खडसेंच्या जाण्याने पक्षावर परिणाम नाही : गिरीश महाजन 

girish mahajan
girish mahajan

जळगाव : एकनाथ खडसे यांच्याबाबत जे निर्णय घेण्यात आले आहेत, ते फडणविसांचे नव्हे, तर पक्षाच्या नेतृत्वाचे आहेत. त्यामळे फडणवीस यांच्यावर केलेले आरोप चुकीचे आहेत, असे मत भारतीय जनता पक्षाचे नेते गिरीश महाजन यांनी व्यक्त केले. खडसे यांच्या जाण्यामुळे पक्षावर काहीही फरक पडणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. 
खडसे यांनी भाजपचा त्याग करताना फडणवीस यांच्यामुळे पक्ष सोडत असल्याचे म्हटले होते. खडसे यांच्या आरोपाचे महाजन यांनी खंडन केले. ते म्हणाले, की खडसे यांच्याबाबत जे निर्णय घेण्यात आले, ते एकट्या देवेंद्र फडणवीस यांचे नव्हते, ते सर्व निर्णय वरिष्ठ पातळीवरील नेत्यांचे होते. फडणवीस हे नेते असल्याने त्यांनी त्याची अंमलबजावणी केली एवढेच. त्यामुळे फडणवीस यांच्यावर आरोप करणे चुकीचे आहे. खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशामुळे भाजपचे राज्यात, जिल्ह्यात मोठे नुकसान होईल, असे सांगितले जात असल्याच्या वृताचेही त्यांनी खंडन केले. ते म्हणाले, की याआधीही देश पातळीवर भाजपमधून अनेक नेते सोडून गेले आहेत. त्यामुळे पक्षावर कोणताही फरक पडला नाही. उलट हेच नेते भाजपत परत आले. त्यामुळे खडसे यांच्या जाण्यामुळे काहीही तोटा होणार नाही. उलट पक्षात नवीन लोकांना संधी मिळेल. त्यामुळे पक्ष अधिकच बळकट झालेला दिसणार आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com