एका अभ्यासानुसार दर तीन भारतीयांपैकी एकाला उच्च रक्तदाबाचा त्रास होतो. उच्चरक्तदाब ही भविष्यातील चिंतेची बाब होऊ शकते.
- डॉ. हंसा योगेंद्र
एका अभ्यासानुसार दर तीन भारतीयांपैकी एकाला उच्च रक्तदाबाचा त्रास होतो. उच्चरक्तदाब ही भविष्यातील चिंतेची बाब होऊ शकते. जगभरात, एक अब्जाहून अधिक लोकांना उच्च रक्तदाबाचा त्रास आहे. परंतु एक चांगली गोष्ट म्हणजे, योग्य जीवनशैलीतील हा विकार दूर होऊ शकतो. या समस्येपासून वाचण्यासाठी आपल्या जीवनातील तीन क्षेत्रे आहेत ज्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे.
व्यायाम - दररोज चालणे आवश्यक आहे. सकाळी किमान ४५ मिनिटे आणि संध्याकाळी ३० मिनिटे चालणे पुरेसे आहेत. अर्थात वेगवान चालले पाहिजे. परंतु इतकेही वेगवान नाही, की तुमचा श्वास कोंडू शकेल. पूर्ण वाक्य बोलता येण्याइतपत वेगवान.
रक्तदाब असणाऱ्या लोकांनी सूर्यनमस्कार किंवा ज्यासाठी तुम्हाला खूप पुढे वाकणे आणि बराच वेळ तिथे राहणे आवश्यक आहे, असा व्यायाम प्रकार टाळावा. श्वास घेण्यास त्रास देणारे कोणतेही आसन टाळावे.
रक्तदाबासाठी उपयुक्त आसने म्हणजे यस्तिकासन आणि भद्रासन. याचबरोबर प्राणायाम करणे योग्य. एखाद्या व्यक्तीने दर दोन तासांनी ५-१० मिनिटे शवासन केल्यास रक्तदाब नियंत्रणात राहू शकतो.
आहार - रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी लक्ष देणे आवश्यक असलेले दुसरे महत्त्वाचे क्षेत्र म्हणजे आहार. मीठ आणि साखरेचे प्रमाण जास्त असलेले पदार्थ, तळलेले अन्न, मसालेदार पदार्थ यासारखे सॅच्युरेटेड फॅट्स असलेले पदार्थ तसेच मांसाहार टाळावा. धूम्रपान आणि मद्यपान करू नये. फळे आणि भाज्यांना प्राधान्य द्यावे. लिंबूवर्गीय फळे नियमितपणे खावीत. भोपळ्याच्या बिया, पालक आणि बीटमध्ये पोषक तत्त्व असतात, जे तुमच्या रक्तवाहिन्यांना आराम देतात. बीन्स आणि बेरी देखील रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी उत्कृष्ट आहेत.
मन - योगानुसार, प्रत्येक आरोग्याच्या समस्येचे मूळ मनामध्ये असते. उच्च रक्तदाब हा एक मानसिक विकार आहे. आक्रमक लोक अनेक गोष्टी वेगाने करतात. त्याचबरोबर राग, तणाव इत्यादींना बळी पडतात. त्यांना उच्च रक्तदाबाचा त्रास जास्त असतो.
हे नियंत्रित करण्याासाठी मनोवृत्तीत बदल आवश्यक आहे. शांत आणि संयोजित असणे ही एक वृत्ती असून ती शिकता येते. स्वतःकडे असलेल्या गोष्टींबद्दल कृतज्ञ असतात ते शांत आणि समाधानी असतात. समोरच्या व्यक्तीला आहे तसे स्वीकारायलाही शिकले पाहिजे. आपल्याला आपल्या स्वतःच्या दोषांची जाणीव झाली तर हे शिकणे सोपे आहे. उच्च शक्तीवर विश्वास निर्माण करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केल्याने आपल्याला अधिक शांतता आणि समाधान लाभू शकते.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.