रावेर (जळगाव) : आयकर भरत असूनही केंद्र शासनाच्या पंतप्रधान किसान सन्मान योजनेचे अनुदान घेणाऱ्या तालुक्यातील १ हजार १७१ शेतकऱ्यांना तहसीलदार कार्यालयाने पंधरा दिवसांत घेतलेले अनुदान परत करण्याचे निर्देश नोटिशीद्वारे दिले आहेत.
नोटिशीत म्हटले आहे, की पी. एम. किसान योजनेच्या निकषाप्रमाणे आयकर भरणाऱ्या व्यक्ती या योजनेस पात्र नाहीत. केंद्र शासनाने पात्र लाभार्थ्यांपैकी आयकर भरणाऱ्या लाभार्थ्यांची यादी जिल्हा प्रशासनास उपलब्ध करून दिलेली आहे. या यादीत आपले नाव समाविष्ट असल्याने आपण योजनेत पात्र असू शकत नाही. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेंतर्गत आपण घेतलेल्या रकमा पंधरा दिवसांच्या आत धनादेशाद्वारे तहसीलदार कार्यालयात जमा कराव्यात. पंधरा दिवसात या रकमा जमा न झाल्यास सक्तीची वसुली करण्याचा इशारा नोटीसमध्ये देण्यात आला आहे.
घेतलेले अनुदान कोटींवर
तालुक्यातील आयकर भरणाऱ्या १ हजा१७१ शेतकऱ्यांनी आतापर्यंत १ कोटी १५ लाख ६८ हजार रुपयांचे अनुदान घेतले आहे. यातील शेतकऱ्यांनी या अनुदानाचे दोन ते सहा हप्ते घेतले आहेत. यामुळे या शेतकऱ्यांना दोन ते बारा हजार रुपये अनुदान परत द्यावे लागणार आहे.
संपादन ः राजेश सोनवणे
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.