Abhay Yojana : ‘अभय शास्ती’ योजनेस 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Jalgaon Municipal Corporation

Abhay Yojana : ‘अभय शास्ती’ योजनेस 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ

जळगाव : शहर महापालिकेतर्फे घरपट्टी कराची थकबाकी भरणाऱ्यांना व्याज व दंडात माफी देण्यासाठी ‘अभय शास्ती’ (Abhay Yojana) योजना राबविण्यात येत आहे. (Abhay Shasti yojana Extended till 15 march jalgaon news)

नागरिकांच्या प्रतिसादामुळे या योजनेची मुदतवाढ १५ मार्चपर्यंत करण्यात आली आहे. महापालिकेतर्फे घरपट्टी कराची थकबाकी भरण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या ‘अभय शास्ती’ योजनेची मुदत ५ मार्चपर्यंत होती.

या योजनेला जनतेचा चांगला प्रतिसाद मिळाला. त्यामुळे या योजनेत मुदतवाढ करावी, असे पत्र महापौर जयश्री महाजन यांनी प्रशासनास दिले होते. त्यास आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांनी मान्यता दिली आहे.

हेही वाचा : तुमच्याकडं कागदी स्वरुपातले शेअर आहेत? मग हे वाचाच....

त्यामुळे या योजनेस आणखी दहा दिवस मुदतवाढ देण्यात आली असून, आता १५ मार्चपर्यंत ही योजना राहणार आहे. नागरिकांनी आपली थकबाकी त्वरित भरून या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महापालिका आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांनी केले आहे.