आम्ही बांगड्या भरलेल्या नसून गप्प बसणार नाही- पाकिस्तान (व्हिडिओ)

आम्ही बांगड्या भरलेल्या नसून गप्प बसणार नाही- पाकिस्तान (व्हिडिओ)

इस्लामाबाद: भारतानं शांततेची बोलणी केली, तर आम्हीदेखील शांततेविषयी बोलू. मात्र त्यांनी युद्धाची भाषा केली, तर आम्हीदेखील त्याच भाषेत उत्तर देऊ, आम्ही बांगड्या भरलेल्या नसून गप्प बसणार नाही असे पाकिस्तानचे रेल्वेमंत्री शेख रशीद अहमद म्हणाले. 

इम्रान खान यांनी 20 कोटी पाकिस्तानी जनतेच्या वतीनं भाषण केलं. आमच्यासाठी पाकिस्तान म्हणजे जीवन आहे आणि पाकिस्तान म्हणजेच मरण आहे. पाकिस्तानकडे कोणी वाकड्या नजरेनं पाहिलं, तर त्याचे डोळे काढून घेऊ, अशी धमकी त्यांनी दिली. 

युद्धाची भाषा केल्यास आम्ही त्याच पद्धतीनं उत्तर देऊ. मग ना कधी गवत उगवेल, ना चिमण्यांचा चिवचिवाट होईल आणि ना मंदिरात कधी घंटानाद होईल, अशा शब्दांमध्ये अहमद यांनी भारताला धमकी दिली. पाकिस्तान मुस्लिमांचा किल्ला आहे आणि आज साऱ्या जगातील मुस्लिमांचं लक्ष पाकिस्तानकडे आहे, असेही रशीद यांनी म्हटले आहे.
 

दरम्यान, जम्मू काश्मीरमधील पुलवामा हल्ल्याला 5 दिवसच झाले असातना पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी जनतेशी संवाद साधला. या हल्ल्यात पाकिस्तानचा हात नाही. कोणत्याही ठोस पुराव्यांशिवाय भारताकडून पाकिस्तानवर आरोप केले जात असल्याचा दावा त्यांनी भाषणात केला. हल्ल्याचे पुरावे द्या, चौकशीला सहकार्य करतो, असंही ते म्हणाले होते. भारतानं आक्रमण केल्यास पाकिस्तानदेखील चोख प्रत्युत्तर देईल, अशा इशारादेखील खान यांनी दिला. यानंतर आता खान यांच्या मंत्रीमंडळातील मंत्र्यानेदेखील भारताविरोधात भडकाऊ भाषण केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com