Girish Mahajan News | उद्धव ठाकरेंनी कॉंग्रेससोबतची युती तोडावी : गिरीश महाजन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Minister Girish Mahajan while flagging off BJP's Savarkar Gaurav Yatra on Thursday,

Girish Mahajan News | उद्धव ठाकरेंनी कॉंग्रेससोबतची युती तोडावी : गिरीश महाजन

जळगाव : स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान करणाऱ्या कॉंग्रेससोबत असलेली युती उद्धव ठाकरे यांनी तोडून दाखवावी, असे आव्हान भाजप नेते व राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन (girish mahajan) यांनी दिले. (girish mahajan statement about uddhav thackeray Alliance with Congress should be broken jalgaon news)

भारतीय जनता पक्षातर्फे स्वातंत्र्यवीर सावरकर गौरवयात्रेच्या प्रारंभप्रसंगी ते बोलत होते. सावरकर यांच्या स्वातंत्र्य लढ्यातील कामगिरीचे स्मरण करून देण्यासाठी भाजपतर्फे राज्यभर स्वातंत्र्यवीर सावरकर गौरवयात्रा काढण्यात आली आहे.

बळीराम पेठेतील भाजप कार्यालयापासून ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते गौरवयात्रेचा प्रारंभ करण्यात आला. प्रदेश संघटक विजय चौधरी, भाजपचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार सुरेश भोळे, महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी, गटनेते राजेंद्र घुगे-पाटील, प्रदेश महिला उपाध्यक्षा उज्वलाताई बेंडाळे, यांची प्रमुख उपस्थिती होती.

सर्वप्रथम प्रभू श्रीरामांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. भारत माता व स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयघोषात यात्रेचा प्रारंभ करण्यात आला. गौरवयात्रा ३० मार्च ते ६ एप्रिलदरम्यान काढण्यात येणार आहे.

हेही वाचा : जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??

राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन म्हणाले, की यात्रेच्या माध्यमातून वीर सावरकर यांनी केलेले कार्याची ओळख नव्या पिढीला होणार आहे. राहुल गांधी व काँग्रेसच्या अन्य नेत्यांकडून सावरकरांचा वारंवार अवमान केला जात आहे. सावरकरांचा अवमान करणाऱ्या काँग्रेसबरोबरची युती उद्धव ठाकरे यांनी तोडून दाखवावी.

संघटन सरचिटणीस विशाल त्रिपाठी, सचिन पानपाटील, डॉ. राधेश्याम चौधरी, सुभाष शौचे, नगरसेवक कैलास सोनवणे, माजी महापौर सदाशिव ढेकळे, जिल्हा महानगराचे पदाधिकारी, मंडलाध्यक्ष, आघाडी अध्यक्ष व युवा मोर्चा, महिला आघाडीचे पदाधिकाऱ्यांसह स्वातंत्र्यवीर सावरकरप्रेमी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दरम्यान, गौरवयात्रा भाजप जळगाव महानगरातील नऊ मंडल व जळगाव शहरात ६ एप्रिलपर्यंत फिरणार आहे. या यात्रेचा समारोप भाजपच्या स्थापनादिनी होईल.