भुसावळचा पुत्र...यशस्विपणे सांभाळतोय सांगली जिल्हा ! 

भुसावळचा पुत्र...यशस्विपणे सांभाळतोय सांगली जिल्हा ! 

भुसावळ  : येथील भुमीपुत्र असलेले सांगलीचे जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी काटेकोर नियोजन व संघटन कौशल्याच्या जोरावर जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या मर्यादित ठेवण्यात यश मिळविले आहे. तेथे जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्ण 167 आहेत. हजार संख्या पार करणाऱ्या जळगाव जिल्ह्याच्या तुलनेत ही संख्या खुपच कमी आहे.

भुसावळचे डॉ. व्हि.जी.चौधरी व डॉ. छाया चौधरी यांचे चिरंजीव असलेले अभिजीत चौधरी यांचे शालेय शिक्षण भुसावळला के. नारखेडे विद्यालयात झाले. त्यानंतर मुंबईला महाविद्यालयीन शिक्षण केले. एम.बी.बी.एस. केलेल्या नंतर दिल्ली येथे स्पर्धा परिक्षेची तयारी केली. 2003 पासून ते भारतीय प्रशासकीय सेवेत आहेत. प्रशासनातील वेगवेगळ्या प्रयोगातुन यंत्रणा गतीमान व प्रभावी करण्यासाठी ते ओळखले जातात. म्हणूनच सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर येथे 23 मार्चला एकाच कुटुंबातील चौघेजण कोरोनाबाधित आढळले काही दिवसांत आकडा 25 पर्यंत पोहचला. दरम्यान बाधित परिसर प्रतिबंधीत करणे, त्याच्या लागुन असलेल्या एक किलोमीटरचा परिसर बफर झोन करणे, संपर्कातील लोकांचा शोध घेणे, बाधित क्षेत्रात अत्यावश्यक सेवा घरपोच देणे. अश्या लहान-मोठ्या काटेकोर नियोजनामुळे कोरोनाची साखळी तोडण्यात बऱ्याच प्रमाणात यश आले. सुरवातीला तर लोकांना घरात राहण्याचे आवाहन करीत ते स्वत: रस्त्यावर फिरले. एप्रिल महिन्यात जिल्हा कोरोनामुक्त झाला होता. नंतर काही तालुक्यात व सांगली शहरात कोरोना रुग्ण आढळुन आले तरी त्यांची संख्या मर्यादित आहे. त्यातही 92 रुग्ण बरे होऊन घरी गेले तर सात जणांचा मृत्यू झाला. जळगाव जिल्ह्याच्या तुलनेने ही आकडेवारी खुपचं समाधानकारक आहे. यासाठी चौधरी यांना पालकमंत्री जयंत पाटील यांचे मोलाचे पाठबळ व पोलीस, आरोग्य, जिल्हापरिषद व महापालिका यांचे सहकार्य मिळाले. त्यांनी तयार केलेली डिस्ट्रिक्ट रॅपिड ऍक्शन टिम देखील कामाला आली. त्याच बरोबर चौधरी यांच्यातील उत्तम संघटन कौशल्य, धोरणाची प्रभावी अंमलबजावणी, काटेकोर नियोजन यांचा एकत्रित परिणाम सांगली जिल्ह्यात दिसून येत आहे. 

सगळ्यांना सोबत घेऊन काम
जिल्हाधिकारी डॉ. चौधरी यांचे आई-वडील व भाऊ भुसावळला राहतात. त्यांच्या आई डॉ. छाया चौधरी यांच्याशी संपर्क साधला असता त्या म्हणाल्या एकटा माणूस काही करु शकत नाही. सर्वांना सोबत घेऊन काम करावे लागते. ते कौशल्य अभिजीत कडे आहे. कामाचे विकेंद्रिकरण तो खुबीने करतो. प्रत्येक ठिकाणी रुग्णांची सोय आहे की नाही हे स्वत: जाऊन पाहतो. त्याचा मला रात्री फोन येतो त्यावेळी जळगाव जिल्ह्यातील कोरोना बाधितांची वाढती संख्या व मृत्युचा वाढता दर या विषयावर चर्चा होते. तो म्हणतो निश्र्चितच काही तरी प्रॉब्लेम असावा. तो शोधुन काढला पाहिजे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com