होऊ दे जरासा उशीर... जगणे अजून बाकी आहे!

औरंगाबाद - घाई-गडबड आणि वाहन चालविताना मोबाईलवर बोलणे हीच अपघाताची मुख्य कारणे आहेत; पण बीड बायपासवरचे अनेक वाहनधारक याचे भान ठेवत नाहीत. हा रस्ता
म्हणजे मृत्युमार्गच. असे असताना या मार्गावर आयुष्य धोक्‍यात घालून पादचारी चक्क मोबाईलमध्ये डोळे खुपसून; तर काही वाहनधारक कानाला फोन किंवा एअरफोन लावून
मार्गक्रमण करीत असल्याचे चित्र मंगळवारी (ता. 12) होते. त्यामुळे अपघात टाळायचा असेल तर "होऊ दे जरासा उशीर.. जगणे अजून बाकी आहे' असे स्वतःच स्वतःला सांगत
वाहनधारकांनी नियम पाळणे आवश्‍यक झाले आहे. 

(सकाळ छायाचित्रसेवा - सचिन माने)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com