कोकणात शेतकऱ्यांच्या नुकसानभरपाईचे 25 लाख प्राप्त

25 lakh received for farmers in ratnagiri konkan
25 lakh received for farmers in ratnagiri konkan

राजापूर (रत्नागिरी) : पाऊस आणि चक्रीवादळाचा तडाखा बसून भातशेतीच्या झालेल्या नुकसानीची शेतकऱ्यांना भरपाई देण्यासाठी तालुक्‍याला सुमारे 25 लाखाचा नुकसानभरपाईचा तिसरा हप्ता प्राप्त झाला आहे. याचा लाभ आपद्‌ग्रस्त शेतकऱ्यांना होणार असल्याची माहिती महसूल विभागाने दिली. नुकसानभरपाईच्या अनुदानाच्या रक्कमेचे महसूल विभागाकडून आपद्‌ग्रस्त शेतकऱ्यांना लवकरच वितरण सुरू होणार आहे. 

भातशेती कापणीच्या ऐन हंगामाच्यावेळी पावसाने धुमाकूळ घातला. त्याला चक्रीवादळाची जोड मिळाली. त्यातून तालुक्‍यातून वाहणाऱ्या अर्जुना-कोदवली नद्यांना पूर येवून भातशेतीचे अतोनात नुकसान झाले. नद्यांच्या काठावरील अनेक शेतकऱ्यांची भातशेती आणि झोडणी करून शेतामध्ये ठेवलेल्या धान्याच्या पिशव्या पुराच्या पाण्यामध्ये वाहून गेल्या होत्या.

भातशेतीसह नागली पिकांच्या नुकसानीचे पंचनामे झाले होते. त्याचा अहवाल शासनाला पाठविण्यात आला होता. शासनाने आपद्‌ग्रस्त शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्याचे जाहीर केले होते. आपद्‌ग्रस्त शेतकऱ्यांसाठी सुमारे 1 कोटी 50 लाख 80 हजार रुपयांच्या भरपाईची रक्कम प्राप्त झाली. त्यापैकी 1 कोटी 47 लाख 88 हजार 450 रुपये खर्ची पडले असून अद्याप 2 लाख 91 हजार 550 रुपयांचे अनुदान शिल्लक आहे. त्यानंतर आता नुकसानभरपाईच्या अनुदानाचा सुमारे 25 लाखाचा तिसरा हप्ता प्राप्त झाला आहे. 

दृष्टीक्षेपात राजापूर 

  • एकूण गावे ः 230
  • भातशेतीचे बाधित क्षेत्र ः 116,40.87 हेक्‍टर
  • आपद्‌ग्रस्त शेतकरी ः 6771
  • मंजूर अनुदान ः 1 कोटी 50 लाख 80 हजार रुपये 
  • वितरण अनुदान ः 1 कोटी 47 लाख 88 हजार 450 रुपये
  • वितरण सुरू असलेले अनुदान ः 2 लाख 91 हजार 550 रुपये

संपादन - स्नेहल कदम 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com