गिरणा धरणाच्या साठ्यात १६ टक्के वाढ 

girna dam
girna dam

भडगाव : गिरणा धरणाच्या जलसाठ्यात यंदाच्या पावसाळ्यात १६ टक्के वाढ झाली असून, पाणलोट क्षेत्रातील धरणे पूर्ण भरली नसल्याने त्यातून अद्याप विसर्ग सुरू झालेला नाही. मात्र, अजून निम्मा पावसाळा बाकी असून, धरण यंदाही शंभरी गाठण्याची शक्यता आहे. 

सद्य:स्थितीला धरणात ४७ टक्के (८६९३ दशलक्ष घनफूट) एवढा जलसाठा आहे. गेल्यावर्षी ४ ऑगस्टला धरणात १९.५० टक्के एवढा जलसाठा होता. त्यामुळे गेल्या वर्षाच्या तुलनेने यंदा २७ टक्के अधिक जलसाठा आहे. गिरणा धरणात एक जूनला ३१ टक्के जिवंत पाणीसाठा होता. दोन महिन्यात धरणात १६ टक्के जलसाठा वाढला असल्याचे गिरणा पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे गिरणा पट्ट्यात शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण असल्याचे चित्र आहे. 

विसर्ग सुरू झाल्यानंतर... 
गिरणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील धरणे अद्याप भरलेली नाहीत. त्यामुळे त्यातून अद्याप पाण्याचा विसर्ग झाला नसल्याचे चित्र आहे. मात्र पुढच्या काही दिवसांत पाऊस बरसल्यास ही धरण भरून गिरणा धरणात पाण्याचा विसर्ग येऊ शकतो. त्यामुळे धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील नाशिक जिल्ह्यातील पुनद, चणकापूर, हरणबारी, केळझर, नाग्यासाक्या ही धरण भरण्याकडे जळगाव जिल्ह्याचे लक्ष लागून आहे. 

पिण्याचा प्रश्न मिटला पण... 
सद्य:स्थितीला गिरणा धरणात ४७ टक्के एवढा उपयुक्त जलसाठा आहे. त्यामुळे गिरणेच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या १५८ ग्रामीण पाणीपुरवठा योजाना व चार पालिकेच्या पाणीपुरवठा योजनांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न मिटला आहे. मात्र, शेती सिंचनासाठी अद्याप दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. 
 

संपादन ः राजेश सोनवणे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com