ब्रेकिंग- तबलिगीहून रत्नागिरीत आलेला 'तो' कोरोना पॉझिटीव्ह 

corona positive case in ratnagiri
corona positive case in ratnagiri

रत्नागिरी - रत्नागिरीत कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळल्यामुळे प्रशासकीय यंत्रणेला धक्का बसला आहे. रत्नागिरी शहरातील राजीवडा परिसरात मुंबईतून आलेली एक व्यक्ती दिल्लीतील मरकझमध्ये सहभागी झाली होती. त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले असता त्यांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यानंतर राजीवडा परिसर सील करण्याची तयारी जिल्हा प्रशासनाकडून सुरु केली आहे.


यासंदर्भातील माहिती देण्यासाठी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हुराज बगाटे आदी उपस्थित होते. राजीवडा येथील पॉझिटीव्ह व्यक्ती 17 मार्चला कोचीवल्ली एक्स्प्रेसने मुंबईहून रत्नागिरीत दाखल झाली. त्यापूर्वी दिल्लीतील मरकजमध्ये त्यांनी सहभाग घेतला होता. रत्नागिरीत आल्यानंतर राजीवडा येथील मशीदीत ती व्यक्ती आणि त्यांचे चार सहकारी वास्तव्याला होते. लोकवस्तीपासून काही अंतरावर त्यांचे वास्तव्य असल्याचे पुढे आले आहे. त्या व्यक्तीबरोबर कोकण रेल्वेतून आलेल्यांपैकी 10 जण चिपळूण, 17 जण रत्नागिरीत तर 24 जणं सिंधुदुर्ग स्थानकावर उतरले आहेत. त्यांचा शोध घेण्याचे काम युध्दपातळीवर सुरु आहे. पॉझिटीव्ह आढळलेल्या व्यक्तीची माहिती स्थानिक नागरिकांकडून देण्यात आलेली नव्हती. पोलिसांच्या गुप्त माहितीच्या आधारावर त्या व्यक्तीला राजीवडा येथून जिल्हा शासकीय रुग्णालयात आणले गेले होते. शुक्रवारी त्यांचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर प्रशासनाकडून पुढील कार्यवाही सुरु करण्यात आली आहे. राजीवडा परिसरातील तीन किलोमीटरचा भाग सील करण्याच्या हालचाली सुरु आहेत. त्या रुग्णाला जिल्हा रुग्णालयात आयसोलेशन वॉर्डमध्ये ठेवण्यात आले आहे. या परिसरामध्ये पालिका आणि जिल्हा परिषद आरोग्य विभागाकडून जनजागृतीवर भर दिला जात आहे. 

रेल्वे प्रवासात ती व्यक्ती कुठे थांबली याचा शोध घेण्याचे काम सुरु आहे. 
दिल्लीतील तबलिगी कार्यक्रमात सहभागी झालेल्यांमधील रत्नागिरीतील 11 जणांना उपचारासाठी दाखल केले असून त्यातील एकाचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. उर्वरितांचा अहवाल तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे. गेल्या दहा दिवसांमध्ये मृत झालेल्यांची यादी तयार करण्याचे काम सुरु आहे. त्यांच्या मृत्यूचे कारणही शोधण्यात येणार आहे. तबलिंगसंदर्भात यादी तयार करण्याचे काम सुरु असून विविध जमातींची लोक रत्नागिरीत दाखल झालेली आहेत. त्यांची यादी पोलिसंानी तयार केली आहे. त्यात मुंबईतून सात, नवी मुबंईतून 17, जामा मशिदीतून 14, डोंगरीपाडा येथून 12 लोक आले आहेत. दिल्लीतूनही एक जमात रत्नागिरीत आली होती; परंतु ती लोकं फेबु्रवारीत रत्नागिरीत आली होती. सध्या विविध भागातून आलेल्या लोकांनी माहिती लपविल्यास त्यांची गय करणार नाही, असा इशारा जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे यांनी दिला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com