कमळ फुलल्याचा भास, नेतृत्वाची छबी पाण्यातच

कमळ फुलल्याचा भास, नेतृत्वाची छबी पाण्यातच

चिपळूण - रत्नागिरी जिल्ह्यात भाजप वाढवण्यासाठी संघटनेकडून स्थानिक नेत्यांना ताकद देण्यात आली. साडेचार वर्षात कमळ फुलल्याचा भास झाला. मात्र, स्थानिक पातळीवर लोकप्रिय नेतृत्व निर्माण झाले नाही. लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजण्याला अवघा महिना उरला आहे. स्वतंत्र लढायचे झाल्यास भाजपकडे लोकप्रिय उमेदवार नाही. शिवसेनेतून आलेल्या सुरेश प्रभूंना निवडणुकीच्या रिंगणात उतरविले तरी विजयापर्यंत पोचण्याचे त्यांच्यासमोर आव्हान आहे.  

राज्यात एकहाती विजय मिळाल्यानंतर कोकणातील लोकसभेच्या दोन व विधानसभेच्या १२ मतदार संघावर भाजपने लक्ष केंद्रित केले होते. पक्षाध्यक्ष अमित शाह यांनी स्थानिक पदाधिकाऱ्यांना कानमंत्र दिल्यानंतर मोठ्या आत्मविश्‍वासाने पदाधिकाऱ्यांनी कामाला सुरवात केली. साडेचार वर्षे संघटन बांधणीसाठी जिल्ह्यात काम झाले. त्यातून कार्यकर्त्यांची फौजही तयार झाली. मात्र, जिल्ह्यामध्ये भाजपला लोकसभेसाठी चेहरा लोकांसमोर आणता आलेला नाही.

राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, आमदार प्रसाद लाड हेच जिल्ह्याची धुरा सांभाळत असल्याचे चित्र आहे. उमेदवार नाही तर मला मतदान करा, असे आवाहन पंतप्रधान नागरिकांना करत आहेत. 
परंतु, कोणाच्या माध्यमातून मोदींना मत द्यायचे, हे अद्याप नागरिकांसमोर आलेले नाही. युतीचा तिढा न सुटलेल्यामुळे संभ्रम कायम आहे. या परिस्थितीमुळे भाजपचा मतदार व कार्यकर्त्यानाही अद्याप दिशा स्पष्ट झालेली नाही. 

रत्नागिरी- सिंधुदुर्ग मतदारसंघासाठी सेनेकडून खासदार विनायक राऊत यांची उमेदवारी निश्‍चित आहे. राऊत यांनी प्रमुख व्यक्तींच्या भेटीगाठी सुरू केल्या आहेत. आचारसंहिता लागू झाल्यावर निवडणुकीची धामधूम वाढणार आहे. कोणत्या टप्प्यात निवडणुका होतात, यावरही प्रचारासाठी मिळणारा वेळ अवलंबून असणार आहे. इच्छुकांसाठी सध्याचा कालावधी अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com