इनर इंजिनिअरिंग : ब्रह्म प्रतिष्ठा

भारतीय संस्कृतीत, साधारणपणे जेव्हा मुलं वयाच्या अकरा किंवा बाराव्या वर्षात पदार्पण करतात, तेव्हा ते एका अशा प्रक्रियेतून जातात ज्याला ‘ब्रह्म प्रतिष्ठा’ म्हणतात.
Sadguru
SadguruSakal

भारतीय संस्कृतीत, साधारणपणे जेव्हा मुलं वयाच्या अकरा किंवा बाराव्या वर्षात पदार्पण करतात, तेव्हा ते एका अशा प्रक्रियेतून जातात ज्याला ‘ब्रह्म प्रतिष्ठा’ म्हणतात. अगदी आजही, काही समुदायांनी हे जोपासून ठेवले आहे, पण सामान्यतः फक्त एक सांस्कृतिक पैलू म्हणून, एक जिवंत प्रक्रिया म्हणून नाही. प्राचीन काळात, मुलं आणि मुली दोघंही या प्रक्रियेतून जात असत, पण हळूहळू कालांतरानं मुलींना त्यातून वगळण्यात आलं.

ब्रह्म प्रतिष्ठा हा एक मंत्र आहे, ज्याचा अर्थ ‘मी ब्रह्म आहेस’ असा होतो. एक मूल फक्त अकरा किंवा बारा वर्षांचं होतं, तेव्हाच त्यानं स्वतःमध्येच दैवी अनुभवण्याच्या प्रक्रियेत दीक्षित केलं जायचं. या अनुभवातून जीवनात पदार्पण करण्याचा हा सर्वांत आदर्श मार्ग आहे. एक अनुभवात्मक प्रक्रिया म्हणून याची सुरुवात झाली, पण आजकाल ती केवळ एक विधी म्हणून राहिली आहे.

मुळात या मागचा हेतू हा होता, की वयाचे तेरावे किंवा चौदावे वर्ष असे वय आहे, जेव्हा मुलं लैंगिकदृष्ट्या परिपक्व होतात आणि त्यांचे मन व विचार अनेक दिशांना धावण्यास सुरवात करतात. जीवनाच्या या टप्प्यात पाऊल ठेवण्याआधी, त्यांनी हे जाणलं पाहिजे की ते काय आहेत. आधी त्यांनी त्यांच्यातील देवत्व जाणलं पाहिजे आणि मग जीवनाच्या इतर आयामांमध्ये प्रवेश केला पाहिजे. एखाद्यानं हे जाणून घेतल्यास मग आयुष्यात ते जे काही करतील, ते एका वेगळ्याच दृष्टीनं करतील. आणि मग जे काही करण्यासाठी ते पुढं येतील, तेव्हा ते त्या गोष्टी लोभ किंवा वासनेनं करणार नाहीत, पण जीवनाच्या एका संपूर्ण वेगळ्याच जाणीवेतून करतील.

पौरुषत्व किंवा स्त्रीत्व या द्वैताच्या ओझ्याखाली गुंतून न पडल्यास देवत्व अनुभवणं फार सोपं आहे. एकदा तुम्ही पौरुषत्व किंवा स्त्रीत्व यांमध्ये गुंतून पडलात किंवा तुमची ओळख बांधली गेली, तर मग त्यातून स्वतःची सुटका करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते. जीवनातील द्वैत तुम्हाला इतक्या प्रचंड ताकदीनिशी प्रभावित करतं, की ते तुम्हाला अवघ्या जीवनाचं ऐक्य पाहू देणार नाही. एकदा तुम्ही स्वतःला केवळ एक स्त्री किंवा पुरुष म्हणून ओळखू लागलात, की तुमची लैंगिक ओळख पुसून टाकण्यासाठी पुष्कळ खटाटोप करावा लागतो; आणि तेवढे करूनही ती पुनःपुन्हा येतच राहते.

प्रत्येक संस्कृतीमध्ये लोकांनी हे जाणलं होतं, की दैवी अनुभवाच्या आयामात प्रवेश करण्यासाठी वयाचे अकरावे किंवा बारावे वर्ष हे उत्तम वय आहे.

कारण या वयात त्या आयामात प्रवेश करणे त्यांना अगदी सोपे जाते. कमीत कमी प्रतिरोधाने ते यात प्रस्थापित होऊ शकतात, आणि मग ते त्यांचे जीवन एका पूर्णपणे वेगळ्याच दृष्टीनं ते हाताळू शकतील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com