दोषींवर कारवाईचा पालकमंत्र्यांचा इशारा, काय आहे प्रकरण?

bridge work issue kankavli konkan sindhudurg
bridge work issue kankavli konkan sindhudurg

कणकवली (सिंधुदुर्ग) - कणकवलीत उड्डाणपुलाची भिंत कोसळली ही गंभीर बाब आहे. या घटनेची सक्षम अधिकाऱ्यांमार्फत चौकशी केली जाईल. त्यात जे कोणी दोषी आढळतील, त्यांच्यावर निश्‍चितपणे कारवाई होईल, अशी ग्वाही पालकमंत्री उदय सामंत यांनी आज येथे दिली. 

कणकवलीतील उड्डाणपुलाची संरक्षक भिंत दोन दिवसांपूर्वी कोसळली होती. त्या घटनेची पाहणी पालकमंत्री उदय सामंत यांनी आज केली. जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, जिल्हा पोलिस अधीक्षक दीक्षित गेडाम, आमदार वैभव नाईक, प्रांताधिकारी वैशाली राजमाने, अधीक्षक अभियंता सलीम शेख, तांत्रिक सल्लागार श्री. सिंग, संदेश पारकर, संजय पडते, अतुल रावराणे, सुशांत नाईक, कन्हैया पारकर, शैलेश भोगले आदी उपस्थित होते. 

पालकमंत्री म्हणाले, ""कणकवलीतील उड्डाणपूल जोड रस्त्याचे काम निकृष्ट झाल्याच्या तक्रारी कणकवलीवासीयांनी केल्या होत्या. त्यानंतर प्रांताधिकाऱ्यांनी महामार्ग अधिकारी आणि ठेकेदार प्रतिनिधींची संयुक्त बैठक बोलावून कामातील त्रुटी दूर करण्याचे निर्देश दिले होते, तरीही त्याकडे दुर्लक्ष करून ठेकेदाराने पुढील काम सुरू ठेवले ही अत्यंत गंभीर बाब आहे. त्यामुळेच या घटनेची संपूर्ण चौकशी करून दोषींवर करवाई व्हावी यासाठी आग्रही भूमिका घेतली आहे. 

गडकरींशी चर्चा करणार 
शहरातील बॉक्‍सेलचे काम अत्यंत निकृष्ट झाले आहे. त्यामुळे बॉक्‍सेल हटवून जानवली पुलापर्यंत उड्डाणपूल विस्तारित करावा, अशी कणकवलीतील नागरिकांसह लोकप्रतिनिधींची मागणी आहे. या मागणीबाबत खासदार विनायक राऊत यांच्या माध्यमातून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी चर्चा करणार आहे, अशी माहिती पालकमंत्री सामंत यांनी दिली. 

संपादन ः राहुल पाटील

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com