मनाची शक्ती : मेंदू सक्रिय करण्याचे मार्ग

आयुष्यात असे काही प्रसंग येतात की ज्यावेळी मेंदू हार मानतो. डोक्यात खूप विचारांची गर्दी झाली आहे, असेही मेंदूला काही वेळा वाटते.
Brain
Brainsakal

- डॉ. हंसा योगेंद्र

आयुष्यात असे काही प्रसंग येतात की ज्यावेळी मेंदू हार मानतो. डोक्यात खूप विचारांची गर्दी झाली आहे, असेही मेंदूला काही वेळा वाटते. कधीकधी तो अतिशय सक्रियही होतो. जीवनातील नीरसपणा कधीकधी आपल्याला कंटाळवाणा आणि सुस्त वाटू शकतो. अर्थात असा दिवस असावा असे आपल्याला अजिबातच वाटत नाही.

एखाद्या कार्यक्रमाच्या दिवशी किंवा ठराविक दिवशीच सक्रिय आणि उत्साही असले पाहिजे असे नाही. तर दररोज उत्साही, सक्रिय असल्यासच आपल्या सुंदर जीवनाकडे चांगल्या पद्धतीने पाहू शकतो.

तुम्ही तुमचा मेंदू रिचार्ज करू शकता आणि प्रत्येक दिवसाचा पूर्ण आनंद घेऊ शकता असे कोणते मार्ग आहेत?

एक साधी सवय आहे, तुम्ही जुळवून घेऊ शकता आणि दैनंदिन कामांकडे बघण्याच्या तुमच्या दृष्टिकोनात नक्कीच मोठा फरक दिसेल. एकदा तुम्ही ही सवय लावली की तुमचा मेंदू दिवसभर रिचार्ज राहील.

तर, ही ताकदवान सवय नेमकी कशाबद्दल मी बोलत आहे?

मी तुमच्या सर्व कामांसाठी कालमर्यादा निश्चित करण्याबद्दल बोलत आहे. कोणतेही काम ठराविक वेळेत पूर्ण केले पाहिजे. तुम्ही अंघोळ करत असाल, खात आहात, झोपत आहात किंवा व्यायाम करत आहात याने काही फरक पडत नाही. या सर्व उपक्रमांची निश्चित कालमर्यादा असावी.

उदाहरणार्थ, तुम्ही अंघोळीला जाण्यापूर्वी, अंघोळीला किती वेळ लागणार आहे, याची कालमर्यादा निश्चित करा. तुम्ही तुमच्या कार्यालयीन कामकाज करताना वेळेचे बंधन घालून घ्या. आणि महत्त्वाचे म्हणजे कालमर्यादा निश्चित केली असल्याची जाणीव ठेवा. त्याचप्रमाणे, तुम्ही जेवणासाठी १५ ते २० मिनिटे निश्चित केली असल्यास त्या वेळेतच जेवण पूर्ण करण्याचा प्रयत्न करा.

तुमच्या सर्व दैनंदिन कामांसाठी एक वेळ निश्चित करा आणि तुमच्या दृष्टिकोनातील फरक पहा.

तुम्ही कालमर्यादा निश्चित करता तेव्हा तुमच्या मनाला ती पूर्ण करण्याचे आव्हान असते. तुम्ही स्वतःला आव्हान देत असता. आव्हान हे मेंदूसाठी अन्न आहे. यामुळे दिवसभरातील नीरस भावना दूर होईल.

आपल्याला अनेकदा प्रेरणा किंवा उत्कटतेची कमतरता जाणवते. तुम्हाला अशी भावना येते तेव्हा मानसिक सराव करा. वेळेची मर्यादा घालण्याचे बंधन पाळा. काही काम २ तासात पूर्ण करता येत असेल तर ते दीड तासात पूर्ण करण्याचे आव्हान द्या.

तुमच्या दिवसातील लहान ते मोठ्या क्रियांसाठी वेळ निश्चित केल्याने मन चार्ज होईल. तुम्हाला तुमचा मेंदू रिचार्ज करायचा असल्यास एक अंतिम मुदत निश्चित करा. तुमच्या मनावर सौम्य ताण लागू करण्यासाठी स्वतःला आव्हान द्या आणि हा सौम्य ताण ऊर्जा वाढवण्याचे काम करेल. हा सौम्य ताण म्हणजे उत्पादक ताण आहे. तुमची उत्पादकता यातून वाढते. ताण नसेल तर त्यात वाढ होणार नाही. त्यामुळे काही प्रमाणात तणाव आपल्यासाठी चांगला असतो.

दुसरीकडे, अति ताणामुळे विविध शारीरिक आणि मानसिक समस्या उद्‍भवू शकतात. त्यामुळे, शून्य ताण आणि जास्त ताण यांच्यातील अचूक संतुलन शोधा आणि अत्यंत व्यग्र दिवसांतही तुमचे मन उत्साही ठेवण्यासाठी आवश्यक असलेले लक्ष शोधा. प्रत्येक क्रियेसाठी एक वेळ मर्यादा सेट करा आणि तुमचा मेंदू रिचार्ज करा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com