भाजपचा किसान मोर्चाद्वारे शेतकऱ्यांसाठी आवाज

bjp kisan morcha
bjp kisan morcha

जळगाव : भारतीय जनता पक्षाचे नेते व माजी मंत्री गिरीश महाजन यांना नेतृत्‍वात आज शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी जळगावात जिल्हाधिकारी कार्यालयावर किसान मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाने शेतकऱ्यांचा आवाज शासनापर्यंत पोहचविण्याचे काम विरोधातील भाजपने केले.


भाजपतर्फे करण्यात आलेल्‍या आंदोलनाद्वारे प्रामुख्याने पिक विमा योजनेचे निकष त्वरीत बदलावेत, शेतकऱ्यांना नुकसान भरपाई त्वरीत द्यावी, कापूस खरेदी केंद्रे त्वरीत सुरू करावी; यासारख्या मागण्या करण्यात आल्‍या. याकरीता भाजपने जिल्हाधिकारी कार्यालयवर किसान मोर्चा काढला. या मोर्चात खासदार रक्षा खडसे, भाजप जिल्हाध्यक्ष तथा आमदार सुरेश भोळे, आमदार संजय सावकारे आदी उपस्थित होते. शेतकऱ्यांच्या विविध मागण्याचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. 

सरकारविरोधी घोषणाबाजी
शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळालीच पाहिजे, केळी पिक विम्याचे निकष त्वरीत बदला, शेतकऱ्यांच्या पिकाला भाव मिळालाच पाहिजे, जो सरकार निक्कमी है, वो सरकार बदलनी है! अशा राज्य सरकारविरोधात घोषणा दिल्या. यावेळी आमदार गिरीश महाजन म्हणाले, की राज्य सरकारने पिक विम्याचे निकष बदलून शेतकऱ्यांवर अन्याय केला आहे. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांना अद्यापही भरपाई मिळालेली नाही. राज्यातील हे सरकार शेतकऱ्यावर अन्याय करत असल्‍याचा आरोप त्यांनी केला. खासदार रक्षा खडसे यांनी राज्यातील मंत्र्यानी केंद्रांतील शासनाने जो आदेश काढला आहे. त्याबाबत अभ्यास करण्याची गरज आहे. केंद्राने केळी पिक विम्याबाबत काय अध्यादेश काढला आहे. त्याचा आभ्यास करण्याचे अवाहन केले.


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com