भारताची काळजी वाटत नाही- सोहेल अमन

Chief of Air Staff Air Chief Marshal Sohail Aman
Chief of Air Staff Air Chief Marshal Sohail Aman

इस्लामाबाद- पाकिस्तानी लष्कर सज्ज असल्यामुळे आम्हाला भारताची काळजी वाटत नाही, असे पाकिस्तानचे हवाईदल प्रमुख मार्शल सोहेल अमन यांनी आज (गुरुवार) म्हटले आहे.

एका कार्यक्रमावेळी बोलताना अमन म्हणाले, 'भारत-पाकिस्तान सीमेवर भारताने केलेल्या गोळीबारात पाकिस्तानचे सैनिक मारले गेले आहेत. आम्ही संयम दाखवत आहोत. पाकिस्तानी लष्कर सज्ज असून, आम्ही भारताला घाबरत नाही. काश्मीरचा विषय हा चर्चेतूनच सुटू शकतो.'

भारत-पाकिस्तान आतंरराष्ट्रीय सीमेवर सध्या तणावाचे वातावरण आहे. भारताने केलेल्या गोळीबारात पाकव्याप्त काश्मीरमधील 13 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. शिवाय, तीन सैनिकांचाही मृत्यू झाला आहे. भारतीय सैनिक हे नागरिकांना लक्ष्य करत आहेत. गोळीबारात 21 जण जखमी झाले आहेत, असेही अमन म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com