नशिराबाद (जि. जळगाव) : नशिराबाद येथे ग्रामपंचायत जाऊन नगरपरिषद झाली. पण गावची पाणी समस्या जशीची तशीच आहे. वर्षभरापासून नगरपरिषद नागरिकांना वेळेवर पाणीपुरवठा करू शकलेली नाही. मानवी चुकांमुळे ही कृत्रिम टंचाई निर्माण झाली असून त्यावर उपाय न केल्यास जलआक्रोश मोर्चा काढण्याचा इशारा भाजपने दिला आहे.
पाणी पुरवठ्याचे नियोजन नसणे, पाणी पंप वारवार दुर्लक्षित चुकांमुळे जळणे, पाणीपुरवठा स्त्रोतावरती अत्यावश्यक वेळी अतिरिक्त पाणी पंप उपलब्ध नाही, कर्मचारी वर्गात पाणी पुरवठ्याचे नियोजन नाही, शहराला होत असलेल्या पाणी पाणीपुरवठ्या बाबत कर्मचारी / सुपवायजर यांच्या नोंद वहीत नोंदी नाहीत, रात्री - बेरात्री पाणी पुरवठा करणे, शहराला होणार्या पाणी पुरवठा बाबत नागरिकाना पूर्व सूचना दिली न जाणे यासह इतर बाबींमुळे शहरात १०-१२ दिवसाआड पाणी येत असून कृत्रिम टंचाई निर्माण झाली आहे. नागरिकांना प्रचंड त्रास होत आहे.
पाणीपट्टीत हवी सवलत
या स्थितीत नशिराबाद मधील नागरिकांना पाणीपट्टीत ५० % सरसकट सूट मिळावी तसेच सुरु असलेली सक्तीची वसुली करण्यात येऊ नये. ८ दिवसांत नियमित पाणी पुरवठ्याचे नियोजन न केल्यास भाजपतर्फे नगरपरिषदेवर जलआक्रोश मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. निवेदनावर भाजप शहराध्यक्ष प्रदीप बोढरे, भाजयुमो सरचिटणीस ललीत बऱ्हाटे सह भाजपा कायकत्यांच्या सह्या आहेत.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.