पाकिस्तानला भारताच्या सौहार्दपूर्ण संबंधाची गरज : इम्रान खान

पाकिस्तानला भारताच्या सौहार्दपूर्ण संबंधाची गरज : इम्रान खान

इस्लामाबाद : ''जेव्हा कधी मी भारतभेटीला येतो. तेव्हा लोक मला सांगतात, की पाकिस्तानातील सैन्य शांतीसाठी इच्छुक नाही. त्यामुळे मी आज पंतप्रधान म्हणून तुम्हाला सांगू इच्छितो, आमचा पक्ष, इतर राजकीय पक्ष, आमचे सैन्य आणि आम्ही सर्वजण भारतासोबत सौहार्दपूर्ण संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत आहोत आणि आम्हाला याची गरज आहे,'' असे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी आज (बुधवार) सांगितले.

इम्रान खान यांच्या हस्ते कतारपूर कॉरिडोरचे भूमीपूजन करण्यात आले. त्यानंतर ते बोलत होते. इम्रान खान म्हणाले, ''आज असे वाटते, की पाकिस्तानात हिंदुस्तान उभा राहिला आहे. मी 21 वर्षे क्रिकेटचा सामना खेळलो. त्यादमम्यान मी नवज्योत सिंग सिद्धू यांच्यासारखा मित्र मिळवला. त्यांच्या या मैत्रीमुळे मला असे वाटते, की आमच्यात माणूसकी जिवंत आहे''. तसेच ते पुढे म्हणाले, जर भारताने एक पाऊल पुढे टाकले तर आम्ही दोन पाऊलं पुढे टाकू. 

इम्रान खान झाले भावूक 

जेव्हा राजकारणात आलो तेव्हा मला असे लोकं भेटले की त्यांना इतरांच्या कोणत्याही गोष्टीत रस नाही. आता पाकिस्तान-हिंदुस्तान जिथे उभा आहे, तेथे 70 वर्षांपासून दोन देशांमध्ये असेच होत आहे. दोन्ही बाजूंनी चुका झाल्या आहेत. त्यामुळे आता जोपर्यंत आपण पुढे पाऊल टाकणार नाही, तोपर्यंत हे शक्य होणार नाही, असे म्हणत इम्रान खान भावूक झाले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com