. जेव्हीपीचे सरचिटणीस तिलविन सिल्वा यांनी काल पत्रकार परिषदेत १७ ते १९ एप्रिलपर्यंत देशाच्या इतिहासातील सर्वात मोठा मोर्चा काढण्यात येईल, असे सांगितले.

श्रीलंकेत आर्थिक स्थिती बिघडत असल्याने विरोधी पक्षांकडून सरकारवर राजीनाम्यासाठी दबाव वाढवला जात आहे. अविश्‍वास ठराव आणि महाभियोग आणण्याची तयारी केली जात असताना जेव्हीपी पक्षाने मोर्चाचे आयोजन करण्याचे ठरवले आहे. सिल्वा म्हणाले, की सरकारविरोधातील आंदेालनाला लोकशक्ती देण्यासाठी पक्ष तयार असून त्याचा शेवट आमच्या विजयातूनच होईल. कलाकार, वकील यासह प्रत्येक घटकातील तज्ज्ञ सरकारविरोधातील आंदोलनात सक्रिय झाले आहेत. राजीनाम्यासाठी मागणी केली जात आहे. परंतु सरकार याकडे दुर्लक्ष करत वेगवेगळे फंडे वापरून सत्तेत राहण्याचा प्रयत्न करत आहे. अध्यक्ष गोटाबया राजपक्ष यांच्या निवासस्थानाबाहेर आजही सहाव्या दिवशी आंदोलन सुरू आहे. इतिहासातील सर्वात वाईट परिस्थिती देशात निर्माण झाल्याचे सिल्वा म्हणाले. सरकारविरोधातील भावना हळूहळू कमी होईल, असे सरकारला वाटते, परंतु लोकांच्या संघर्षाला सरकारने कमी लेखू नये, असेही बजावले. या मोर्चात देशातील सर्व पक्षांनी राजकीय मतभेद विसरून सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.

आंदोलकांकडून नवीन वर्षाचे स्वागत

अध्यक्षीय निवासस्थानाबाहेर गेल्या सहा दिवसांपासून आंदोलन करणाऱ्या नागरिकांनी, सेलिब्रिटींनी आज पारंपरिक सिंहाला आणि तमीळ नवीन वर्षाचे आज स्वागत केले. यावेळी दूधाचे आणि मिठाईचे वाटप करण्यात आले. अध्यक्ष गोटाबया यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी आंदोलक त्यांच्या घराबाहेर ठाण मांडून आहेत. आंदोलक अध्यक्षीय निवासस्थानाचे प्रवेशद्वार आणि परिसरावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न करत असून देशाच्या आर्थिक डबघाईला अध्यक्ष जबाबदार असल्याचा आरोप करत आहेत. काल पंतप्रधान महिंदा राजपक्ष यांनी चर्चेचा मांडलेला प्रस्ताव आंदोलकांनी फेटाळून लावला. स्थानिक वेळेनुसार आज सकाळी ८.४१ वाजता नवीन वर्षाचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर ९.०७ वाजता दूध उकळले आणि ते दूध उतू गेले. दूध सांडणे हे नवीन वर्ष चांगले राहण्याचे संकेत देतात, अशी श्रीलंकन नागरिकांची धारणा आहे. त्यानंतर सकाळी १०.१७ वाजता नवीन वर्षातील पहिल्या जेवणाच्या वेळी पारंपरिक मिठाईचे वाटप केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com