स्‍वतःची जागा राखू शकले नाहीत, आता भाजपवर बोलण्याचा अधिकार नाही; महाजनांची खडसेंवर टीका

girish mahajan eknath khadse
girish mahajan eknath khadse

जळगाव : भाजपतील नेत्यांच्या अहंपणामुळे राज्यातील सता गेली असे बोलण्याचा नाथाभाऊंना अधिकार नाही. ते आपली स्वतःची जागा विधानसभेत राखू शकले नाहीत, अशी टीका माजी मंत्री गिरीश महाजन यांनी केली. 
जामनेर येथे आज गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखालील वीज बिल दरवाढी विरोधात आंदोलन करण्यात आले. या वेळी वीज मंडळाच्या उपकर्यालास कुलूप लावण्यात आले. त्यांनी महविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली. 
राष्ट्रवादीच्या जिल्हा बैठकीत खडसेंनी काही नेत्यांच्या अहंपणामुळे भाजपची सत्ता गेली, अशी टीका केली, त्यासंदर्भात पत्रकारांनी महाजनांना छेडले असता ते म्हणाले, खडसे यांनी काय बोलावे, हा त्यांचा प्रश्‍न आहे. विधानसभा निवडणुकीत आमचे सर्वाधिक १०५ आमदार निवडून आले आहेत. आम्ही सेनेसोबत युती म्हणून लढलो, सत्ता आमचीच येणार होती. मात्र, शिवसेनेच्या ‘यू- टर्न’मुळे आमचे सरकार बनले नाही. त्यात कुणाच्या अहंपणाचा प्रश्‍न येतच नाही. त्यावेळी नाथाभाऊ आमच्या पक्षात होते, त्यांची मुक्ताईनगरची जागाही राखू शकले नाही. त्यांच्या कन्या त्या ठिकाणाहून परभूत झाल्या, त्यामुळे त्यांना भाजपबद्दल बोलण्याचा अधिकार नाही, असे महाजन म्हणाले. 

तर तिव्र आंदोलनाचा इशारा
कोरोना काळातील सहा ते सात महीण्यांच्या विजबिल माफ करून महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांसह असंख्य ग्राहकांना दिलासा द्यावा आणि विज मंडळाच्या कारभारात सुधारणा करावी अन्यथा यापुढील काळात भाजपतर्फे आणखी तिव्र आंदोलन छेडण्यात येईल असा ईशारा माजी मंत्री गिरीश महाजन यांनी दिला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com