जळगाव : जळगाव महापालिकेमार्फत राबविण्यात येणाऱ्या अभय शास्ती योजनेचे शेवटचे तीन दिवस बाकी आहेत. बुधवार (ता. १५)पासून ही योजना बंद होणार असल्याचे उपायुक्त गणेश चाटे यांनी कळविले आहे. (Abhay Shasti scheme will be closed after 3 days Jalgaon Municipality New)
हेही वाचा : नेट बँकिंग खात्यात ठेवा कमी रक्कम...जाणून घ्या कारण
महापालिकेच्या इतिहासात प्रथमच १०० टक्के शास्तीमाफी योजना राबविण्यात आली. यामुळे नागरिकांची कराची ३० ते ६० टक्के रक्कम बचत होणार आहे. या योजनेचा थकबाकीदार फायदा घेणार नाहीत.
त्यांच्याकडे वसुलीसाठी मालमत्ता जप्ती करणे, लिलाव करणे याचा प्लॅन तयार करण्यात येत आहे. १ ते १५ एप्रिलदरम्यान जवळपास सहा हजार मालमत्ताधारकांची यादी तयार करणे, त्यांना अधिपत्र बजावून लिलाव करणे, अनधिकृत मालमत्ता सर्व करून दुप्पट दराने अनधिकृत शास्ती लावणे, अशी कारवाई करण्यात येणार आहे.
मालमत्ता करवसुलीत सुधारणा न झाल्यास १५ व्या वित्त आयोगाचे अनुदान बंद होणार आहे. त्यामुळे सक्त कारवाई करण्यात येणार आहे. त्यासाठी सर्व थकीत मालमत्ता करधारक, एमआयडीसी उद्योजक, शासकीय कार्यालयांनी १०० टक्के शास्तीमाफीच्या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहनही श्री. चाटे यांनी केले आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.