राज्यात वजीर चाल चालतोय; पालकमंत्री पाटलांचे फडणवीसांवर टीकास्त्र 

gulabrao patil devendra fadnvis
gulabrao patil devendra fadnvis

जळगाव : राजकारणात बुद्धिबळ सारखाच खेळ खेळला जातो. आपला प्यादा कसा सरकवायचा, हे बुद्धिबळात बघितले जाते. पण आजची राजकीय परिस्थिती लक्षात घेतली; तर इथे फक्त वजीर चाल चालतोय, अशा शब्दांत शिवसेना नेते तथा राज्याचे सार्वजनिक पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका केली. 

लोकसंघर्ष मोर्चाच्यावतीने जळगावात शिवजयंतीचे औचित्य साधून बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते या स्पर्धेचे उदघाटन करण्यात आले. या कार्यक्रमानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. 

बुद्धिबळ आणि राजकारण सारखेच 
बुद्धिबळ खेळाकडे पाहिले की राजकारणाची आठवण येते. राजकारणातही एकमेकांचे पत्ते कापले जातात. बुद्धिबळात अडीच घर चालणारी चाल आहे. तिरपी चाल आहे, हत्तीची सरळ चाल आहे. वजीर चौफेर चाल चालतो. तशाच पद्धतीने राजकारणात चालत असल्याचे मंत्री पाटील म्हणाले. 

आमची चाल अगदी शांततेत
विरोधकांना चिमटा काढताना मंत्री पाटील म्हणाले की, आमच्यावर विरोधक कितीही चाल करत असतील तरी आमची चाल मात्र हत्तीसारखी अगदी शांततेत आहे. ती शांततेत असली तरी गजकेसरिया योगाची चाल आहे. आमची चाल ही पूर्ण उद्दिष्टापर्यंत पोहोचणारी आहे. बुध्दीबळ स्पर्धेत जसे घोडा अडीच घर चालतो, हत्ती सरळ चालतो तर वजिराला मुक्त संचारची परवानगी असते, तशी आजच्या राजकारणात ही आहे. आणि म्हणून छत्रपती शिवरायांच्या विचारांवर चालणाऱ्या रयतेच्या राज्यासाठीच्या सरकारची गरज आहे आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराज हे आम्हाला आदर्श आहेत व त्यांच्या विचारानी आम्ही राज्यकारभार करण्याचा प्रयत्न करीत आहोत. 

संपादन ः राजेश सोनवणे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com