अमळनेर : दहिवद येथील सरपंच (Sarpanch) सुषमा देसले यांनी महात्मा गांधी रोजगार योजनेतून बिहार पॅटर्न राबवण्यासाठी महिलांची टीम बनवून गावात ११ हजार झाडे ( Tree Platension) लावण्याचे उद्दिष्ट हाती घेतले.दहिवद येथे गुरुवारी एका मिनिटात हजारो झाडे लावण्याचा उपक्रम राबविण्यात आला.
सरपंच सुषमा देसले यांनी महात्मा गांधी रोजगार योजनेतून बिहार पॅटर्न राबवण्यासाठी महिलांची टीम बनवून गावात ११ हजार झाडे लावण्याचे उद्दिष्ट हाती घेतले.ओम च्या मंत्रोच्चारात एकाच मिनिटात हजारो झाडे लावण्यात आली. महिला, ग्रामस्थ तसेच शालेय विद्यार्थी एका दिवसात ११ हजार झाडे लावण्याचे उद्दिष्ट पूर्ण करणार आहेत. प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील सूर्यवंशी ,छत्तीसगड चे बेटी बचाव बेटी पढाव अभियानाचे संयोजक अजय तिवारी,नगर चे जिल्हा नियोजन अधिकारी निलेश भदाणे , तालुका कृषी अधिकारी भारत वारे, पोलीस निरीक्षक जयपाल हिरे, सहायक गटविकास अधिकारी संदीप वायाळ,धुळे पंचायत समितीचे उपसभापती विद्याधर पाटील, जिल्हा बँक संचालिका तिलोत्तमा पाटील, पाणी फौंडेशनचे सुखदेव भोसले, सरकारी वकील ऍड. शशिकांत पाटील , ऍड तिलोत्तमा पाटील , बाजार समितीचे माजी संचालक विजय पाटील, सानेगुरुजी स्मारक समिती कार्यवाह दर्शना पवार, माजी नगराध्यक्ष विनोद पाटील, भास्कर बोरसे, उपसरपंच सुनील पाटील, ग्रामसेवक संजीव सैंदाणे, गुलाबराव बोरसे, प्रफुल भदाणे, शिवाजी पारधी ,सुभाष देसले हजर होते. उदघाटन मान्यवरांच्या हस्ते वृक्षपूजनाने करण्यात आले. सूत्रसंचालन सुशील भदाणे यांनी केले.
ही लोकचळवळ उपयोगीची
यावेळी छत्तीसगडचे उद्योगपती दिनेश पाटील होते. दिनेश पाटील म्हणाले की पुरेसे पाणी मिळत नाही म्हणून दहिवद गाव शुद्ध पाण्यासाठी वर्षाला ७२ लाख रुपये खर्च करीत आहे.वृक्ष लागवडीमुळे पाऊस पडून त्याचा पिण्याच्या पाण्यासाठी, शेतीसाठी, शुद्ध ऑक्सिजन मिळण्यासाठी लाभ होणार आहे. वृक्षारोपणाचे काम चांगल्या प्रकारे सुरू असून ,आजची लोकचळवळ भविष्यात उपयोगी ठरणार आहे आता दहिवद व अमळनेर पॅटर्न चे संपूर्ण महाराष्ट्र अनुकरण करेल असे मत जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील सूर्यवंशी यांनी
त्याचप्रमाणे सत्यमेव जयते ग्राम समृद्धी स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल पाणी फाऊंडेशन चे सीईओ सत्यजित भटकर यांच्यामार्फत सरपंच सुषमा देसले , अश्विनी माळी , कल्पेश्वरी पाटील ,संजय देसले , जयश्री पाटील , मयूर पाटील , हेमंत हडपे ,प्रदीप देसले , विशाल सोनवणे , भूषण पाटील यांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. दर्शना पवार यांनी क्रांती वीरांगना लीलाताई पाटील यांच्या वीर कथा असलेले पुस्तक महिलांना वाटले. सीमा रगडे यांनी बचत गटाच्या महिलांना मार्गदर्शन केले.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.